* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STATE OF FEAR
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788177669695
  • Edition : 1
  • Publishing Year : 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 528
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
EVERYONE IS AWARE THAT THE INCREASE IN THE INDUSTRIALIZATION IS LEADING TO THE INCREASED PERCENTAGE OF CARBON DIOXIDE IN THE ATMOSPHERE, WHICH IS FURTHER INCREASING THE GLOBAL TEMPERATURE. THIS INCREASED TEMPERATURE IS FURTHER GOING TO RESULT INTO THE INCREASED WATER LEVELS ALL OVER THE WORLD, MELTING THE SNOW EVERYWHERE. IT IS CALLING IN FOR NATURAL CALAMITIES LIKE FLOOD, STORMS, FAMINE, CLOUD BURSTING, ETC. NERF, A CHARITABLE ORGANIZATION WORKING FOR THE BETTERMENT OF THE ENVIRONMENT; HAS CALLED FOR A WORLDWIDE MEETING AT CALIFORNIA; THEY ARE LACKING IN FUNDS. THERE ARE OTHER ENVIRONMENTALISTS, BELIEVING IN THE TERRORISTS` WAY OF WORKING; THEY BRING IN BOMB EXPLOSIONS UNDER WATER, IN THE PACIFIC OCEAN, RESULTING INTO TSUNAMI, WHICH STARTS TOWARDS THE COASTS OF CALIFORNIA AT THE SPEED OF 800 KM PER HOUR…..
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे महापूर, चक्रीवादळं, दुष्काळ, ढगफुटी अशी संकटं वाढू लागली आहेत. हे सारे जगाला पटवण्यासाठी एन.ई.आर.एफ. या पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थेनं कॅलिफोर्नियात एक जागतिक परिषद आयोजित केलेली आहे. एन.ई.आर.एफ.कडे निधीची कमतरता आहे. संकटांचा धोका किती मोठा आहे हे पटवण्यासाठी पर्यावरणवादाचे समर्थक दहशतवादी पॅसेफिक महासागरात पाण्याखाली स्फोट घडवून आणतात. तिथे निर्माण झालेली सुनामीची लाट ताशी आठशे किलोमीटर वेगानं कॅलिफोर्नियाच्या दिशेनं सरकू लागली आहे...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES # PREY #प्रे #PRAMOD JOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #STATE OF FEAR #MICHAELCRICHTON #NEXT # PIRATE LATITUDES
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    पर्यावरण दहाशतवाद म्हणजे नक्की काय ...?? आज जगभरातील औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात सोडला जातोय . त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होतेय.त्यामुळे पृथ्वीवरील बर्फ वितळून पाण्याची पातळी वाढेल .मग महापूर ..चक्रीवादळ... ुनामी ..अशी नैसर्गिक संकटाची वाढ होईल. यात पहिला धोका आहे तो पॅसिफिक महासागरातील वानुटू या बेटाला. समुद्रसपाटीपासून अवघे काही इंच वर असलेले हे बेट प्रथम पाण्याखाली जाईल . म्हणूनच ते राष्ट्र अमेरिकेवर खटला भरण्याच्या तयारीत आहे .अमेरिकेतून सर्वात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडला जातो असा त्यांचा दावा आहे . अमेरिकेतील एन. इ.आर. एफ. ही पर्यावरणवादी संस्था या खटल्यात वानुटू राष्ट्राला मदत करणार आहे . पण प्रत्यक्षात हा खटला दाखल झाला नाही उलट त्या खटल्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणारे अचानक गायब झाले किंवा मारले गेले .एन .इ. आर. एफ. ने पर्यावरणाला असणारा धोका जगाला पटवून देण्यासाठी एक परिषद कॅलिफोर्नियात आयोजित केली आहे .त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे . त्याचवेळी ह्या संकटाचा धोका किती आहे हे पटविण्यासाठी पर्यावरणवादाचे दहशतवादी कृत्रिमरित्या सुनामी लाट निर्माण करून ती कॅलिफोर्नियाच्या दिशेने जाईल अशी योजना करतात . त्यांनी निर्माण केलेली ही सुनामी आता ताशी आठशे किलोमीटर वेगाने कॅलिफोर्नियाच्या दिशेने प्रवास करतेय . जगातील पाच माणसे ह्या संकटाचा सामना करतायत . या मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तीपुढे ते यशस्वी होतील का ....?? एक अतिशय वेगळा विषय थरारक आणि उत्कंठावर्धकपणाने मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे . ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    अस्वस्थ करणारे लेखन… ही कादंबरी काल्पनिक आहे, परंतु काही व्यक्ती व संस्था यांचे उल्लेख सर्व खरे आहेत. सुरुवातीच्या पानावरती दोन सुवचने आहेत. एक मार्क ट्वेन यांचे की ‘विज्ञानाच्या बाबतीत एक अशी काहीतरी विलक्षण गोष्ट आहे की, क्षुल्लक तथ्यांवर विसंबून ्यामध्ये घाऊक प्रमाणात अंदाज हाती लागतात. तसेच दुसरं महत्त्वाचं वचन जॉर्ज ऑर बेल यांचं, कोणत्याही महत्त्वाच्या विषयाला नेहमी असे काही पैलू असतात की कोणालाच त्याची चर्चा नको असते.’ या वचनातून पुस्तकाच्या बाबतीतला दृष्टिकोन स्पष्ट होतो. मायकेल क्रायटन या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाची त्यामधील विषयामुळे वादग्रस्त ठरलेली ही नवीन कादंबरी. या कादंबरीचा विषय आहे, ‘जागतिक तापमान वाढ’ या कादंबरीत पर्यावरणवादी विचारसरणी व पर्यावरण रक्षणाच्या चळवळीवर खरपूस टीका केलेली आहे. विज्ञान व रहस्यकथा याच चिंतनशीलता याचं मिश्रण या कादंबरीत आहे. यात वारंवार पर्यावरणवादी विचारसरणीच्या लोकांतील अतिरेकीपणा व पर्यावरण रक्षणाच्या चळवळीतील अपप्रवृत्ती यांची सविस्तर चर्चा आहे. अनुवाद करताना विचाराचा धागा नेमकेपणाने पकडल्यामुळे अतिशय सुगम सरळ भाषेत ही कादंबरी आपण अत्यंत वेगात ओघवत्या भाषेबरोबर पुढे सरकत जाते. मुळातून वाचावी, अस्वस्थ होते चिंतन करावी, अशी ही कादंबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more