* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EK DIWA VIZATANA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984699
  • Edition : 5
  • Publishing Year : APRIL 1986
  • Weight : 180.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TALES LIKE THE TITLE STORY OF THIS COLLECTION BELONG TO THE GENRE OF INEXPLICABLE MYSTERIES. ‘CHAUTHI KHIDAKI’ IS A FANTASTIC SCIENTIFIC TALE BUILT AROUND THE CONCEPT OF TIME. ‘PORKHEL’ USES THEANALOGY OF A CHILDAT PLAY WITH HER DOLLS, TO HIGHLIGHT THAT HUMAN BEINGS ARE MERE PAWNS IN THE HANDS OF FATE. ‘SUCHETA CHAKRAPANI ANI TICHA KOKILKANTH’ TACKLES THE TANGLE BETWEEN AN ARTISTE AND HER ART – A FANTASTIC RENDERING REMINISCENT OF MAGICAL REALISM. MATKARI’S STORIES GIVE US THE FEELING OF ENTERING A JUNGLE AT DUSK. THE READER BEGINS HIS JOURNEY ALONG THE BORDER THAT SEPARATES REALITY FROM FANTASY. MATKARI EMPLOYS DIFFERENT NARRATIVE STYLES AND STRUCTURE TO LEAD THE READER ALONG FAMILIAR AS WELL AS UNFAMILIAR PATHS IN THIS JUNGLE.WHILE BEING IMMENSELY ATTRACTIVE, THIS JOURNEY TAKES THE READER INTO EVER DEEPER REGIONS.
या संग्रहातल्या ‘एक दिवा विझताना’सारख्या कथा न आकळणारी गूढरहस्ये या सूत्राभोवती फिरतात. ‘चौथी खिडकी’ ही एक अफलातून विज्ञानकथा ‘काळ’ या संकल्पनेभोवती रचली आहे, तर ‘पोरखेळ’सारख्या कथेमधून मानवाचे नियतीच्या हातातले बाहुले असणे, हे सूत्र बाळाच्या बाहुल्यांशी खेळण्याच्या प्रतीकातून सूचित केले आहे. कलावंत आणि कला यांच्यातला तिढा मांडणारी ‘सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळकंठ’ ही कथा एक उत्कृष्ट पँÂटसी ठरते; ती जादुई वास्तववादाची आठवण करून देते. संधिप्रकाशातल्या धूसर वातावरणात एखाद्या अरण्यात शिरावे, तसे मतकरी यांच्या कथा वाचताना वाटते. वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर प्रवास सुरू होतो. वाचकांना या अरण्यातल्या कळलेल्या, न कळलेल्या वाटांकडे नेण्यासाठी मतकरी कथनाचे वेगवेगळे घाट, निवेदनशैली यांचा वापर करतात. हा प्रवास विलक्षण आकर्षक असतोच; पण तो आत आत खोलातही नेतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarOmkar Dilip Bagal

