* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353170233
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A STORY ABOUT A DYNAMIC IAS OFFICER WHO IS STRICT AND DOESN’T FUNCTION UNDER ANYONE’S PRESSURE. THAT IS THE REASON HE FACES LOT OF PROBLEMS IN HIS DAY TO DAY FUNCTIONING. WHEN FUNCTIONING AS A COLLECTOR OF BANDRA, HE NOTICES SOME CORRUPTION ACTIVITIES AND MULTI CRORE SCAMS. MANY BIG POLITICIANS, SENIOR OFFICERS AND POWERFUL BUILDERS HAVE THEIR VESTED INTERESTS IN THESE ACTIVITIES. THE BRAVE COLLECTOR IS PRESSURIZED BY THE WHOLE LOBBY AT ADMINISTRATIVE LEVEL. BUT HE IS FIRM ON HIS DUTIES , RESPONSIBILITIES & DECISIONS. THE COLLECTOR SHAKES HANDS WITH MEDIA TO STOP THESE KINDS OF CORRUPTION ACTIVITIES. THIS SENSATIONAL BOOK ‘RED TAPE’ PORTRAYS HIS HARD STRUGGLE OF FIGHTING AGAINST A CORRUPT SYSTEM IN AN EXCITING WAY.
सरकारी अधिकारी ही उपाधी भारदस्त वाटत असली तरी सत्ताधारी, विरोधक, प्रसार माध्यमे, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक घटकांसाठी खरे तर ते ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. कारण, कोणत्याही चांगल्या कामाचे श्रेय जाते सरकारकडे आणि काम बिघडले तर खापर मात्र फोडले जाते प्रशासनावर. संबंधित निर्णय किंवा योजना चांगली होती, पण प्रशासन कुचकामी ठरल्याने त्याची वाट लागली असा सर्वसाधारण मतप्रवाह असतो. अशी टिप्पणी करणे सोपे असले तरी प्रत्यक्षात विविध प्रकारच्या दबावांना, राजकारणाला, हितसंबंधियांच्या कट-कारस्थानांना तोंड देत आणि अनेकविध लाभांना तसेच आमिषांना दूर लोटत निर्णयाची अंमलबजावणी करणे महामुष्किल काम. शिवाय हे करताना सतत प्रशासनाच्या मजबूत पोलादी चौकटीचे भानही बाळगावे लागते. साहजिकच बहुतेकजण प्रवाहप्रतीत होत सत्ताधाऱ्यांचे वा वरिष्ठांचे ‘होयबा’ होणे पसंत करतात आणि स्वत:चे उखळही पांढरे करून घेतात. मात्र काही जिगरबाज अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहूनच या अ-व्यवस्थेविरोधात झगडा पुकारतात. व्यापक जनहीत डोळ्यासमोर ठेवून न्याय्य हक्कांसाठी झगडणाऱ्या अशा मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवावरच प्रशासनाचा गाडा पुढे सरकत असतो. दोन दशकांहून अधिक काळच्या पत्रकारितेत या सगळ्याची जवळून झालेली ओळख आणि सुमारे पावणेदोन वर्षे मंत्रालयात राजपत्रित अधिकारी म्हणून काम करताना ‘आतून’ घेतलेला प्रत्यक्ष अनुभव याची गुंफण करत एका वेगळ्या विषयाची केलेली ही मांडणी..
सार्वजनिक वाचनालय, नाशिकतर्फे धनंजय कुलकर्णी पुरस्कार.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#रेड टेप #अभिजित कुलकर्णी #करप्शन #लाल फितीचा कारभार #प्रशासकीय चौकाट #संघर्ष #राजपत्रित अधिकारी #भ्रष्टाचाराशी लढा #जिल्हाधिकारी #कमिशनर #लाभार्थी #विरोधक #पत्रकार #दलाल #माफिया #आय.ए.एस. #अधिकारी #आय.पी.एस अधिकारी # झुंजार अधिकाऱ्याची उत्कंठावर्धक संघर्षगाथा #जया देशमुख #आरोग्यमंत्री #महेश #अभिषेक #RED TAPE #ABHIJIT KULKARNI #CORRUPTION #RED RULE #ADMINISTRATOR #CONFLICT #GAZETTED OFFICER #FIGHTING CORRUPTION #COLLECTOR #COMMISSIONER #BENEFICIARY #OPPONENT #JOURNALIST #BROKERS #MAFIA #OFFICER #IPS OFFICER #EXCITED FIGHT FOR THE OFFICER #JAYA DESHMUKH #HEALTH MINISTER #MAHESH #ABHISHEK
Customer Reviews
  • Rating StarOnkar Pardeshi

    Hello Abhijeet Sir, I have recently read your "Red Tape" Novel. It is really really good and the structure of the language is very good. You Emphasised on the corruption and dark side of our Administration and Government is really really good. I hopethe second part of the novel will come soon! ...Read more

