* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STATE OF FEAR
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788177669695
  • Edition : 1
  • Publishing Year : 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 528
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 30 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
EVERYONE IS AWARE THAT THE INCREASE IN THE INDUSTRIALIZATION IS LEADING TO THE INCREASED PERCENTAGE OF CARBON DIOXIDE IN THE ATMOSPHERE, WHICH IS FURTHER INCREASING THE GLOBAL TEMPERATURE. THIS INCREASED TEMPERATURE IS FURTHER GOING TO RESULT INTO THE INCREASED WATER LEVELS ALL OVER THE WORLD, MELTING THE SNOW EVERYWHERE. IT IS CALLING IN FOR NATURAL CALAMITIES LIKE FLOOD, STORMS, FAMINE, CLOUD BURSTING, ETC. NERF, A CHARITABLE ORGANIZATION WORKING FOR THE BETTERMENT OF THE ENVIRONMENT; HAS CALLED FOR A WORLDWIDE MEETING AT CALIFORNIA; THEY ARE LACKING IN FUNDS. THERE ARE OTHER ENVIRONMENTALISTS, BELIEVING IN THE TERRORISTS` WAY OF WORKING; THEY BRING IN BOMB EXPLOSIONS UNDER WATER, IN THE PACIFIC OCEAN, RESULTING INTO TSUNAMI, WHICH STARTS TOWARDS THE COASTS OF CALIFORNIA AT THE SPEED OF 800 KM PER HOUR…..
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे महापूर, चक्रीवादळं, दुष्काळ, ढगफुटी अशी संकटं वाढू लागली आहेत. हे सारे जगाला पटवण्यासाठी एन.ई.आर.एफ. या पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थेनं कॅलिफोर्नियात एक जागतिक परिषद आयोजित केलेली आहे. एन.ई.आर.एफ.कडे निधीची कमतरता आहे. संकटांचा धोका किती मोठा आहे हे पटवण्यासाठी पर्यावरणवादाचे समर्थक दहशतवादी पॅसेफिक महासागरात पाण्याखाली स्फोट घडवून आणतात. तिथे निर्माण झालेली सुनामीची लाट ताशी आठशे किलोमीटर वेगानं कॅलिफोर्नियाच्या दिशेनं सरकू लागली आहे...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES # PREY #प्रे #PRAMOD JOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #STATE OF FEAR #MICHAELCRICHTON #NEXT # PIRATE LATITUDES
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    पर्यावरण दहाशतवाद म्हणजे नक्की काय ...?? आज जगभरातील औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात सोडला जातोय . त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होतेय.त्यामुळे पृथ्वीवरील बर्फ वितळून पाण्याची पातळी वाढेल .मग महापूर ..चक्रीवादळ... ुनामी ..अशी नैसर्गिक संकटाची वाढ होईल. यात पहिला धोका आहे तो पॅसिफिक महासागरातील वानुटू या बेटाला. समुद्रसपाटीपासून अवघे काही इंच वर असलेले हे बेट प्रथम पाण्याखाली जाईल . म्हणूनच ते राष्ट्र अमेरिकेवर खटला भरण्याच्या तयारीत आहे .अमेरिकेतून सर्वात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडला जातो असा त्यांचा दावा आहे . अमेरिकेतील एन. इ.आर. एफ. ही पर्यावरणवादी संस्था या खटल्यात वानुटू राष्ट्राला मदत करणार आहे . पण प्रत्यक्षात हा खटला दाखल झाला नाही उलट त्या खटल्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणारे अचानक गायब झाले किंवा मारले गेले .एन .इ. आर. एफ. ने पर्यावरणाला असणारा धोका जगाला पटवून देण्यासाठी एक परिषद कॅलिफोर्नियात आयोजित केली आहे .त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे . त्याचवेळी ह्या संकटाचा धोका किती आहे हे पटविण्यासाठी पर्यावरणवादाचे दहशतवादी कृत्रिमरित्या सुनामी लाट निर्माण करून ती कॅलिफोर्नियाच्या दिशेने जाईल अशी योजना करतात . त्यांनी निर्माण केलेली ही सुनामी आता ताशी आठशे किलोमीटर वेगाने कॅलिफोर्नियाच्या दिशेने प्रवास करतेय . जगातील पाच माणसे ह्या संकटाचा सामना करतायत . या मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तीपुढे ते यशस्वी होतील का ....?? एक अतिशय वेगळा विषय थरारक आणि उत्कंठावर्धकपणाने मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे . ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    अस्वस्थ करणारे लेखन… ही कादंबरी काल्पनिक आहे, परंतु काही व्यक्ती व संस्था यांचे उल्लेख सर्व खरे आहेत. सुरुवातीच्या पानावरती दोन सुवचने आहेत. एक मार्क ट्वेन यांचे की ‘विज्ञानाच्या बाबतीत एक अशी काहीतरी विलक्षण गोष्ट आहे की, क्षुल्लक तथ्यांवर विसंबून ्यामध्ये घाऊक प्रमाणात अंदाज हाती लागतात. तसेच दुसरं महत्त्वाचं वचन जॉर्ज ऑर बेल यांचं, कोणत्याही महत्त्वाच्या विषयाला नेहमी असे काही पैलू असतात की कोणालाच त्याची चर्चा नको असते.’ या वचनातून पुस्तकाच्या बाबतीतला दृष्टिकोन स्पष्ट होतो. मायकेल क्रायटन या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाची त्यामधील विषयामुळे वादग्रस्त ठरलेली ही नवीन कादंबरी. या कादंबरीचा विषय आहे, ‘जागतिक तापमान वाढ’ या कादंबरीत पर्यावरणवादी विचारसरणी व पर्यावरण रक्षणाच्या चळवळीवर खरपूस टीका केलेली आहे. विज्ञान व रहस्यकथा याच चिंतनशीलता याचं मिश्रण या कादंबरीत आहे. यात वारंवार पर्यावरणवादी विचारसरणीच्या लोकांतील अतिरेकीपणा व पर्यावरण रक्षणाच्या चळवळीतील अपप्रवृत्ती यांची सविस्तर चर्चा आहे. अनुवाद करताना विचाराचा धागा नेमकेपणाने पकडल्यामुळे अतिशय सुगम सरळ भाषेत ही कादंबरी आपण अत्यंत वेगात ओघवत्या भाषेबरोबर पुढे सरकत जाते. मुळातून वाचावी, अस्वस्थ होते चिंतन करावी, अशी ही कादंबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more