* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KABANDH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665611
  • Edition : 10
  • Publishing Year : NOVEMBER 1975
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS A MYSTERY? IT IS STORY BASED ON A MYSTIC ASPECT OF LIFE. DEATH IS A MYSTERY. WHAT REALLY HAPPENS AT THE TIME OF DEATH? NO ONE COULD EVER ANSWER THIS QUESTION SO FAR. SCIENCE HAS SO FAR SUCCEEDED IN PUTTING FORTH A THEORY FOR THE DESTRUCTION OF THE HUMAN BODY. BUT HUMAN IS NOT ONLY THE BODY, IT IS THE MIND WITHIN, THE SOUL WITHIN, IT HAS FEELINGS, LUST… DO THEY EXTINCT WITH DEATH? OR DO THEY LINGER IN THE UNIVERSE? NO ONE HAS BEEN SUCCESSFUL IN ANSWERING THESE QUESTIONS. THE COMMON PEOPLE ARE ALWAYS ATTRACTED TOWARDS THE DARK SECRET OF LIFE. YET, HOW FAR TRUE IT IS FROM THE SCIENTIFIC POINT OF VIEW? IT IS AGAIN BEYOND ARGUMENTS. IN GENERAL, THE STORIES BASED ON FACTS ARE CONSIDERED TO BE ARTISTIC WHILE THOSE BASED ON MYSTERY ARE SUPPOSED TO BE WITHOUT ANY ARTISTIC VALUE. MATKARI`S MYSTERIES HAVE PROVEN THIS CONSIDERATION WRONG. HE HAS INCREDIBLE STYLE AS A WRITER AND PRODUCES IT WITH AN EARNEST ZEAL, HE FEATURES THE CHARACTERS PERFECTLY WELL, THE THEME IS CAPTIVATING, AND THE AMBIENCE IS SO TRUE THAT WE LIVE IN IT. OF COURSE, THIS IS ALL PHILOSOPHICAL DISCUSSION, BUT PEOPLE WHO DO NOT BELIEVE IN SUPERNATURAL POWERS ALSO HAVE FOUND THEMSELVES ENGROSSED IN THESE STORIES FROM STARTING TO END.
गूढकथा म्हणजे काय? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळया गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले, परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का? याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या सर्व गूढतेचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. परंतु विज्ञानाच्या दृष्टीने या विषयात कितीसे तथ्य असते हा विवाद्य विषय आहे. त्यामुळे वास्तववादी कथा म्हणजे कलात्मक कथा आणि गूढकथा या कलाशून्य असे ढोबळ समीकरण बेतले गेले आहे. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी हे समीकरण चुकीचे ठरवले आहे. उत्तम गूढकथांमध्ये चांगले व्यक्तिचित्रण, मनाची पकड घेणा-या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरणनिर्मिती, या सा-यांची एक स्वतंत्र आकर्षक शैली रहस्य निर्माण करणा-याकडे असावी लागते. आणि ही सर्व वैशिष्ट्ये रत्नाकर मतकरी यांच्या लेखनात असल्याचे वाचकांनीच मान्य केलेले आहे. अर्थात हे सगळे तात्त्विक चिंतन झाले. पण ज्याचा कुठल्याही गूढप्रकारावर विश्वास नाही, अशा माणसालाही हे पुस्तक सबंध वाचावेसे वाटेल एवढी खात्री नक्कीच आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    गूढकथा आणि मतकरी यांचे नाते अतूट आहे . गूढकथा म्हटल्या की रत्नाकर मतकरीच डोळ्यासमोर येतात.आयुष्याच्या एखाद्या मुलखावेगळ्या पैलू विषयी लिहिलेली कथा म्हणजे गूढकथा .यात त्यांच्या बारा गूढकथा आहेत . सर्वच कथा वाचनीय आहेत . यात माझ्या आवडीची सुप्रसिद्ध द्ष्टा ही कथा आहे.काही वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या एका मालिकेत द्रष्टा कथा दाखविली होती . दिलीप कुलकर्णी आणि दिलीप कोल्हटकर यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या . ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 12-06-2005

