* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SLUMDOG MILLIONAIRE
  • Availability : Available
  • Translators : VANDANA ATRE
  • ISBN : 9788184980233
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 270
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A FORMER TIFFIN BOY FROM M:RMBAI, RAM MOHAMMCD THOMAS, HAS JUST GOT TWELVE QUESTION` CORRECT ON A TV QUIZ SHOW TO WIN A COOL ONE BILLION RUPEES. BUT HE IS BRUTALLY SLUNG IN A PRISON CELL ON SUSPICION OF CHEATING. BECAUSE HOW CAN A KID FROM THE SLUMS KNOW WHO SHAKESPEARE WAS, UNLESS HE HAS BEEN _LIING A FASTPNE? IN THE ORDER OF THE QUESTIONS ON THE SHOW, RAM TELLS US WHICH AMAZING ADVENTURES IN HIS STREET-KID LIFE TAUGHT HIM THE ANSWERS. FROM ORPHANAGES TO BROTHELS, GANGSTERS TO BEGGAR-MASTERS, AND INTO THE HOMES OF BOLLYWOOD`S RICH AND FAMOUS, SLUMDOG MILLIONAIRE IS BRIMMING WITH THE CHAOTIC COMEDY, HEART-STOPPING TRAGEDY, AND TEAR-INDUCING JOYFULNESS OF MODERN INDIA. "THIS BRILLIANT STORY, AS COLOSSAL, VIBRANT AND CHAOTIC AS INDIA ITSELF...IS NOT TO BE MISSED` OBSERVER,` A LIVELY FIRST NOVEL. . . INDIA IS EQUALLY CHAOTIC AND ENCHANTING` SUNDAY TIMES.
मुंबईतील एक कफल्लक वेटर तुरुंगामध्ये का गेला आहे? कारणे आहेत : अ. त्याने गि-हाइकाला ठोसा मारला आहे. ब. त्याने खूप व्हिस्की घेतली आहे. क. त्याने गल्ल्यामधून पैसे चोरले आहेत. ड. जगातील सगळ्यांत मोठ्या रकमेचा ‘क्विझ शो’ त्याने जिंकला आहे. ‘हु विल विन ए बिलियन’ या क्विझ शोमधील बाराही प्रश्नांची उत्तरे अचूक दिल्यानंतर राम महम्मद थॉमस याला अटक करण्यात आली आहे. कधीही शाळेचे तोंडही न बघितलेला किंवा वृत्तपत्र हातातही न धरणारा एक दरिद्री, अनाथ मुलगा सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रहाचे किंवा शेक्सपिअरच्या नाटकाचे नाव लबाडी केल्याखेरीज सांगूच शकत नाही. क्विझ शोचे चित्रीकरण पुन्हा बघताना तो आपण कसे जिंकलो याचे वर्णन करू लागतो आणि वाचकाला घेऊन जातो त्याच्या आयुष्याच्या अद्भुत सफरीवर! कचराकुंडीवर सुरू झालेल्या त्याच्या आयुष्यात कधी त्याची गाठ पडते सुरक्षेचे अती वेड असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्नलशी, तर कधी तो ‘ताजमहाल’चा गाईड म्हणून काम करतो. रामची जीवनेच्छा चिवट आहे! रस्त्यावरील जीवन जगताना मिळालेल्या शहाणपणातून, क्षुल्लक गोष्टींच्या भांडारातून तो क्विझमधील प्रश्नांची उत्तरे देत लाखो प्रेक्षकांना अक्षरश: स्तंभित करतोच; पण आयुष्याच्या कोड्याचीही उत्तरे मिळवतो. आधुनिक भारताच्या सामाजिक पाश्र्वभूमीवरील ही कथा सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधील संघर्षाचे दर्शन घडवतेच; पण जगण्याखेरीज दुसरा पर्यायच नसलेल्या मुलापुढे आयुष्य काय वाढून ठेवते तेही प्रभावीपणे दाखवते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SLUMDOGMILLIONAIRE #SLUMDOGMILLIONAIRE #स्लमडॉगमिलेनिअर #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VANDANAATRE #वंदनाअत्रे #VIKASSWARUP
