GURUCHARAN SINGH GANDHI

About Author


GURUCHARAN SINGH GANDHI HAS TRAVERSED THE DUSTY ROAD FROM A LITTLE-KNOWN HAMLET IN JHARKHAND TO THE CORRIDORS OF THE CORPORATE WORLD. HE HAS STEADFASTLY REFUSED TO OUTGROW HIS SMALL-TOWN BOY IDENTITY WHILE NEGOTIATING THE MEGAPOLISES OF THE WORLD. HIS FRIENDS AND FOES REFER TO HIM AFFECTIONATELY AS ‘GURU’ WHICH HE FEELS GIVES HIM AN IMPORTANCE HE OTHERWISE LACKS. GURU CONSIDERS HIMSELF A FULL-TIME CORPORATE-WALLAH AND A PART-TIME WRITER. HE IS ALSO A REGULAR BLOGGER, WHEREIN HE OBSERVES LIFE ALONGSIDE LIVING IT (WWW.MONDAYMUSINGSBYGURU.BLOGSPOT.COM) HE RUNS MARATHONS TO CLEAR HIS MIND AND READS KABEER TO CLEANSE HIS SOUL. KABEER IS HIS SOUL MATE AND THEY OFTEN HAVE LONG CONVERSATIONS. GURU IS CURRENTLY VICE PRESIDENT, HEAD OF LEARNING AND DEVELOPMENT WITH A PREMIER CORPORATE. HIS INTERESTS INCLUDE INDIVIDUAL AND ORGANIZATIONAL CHANGE.

गुरुचरण सिंग गांधी यांचा प्रवास झिंकपानी जिल्ह्यातील छोट्याशा अनोळखी खेड्यापासून ते कॉर्पोरेट जगतातील मखमली दालनापर्यंत झाला आहे. जगातील मोठमोठ्या कॉर्पोरेट साम्राज्यांशी व्यवहार करतानादेखील त्यांनी आपली ‘गावाकडचा मुलगा’ही ओळख कटाक्षाने आणि खंबीरपणे जपली आहे. त्यांचे मित्र आणि सहकारी प्रेमाने त्यांना ‘गुरू’ असे संबोधतात, तेव्हा त्यांना आनंद होतो. आपल्याला एरवी मिळू शकत नाही ते महत्त्व या संबोधनातून मिळते, असे त्यांचे मत आहे. ‘गुरू’ स्वतःला पूर्णवेळ कॉर्पोरेट वल्ली आणि अर्धवेळ लेखक मानतात. ते नियमितपणे ब्लॉग (WWW.MONDAYMUSINGSBYGURU.BLOGSPOT.COM) लिहितात, जिथे ते आयुष्याकडे एका बहिःस्थ दृष्टिकोनातून बघतात. मनाला तजेला मिळावा म्हणून ते मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावतात आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी कबीर वाचतात. कबीर हा त्यांचा जिवाभावाचा सवंगडी असून दोघेजण तासन्तास गप्पा मारत असतात. गुरू सध्या एका प्रतिष्टित कॉर्पोरेट कंपनीत उपाध्यक्ष तसेच शिक्षण आणि विकास विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात. वैयाQक्तक आणि संस्थात्मक प्रगती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KORPORATE KABEER Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more