* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COMETH THE HOUR
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789392482007
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2022
  • Weight : 800.00 gms
  • Pages : 504
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THRILLING AND ABSORBING, COMETH THE HOUR IS THE SIXTH NOVEL IN INTERNATIONAL BESTSELLER JEFFREY ARCHER`S THE CLIFTON CHRONICLES AND SEES THE CLIFTON AND BARRINGTON FAMILIES NAVIGATE THE 1970S IN AN EPIC TALE OF TRAGEDY AND HOPE. THERE ARE DEVASTATING CONSEQUENCES FOR HARRY AND EMMA CLIFTON, HER BROTHER GILES BARRINGTON AND THEIR ARCH ENEMY LADY VIRGINIA WHEN A SUICIDE NOTE IS READ OUT IN COURT. HAVING FALLEN IN LOVE, GILES MUST DECIDE IF HE SHOULD WITHDRAW FROM POLITICS TO TRY AND RESCUE THE WOMAN HE LOVES FROM BEHIND THE IRON CURTAIN. LADY VIRGINIA FACES BANKRUPTCY, AND CAN SEE NO WAY OUT OF HER FINANCIAL PROBLEMS, UNTIL SHE IS INTRODUCED TO A RICH, HAPLESS AMERICAN. HARRY AND EMMA`S SON SEBASTIAN CLIFTON, NOW THE CHIEF EXECUTIVE OF FARTHINGS BANK, FALLS IN LOVE WITH THE WRONG GIRL EVEN AS HIS RIVALS PLOT TO OVERTHROW HIM. MEANWHILE, HIS FATHER REMAINS DETERMINED TO FREE A FELLOW AUTHOR FROM A GULAG IN SIBERIA, FOLLOWING THE INTERNATIONAL SUCCESS OF THE BOOK THEY WROTE TOGETHER, THE ACCLAIMED UNCLE JOE. BUT THEN SOMETHING ASTONISHING HAPPENS THAT NONE OF THEM COULD HAVE ANTICIPATED . . . THE PENULTIMATE BOOK IN THE CLIFTON CHRONICLES ONCE AGAIN SHOWCASES JEFFREY ARCHER`S EXTRAORDINARY STORYTELLING ABILITIES AND CONFIRMS HIS REPUTATION FOR BREATHTAKING TWISTS. CONTINUE THE BESTSELLING SERIES WITH THIS WAS A MAN.
आत्महत्या करण्यापूर्वी कुणीतरी लिहून ठेवलेल्या पत्रामुळे हॅरी आणि एमा क्लिफ्टन, गाइल्स बॅरिंग्टन आणि लेडी व्हर्जिनिया यांच्या आयुष्यावर होतात दूरगामी परिणाम...गाइल्सच्या मनात राजकारणातून निवृत्त व्हावं की नाही याविषयी सुरू आहे द्वंद्व...त्याच्या जीवनात आलेली कारीन आहे रशियन हेर...दिवाळखोरीची वेळ आलेल्या लेडी व्हर्जिनियाने ठागलंय धनाढ्य उद्योगपती सायरस टी. ग्रॅन्टला... फार्दिंग्ज बँकेचा चीफ एक्झिक्युटिव्ह झालेल्या सेबॅस्टियनला, त्याचप्रमाणे बँकेचे चेअरमन हकीम बिशारा यांना गोत्यात आणून बँकेवर कबजा करायचं स्वप्न पाहताहेत स्लोन आणि मेलर... अ‍ॅनातोली बाबाकोव्ह यांनी रशियन सरकारविरुद्ध सडेतोडपणे लिहिलेल्या ‘अंकल ज्यो` या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यांना रशियन सरकारने तुरुंगात टाकलंय...हॅरी क्लिफ्टन त्यांची तुरुंगातून मुक्तता करू पाहतोय...पण, या बाबतीत अचानकच घडतं काही कल्पनातीत...एकमेकीत गुंतलेल्या रहस्यमय कड्या आणि बदमाषांनी एकमेकांवर केलेल्या कुरघोड्यांचं रंगतदार चित्रण
COMETH THE HOUR BY JEFFREY ARCHER
No Records Found
No Records Found
Keywords
#जेफ्रीआर्चर #अनुवादितकादंबरी #लीनासोहोनी # कमेथ् दअवर #बेस्टकेप्टसीक्रेट #कॅटओ’नाइनटेल्स #टूकटअलाँगस्टोरीशॉर्ट #बीकेअरफुलव्हॉटयूविशफॉर #अॅन्डदेअरबायहँग्जअटेल #ट्वेल्व्हरेडहेरिंग्ज#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #JEFFREYARCHER #LEENASOHONI #COMETHTHEHOUR #BESTKEPTSECRET #CATONINETALES #TOCUTALONGSTORYSHORT #BECAREFULLWHATYOUWISHFOR #ANDTHEREBYHANGSATALE #TWELVEREDHERRINGS #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more