Customer Reviews
  • Rating StarEknath Marathe

    स्लमडॉग मिलेनिअर ईबुक वाचायला लागलेला वेळ, साधारण 4.45 मिनिटे या पुस्तकावर बेतलेला सिनेमा तुफान चालला होता व ऑस्कर ची बाहुली सुद्धा या सिनेमाला मिळाल्याचे आठवते. मी सिनेमा बघितला नव्हता म्हणून ईबुक हातात येताच वाचायला घेतले. प्रश्न मंजुषा स्पर्धे 100 करोड एक साधा वेटर जिंकतो. त्याला ते बक्षीस न देण्यासाठी स्पर्धेचे आयोजक आकाश पाताळ एक करतात. शाळा महाविद्यालयात कधीही न गेलेला, अडाणी 18 वर्षाचा तरुण, एका पेक्षा एक काठिण्य पातळी असलेले 12 प्रश्न , बरोबर उत्तरे देवून 100 कोटी जिंकतो , हे मान्य करायला कंपनी तयार नाही. ती त्याला खोट्या आरोपात अडकवते. एक वकील त्याला लॉक अप मधून बाहेर काढते. तिने विचारलेल्या प्रश्नोत्तरात, त्या 12 प्रश्नांची उत्तरे त्या तरुणाला कशी माहीत होती याची रोमहर्षक कहाणी उलगडत जाते ! प्रत्येक प्रश्नाची उकल वेगळ्या प्रवासात व शहरात उलगडत जाते. एकदा वाचायला घेतले की हे पुस्तक खाली ठेवता येत नाही ! वंदना अत्रे यांनी केलेला मराठी अनुवाद सुद्धा अगदी ओघवता व रसाळ आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 18-04-2009

    लकी कॉइन! प्रिय राम महमन थॉमस, आपली भेट होऊन बरोबर एक वर्ष झाले. तू विकास स्वरूप यांचा नायक. ‘क्यू अ‍ॅण्ड ए’ या कादंबरीतील. थोडी अधिक ओळखीची खूण इतरांना सांगायची तर डॅनी इतरांना सांगायची तर डॅनी बोएलच्या ‘स्लमडॉग’मधील जमाल. शंभर कोटी रूपये बक्षीस अलेले क्वीझ आश्चर्यकारकरित्या जिंकून ‘मिलिओनेर’ झालेला एक अशिक्षित वेटर. आपली पहिल्यांदा गाठ पडली त्या दिवशी दुपारी मी नुकतीच हॉस्पिटलमधून घरी परतले होते. केमोथेरेपीची दुसरी सायकल संपवून. समेर होते मेहता पब्लिशिंग हाऊसकडून आलेले कुरिअर आणि त्यातील ‘क्यू अ‍ॅण्ड ए’कादंबरीत राजश्री देशमुखांची छोटी चिठ्ठी. सहज काही पाने चाळली तेव्हा वाचायला मिळाली ती तुझ्या हाती ‘लकी कॉइन’ येते, ती घटना. तुझ्या आयुष्यातील अनेक घटनांच्या वेळी तू ते नाणे हवेत भिरकावतोस अन् वाट बघतोस- छापा की काटा, यापैकी छापा पडण्याची. ते वाचताना मी स्वत:शीच हसले. कशासाठी? मीही त्यावेळी वाट बघत होते.- उंच उडालेले नाणे खाली येण्याची. छापा : कदाचित मी जगेन. काटा : कदाचित...! या कादंबरीची पाने होती ३०४ एवढ्या पानांचा अनुवाद संपविण्याइतके आयुष्य हाताशी असेल ना माझ्या? क्षणभर विषण्ण होऊन कादंबरी दूर ठेवून दिली तेव्हा डॉक्टरांच्या रिपोर्टमधील दोन शब्द डोळ्यांसमोर आले. ‘कॅन्सर : स्टेज फोर’. अनुवाद सुरू केला ती पहाट आजही आठवते. कारण इतरांसाठी ती नव्या दिवसाची ताजी पहाट होती; पण माझ्यासाठी संपत आलेली ती वेदनादायी उत्तररात्र होती. केमोच्या साइड इफेक्टस्च्या वेदना...