    विविध पातळीवरील गूढानुभव देणारा कथासंग्रह... ‘कबंध’ हा यशस्वी गूढकथा लेखक रत्नाकर मतकरी यांचा कथासंग्रह. मतकरींनी गेली पन्नास वर्षे अशा गूढकथांचे लेखन केले आहे. त्यांचे खेकडा, निजधाम, मृत्युंजयी, फाशी बखळपासून बारा-पस्तीस या संग्रहापर्यंत पंधरा एक कासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील काहींना राज्यपुरस्कार मिळाले आहेत. मतकरी हे एक चतुरस्र साहित्यिक व कलावंत आहेत. त्यांनी कादंबरी, नाटक, एकांकिका, बालनाट्य, ललित निबंध असे विविध प्रकारचे लेखन केले आहे. गूढकथेच्या क्षेत्रात सर्वाधिक महत्त्वाची कामगिरी त्यांचीच आहे. मराठीतील गूढकथा निर्मितीमागे देखील इंग्रजी साहित्याचा संस्कार व प्रेरणा आहे. एडगर अ‍ॅलन पो आणि नॅथानिएल हॅथार्न यांनी दोनशे वर्षांपूर्वी भूतकथा लिहिल्या आणि ‘गूढकथा’ वाचकप्रिय केली. ब्रॅम स्टोकरची ‘ड्रॅक्युला’ ही कादंबरी जगात प्रसिद्ध आहे. डिकेन्सपासून पर्लबकसारख्या साहित्यिकांनी दर्जेदार गूढकथा लिहिल्या आहेत. मराठीत द. पा. खांबेटे यांनी गूढकथा विशेषत: भयकथा लिहिल्या. त्यानंतर प. ग. सुर्वे, ग. रा. टिकेकर आदी काही लेखकांनी ‘हंस’ व ‘नवल’ मध्ये असे लेखन केले. जी. ए. कुलकर्णी यांनी अंजन, लक्ष्मी, निरोप, राक्षस, स्वामी आदी गूढकथा लिहिल्या आहेत. नारायण धारप यांनीही मतकरींच्या बरोबरीने गूढकथा सातत्याने लिहिल्या. त्यांनी सर्व पिशाच्च करणीचा उपशम करण्यासाठी समर्थ नावाची वाचकांना आश्वासक अशी व्यक्तिरेखा निर्माण केली. ‘गूढकथा’ हा कथेचाच एक प्रकार. गूढ किंवा विलक्षण, अकल्पित असे अनुभव, धूसर, भयसूचक वातावरण, अकस्मात घडणाऱ्या घटना यामुळे तयार होणारे एक अमानुष जग, यातून गूढकथा रूप घेते. रहस्यकथेत कथा संपल्यावर रहस्य उरत नाही. गूढकथेत मात्र कथा संपल्यावरही काहीतरी गूढतेची मन कातर करणारी अस्फुटता रेंगाळतेच. ‘मानवी संज्ञेला व बुद्धीला ज्ञात अशा जगापलीकडच्या, अनाकलनीय, अतर्क्य अशा लोकविलक्षण वास्तवाचे अस्तित्व हे गूढकथेचे अधिष्ठान, मानता येईल. ‘कबंध’ या संग्रहात बारा कथा आहेत. यात रचनेची तसेच आशयार्थाची विविधता आहे. ‘म्हणे मागे कोण आले? या कथेत इच्छापूर्तीचे सूत्र आहे. डॉ. दिवेकर आणि डॉ. सप्तर्षी यांची ही कथा ‘सूडकथा’ स्वरूपाची अमानुषी कथा आहे. नीलिमा या सुंदर नर्सच्या प्राप्तीसाठी दोन मित्रातील स्पर्धेची कथा. डॉ. सप्तर्षीच्या मोटर सायकलचा अपघात होतो. त्याच्या डोक्याचे इमर्जन्सी ऑपरेशन करण्यात येते. पण ऑपरेशन टेबलावरच तो गतप्राण होतो. काही दिवसांनी डॉ. दिवेकर मोटरसायकल वरून जात असता मागे सप्तर्षी पाठलाग करतो, असा भास होतो आणि घाबरलेल्या दिवेकरच्या मोटर सायकलचा अपघात होतो आणि त्याचं एक मायनर ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन टेबलवर घेण्यात येतं. अ‍ॅनास्थेशिया देणारा सप्तर्षी, दिवेकरना दिसतो. तो एकदम किंचाळतो. ‘ही इज सप्तर्षी. ही वांटस् टू किल मी! बिकॉज आय किल्ड हिम!’ मी त्याचा प्राण घेतला! मी त्याला ओव्हरडोस दिला! अ परफेक्ट मर्डर! वाचवा... ऑपरेशननंतर दिवेकर शुद्धीवर आल्यावर त्यांना कळतं डॉ. अष्टीकर यांच्या ऐवजी डॉ. सप्तर्षीनं येऊन त्यांना जिवंत ठेवलं होतं, ‘पुष्कळ वर्षे जगा आणि आपल्या पापाचं प्रायश्चित घ्या.’ यासाठी. ही पिशाच्च कथा आहे, यात सूड आहे पण वेगळ्या प्रकारचा. स्वत:पासून स्वतंत्र होऊन कुठेही संचार करू शकणाऱ्या माणसाच्या इच्छा– देहाची कल्पना ‘इच्छा-देह’ या गूढ फँटसीमध्ये मतकरींनी साकार केली आहे. या कथेचा नायक म्हणतो... प्रत्येकाला एक वेगळा इच्छामय देह असतो आणि क्वचित तो स्वतंत्र होऊन क्षणात कुठंही जातो. विश्रांतीच्या तारुण्याच्या शोधात, जिथं त्याला मनापासून बोलावणारं कुणी असेल– अपघातात मृत्यू आला असताना प्रबल स्वेच्छेच्या सामर्थ्यावर त्याला दूर ठेवून इष्ट कार्यसिद्धीसाठी देहरूपाने जगणाऱ्या माणसाची कथा ‘लांबणीवर’ मध्ये आहे. नानांना आपल्या मुलीचे लग्न जमविण्याचा ध्यास लागलेला. एकाएकी त्यांचे घर कोसळते आणि नाना त्यात सापडतात. ते पंधरा दिवसांनी शुद्धीवर येतात आणि मुलीच्या लग्नाच्या खटपटीला ते पंधरा दिवसांनी शुद्धीवर येतात आणि मुलीच्या लग्नाच्या खटपटीला लागतात. शेवटी एका चमत्काराने लग्न ठरते. लग्न झाले. नाना घरी आले, गोविंदाला आपल्या मित्राला म्हणाले, ‘बिल्डिंग पडली त्याचवेळी माझा प्राण गेला... पोरीनं जीव तोडून हाक दिली. तिचं लग्न राहिलं होतं म्हणून मी परत आलो. इच्छाशक्तीच्या जोरावर कसाबसा हा देह टिकवला. ते बिछान्यावर पडले आणि गोविंदाला तिथे सांगाडा दिसला. ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ या कथेत सामाजिक अंग प्रभावी आहे. हिला वास्तववादी गूढकथा म्हणता येईल. एका कोकणी खेड्यात ही कथा घडते. येथील माणसांच्या मनातील भूतावळ प्रभावी आहे. मूल नसलेल्या प्रेमळ, निष्पाप, स्त्रीला ही मनुष्यरूपी स्वार्थी भूते जखीण ठरवतात. रूढी, परंपरा यांना कवटाळून स्वार्थ साधणाऱ्या या मानवी पिशाच्चांनी या अश्राप स्त्रीचा बळी का घेतला? हे कोडे, कथा निवेदन करणाऱ्या सरळवृत्तीच्या मुलाला भंडावून सोडते. हे सामाजिक व्यवहारातील गूढ कोण उकलणार? ‘लपाछपी’ ही दुभंग व्यक्तिमत्त्व लाभलेल्या विकृत मनोवृत्ती असलेल्या मुलाची कथा आहे. ‘असाही एक कलावंत’ आणि ‘ट्रिंग-ट्रिंग-हॅलो क्लिक’ या कथा खून, व्यभिचार, फसवणूक आदि गंभीर घटनांच्या असूनही त्या विनोदाच्या अंगाने जातात. या पुस्तकाचे शीर्षक बनलेली ‘कबंध’ ही कथा. माणसाने केलेल्या घोर अन्यायाची पापाची टोचरणी कशी पिशाच्चरूप बनून त्याला त्याच्या अंताकडे खेचते याचे या प्रभावी कथेत मतकरींनी नेटके चित्रण केले आहे. या कथेतील डॉक्टर, रविला दिसणाऱ्या कबंधाचे स्पष्टीकरण देण्यात ‘टेरिबल गिल्ट कॉम्प्लेक्स!’ आपण मालतीवर केलेल्या अन्यायाची रुखरुख त्याच्या मनात खोलवर होती. ती कितीही गाडली तरी दुसरं लग्न करताच उफाळून आली. रेल्वे अ‍ॅक्सिडेंटमध्ये दिसलेल्या कबंधाचा त्या भावनेनं आकार घेतला. सगळीकडं ते कबंध त्याला दिसायला लागलं. नथिंग सरप्राइजिंग. आहे पिशाच्चं कसली? माणसाच्या मनातच इतक्या भयंकर गोष्टी दडलेल्या असतात की, यातून कसलीही पिशाच्चं आकार घेऊ शकतात, मला वाटतं मतकरींनी आपल्या गूढकथांच्या एका अंगाचं विवरण येथे केलं आहे, असे विविध प्रकारचे वेगवेगळ्या पातळ्यांवरील गूढ अनुभव व तर्कापलीकडील घटिते मतकरींनी आपल्या कथांतून प्रभावी शैलीने नटवून पेश केली आहेत. त्यामुळे त्यांचे कथासंग्रह वाचनीय झाले आहेत. -प्रा. इनास फर्नांडिस ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 05-06-2005

