A. P. KHARAT

About Author

Birth Date : 15/07/1936


PRINCIPAL ANANTRAO PANDURANG KHARAT WAS BORN IN A SMALL VILLAGE KHARATWADI (T. VALWA, DIST. SANGLI) IN A FARMING FAMILY. HE RECEIVED THE PROF.GANGUNANA KANETKAR AWARD FOR SECURING FIRST RANK IN B.ED FROM PUNE UNIVERSITY IN 1962. HE ALSO STOOD FIRST IN M.ED EXAM FROM SHIVAJI UNIVERSITY IN 1965. HE IS A RED RIBBON AWARDEE IN THE D.P.ED. COURSE.

प्राचार्य अनंतराव पांडुरंग खरात यांचा जन्म खरातवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) या छोट्या खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. 1962 मध्ये पुणे विद्यापीठाच्या बी.एड. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांना प्रा. गंगूनाना कानेटकर पारितोषिक मिळाले. 1965 मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एम.एड. परीक्षेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. डी.पी.एड. कोर्समध्ये ते ’रेड रिबन’चे मानकरी आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत व महाविद्यालयांत अध्यापनाचा त्यांचा अडतीस वर्षांचा अनुभव आहे. शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक संशोधन, शैक्षणिक प्रशासन व शारीरिक शिक्षण या विषयांच्या अध्यापनात विशेष रस. चौदा वर्षे प्राचार्य म्हणून प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय विभागात इंटर्नल ऑडिटर म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले आहे. ते रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त आजीव सेवक आहेत. निवृत्तीनंतर रयत प्रिंटिंग प्रेसचे मानसेवी व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही वर्षे सेवा केली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SHARYATI SPARDHA KHEL Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more