AVINASH BHOME

About Author

Birth Date : 15/10/1950
Death Date : 15/07/2019


NA

भोमे यांनी सकाळ, तरुण भारत यांसारख्या मराठी, तसेच इतर प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर स्तंभलेखन, तसेच पत्रलेखन केले आहे. आजवर त्यांचे इंग्रजी व मराठी मिळून १००० पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भारत हायस्कूल मधून झाले, तर बी.एम.सी.सी. कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ते सन १९७०मध्ये बी.कॉम.च्या परीक्षेत पुणे विद्यापीठामध्ये सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल त्यांना पुढील शिक्षणासाठी नॅशनल स्कॉलरशिपही मिळाली, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे त्यांनी १९७०मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी २००० साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. या तीस वर्षांच्या काळात त्यांनी बँकेची विविध पदे व जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या. बालसंगोपनाबद्दल पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते तुम्ही अन् तुमची मुले या विषयावर विविध शाळांमधून मोफत व्याख्याने देतात. त्यांचे सुसंवाद सहकार्याशी हे पुस्तक प्रसिद्ध असून त्यात व्यंगचित्रांच्या साहय्याने मॅनेजमेंट अँड ह्यूमन रिलेशन हा अवघड व गुंतागुंतीचा विषय सोप्या पद्धतीने विशद करण्यात आला आहे. त्यांनी जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या यू सेड इट! या कॉमन मॅनच्या व्यंगचित्रसंग्रहाचेही भाषांतर केले आहे. व्यवस्थापन, अकाउंट्स, बँकिंग अँड फायनान्स यांसारख्या विषयांवर व्याख्याने देण्यासाठी त्यांना बँकांची ट्रेनिंग कॉलेजेस व विविध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समधून आमंत्रित केले जाते. २००६ सालापासून ते विडंबन गीतांचा कार्यक्रमही सादर करत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
KASA BOLALAAT! PART 1 TO 7 Rating Star
Add To Cart INR 665
TUMHI AANI TUMACHI MULA Rating Star
Add To Cart INR 160

Shop by

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more