  • Rating StarVaibhav Salunke

    दैनिक दिव्य मराठी, नाशिकचे डेप्युटी एडिटर श्री. अभिजित कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘रेड टेप’ ही कादंबरी, २६४ पृष्ठांची ही कांदबरी मेहता पब्लिशिंग हाऊस, (पुणे) यांनी प्रकाशित केली आहे. काल्पनिक कथानकावर बेतलेली ही कादंबरी वाचकांच्या पातळीवर कालपनिक राहत नसून आजूबाजूला घडणारी घटनाचं बनून जाते. क्षणाक्षणाला कथानकातील उत्कंठा वाढवत जाते. बांद्रयाचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धडाडीचे जिल्हाधिकारी महेश राऊत हे या कादंबरीचे नायक आहेत. तर ‘प्रखर’ या दैनिकाचा झुंझार, निर्भीड मुख्य बातमीदार जया देशमुख हे सहनायक आहेत. आजूबाजूचे पात्र आपसूकच मग ओघाने येतात. गोरगरीब रूग्णांवर सवलतीच्या दरात उपचार व्हावेत म्हणून सरकातर्फे बांद्रयाला मध्यवस्तीत उभारायच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेला कोट्यावधी रूपयांचा भूखंड गिळून टाकण्याचा घाट घातला जातो. यात राजकारणी, मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, बिल्डर, ठेकेदार व दलाल या सर्वांच्या ‘अभद्र युती ’चा समावेश असतो. या अभद्र युतीचा लोकहित विरोधी असलेला डाव उधळून लावण्याचा चंग जिल्हाधिकारी महेश राऊत करतात. त्यांना जया देशमुख या निर्भीड पत्रकाराची साथ-संगत लाभते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, बांधकांममंत्री, आरोग्यमंत्री आणि मंत्री मंडळातील अजून एक-दोन मंत्री, मुख्यसचिव, महसूल सचिव, सचिव दर्जाचे अजून एक-दोन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार आणि कार्यालयातील काही घरभेदी अधिकारी/कर्मचारी अशी सर्व फौज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महेश राऊत व त्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मदत करणारा पत्रकार जया देशमुख यांचा जबरदस्त असा दुहेरी संघर्ष या कादंबरीत पत्रकार, संपादक अभिजित कुलकर्णी यांनी उभा केला आहे. या कथानकावर निश्चित एखादा चित्रपट होऊ शकतो. सामान्य माणासाला कायमच मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा रूबाब-आब व व्यक्तीमत्त्वाचे आकर्षण राहिले आहे. या आकर्षणाबरोबरच त्यांच्या वर्तुळात घडणाऱ्या आतील घडामोडी, लफडी याविषयी ‘चवितचर्ण’ करण्यात एका विशिष्ट गटाला रस असतो. ही सर्वसामान्य वाचकांची नस नेमकी हेरत कुलकर्णी यांनी संपूर्ण कादंबरीत मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संबंधित खुसखुसीत चर्चा कादंबरीत ठिकठिकाणी पात्रांच्या तोंडून उदधृत केल्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पत्रकार यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष व दूरध्वनीच्या माध्यमातून होणार संवाद अभिजित कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कादंबरीत शब्दब्ध केला आहे. यामुळे वाचक म्हणून आपण या संवाद शैलीच्या प्रेमात अधिक पडत जातो. जिल्हाधिकारी महेश राऊत यांना अडकविण्यासाठी विदेश दौऱ्यांत त्यांच्यावर लावण्यात आलेला ‘हॅनी ट्रॅप’ बाबत आपली उत्कंठा वाढत जाते. जिल्हाधिकारी या ‘हॅनी ट्रॅप’ मध्ये फसतील का ? याची क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत जाते. व काळजी पण वाटत जाते. मंत्रालयात महेश राऊत यांची बदली झाल्यानंतर राऊत हताश, निराश होतात. प्रसंगी नोकरी सोडण्याचा निर्धार करतात. मात्र त्यांचा पत्रकार मित्र त्यांची समजूत घालतो. आणि त्यांना मंत्रालयात रूजू होण्याचा सल्ला देतात. महेश राऊत मंत्रालयात रूजू झाल्यानंतर आपणास वाटते. हा संघर्ष आता संपला ; पण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राऊत ‘बांद्रा’ तील भूखंड हळपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघळून लावतात की ते त्यात अपयशी ठरतात ? हा संघर्ष कादंबरीत वाचण्यासारखा आहे. कादंबरी एकूणच उत्कंठावर्धक, वाचकांची अभिरूचीची भूक सांभाळणारी, खुसखुसीत, खुमासदार झालेली आहे. ‘रेडटेप !’. ...Read more