    एक दिवा विझताना - रत्नाकर मतकरी (समीक्षण - ओंकार दिलीप बागल) प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या - १२८ पाने किंमत - १९० रुपये मुखपृष्ठ - या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर काळोख्या अंधाराचे चित्र आहे. हा अंधार म्हणजेचं दिवा विझल्यानंत होणारा गर्द काळोख. विझलेल्या दिव्याचं आणि त्यामुळे पसरलेल्या या अंधाराचं अनैसर्गिक गूढ यातून समोर येतं. शुभ्र सफेद वस्त्रावर सांडलेला रक्ताचा पसरट डाग हा मृत्यूसंबंधित घटनेचा संकेत देण्याचा प्रयत्न करतो. अंधार, काळोख, रक्ताचा डाग या सर्व गोष्टी, माणसाच्या शेवटच्या प्रवासातील बाबी, कथासंग्रहातील भयावह घटनांचे सूचक असल्याचं लक्षात येतं. प्रस्तूत कथासंग्रह `एक दिवा विझताना` हा लेखक रत्नाकर मतकरी यांचा एक अभूतपूर्व साहित्याचा नमूना आहे. याशिवाय लेखकांची अ‍ॅडम, कबंध, खेकडा, निजधाम, निर्मनुष्य, परदेशी, पानगळीचं झाड अशी बरीच कथासंग्रहे प्रकाशित झाली आहेत. `एक दिवा विझताना` या कथासंग्रहात एका पेक्षा एक सर्रास ठरणाऱ्या एकूण सात संकीर्ण कथा आहेत. या सर्व कथा वाचकाला निश्चितचं बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. प्रत्येक कथा वाचत असताना एका अनोख्या गोष्टीचे गूढ उकलत जाते. विज्ञाननिष्ठ तत्वांची पायमल्ली न करता मानवाच्या चाकोरीबद्ध बुद्धीला आव्हान देणाऱ्या काही शक्तींचा लेखकांनी परिचय करून दिला आहे. भौतिक जगात प्रमाण मानलं जाणाऱ्या विज्ञानासोबतचं मानवी पंचेंद्रियांच्या जाणिवांवर आधारलेल्या काही अपरिचित शक्तींचा अनुभव लेखकांनी मांडलेला आहे. गृहीत न धरलेल्या मानवी मनाच्या सामर्थ्यास केंद्रबिंदू ठेवून परलोकाचा अभ्यास म्हणजे विज्ञानाच्या काही अंशी पलीकडे जाण्यासारखचं. अशा गोष्टींचा उहापोह करण्यासाठी लागणारं विज्ञान या क्षणाला ठाऊक नसलं तरी भविष्यात पाश्चात्य संशोधक याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतील असं वाचताना आपलं मत तयार होत जातं. या कथासंग्रहातील पहिल्याचं कथेत अ‍ॅनिमियाचा प्रादुर्भाव झालेला एक तरुण मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या धाकट्या भावाला एका अगम्य शक्तीचा परिचय होतो. डॉक्टरांनीसुद्धा त्याच्याकडे वेळ कमी असल्याचं नमूद केलेलं असतं. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी कि मानवी मनाची शक्ती सांगणारं हे रहस्य त्या रुग्णाचे काही काळासाठी आयुष्य वाढवतं. वैद्यकीय चिकित्सकेतसुद्धा ही गोष्ट अचंबित करणारी आहे. मानवी मनाच्या सुप्त शक्तीवर लिहिलेली ही कथा वाचकाला सुन्न करून टाकते. कथासंग्रहातील "अशब्द" ही कथा भावनिक पातळीवर लिहिली गेली असून, दोन मानवी मनांचा होणारा सवांद आणि त्यासंबंधित घडलेल्या नैसर्गिक घटनांचा उल्लेख या कथेतून अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या मांडला आहे. टेलीपॅथीनुसार दोन माणसं प्रत्यक्षात न बोलता मनातल्या विचारांचे दुसऱ्या मनापर्यंत संप्रेषण करू शकतात. परंतू त्यासाठी माणूस जिवंत असायला हवा, कारण या कथेतील पात्र मृत व्यक्तीशी संभाषण कशी काय करू शकते हे समजण्याच्या खूप पलीकडे आहे. "चौथी खिडकी" ही कथा टाईम ट्रॅवेल वा भविष्य भ्रमण करणाऱ्या संशोधनाचा एक सुंदर अनुभव देणारी कथा म्हणून वाचकांच्या पसंत पडेल याची खात्री आहे. भविष्य भ्रमण याविषयी अनेक देशांत संशोधन चालू असल्याचं कित्येक वैज्ञानिक लेखांत आपल्याला वाचायला मिळतं, त्यामूळे वाचकाला ही