* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KABANDH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665611
  • Edition : 10
  • Publishing Year : NOVEMBER 1975
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS A MYSTERY? IT IS STORY BASED ON A MYSTIC ASPECT OF LIFE. DEATH IS A MYSTERY. WHAT REALLY HAPPENS AT THE TIME OF DEATH? NO ONE COULD EVER ANSWER THIS QUESTION SO FAR. SCIENCE HAS SO FAR SUCCEEDED IN PUTTING FORTH A THEORY FOR THE DESTRUCTION OF THE HUMAN BODY. BUT HUMAN IS NOT ONLY THE BODY, IT IS THE MIND WITHIN, THE SOUL WITHIN, IT HAS FEELINGS, LUST… DO THEY EXTINCT WITH DEATH? OR DO THEY LINGER IN THE UNIVERSE? NO ONE HAS BEEN SUCCESSFUL IN ANSWERING THESE QUESTIONS. THE COMMON PEOPLE ARE ALWAYS ATTRACTED TOWARDS THE DARK SECRET OF LIFE. YET, HOW FAR TRUE IT IS FROM THE SCIENTIFIC POINT OF VIEW? IT IS AGAIN BEYOND ARGUMENTS. IN GENERAL, THE STORIES BASED ON FACTS ARE CONSIDERED TO BE ARTISTIC WHILE THOSE BASED ON MYSTERY ARE SUPPOSED TO BE WITHOUT ANY ARTISTIC VALUE. MATKARI`S MYSTERIES HAVE PROVEN THIS CONSIDERATION WRONG. HE HAS INCREDIBLE STYLE AS A WRITER AND PRODUCES IT WITH AN EARNEST ZEAL, HE FEATURES THE CHARACTERS PERFECTLY WELL, THE THEME IS CAPTIVATING, AND THE AMBIENCE IS SO TRUE THAT WE LIVE IN IT. OF COURSE, THIS IS ALL PHILOSOPHICAL DISCUSSION, BUT PEOPLE WHO DO NOT BELIEVE IN SUPERNATURAL POWERS ALSO HAVE FOUND THEMSELVES ENGROSSED IN THESE STORIES FROM STARTING TO END.
गूढकथा म्हणजे काय? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळया गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले, परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का? याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या सर्व गूढतेचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. परंतु विज्ञानाच्या दृष्टीने या विषयात कितीसे तथ्य असते हा विवाद्य विषय आहे. त्यामुळे वास्तववादी कथा म्हणजे कलात्मक कथा आणि गूढकथा या कलाशून्य असे ढोबळ समीकरण बेतले गेले आहे. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी हे समीकरण चुकीचे ठरवले आहे. उत्तम गूढकथांमध्ये चांगले व्यक्तिचित्रण, मनाची पकड घेणा-या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरणनिर्मिती, या सा-यांची एक स्वतंत्र आकर्षक शैली रहस्य निर्माण करणा-याकडे असावी लागते. आणि ही सर्व वैशिष्ट्ये रत्नाकर मतकरी यांच्या लेखनात असल्याचे वाचकांनीच मान्य केलेले आहे. अर्थात हे सगळे तात्त्विक चिंतन झाले. पण ज्याचा कुठल्याही गूढप्रकारावर विश्वास नाही, अशा माणसालाही हे पुस्तक सबंध वाचावेसे वाटेल एवढी खात्री नक्कीच आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    गूढकथा आणि मतकरी यांचे नाते अतूट आहे . गूढकथा म्हटल्या की रत्नाकर मतकरीच डोळ्यासमोर येतात.आयुष्याच्या एखाद्या मुलखावेगळ्या पैलू विषयी लिहिलेली कथा म्हणजे गूढकथा .यात त्यांच्या बारा गूढकथा आहेत . सर्वच कथा वाचनीय आहेत . यात माझ्या आवडीची सुप्रसिद्ध द्ष्टा ही कथा आहे.काही वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या एका मालिकेत द्रष्टा कथा दाखविली होती . दिलीप कुलकर्णी आणि दिलीप कोल्हटकर यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या . ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 12-06-2005