  • Rating StarShrikant Adhav

    दैनिक दिव्य मराठी, नाशिकचे डेप्युटी एडिटर श्री. अभिजित कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘रेड टेप’ ही कादंबरी, २६४ पृष्ठांची ही कांदबरी मेहता पब्लिशिंग हाऊस, (पुणे) यांनी प्रकाशित केली आहे. काल्पनिक कथानकावर बेतलेली ही कादंबरी वाचकांच्या पातळीवर काल्निक राहत नसून आजूबाजूला घडणारी घटनाचं बनून जाते. क्षणाक्षणाला कथानकातील उत्कंठा वाढवत जाते. बांद्रयाचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धडाडीचे जिल्हाधिकारी महेश राऊत हे या कादंबरीचे नायक आहेत. तर ‘प्रखर’ या दैनिकाचा झुंझार, निर्भीड मुख्य बातमीदार जया देशमुख हे सहनायक आहेत. आजूबाजूचे पात्र आपसूकच मग ओघाने येतात. गोरगरीब रूग्णांवर सवलतीच्या दरात उपचार व्हावेत म्हणून सरकातर्फे बांद्रयाला मध्यवस्तीत उभारायच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेला कोट्यावधी रूपयांचा भूखंड गिळून टाकण्याचा घाट घातला जातो. यात राजकारणी, मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, बिल्डर, ठेकेदार व दलाल या सर्वांच्या ‘अभद्र युती ’चा समावेश असतो. या अभद्र युतीचा लोकहित विरोधी असलेला डाव उधळून लावण्याचा चंग जिल्हाधिकारी महेश राऊत करतात. त्यांना जया देशमुख या निर्भीड पत्रकाराची साथ-संगत लाभते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, बांधकांममंत्री, आरोग्यमंत्री आणि मंत्री मंडळातील अजून एक-दोन मंत्री, मुख्यसचिव, महसूल सचिव, सचिव दर्जाचे अजून एक-दोन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार आणि कार्यालयातील काही घरभेदी अधिकारी/कर्मचारी अशी सर्व फौज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महेश राऊत व त्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मदत करणारा पत्रकार जया देशमुख यांचा जबरदस्त असा दुहेरी संघर्ष या कादंबरीत पत्रकार, संपादक अभिजित कुलकर्णी यांनी उभा केला आहे. या कथानकावर निश्चित एखादा चित्रपट होऊ शकतो. सामान्य माणासाला कायमच मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा रूबाब-आब व व्यक्तीमत्त्वाचे आकर्षण राहिले आहे. या आकर्षणाबरोबरच त्यांच्या वर्तुळात घडणाऱ्या आतील घडामोडी, लफडी याविषयी ‘चवितचर्ण’ करण्यात एका विशिष्ट गटाला रस असतो. ही सर्वसामान्य वाचकांची नस नेमकी हेरत कुलकर्णी यांनी संपूर्ण कादंबरीत मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संबंधित खुसखुसीत चर्चा कादंबरीत ठिकठिकाणी पात्रांच्या तोंडून उदधृत केल्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पत्रकार यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष व दूरध्वनीच्या माध्यमातून होणार संवाद अभिजित कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कादंबरीत शब्दब्ध केला आहे. यामुळे वाचक म्हणून आपण या संवाद शैलीच्या प्रेमात अधिक पडत जातो. जिल्हाधिकारी महेश राऊत यांना अडकविण्यासाठी विदेश दौऱ्यांत त्यांच्यावर लावण्यात आलेला ‘हॅनी ट्रॅप’ बाबत आपली उत्कंठा वाढत जाते. जिल्हाधिकारी या ‘हॅनी ट्रॅप’ मध्ये फसतील का ? याची क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत जाते. व काळजी पण वाटत जाते. मंत्रालयात महेश राऊत यांची बदली झाल्यानंतर राऊत हताश, निराश होतात. प्रसंगी नोकरी सोडण्याचा निर्धार करतात. मात्र त्यांचा पत्रकार मित्र त्यांची समजूत घालतो. आणि त्यांना मंत्रालयात रूजू होण्याचा सल्ला देतात. महेश राऊत मंत्रालयात रूजू झाल्यानंतर आपणास वाटते. हा संघर्ष आता संपला ; पण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राऊत ‘बांद्रा’ तील भूखंड हळपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघळून लावतात की ते त्यात अपयशी ठरतात ? हा संघर्ष कादंबरीत वाचण्यासारखा आहे. कादंबरी एकूणच उत्कंठावर्धक, वाचकांची अभिरूचीची भूक सांभाळणारी, खुसखुसीत, खुमासदार झालेली आहे. शेवटी जाता-जाता ऐवढेच म्हणावे वाटते की, ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या अरूण साधूंच्या मराठी कादंबरीनंतर बऱ्याच दिवसांनी एका पत्रकाराने लिहलेली दर्जेदार मराठी कादंबरी वाचण्यात आली ती म्हणजे ‘रेडटेप !’ ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 03-02-2019

    सरकारी अधिकाऱ्याची संघर्षगाथा... साधारणपणे पुस्तकाचं बाह्यरूप, लेखक असं बघून पुस्तक वाचायचं की नाही, हे मी ठरवतो. पुस्तकांच्या दुकानात नवीन काय हे चाळताना ‘रेड टेप’ समोर आलं. लेखक नवीन असल्यानं मला प्रश्न पडला. मुखपृष्ठ खूपच लक्षवेधक असल्यानं त्यावरं फाइलचा लाल बंध असलेलं छान चित्र पाहून ही सरकारी कारभारावरची कादंबरी असली पाहिजे, असा अंदाज बांधला. या लाल फितीचा जाच सर्वसामान्य माणसाला फार होत असतो. काही व्यक्ती त्याविरुद्ध, त्यातल्या अन्यायकारक गोष्टींविरूद्ध लढतात हे आपण अधूनमधून वर्तमानपत्रांतून वाचतो, बघतो. कधीकधी अनुभवतोसुद्धा; पण आपण थंड बसतो. या पार्श्वभूमीवर ‘रेड टेप’ वाचावी अशी ऊर्मी आली. ते पुस्तक वाचायला घेतलं आणि एकहाती वाचून संपवून टाकलं. प्रथमपासून सुरू होणारं सूत्र शेवटपर्यंत टिकवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. त्या लेखनात पत्रकाराचं वृत्तलेखन सतत जाणवत राहतं. अनेक प्रसंगांची गुंफण विशिष्ट शैलीत सलगपणे केलेली असल्यानं आपण प्रथम चकित होतो. नंतर विचारप्रवृत्त होतो. चीड येते आणि मनापासून प्रस्थापित चुकीच्या गोष्टींविरुद्ध लढणाऱ्या माणसाच्या बाजूनं उभा राहतो. समाजकारण, राजकारण, सरकारी कारभार आणि सर्वसामान्य माणूस या सर्वांचं एक वेगळं दर्शन, एक वेगळा पैलू पुस्तक वाचताना जाणवत राहतं. सुमारे २६४ पानांचं हे पुस्तक ओघवत्या भाषेत आणि वास्तवाच्या पातळीवर असल्यानं मनाला भावतं. भिडतं. महेशसारख्या अधिकारी सद्य:स्थितीत खूप आवश्यक आहे, असं वाटतं. अशा अधिकाऱ्यांची फळी निर्माण झाली, तर परीवर्तन होऊ शकेल. समाजात, सरकारमध्ये, प्रशासनात, पत्रकारितेत सारंच वाईट नाही. ‘सब घोडे बारा टक्के’ असं आपण समजतो तसं नाही. काही अधिकारी, पत्रकार, राजकारणी, इतर माणसं चांगली आहेत हे समजतं. मात्र, सन्मार्गी आणि कर्तबगार अधिकाऱ्याच्या वाटेत कसे पेरले जातात, याचं उत्कृष्ट वर्णन पुस्तकात केलेलं आहे. उच्चपदस्थ अधिकारी, मंत्री, कायदा खातं इत्यादी जर भ्रष्ट असेल, तर त्यातले लागेबांधे कसे घट्ट असतात यावर लेखकानं छान झोत टाकला आहे. महेशसारख्या अधिकाऱ्याचं प्रशासकीय कौशल्य, काटेकोरपणे कायदा पाळणं आणि आपलं काम करत राहणं हे किती जिकीरीचं हे लक्षात येते. वाचकामध्ये कधीकधी विषण्णता, कधी खेद, कधी उत्कंठा, कधी चीड अशा अनेक वेगवेगळ्या भावना उचंबळून येतात. शेवटी बुद्धी विचार करू लागते. असं विचारप्रवृत्त करणं हेच लेखकाचं कौशल्य आहे. नवेदित असूनही त्याला ते जमलं आहे. आयएएस दर्जाचे अधिकारी एकमेकांशी कसे वागतात, किती ताणतणावात असतात, त्यांचे कुटुंबीय कशाकशाला तोंड देतात, ते या कादंबरीत समर्थपणे रेखाटण्यात आलं आहे. समाज जडणघडणीच्या वाटचालीत अशी पुस्तकं मोठा वाटा उचलतात. एकूण सजग वाचकांनी, स्पर्धा, परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी, समाजकारण्यांनी, पत्रकारांनी आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा वाचावं असं हे पुस्तक आहे. प्रथम अपत्याचं इतकं छान रूपडं रेखाटण्यात लेखक अभिजित कुलकर्णी यशस्वी झाले आहेत. त्यांनी असंच शोधपत्रकारितेतलं लेखन करावं यासाठी शुभेच्छा. – डॉ. हिरेन निरगुडकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more