RATNAKAR MATKARI

About Author

Birth Date : 17/11/1938
Death Date : 17/05/2020


RATNAKAR MATKARIS ONE-ACT PLAY VEDI MANASAM WAS FIRST BROADCAST ON FEBRUARY 16, 1955 FROM AKASHVANIS MUMBAI STATION. FROM THEN TILL TODAY, MORE THAN FIFTY YEARS, HIS RICH CAREER CONTINUES TO FLOURISH. HE HAS WORKED AS A WRITER, PRODUCER, DIRECTOR AND ILLUSTRATOR THROUGH VARIOUS MEDIUMS OF LITERATURE, THEATRE, TELEVISION AND FILM. HE HAS WRITTEN QUALITY WORKS IN DIFFERENT LITERARY GENRES SUCH AS PLAYS, ONE-ACT PLAYS, CHILDRENS PLAYS, STORIES, NOVELS, AND LITERARY WORKS.

रत्नाकर मतकरी यांची १६ फेब्रुवारी, १९५५ रोजी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वेडी माणसं ही एकांकिका प्रथम प्रसारित झाली. तेव्हापासून आजपर्यंत, पन्नास वर्षांहून अधिक काळ, त्यांची समृद्ध कारकिर्द बहरतेच आहे. साहित्य, रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट या विविध माध्यमांतून त्यांनी लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार म्हणून काम केले आहे. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललितलेख अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. नाटकांचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य आणि संगीत यांची संकल्पना, वेषभूषा रेखाटन आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपली कामगिरी अत्यंत निष्ठेने बजावली आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी यांच्या मदतीने त्यांनी बालनाट्य,सूत्रधार आणि महाद्वार अशा तीन नाट्यसंस्था सुरू केल्या. प्रयोगशीलता, निर्मितीची अथक ऊर्जा, चैतन्य, उपक्रमशीलता; तसेच अंतर्मुखता आणि समाजाभिमुखता यांचे संतुलन हे रत्नाकर मतकरींच्या कलावंत-व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू आहेत. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, 2019-20
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 18 total
ADAM Rating Star
Add To Cart INR 350
EK DIWA VIZATANA Rating Star
Add To Cart INR 220
JADU TERI NAJAR Rating Star
Add To Cart INR 90
KABANDH Rating Star
Add To Cart INR 260
KHEKADA Rating Star
Add To Cart INR 230
KRUSHNAKANYA Rating Star
Add To Cart INR 220
MADHYARATRICHE PADGHAM Rating Star
Add To Cart INR 200
MRUTYUNJAYEE Rating Star
Add To Cart INR 300
NIJDHAM Rating Star
Add To Cart INR 220
NIRMANUSHYA Rating Star
Add To Cart INR 220
PARDESHI Rating Star
Add To Cart INR 150
PHASHI BAKHAL Rating Star
Add To Cart INR 140
12

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more