* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EK DIWA VIZATANA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984699
  • Edition : 6
  • Publishing Year : APRIL 1986
  • Weight : 180.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TALES LIKE THE TITLE STORY OF THIS COLLECTION BELONG TO THE GENRE OF INEXPLICABLE MYSTERIES. CHAUTHI KHIDAKI IS A FANTASTIC SCIENTIFIC TALE BUILT AROUND THE CONCEPT OF TIME. PORKHEL’ USES THEANALOGY OF A CHILDAT PLAY WITH HER DOLLS, TO HIGHLIGHT THAT HUMAN BEINGS ARE MERE PAWNS IN THE HANDS OF FATE.SUCHETA CHAKRAPANI ANI TICHA KOKILKANTH TACKLES THE TANGLE BETWEEN AN ARTISTE AND HER ART – A FANTASTIC RENDERING REMINISCENT OF MAGICAL REALISM. MATKARI’S STORIES GIVE US THE FEELING OF ENTERING A JUNGLE AT DUSK. THE READER BEGINS HIS JOURNEY ALONG THE BORDER THAT SEPARATES REALITY FROM FANTASY. MATKARI EMPLOYS DIFFERENT NARRATIVE STYLES AND STRUCTURE TO LEAD THE READER ALONG FAMILIAR AS WELL AS UNFAMILIAR PATHS IN THIS JUNGLE.WHILE BEING IMMENSELY ATTRACTIVE, THIS JOURNEY TAKES THE READER INTO EVER DEEPER REGIONS.
या संग्रहातल्या ‘एक दिवा विझताना’सारख्या कथा न आकळणारी गूढरहस्ये या सूत्राभोवती फिरतात. ‘चौथी खिडकी’ ही एक अफलातून विज्ञानकथा ‘काळ’ या संकल्पनेभोवती रचली आहे, तर ‘पोरखेळ’सारख्या कथेमधून मानवाचे नियतीच्या हातातले बाहुले असणे, हे सूत्र बाळाच्या बाहुल्यांशी खेळण्याच्या प्रतीकातून सूचित केले आहे. कलावंत आणि कला यांच्यातला तिढा मांडणारी ‘सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळकंठ’ ही कथा एक उत्कृष्ट फॅन्टसी ठरते; ती जादुई वास्तववादाची आठवण करून देते. संधिप्रकाशातल्या धूसर वातावरणात एखाद्या अरण्यात शिरावे, तसे मतकरी यांच्या कथा वाचताना वाटते. वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर प्रवास सुरू होतो. वाचकांना या अरण्यातल्या कळलेल्या, न कळलेल्या वाटांकडे नेण्यासाठी मतकरी कथनाचे वेगवेगळे घाट, निवेदनशैली यांचा वापर करतात. हा प्रवास विलक्षण आकर्षक असतोच; पण तो आत आत खोलातही नेतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarOmkar Dilip Bagal