कथा रुचण्यास अधिक मदत होईल. याशिवाय "रूममेट" ही कथा वाचताना कंटाळवाणी वाटत असली तरी तिचा शेवट तितकाच अकल्पित आणि भयावह आहे. कथेची नायिका अनावधनाने तिच्या मैत्रिणीचा खून करते आणि यामागे तिचं मानसिक आजारपण असतं. मानसिक विकारातून एखाद्याचा खून करण्याइतपत बुद्धी भ्रष्ट होऊ शकते याबद्दल अलीकडेचं संशोधन झालेलं आहे. लहानपणीचा "पोरखेळ" कधी आपल्या जीवनाचा अकल्पित भाग बनू शकतो, याची प्रचिती एका कथेतून वाचकांना मिळते. मानवाचे नियतीच्या हातातले बाहुले असणे, हे सूत्र बाळाच्या बाहुल्यांशी खेळण्याच्या प्रतीकातून सूचित केले आहे. कलावंत आणि कला यांच्यातला तिढा मांडणारी ‘सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळकंठ’ ही कथा एक उत्कृष्ट फँटसी आहे, ही कथा वाचकाला जादुई वास्तववादाची आठवण करून देते. म्हणजे असं खरंचं झालं तर माणसाच्या स्वतंत्र बुद्धिप्रणालीला काही महत्वचं उरणार नाही एवढं नक्की. "नाईटमेअर" ही कथा आपल्या आयुष्यातील सहज घडणाऱ्या घटनेचा उत्तरार्ध कसा होऊ शकतो हे सांगत त्याचा माणसाच्या एकंदर आयुष्यावर कशा प्रकारे आघात होऊ शकतो याचं गांभीर्य लक्षात आणून देते. या सर्व कथांकडे बारकाईने पाहिल्यास असं लक्षात येतं कि लेखकांनी माणसाच्या मृत्यूच्या मार्गात घडत असलेल्या काही गोष्टींचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवा विझत असताना नेमकं काय होत असेल एवढंच सांगून मतकरी थांबत नाहीत तर जीवित व्यक्ती आणि मृत व्यक्ती यांना प्रत्यक्षात एकरूप करून सोडतात. मृत्यूसंदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या किंवा सध्याच्या काळात संशोधनात्मक पातळीवर असलेल्या वैज्ञानिक गोष्टींच्या आधारे या कथा लिहिलेल्या आहेत. मुळात सध्या आपण ज्यास अकल्पित असं संबोधत आहे, त्या गोष्टी भविष्यात प्रत्यक्षात अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्याचा आधार वैज्ञानिक सिद्धांत असून त्या केवळ मानवी आकलनक्षमतेच्या बाहेर आहेत एवढंचं. अशा प्रकारे, रत्नाकर मतकरींचा "एक दिवा विझताना" हा कथासंग्रह म्हणजे लेखकांचा कोणत्याही गोष्टीचा "शेवट" प्रचंड विलक्षण, थोडंसं विचित्र आणि अद्वितीय करण्याचा हातखंडा वाचकांच्या लक्षात येतो. संधिप्रकाशातल्या धूसर वातावरणात एखाद्या अरण्यात शिरावे, तसे मतकरी यांच्या कथा वाचताना वाटते. वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर प्रवास सुरू होतो. वाचकांना या अरण्यातल्या कळलेल्या, न कळलेल्या वाटांकडे नेण्यासाठी रत्नाकर मतकरी कथनाचे वेगवेगळे घाट, निवेदनशैली यांचा वापर करतात. हा प्रवास विलक्षण आकर्षक असतोच, पण तो आत आत खोलातही नेतो. "एक दिवा विझताना" या कथासंग्रहाविषयी मतकरी म्हणतात, "मी सांगत आहे, त्या घटनेमागचे गूढ कधी उलगडेल, तेव्हा खरे. त्याचे स्पष्टीकरण भविष्यात मिळेल. आजच्या आपल्या तुटपुंज्या ज्ञानाच्या कक्षेत ते बसत नाही." लेखकांच्या विधानांशी समर्पक असणाऱ्या या कथा मात्र मानवी कल्पनाशक्तीची सर्व दारे नक्कीच खिळखिळी करून ठेवतात. -©ओंकार दिलीप बागल (7506582341/ bagalomkar2@gmail.com) ...Read more

  • Rating StarNarendra Gaikwad

    रत्नाकर मतकरी म्हणजे गुढ कथांचे राजेच...

  • Rating StarNeeten Vaidya

    यातली अशब्द ही कथा अप्रतिम आहे.

  • Rating StarNagesh Dhawade

    ज्याने हे पुस्तक वाचलं असेल तो ते कधीही विसरणार नाही.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more