एखाद्या विषारी नागाने डंख मारावा तशा बघता बघता पायाच्या नखापासून या पायदुखीच्या वेदना सुरू व्हायच्या. चरकात टाकून पिळल्या जाणाऱ्या उसाला होत असतील तशा. कण्हून, शेकून, पाय दाबून, बांधून ठेवून कंटाळले अन् त्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून खुर्चीत बसले. धारवीच्या उकिरड्यावर वाढणाऱ्या राम महमद थॉमससाठी. धारावीच्या झोपडीतून उचलून पोलीस ठाण्यावरील टीचभर खोलीत उलटतपासणीसाठी डांबून ठेवलेला राम महमद थॉमस. पहिल्या प्रकरणाची १२-१३ पाने लिहून झाली तेव्हा जाणवले. वेदनांनी दोन्ही पाय अक्षरश: बधीर झाले होते. जणू कमरेखालचे शरीरच नाहीय् असे वाटावे इतके बधीर. मग मीही तुझ्यासारखेच माझ्या खिशातून माझे खोटे-खोटे लकी कॉइन काढून उडवले अन् वर भिरकावत म्हटले- छापा : मी माझ्या पायावर आत्ता उभी राहून समोरच्या सहा पायऱ्या उतरणार. काटा : कदाचित...! नाणे खाली आले तेव्हा मी माझ्या पायावर उभी होते. पण तुडूंब भरलेल्या डोळ्यांना खालचे काहीच दिसत नव्हते. तुला खरंच सांगते, या अनुभवानंतर मी ठरवले- राम महमद थॉमसची ही कमालीची उत्कंठावर्धक कहाणी मी अधाशासारखी दोन रात्रीत वाचून नाही संपवणार. कारण माझ्यासाठी तो एक वेदनाशामक उपचार होता. या वेदना जेव्हा माझ्या शरीराबरोबर मनावरही कब्जा करू बघायच्या, त्या प्रत्येक वेळी राम, तुझी सोबत मला झाली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये डाव्या हाताला सलाईन लावलेले असायचे आणि उजव्या हाताने मी लिहित असायची तुझी गोष्ट. कथेत परिस्थिती जेव्हा तुटण्याइतकी ताणली जायची, तेव्हा वाटायचे- हा खिशातून ‘लकी कॉईन’ का नाही काढत उत्तरासाठी? किती सोप्पे आहे ते...! पण असे म्हणताना मनोमन मला हेही ठाऊक होते की, प्रत्यक्ष आयुष्यात गोष्टी इतक्या सोप्या नसतात. अन् स्वत:ला हवे आहे- अगदी तीव्रतेने हवे आहे ते मिळवण्यासाठी फार फार झगडावे लागते. हे या अनुवादामुळे तुझ्याबरोबर मीही पुन्हा शिकत होते. तुला तुझे प्रेम हवे होते. आग्र्यात हरवलेले. विपरीत परिस्थितीवर मात करून ते मिळवल्याचे समाधानही तुला मिळवायचे होते. मला माझे आयुष्य हवे होते- तेही विपरीत परिस्थितीशी लढून मिळवायचे होते आणि या लढाईत विजयाचे अचूक दान पदरात टाकणारी ‘लकी कॉइन’ नावाची गोष्ट कधीच नसते. कोणाकडेच नसते. ते कॉइन आपल्याच मनात असते. कधीमधी फारच पराभूत वाटायला लागले तर उमेद देणारे. छापा : मी जगेन. काटा : कदाचित...! तू तुझ्या क्विझमध्ये दुसऱ्याच प्रश्नावर अडखळलास, तेव्हा माझ्या पोटात एकदम भीती अगदी दाटून आली. कारण एव्हाना मी माझ्याही नकळत तुझ्या विजयाचा आणि कॅन्सरशी सुरू असलेल्या लढाईतील माझ्या विजयाचा कोठेतरी परस्परसंबंध जोडत होते. तू विकास स्वरूप यांचा मानसपुत्र आहेस आणि तुझी संघर्षकथा काल्पनिक आहे, हे साफ विसरूनच गेले होते जणू. तुझी कहाणी वास्तव नव्हती. पण माझे आयुष्यही पुस्तकांच्या पानांपुरते नव्हते. ते समोर दिसत होते. किती ठरले आहे, ते ठाऊक नव्हते आणि त्यात माझ्या असण्या-नसण्यामुळे होणारे परिणामही समोर दिसत होते. तुझ्या ‘क्विझ’मध्ये तुला हेल्पलाइन होत्या. मला? पण या वळणावरही तुझे-माझे नाते तुटले नाही... मदतीचा एक अत्यंत आश्वासक, स्नेहशील हात यावेळी भीष्मराज बाम सरांच्या रूपाने माझ्यापुढे आला आणि बघता बघता कॅन्सरशी माझी लढाई ही दु:सह प्रवास न ठरता तो एक कुतूहलाचा अनुभव होऊ लागला. बाम सरांनी मला प्राणायामाचे महत्त्व सांगून तो शिकवला. आपल्याला अखंड प्रकाश व प्राणशक्ती