GURUCHARAN SINGH GANDHI

About Author


GURUCHARAN SINGH GANDHI HAS TRAVERSED THE DUSTY ROAD FROM A LITTLE-KNOWN HAMLET IN JHARKHAND TO THE CORRIDORS OF THE CORPORATE WORLD. HE HAS STEADFASTLY REFUSED TO OUTGROW HIS SMALL-TOWN BOY IDENTITY WHILE NEGOTIATING THE MEGAPOLISES OF THE WORLD. HIS FRIENDS AND FOES REFER TO HIM AFFECTIONATELY AS ‘GURU’ WHICH HE FEELS GIVES HIM AN IMPORTANCE HE OTHERWISE LACKS. GURU CONSIDERS HIMSELF A FULL-TIME CORPORATE-WALLAH AND A PART-TIME WRITER. HE IS ALSO A REGULAR BLOGGER, WHEREIN HE OBSERVES LIFE ALONGSIDE LIVING IT (WWW.MONDAYMUSINGSBYGURU.BLOGSPOT.COM) HE RUNS MARATHONS TO CLEAR HIS MIND AND READS KABEER TO CLEANSE HIS SOUL. KABEER IS HIS SOUL MATE AND THEY OFTEN HAVE LONG CONVERSATIONS. GURU IS CURRENTLY VICE PRESIDENT, HEAD OF LEARNING AND DEVELOPMENT WITH A PREMIER CORPORATE. HIS INTERESTS INCLUDE INDIVIDUAL AND ORGANIZATIONAL CHANGE.

गुरुचरण सिंग गांधी यांचा प्रवास झिंकपानी जिल्ह्यातील छोट्याशा अनोळखी खेड्यापासून ते कॉर्पोरेट जगतातील मखमली दालनापर्यंत झाला आहे. जगातील मोठमोठ्या कॉर्पोरेट साम्राज्यांशी व्यवहार करतानादेखील त्यांनी आपली ‘गावाकडचा मुलगा’ही ओळख कटाक्षाने आणि खंबीरपणे जपली आहे. त्यांचे मित्र आणि सहकारी प्रेमाने त्यांना ‘गुरू’ असे संबोधतात, तेव्हा त्यांना आनंद होतो. आपल्याला एरवी मिळू शकत नाही ते महत्त्व या संबोधनातून मिळते, असे त्यांचे मत आहे. ‘गुरू’ स्वतःला पूर्णवेळ कॉर्पोरेट वल्ली आणि अर्धवेळ लेखक मानतात. ते नियमितपणे ब्लॉग (WWW.MONDAYMUSINGSBYGURU.BLOGSPOT.COM) लिहितात, जिथे ते आयुष्याकडे एका बहिःस्थ दृष्टिकोनातून बघतात. मनाला तजेला मिळावा म्हणून ते मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावतात आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी कबीर वाचतात. कबीर हा त्यांचा जिवाभावाचा सवंगडी असून दोघेजण तासन्तास गप्पा मारत असतात. गुरू सध्या एका प्रतिष्टित कॉर्पोरेट कंपनीत उपाध्यक्ष तसेच शिक्षण आणि विकास विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात. वैयाQक्तक आणि संस्थात्मक प्रगती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KORPORATE KABEER Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more