    विविध पातळीवरील गूढानुभव देणारा कथासंग्रह... ‘कबंध’ हा यशस्वी गूढकथा लेखक रत्नाकर मतकरी यांचा कथासंग्रह. मतकरींनी गेली पन्नास वर्षे अशा गूढकथांचे लेखन केले आहे. त्यांचे खेकडा, निजधाम, मृत्युंजयी, फाशी बखळपासून बारा-पस्तीस या संग्रहापर्यंत पंधरा एक कासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील काहींना राज्यपुरस्कार मिळाले आहेत. मतकरी हे एक चतुरस्र साहित्यिक व कलावंत आहेत. त्यांनी कादंबरी, नाटक, एकांकिका, बालनाट्य, ललित निबंध असे विविध प्रकारचे लेखन केले आहे. गूढकथेच्या क्षेत्रात सर्वाधिक महत्त्वाची कामगिरी त्यांचीच आहे. मराठीतील गूढकथा निर्मितीमागे देखील इंग्रजी साहित्याचा संस्कार व प्रेरणा आहे. एडगर अ‍ॅलन पो आणि नॅथानिएल हॅथार्न यांनी दोनशे वर्षांपूर्वी भूतकथा लिहिल्या आणि ‘गूढकथा’ वाचकप्रिय केली. ब्रॅम स्टोकरची ‘ड्रॅक्युला’ ही कादंबरी जगात प्रसिद्ध आहे. डिकेन्सपासून पर्लबकसारख्या साहित्यिकांनी दर्जेदार गूढकथा लिहिल्या आहेत. मराठीत द. पा. खांबेटे यांनी गूढकथा विशेषत: भयकथा लिहिल्या. त्यानंतर प. ग. सुर्वे, ग. रा. टिकेकर आदी काही लेखकांनी ‘हंस’ व ‘नवल’ मध्ये असे लेखन केले. जी. ए. कुलकर्णी यांनी अंजन, लक्ष्मी, निरोप, राक्षस, स्वामी आदी गूढकथा लिहिल्या आहेत. नारायण धारप यांनीही मतकरींच्या बरोबरीने गूढकथा सातत्याने लिहिल्या. त्यांनी सर्व पिशाच्च करणीचा उपशम करण्यासाठी समर्थ नावाची वाचकांना आश्वासक अशी व्यक्तिरेखा निर्माण केली. ‘गूढकथा’ हा कथेचाच एक प्रकार. गूढ किंवा विलक्षण, अकल्पित असे अनुभव, धूसर, भयसूचक वातावरण, अकस्मात घडणाऱ्या घटना यामुळे तयार होणारे एक अमानुष जग, यातून गूढकथा रूप घेते. रहस्यकथेत कथा संपल्यावर रहस्य उरत नाही. गूढकथेत मात्र कथा संपल्यावरही काहीतरी गूढतेची मन कातर करणारी अस्फुटता रेंगाळतेच. ‘मानवी संज्ञेला व बुद्धीला ज्ञात अशा जगापलीकडच्या, अनाकलनीय, अतर्क्य अशा लोकविलक्षण वास्तवाचे अस्तित्व हे गूढकथेचे अधिष्ठान, मानता येईल. ‘कबंध’ या संग्रहात बारा कथा आहेत. यात रचनेची तसेच आशयार्थाची विविधता आहे. ‘म्हणे मागे कोण आले? या कथेत इच्छापूर्तीचे सूत्र आहे. डॉ. दिवेकर आणि डॉ. सप्तर्षी यांची ही कथा ‘सूडकथा’ स्वरूपाची अमानुषी कथा आहे. नीलिमा या सुंदर नर्सच्या प्राप्तीसाठी दोन मित्रातील स्पर्धेची कथा. डॉ. सप्तर्षीच्या मोटर सायकलचा अपघात होतो. त्याच्या डोक्याचे इमर्जन्सी ऑपरेशन करण्यात येते. पण ऑपरेशन टेबलावरच तो गतप्राण होतो. काही दिवसांनी डॉ. दिवेकर मोटरसायकल वरून जात असता मागे सप्तर्षी पाठलाग करतो, असा भास होतो आणि घाबरलेल्या दिवेकरच्या मोटर सायकलचा अपघात होतो आणि त्याचं एक मायनर ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन टेबलवर घेण्यात येतं. अ‍ॅनास्थेशिया देणारा सप्तर्षी, दिवेकरना दिसतो. तो एकदम किंचाळतो. ‘ही इज सप्तर्षी. ही वांटस् टू किल मी! बिकॉज आय किल्ड हिम!’ मी त्याचा प्राण घेतला! मी त्याला ओव्हरडोस दिला! अ परफेक्ट मर्डर! वाचवा... ऑपरेशननंतर दिवेकर शुद्धीवर आल्यावर त्यांना कळतं डॉ. अष्टीकर यांच्या ऐवजी डॉ. सप्तर्षीनं येऊन त्यांना जिवंत ठेवलं होतं, ‘पुष्कळ वर्षे जगा आणि आपल्या पापाचं प्रायश्चित घ्या.’ यासाठी. ही पिशाच्च कथा आहे, यात सूड आहे पण वेगळ्या प्रकारचा. स्वत:पासून स्वतंत्र होऊन कुठेही संचार करू शकणाऱ्या माणसाच्या इच्छा– देहाची कल्पना ‘इच्छा-देह’ या गूढ फँटसीमध्ये मतकरींनी साकार केली आहे. या कथेचा नायक म्हणतो... प्रत्येकाला एक वेगळा इच्छामय देह असतो आणि क्वचित तो स्वतंत्र होऊन क्षणात कुठंही जातो. विश्रांतीच्या तारुण्याच्या शोधात, जिथं त्याला मनापासून बोलावणारं कुणी असेल– अपघातात मृत्यू आला असताना प्रबल स्वेच्छेच्या सामर्थ्यावर त्याला दूर ठेवून इष्ट कार्यसिद्धीसाठी देहरूपाने जगणाऱ्या माणसाची कथा ‘लांबणीवर’ मध्ये आहे. नानांना आपल्या मुलीचे लग्न जमविण्याचा ध्यास लागलेला. एकाएकी त्यांचे घर कोसळते आणि नाना त्यात सापडतात. ते पंधरा दिवसांनी शुद्धीवर येतात आणि मुलीच्या लग्नाच्या खटपटीला ते पंधरा दिवसांनी शुद्धीवर येतात आणि मुलीच्या लग्नाच्या खटपटीला लागतात. शेवटी एका चमत्काराने लग्न ठरते. लग्न झाले. नाना घरी आले, गोविंदाला आपल्या मित्राला म्हणाले, ‘बिल्डिंग पडली त्याचवेळी माझा प्राण गेला... पोरीनं जीव तोडून हाक दिली. तिचं लग्न राहिलं होतं म्हणून मी परत आलो. इच्छाशक्तीच्या जोरावर कसाबसा हा देह टिकवला. ते बिछान्यावर पडले आणि गोविंदाला तिथे सांगाडा दिसला. ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ या कथेत सामाजिक अंग प्रभावी आहे. हिला वास्तववादी गूढकथा म्हणता येईल. एका कोकणी खेड्यात ही कथा घडते. येथील माणसांच्या मनातील भूतावळ प्रभावी आहे. मूल नसलेल्या प्रेमळ, निष्पाप, स्त्रीला ही मनुष्यरूपी स्वार्थी भूते जखीण ठरवतात. रूढी, परंपरा यांना कवटाळून स्वार्थ साधणाऱ्या या मानवी पिशाच्चांनी या अश्राप स्त्रीचा बळी का घेतला? हे कोडे, कथा निवेदन करणाऱ्या सरळवृत्तीच्या मुलाला भंडावून सोडते. हे सामाजिक व्यवहारातील गूढ कोण उकलणार? ‘लपाछपी’ ही दुभंग व्यक्तिमत्त्व लाभलेल्या विकृत मनोवृत्ती असलेल्या मुलाची कथा आहे. ‘असाही एक कलावंत’ आणि ‘ट्रिंग-ट्रिंग-हॅलो क्लिक’ या कथा खून, व्यभिचार, फसवणूक आदि गंभीर घटनांच्या असूनही त्या विनोदाच्या अंगाने जातात. या पुस्तकाचे शीर्षक बनलेली ‘कबंध’ ही कथा. माणसाने केलेल्या घोर अन्यायाची पापाची टोचरणी कशी पिशाच्चरूप बनून त्याला त्याच्या अंताकडे खेचते याचे या प्रभावी कथेत मतकरींनी नेटके चित्रण केले आहे. या कथेतील डॉक्टर, रविला दिसणाऱ्या कबंधाचे स्पष्टीकरण देण्यात ‘टेरिबल गिल्ट कॉम्प्लेक्स!’ आपण मालतीवर केलेल्या अन्यायाची रुखरुख त्याच्या मनात खोलवर होती. ती कितीही गाडली तरी दुसरं लग्न करताच उफाळून आली. रेल्वे अ‍ॅक्सिडेंटमध्ये दिसलेल्या कबंधाचा त्या भावनेनं आकार घेतला. सगळीकडं ते कबंध त्याला दिसायला लागलं. नथिंग सरप्राइजिंग. आहे पिशाच्चं कसली? माणसाच्या मनातच इतक्या भयंकर गोष्टी दडलेल्या असतात की, यातून कसलीही पिशाच्चं आकार घेऊ शकतात, मला वाटतं मतकरींनी आपल्या गूढकथांच्या एका अंगाचं विवरण येथे केलं आहे, असे विविध प्रकारचे वेगवेगळ्या पातळ्यांवरील गूढ अनुभव व तर्कापलीकडील घटिते मतकरींनी आपल्या कथांतून प्रभावी शैलीने नटवून पेश केली आहेत. त्यामुळे त्यांचे कथासंग्रह वाचनीय झाले आहेत. -प्रा. इनास फर्नांडिस ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 05-06-2005