    एक दिवा विझताना - रत्नाकर मतकरी (समीक्षण - ओंकार दिलीप बागल) प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या - १२८ पाने किंमत - १९० रुपये मुखपृष्ठ - या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर काळोख्या अंधाराचे चित्र आहे. हा अंधार म्हणजेचं दिवा विझल्यानंत होणारा गर्द काळोख. विझलेल्या दिव्याचं आणि त्यामुळे पसरलेल्या या अंधाराचं अनैसर्गिक गूढ यातून समोर येतं. शुभ्र सफेद वस्त्रावर सांडलेला रक्ताचा पसरट डाग हा मृत्यूसंबंधित घटनेचा संकेत देण्याचा प्रयत्न करतो. अंधार, काळोख, रक्ताचा डाग या सर्व गोष्टी, माणसाच्या शेवटच्या प्रवासातील बाबी, कथासंग्रहातील भयावह घटनांचे सूचक असल्याचं लक्षात येतं. प्रस्तूत कथासंग्रह `एक दिवा विझताना` हा लेखक रत्नाकर मतकरी यांचा एक अभूतपूर्व साहित्याचा नमूना आहे. याशिवाय लेखकांची अ‍ॅडम, कबंध, खेकडा, निजधाम, निर्मनुष्य, परदेशी, पानगळीचं झाड अशी बरीच कथासंग्रहे प्रकाशित झाली आहेत. `एक दिवा विझताना` या कथासंग्रहात एका पेक्षा एक सर्रास ठरणाऱ्या एकूण सात संकीर्ण कथा आहेत. या सर्व कथा वाचकाला निश्चितचं बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. प्रत्येक कथा वाचत असताना एका अनोख्या गोष्टीचे गूढ उकलत जाते. विज्ञाननिष्ठ तत्वांची पायमल्ली न करता मानवाच्या चाकोरीबद्ध बुद्धीला आव्हान देणाऱ्या काही शक्तींचा लेखकांनी परिचय करून दिला आहे. भौतिक जगात प्रमाण मानलं जाणाऱ्या विज्ञानासोबतचं मानवी पंचेंद्रियांच्या जाणिवांवर आधारलेल्या काही अपरिचित शक्तींचा अनुभव लेखकांनी मांडलेला आहे. गृहीत न धरलेल्या मानवी मनाच्या सामर्थ्यास केंद्रबिंदू ठेवून परलोकाचा अभ्यास म्हणजे विज्ञानाच्या काही अंशी पलीकडे जाण्यासारखचं. अशा गोष्टींचा उहापोह करण्यासाठी लागणारं विज्ञान या क्षणाला ठाऊक नसलं तरी भविष्यात पाश्चात्य संशोधक याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतील असं वाचताना आपलं मत तयार होत जातं. या कथासंग्रहातील पहिल्याचं कथेत अ‍ॅनिमियाचा प्रादुर्भाव झालेला एक तरुण मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या धाकट्या भावाला एका अगम्य शक्तीचा परिचय होतो. डॉक्टरांनीसुद्धा त्याच्याकडे वेळ कमी असल्याचं नमूद केलेलं असतं. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी कि मानवी मनाची शक्ती सांगणारं हे रहस्य त्या रुग्णाचे काही काळासाठी आयुष्य वाढवतं. वैद्यकीय चिकित्सकेतसुद्धा ही गोष्ट अचंबित करणारी आहे. मानवी मनाच्या सुप्त शक्तीवर लिहिलेली ही कथा वाचकाला सुन्न करून टाकते. कथासंग्रहातील "अशब्द" ही कथा भावनिक पातळीवर लिहिली गेली असून, दोन मानवी मनांचा होणारा सवांद आणि त्यासंबंधित घडलेल्या नैसर्गिक घटनांचा उल्लेख या कथेतून अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या मांडला आहे. टेलीपॅथीनुसार दोन माणसं प्रत्यक्षात न बोलता मनातल्या विचारांचे दुसऱ्या मनापर्यंत संप्रेषण करू शकतात. परंतू त्यासाठी माणूस जिवंत असायला हवा, कारण या कथेतील पात्र मृत व्यक्तीशी संभाषण कशी काय करू शकते हे समजण्याच्या खूप पलीकडे आहे. "चौथी खिडकी" ही कथा टाईम ट्रॅवेल वा भविष्य भ्रमण करणाऱ्या संशोधनाचा एक सुंदर अनुभव देणारी कथा म्हणून वाचकांच्या पसंत पडेल याची खात्री आहे. भविष्य भ्रमण याविषयी अनेक देशांत संशोधन चालू असल्याचं कित्येक वैज्ञानिक लेखांत आपल्याला वाचायला मिळतं, त्यामूळे वाचकाला ही