    भेदक रहस्यांची गुंफण... मराठी सारस्वतात सर्व प्रांतात मुक्त विहार करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांचा ‘कबंध’ हा गुढकथेचा संग्रह. ‘निजधाम’ व ‘खेकडा’ यापूर्वी प्रसिद्ध झालेली त्यांची गूढकथेची पुस्तकं तितकीच लोकप्रिय. मतकरी यांची नाटकं, कादंबरी, ललित लेखनाप्राणे गूढकथाही वाचकप्रिय आहेत. कबंध या पहिल्या कथेत त्याच पद्धतीची वातावरणनिर्मिती, मधुरा आणि रवी हे विवाहित नवदांपत्य मधुचंद्रासाठी लांबच्या बंगल्यात, निसर्गरम्य वातावरणात आलेले. पहिल्याच स्पर्शाच्या ओढीत स्वप्न रंगवणारे, पण रवीला एका स्त्रीचं शीर नसलेलं फक्त धड दिसतं. मुंडकं नसलेली ही स्त्री रवीची पहिली पत्नी. याचा पाठलाग कसा करते व शेवट काय होतो हे रत्नाकर मतकरी यांनी विलक्षण ताकदीनं गुंफलेलं. श्रीमंत कथेत अत्यंत गरिबीत जगणारा रमाकांत व त्याची पत्नी रजनी आहेत. रमाकांतला कामधंदा, नोकरी नाही. औषध न मिळाल्याने त्याच्या लहान मुलीचं निधन. रजनी हताश. त्यात रमाकांत अघोरी मार्गाला जातो, खूप श्रीमंत होण्यासाठी. मग तो श्रीमंत होतो का, त्याला काय अनुभव मिळतात हे थरारक चित्रण या कथेत आहे. दृष्टा अशीच वेगळ्या धाटणीची कथा. सर्वसाधारण बुद्धी नसलेला, पण असाधारण शक्ती लाभलेल्या पंडीतची कथा. म्हणूनच स्वत: आईचं मरण, वकील साने यांनी केलेला सुंदर पत्नीचा खून अशा गोष्टी त्याला आधीच दिसतात आणि या गोष्टीचा शेवटही धक्का देणारा आहे. लहानपणीच जन्म देऊन आई वारल्याने वडिलांचा रोष निर्माण झालेल्या विल्कूची ही कथा. वडील त्याला मुंबईला घेऊन जात नाहीत. तो आजीकडे शहाड या छोट्या गावी राहतो. त्याची खुनशी वृत्ती कशी उफाळते ती या कथेत परिणामकारक पद्धतीने लेखकाने चितारली आहे. प्रेम, माया न मिळाल्याने विल्कू कसा वागतो ते ‘लपाछपी’तून जाणवते. ‘म्हणजे कोण मागे आले’ या कथेत दोन डॉक्टर एकाच सुस्वरूप नर्सवर फिदा झाल्याची कहाणी. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढल्यानंतर डॉ. दिवेकर सुखी झाले का? त्यांना त्यांची प्रेयसी नीलिमा प्राप्त झाली का? हे वाचनीय आहे. ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ ही कथा अंधश्रद्धेवर आधारित आहे. बाबल्या रावळ दुकानदार. त्याची तरुण पत्नी गोकुळा. मूलबाळ नाही म्हणून ती देवदेवस्की किंवा करणी करते असा संशय. होळीला बाबल्या मोठा पेटारा अर्पण करतो. वाद्यं जोरात वाजवली जातात. होळीची बोंब सुरू. त्यात पेटारा टाकला जातो. पेटाऱ्यात काय आहे हे बाबल्याला माहीत. नंतर मात्र कोणीच बोलत नाही आणि गोकुळा गावकऱ्यांना दिसत नाही. ‘एक माणूस आणि एक पशू’ ही सूडकथा चमत्कारिक आहे. एका डॉक्टरने दुसऱ्याच्या सुस्वरूप पत्नीवर डोळा ठेवून त्या श्रीमंत माणसाचा पशू करणे, त्याला इंजेक्शने देणे अशी ही कथा. अखेरी तो पूर्ण पशू त्या डॉक्टरचाच जीव घेतो अशी कलाटणी. ‘असाही एक कलावंत’मध्ये एक बिलंदर आहे. त्याला कुणाचा तरी खून करण्याची खुमखुमी. रहस्यकथेचे बादशाह नानासाहेबांकडे तो येतो, त्यांचा सल्ला घेतो व कुणाचा खून करतो, त्यामुळे नानासाहेब वैतागतात अशी ही कथा. सर्वच कथा वाचनीय असून रहस्यमय गूढ निर्माण करणाऱ्या आहेत. -रमेश उदारे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more