देणाऱ्या सूर्याची उपासना करायला शिकवली आणि त्याबरोबर चित्रणाचं तंत्र शिकवलं. मनाने नेमका कशाचा ध्यास घ्यायला हवा, कशावर एकाग्र व्हायला हवे, भूतकाळातील वेदनादायी, अवमानाच्या आठवणींना दूर ठेवून फक्त उत्तम तेच कसे स्मरायचे, या उत्तमाचीच आराधना कशी करायची, हे त्यांनी शिकविले. खरे म्हणजे ते जीवनशिक्षणच होते. आतापर्यंत न मिळालेले, पण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत अनिवार्य असे. या शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग करून त्याचे कॅन्सरवर होणारे परिणाम बघताना शिक्षणाच्या प्रत्येक पहाटेच्या सत्रात मला जगण्याचे आश्वासन मिळत गेले. खरे तर बाम सरांच्या मदतीने मीच मला ते आश्वासन देत गेले. आणि या आश्वासनानंतर मात्र राम, तुझ्या हरण्या-जिंकण्याच्या काल्पनिक कहाणीकडे मी तटस्थपणे अनुवादक म्हणून बघू लागले. तू हरणार की जिंकणार याची उरली फक्त निखळ उत्सुकता! कहाणीच्या शेवटच्या वळणावर ‘क्विझ’चा अँकर प्रेमकुमारचा सूड उगवण्यासाठी त्याच्यावर रोखलेल रिव्हॉल्व्हर अखेरच्या क्षणी फेकून स्फुंदून स्फुंदून रडताना तुला बघितले अन् मी चकितच झाले. जीवघेण्या अशा परिस्थितीच्या टकमक टोकावर नेऊन उभे करून आपली परीक्षा बघणाऱ्या भूतकाळाला विसरून, मागे टाकूनच पुढे जायचे असते, हे तुलाही ठाऊक होते? कोठे मिळाले तुला हे शिक्षण? परिस्थितीकडून की जीवनसंघर्षात भेटलेल्या तर्हेतर्हेच्या माणसांकडून? खरे म्हणजे तुझ्या कहाणीतील तो एक अत्यंत रोमांचक क्षण. पण मला त्या क्षणी तुझ्या जय-पराजयापेक्षा तुझ्यातील एक समंजस, शहाणा राम महमद थॉमस दिसला- जो कल्पनेपेक्षा खूप वेगळा होता... अस्सल अन् जवळचाही. ‘लकी कॉइन’ नावाची तकलादू कुबडी समुद्रात भिरकावून देणारा. स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणारा. मीही माझे ‘लकी कॉइन’ कधीच माझ्या जवळच्या गोदेच्या पात्रात भिरकावून दिले आहे, हे तुला मला सांगायचे होते... ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 10-05-2009

    प्रवाही अनुवाद... ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटानं इतिहास घडवला, तो जाणकारांना ज्ञात आहेत. हा चित्रपट ज्या ‘क्यू अ‍ॅण्ड ए’ या कादंबरीवर आधारित आहे त्या कादंबरीचा अनुवाद वंदना अत्रे यांनी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या नावानं केला आहे. मूळ लेखक विकास स्वरूप. ुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसनं त्याचं प्रकाशन केलंय. एका साध्या हॉटेलातील वेअर ‘हू विल विन अ बिलिअन’ या क्विझ शोमध्ये अवघड प्रश्नांची अचूक उत्तरं देत शंभर कोटी जिंकतो. हे सारं स्वप्नवत. ज्या मुलानं शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, ज्याचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध आलेला नाही, जो आजवरचं जीवन बेवारसपणे जगलाय, रोज उगवणाऱ्या दिवसाचं ‘आव्हान’ घेत जो जीवनाशी भांडलाय, ध्येयहीन जीवन जगणारा एक अतिसामान्य मुलगा क्विझ शोमधील सारे प्रश्न सोडवतो; ही एक अविश्वसनीय, विलक्षण घटना. हा विजेता म्हणजे लावारिस राम मोहम्मद थॉमस अशा विचित्र नावाचा! या