कथा रुचण्यास अधिक मदत होईल. याशिवाय "रूममेट" ही कथा वाचताना कंटाळवाणी वाटत असली तरी तिचा शेवट तितकाच अकल्पित आणि भयावह आहे. कथेची नायिका अनावधनाने तिच्या मैत्रिणीचा खून करते आणि यामागे तिचं मानसिक आजारपण असतं. मानसिक विकारातून एखाद्याचा खून करण्याइतपत बुद्धी भ्रष्ट होऊ शकते याबद्दल अलीकडेचं संशोधन झालेलं आहे. लहानपणीचा "पोरखेळ" कधी आपल्या जीवनाचा अकल्पित भाग बनू शकतो, याची प्रचिती एका कथेतून वाचकांना मिळते. मानवाचे नियतीच्या हातातले बाहुले असणे, हे सूत्र बाळाच्या बाहुल्यांशी खेळण्याच्या प्रतीकातून सूचित केले आहे. कलावंत आणि कला यांच्यातला तिढा मांडणारी ‘सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळकंठ’ ही कथा एक उत्कृष्ट फँटसी आहे, ही कथा वाचकाला जादुई वास्तववादाची आठवण करून देते. म्हणजे असं खरंचं झालं तर माणसाच्या स्वतंत्र बुद्धिप्रणालीला काही महत्वचं उरणार नाही एवढं नक्की. "नाईटमेअर" ही कथा आपल्या आयुष्यातील सहज घडणाऱ्या घटनेचा उत्तरार्ध कसा होऊ शकतो हे सांगत त्याचा माणसाच्या एकंदर आयुष्यावर कशा प्रकारे आघात होऊ शकतो याचं गांभीर्य लक्षात आणून देते. या सर्व कथांकडे बारकाईने पाहिल्यास असं लक्षात येतं कि लेखकांनी माणसाच्या मृत्यूच्या मार्गात घडत असलेल्या काही गोष्टींचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवा विझत असताना नेमकं काय होत असेल एवढंच सांगून मतकरी थांबत नाहीत तर जीवित व्यक्ती आणि मृत व्यक्ती यांना प्रत्यक्षात एकरूप करून सोडतात. मृत्यूसंदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या किंवा सध्याच्या काळात संशोधनात्मक पातळीवर असलेल्या वैज्ञानिक गोष्टींच्या आधारे या कथा लिहिलेल्या आहेत. मुळात सध्या आपण ज्यास अकल्पित असं संबोधत आहे, त्या गोष्टी भविष्यात प्रत्यक्षात अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्याचा आधार वैज्ञानिक सिद्धांत असून त्या केवळ मानवी आकलनक्षमतेच्या बाहेर आहेत एवढंचं. अशा प्रकारे, रत्नाकर मतकरींचा "एक दिवा विझताना" हा कथासंग्रह म्हणजे लेखकांचा कोणत्याही गोष्टीचा "शेवट" प्रचंड विलक्षण, थोडंसं विचित्र आणि अद्वितीय करण्याचा हातखंडा वाचकांच्या लक्षात येतो. संधिप्रकाशातल्या धूसर वातावरणात एखाद्या अरण्यात शिरावे, तसे मतकरी यांच्या कथा वाचताना वाटते. वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर प्रवास सुरू होतो. वाचकांना या अरण्यातल्या कळलेल्या, न कळलेल्या वाटांकडे नेण्यासाठी रत्नाकर मतकरी कथनाचे वेगवेगळे घाट, निवेदनशैली यांचा वापर करतात. हा प्रवास विलक्षण आकर्षक असतोच, पण तो आत आत खोलातही नेतो. "एक दिवा विझताना" या कथासंग्रहाविषयी मतकरी म्हणतात, "मी सांगत आहे, त्या घटनेमागचे गूढ कधी उलगडेल, तेव्हा खरे. त्याचे स्पष्टीकरण भविष्यात मिळेल. आजच्या आपल्या तुटपुंज्या ज्ञानाच्या कक्षेत ते बसत नाही." लेखकांच्या विधानांशी समर्पक असणाऱ्या या कथा मात्र मानवी कल्पनाशक्तीची सर्व दारे नक्कीच खिळखिळी करून ठेवतात. -©ओंकार दिलीप बागल (7506582341/ bagalomkar2@gmail.com) ...Read more

  • Rating StarNarendra Gaikwad

    रत्नाकर मतकरी म्हणजे गुढ कथांचे राजेच...

  • Rating StarNeeten Vaidya

    यातली अशब्द ही कथा अप्रतिम आहे.

  • Rating StarNagesh Dhawade

    ज्याने हे पुस्तक वाचलं असेल तो ते कधीही विसरणार नाही.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more