    भेदक रहस्यांची गुंफण... मराठी सारस्वतात सर्व प्रांतात मुक्त विहार करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांचा ‘कबंध’ हा गुढकथेचा संग्रह. ‘निजधाम’ व ‘खेकडा’ यापूर्वी प्रसिद्ध झालेली त्यांची गूढकथेची पुस्तकं तितकीच लोकप्रिय. मतकरी यांची नाटकं, कादंबरी, ललित लेखनाप्राणे गूढकथाही वाचकप्रिय आहेत. कबंध या पहिल्या कथेत त्याच पद्धतीची वातावरणनिर्मिती, मधुरा आणि रवी हे विवाहित नवदांपत्य मधुचंद्रासाठी लांबच्या बंगल्यात, निसर्गरम्य वातावरणात आलेले. पहिल्याच स्पर्शाच्या ओढीत स्वप्न रंगवणारे, पण रवीला एका स्त्रीचं शीर नसलेलं फक्त धड दिसतं. मुंडकं नसलेली ही स्त्री रवीची पहिली पत्नी. याचा पाठलाग कसा करते व शेवट काय होतो हे रत्नाकर मतकरी यांनी विलक्षण ताकदीनं गुंफलेलं. श्रीमंत कथेत अत्यंत गरिबीत जगणारा रमाकांत व त्याची पत्नी रजनी आहेत. रमाकांतला कामधंदा, नोकरी नाही. औषध न मिळाल्याने त्याच्या लहान मुलीचं निधन. रजनी हताश. त्यात रमाकांत अघोरी मार्गाला जातो, खूप श्रीमंत होण्यासाठी. मग तो श्रीमंत होतो का, त्याला काय अनुभव मिळतात हे थरारक चित्रण या कथेत आहे. दृष्टा अशीच वेगळ्या धाटणीची कथा. सर्वसाधारण बुद्धी नसलेला, पण असाधारण शक्ती लाभलेल्या पंडीतची कथा. म्हणूनच स्वत: आईचं मरण, वकील साने यांनी केलेला सुंदर पत्नीचा खून अशा गोष्टी त्याला आधीच दिसतात आणि या गोष्टीचा शेवटही धक्का देणारा आहे. लहानपणीच जन्म देऊन आई वारल्याने वडिलांचा रोष निर्माण झालेल्या विल्कूची ही कथा. वडील त्याला मुंबईला घेऊन जात नाहीत. तो आजीकडे शहाड या छोट्या गावी राहतो. त्याची खुनशी वृत्ती कशी उफाळते ती या कथेत परिणामकारक पद्धतीने लेखकाने चितारली आहे. प्रेम, माया न मिळाल्याने विल्कू कसा वागतो ते ‘लपाछपी’तून जाणवते. ‘म्हणजे कोण मागे आले’ या कथेत दोन डॉक्टर एकाच सुस्वरूप नर्सवर फिदा झाल्याची कहाणी. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढल्यानंतर डॉ. दिवेकर सुखी झाले का? त्यांना त्यांची प्रेयसी नीलिमा प्राप्त झाली का? हे वाचनीय आहे. ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ ही कथा अंधश्रद्धेवर आधारित आहे. बाबल्या रावळ दुकानदार. त्याची तरुण पत्नी गोकुळा. मूलबाळ नाही म्हणून ती देवदेवस्की किंवा करणी करते असा संशय. होळीला बाबल्या मोठा पेटारा अर्पण करतो. वाद्यं जोरात वाजवली जातात. होळीची बोंब सुरू. त्यात पेटारा टाकला जातो. पेटाऱ्यात काय आहे हे बाबल्याला माहीत. नंतर मात्र कोणीच बोलत नाही आणि गोकुळा गावकऱ्यांना दिसत नाही. ‘एक माणूस आणि एक पशू’ ही सूडकथा चमत्कारिक आहे. एका डॉक्टरने दुसऱ्याच्या सुस्वरूप पत्नीवर डोळा ठेवून त्या श्रीमंत माणसाचा पशू करणे, त्याला इंजेक्शने देणे अशी ही कथा. अखेरी तो पूर्ण पशू त्या डॉक्टरचाच जीव घेतो अशी कलाटणी. ‘असाही एक कलावंत’मध्ये एक बिलंदर आहे. त्याला कुणाचा तरी खून करण्याची खुमखुमी. रहस्यकथेचे बादशाह नानासाहेबांकडे तो येतो, त्यांचा सल्ला घेतो व कुणाचा खून करतो, त्यामुळे नानासाहेब वैतागतात अशी ही कथा. सर्वच कथा वाचनीय असून रहस्यमय गूढ निर्माण करणाऱ्या आहेत. -रमेश उदारे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more