राम मोहम्मद थॉमसची ही जीवनकहाणी. पण ही काही सामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची प्रातिनिधिक कथा होत नाही. पण ती होते सत-असत्, दृष्ट-सुष्ट, संस्कार-संस्कारहीन, तत्त्वशील-तत्त्वशून्य, पाप-पुण्याच्या संघर्षाची. त्यातून अधोरेखित होणारा संदेश फार मोलाचा. सुदैव, नशीब यावर हवाला ठेवण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर विश्वास असायला हवा. विकास स्वरूप नायकाच्या तोंडून आपला संदेश देताना म्हणतात, ‘नशीब आपल्यामधूनच आकार घेतं...’ ज्याचं त्याचं नशीब हे ज्यानं त्यानं स्वत:च घडवायला हवं. ही कहाणी फ्लॅशबॅक पद्धतीनं सांगितली आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराशी त्याच्या आयुष्यातील घटनांचा संबंध येतो. म्हणूनच तो आत्मविश्वासपूर्वक साऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. झोपडपट्टीचं विदारक जिणं, शिवाय त्यांच्याकडे पाहण्याचा साऱ्या यंत्रणेचा, व्यवस्थेचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन यातून प्रकर्षानं जाणवतो. नायकाच्या नावाचं रहस्य. त्याच्या तिन्ही धर्मियांनी दाखवलेला अधिकार हा मानवी जीवनावरचं धर्माचं असणारं प्राबल्य स्पष्ट करतो. रामच्या आयुष्यातील एकेक घटना त्याला ‘जीवन’ म्हणजे काय हे शिकवणारी. त्यातून त्याला मिळणारे धडे, ज्ञान हे शाळा-विद्यालयातील अभ्यासक्रमापेक्षा भिन्न आणि अनमोलही! तो म्हणतो, ‘तुमच्या स्वप्नांची ताकद फक्त तुमच्या मनापुरती असते. या स्वप्नांना पैशाचं पाठबळ असेल तर इतरांच्या मनावर पण तुम्ही प्रभाव टाकू शकता.’ सभोवतालचं वास्तव सांगताना तो म्हणतो, ‘कळकट-तुटक्या, गळक्या झोपड्यांतून राहणाऱ्या लोकांसाठी आयुष्य हा शाप असतो... गर्दीनं गजबजलेल्या चाळीत राहणारी माणसं आयुष्य फक्त ढकलत असतात.’ पण हे तत्त्वज्ञान सांगताना नायक कुठंही आव आणत नाही की मुखवटे पांघरून दांभिकपणा करत नाही. त्याचं निवेदन थेट कुठचीही भीडमुर्वत न ठेवता केलेलं आणि स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शी आहे. त्यातील शेवटचा ट्विस्टही बोलका, मार्मिक आहे. उदा. ‘युद्ध ही फार गंभीर गोष्ट आहे. ती प्राण घेते.’ तर प्रेमासारख्या नाजूक अनुभवाविषयी तो म्हणतो, ‘प्रेम असे एका क्षणात होत नसते, ते अलगद तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण तजेलदार, रंगीत बनवते आणि तुमच्या स्वप्नांना व्यापून उरते.’ कालौघात लेखक उपमाही समर्पक, प्रभावी योजतो. उदा. हातातील गोट्या फरशीवर सांडाव्या तसे ते स्वर खोलीभर विखुरले. ‘किंवा व्यक्तिमत्त्व स्पष्ट करताना झाडावर एखादं पानही चुकीच्या जागी उगवलेलं लाजवंतीला आवडत नाही.’ असं लाजवंतीचं वर्णन करतो. सुभाषितात्मक वाक्यही अनुभवातून आलेली आहेत. उदा. ‘जेव्हा तुम्ही स्वत:च आतून खचलेले असता तेव्हा इतरांना धीर देणे फार अवघड असते.’ किंवा ‘स्वप्न जेवढे मोठे, तेवढा अपेक्षाभंगही मोठा.’ मात्र हा अनुवाद वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. मूळ मराठीत पुस्तक लिहिल्यासारखा अनुवाद प्रवाही आणि प्रभावी झालाय. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more