RATNAKAR MATKARI

About Author

Birth Date : 17/11/1938
Death Date : 17/05/2020


RATNAKAR MATKARIS ONE-ACT PLAY VEDI MANASAM WAS FIRST BROADCAST ON FEBRUARY 16, 1955 FROM AKASHVANIS MUMBAI STATION. FROM THEN TILL TODAY, MORE THAN FIFTY YEARS, HIS RICH CAREER CONTINUES TO FLOURISH. HE HAS WORKED AS A WRITER, PRODUCER, DIRECTOR AND ILLUSTRATOR THROUGH VARIOUS MEDIUMS OF LITERATURE, THEATRE, TELEVISION AND FILM. HE HAS WRITTEN QUALITY WORKS IN DIFFERENT LITERARY GENRES SUCH AS PLAYS, ONE-ACT PLAYS, CHILDRENS PLAYS, STORIES, NOVELS, AND LITERARY WORKS.

रत्नाकर मतकरी यांची १६ फेब्रुवारी, १९५५ रोजी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वेडी माणसं ही एकांकिका प्रथम प्रसारित झाली. तेव्हापासून आजपर्यंत, पन्नास वर्षांहून अधिक काळ, त्यांची समृद्ध कारकिर्द बहरतेच आहे. साहित्य, रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट या विविध माध्यमांतून त्यांनी लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार म्हणून काम केले आहे. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललितलेख अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. नाटकांचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य आणि संगीत यांची संकल्पना, वेषभूषा रेखाटन आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपली कामगिरी अत्यंत निष्ठेने बजावली आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी यांच्या मदतीने त्यांनी बालनाट्य,सूत्रधार आणि महाद्वार अशा तीन नाट्यसंस्था सुरू केल्या. प्रयोगशीलता, निर्मितीची अथक ऊर्जा, चैतन्य, उपक्रमशीलता; तसेच अंतर्मुखता आणि समाजाभिमुखता यांचे संतुलन हे रत्नाकर मतकरींच्या कलावंत-व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू आहेत. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, 2019-20
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 18 total
ADAM Rating Star
Add To Cart INR 350
EK DIWA VIZATANA Rating Star
Add To Cart INR 220
JADU TERI NAJAR Rating Star
Add To Cart INR 90
KABANDH Rating Star
Add To Cart INR 260
KHEKADA Rating Star
Add To Cart INR 230
KRUSHNAKANYA Rating Star
Add To Cart INR 220
MADHYARATRICHE PADGHAM Rating Star
Add To Cart INR 200
MRUTYUNJAYEE Rating Star
Add To Cart INR 300
NIJDHAM Rating Star
Add To Cart INR 220
NIRMANUSHYA Rating Star
Add To Cart INR 220
PARDESHI Rating Star
Add To Cart INR 150
PHASHI BAKHAL Rating Star
Add To Cart INR 140
12

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more