* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUDHA MURTHY IS FROM THE NORTH KARNATAKA. PEOPLE HERE HAVE A TYPICAL PERSONALITY. THEY ALL CARRY THE CULTURE WITHIN THEMSELVES. ALL THE STORIES COLLECTED HERE RESEMBLE THE JASMINE GARLAND, EACH FLOWER CARRYING THE FRAGRANCE AND INTERWOVEN IN THE KARNATAKI THREAD. THE TENDEREST PART OF THE AUTHOR`S MIND COMES INTO LIGHT THROUGH THE WAY SHE HAS PICTURED THE UNCOMMON ASPECTS OF THE COMMON PEOPLE. SHE HAS ALSO BATHED IT IN LIGHT HUMOUR.
सुधा मूर्ती यांचं नर्मविनोदी शैलीतलं वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक मराठीत! उत्तर कर्नाटकातल्या या सर्व माणसांना स्वत:चं असं खास व्यक्तित्व आहे. तसेच ते सगळे इथल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा भागही आहेत. यातील सर्व कथा म्हणजे टपोया, सुगंधी मोगयाच्या फुलांचा गजरा, अस्सल कर्नाटकी गोफात गुंफलेला! या ‘सर्वसाधारण’ माणसांमध्ये जाणवणारं ‘असामान्यत्व’ लेखिकेच्या स्वभावातली ऋजुता अधोरेखित करतं.

No Records Found
No Records Found
Keywords
#SAMANYARALLI #ASAMANYA #SUDHA #MURTY #UMA #KULKARNI #BANDLE #BINDAPPA #CUNDOCTOR #BHIMANNA #ANGADI #JAYANNA #CHATUR #CHAMAVVA #SANDHISADHU #SEEMA #DABBAWALI #NALINI #सामान्यांतले #असामान्य #कथासंग्रह #उमा #कुलकर्णी #बंडल #बिंदप्पा #कंडक्टर #भीमण्णा #अंगडि #जयण्णा #चतुर #चामव्वा #संधिसाधू #सीमा #डब्बावाली #नलिनी
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू... ‘सामान्यातले असामान्य’ या सुधा मूर्तीलिखित कथासंग्रहात उत्तर कर्नाटकातल्या पार्श्वभूमीवरच्या कथा आहेत. कथांमधील व्यक्तींमध्ये अस्सल कर्नाटकी गुणधर्म असलेले कथांचे नायक-नायिका या कोणी असामान्य नाहीत. पण प्रत्येक माणसत काहीतरी चांगले-असामान्य असते. याच असामान्यत्वाचा शोध लेखिका घेते. असे करताना कधी विनोदी शैलीत व्यक्तिचित्रण केले आहे. उमा कुलकर्णींनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. लेखिकेने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे उ. कर्नाटकी संस्कृतीचा व भाषेचा थाटच वेगळा आहे. प्रादेशिक वैशिष्ट्य आहे. येथील माणसं वरवर ओबडधोबड वाटली तरी पारदर्शी आहेत. बोलण्यात, वागण्यात रोखठोकपणा जाणवला तरी भावनाशीलता व मृदुताही आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य अधोरेखित होते. ‘बंडल बिंदप्पा’ या नावातच त्याच्या स्वभावाची कल्पना येते. वरवर जाणवणारा उद्धटपणा, पण आतून फणसासारखा गोड रसाळपणा हे कर्नाटकी वैशिष्ट्य बंडल बिंदप्पामध्ये पुरेपूर भरलंय. बिंदप्पाला बंडल या उपाधीची तमा नाही, राईचा पर्वत करणं हा त्याचा स्वभावधर्म. याचा फटका कित्येकांना बसूनही तो कोणाच्या क्रोधाचा बळी ठरत नाही. कारण त्याचं पराकोटीचं कन्नड प्रेम. कंडक्टर भीमण्णा एक अजब वल्ली. स्वत:च्या संसारापासून अलिप्त, सामान्य परिस्थितीतही सदा आनंदी असणारा भीमण्णा दिलदार आहे. त्यामुळे नोकरी गमवावी लागली तरी मूळ स्वभाव जात नाही. ‘जीवन म्हणजे मूळ कडुनिंबाचं मिश्रण. माझ्यासारख्याचं जीवन म्हणजे रंग नसलेलं चित्र. प्रत्येकाने आपापल्या मर्जीप्रमाणे रंग भरायचे. किरकिरता जीवनाचा कुठलाही रुट सोडून पळून जात नाही.’ हे भीमण्णाचं तत्त्वज्ञान. अंगडी जयण्णा हा सामान्य पण दिलदार माणूस. अंगडी म्हणजे दुकान लहानपणापासून व्यापाराची आवड असणारा जयण्णा दुकान चालवतो. पण अव्यवहारीपणामुळे बुडितखाती जातो. अखेर आजोबा मळा विकून कर्जफेड करतात. याच्याविरुद्ध आहे चंतुर चामव्व. सामान्य रूप, सामान्य शिक्षण, सामान्य परिस्थितीतील चामव्वा व्यवहाराला चतुर व स्वार्थी. पैसा हेच सर्वस्व मानणारी चामव्वा सतत फायद्या-तोट्याचाच विचार करताना दिसते. प्रेम, ममता या शब्दांशी तिचा काहीही संबंध नाही. वरवर गोड बोलणारी चामव्वा आतून कडवटपणाने युक्त आहे. म्हणूनच कोंडीत पकडून श्रीमंत सासर पटकवते; इतकेच नव्हे तर दागिने, तिजोरी लंपास करते. संसाराच्या आर्थिक नाड्या हातात घेण्यात यशस्वी ठरते. असूया. तिचं नाव अनसक्का. ही स्त्री अत्यंत मत्सरी. कधीही कुणाच्याही चांगल्या गुणांचे कौतुक न करणारी वृत्ती. म्हणूनच वैभवात असूनही असमाधानी, अतृप्त. पण तिचा हा अवगुण झाकला जातो तो तिच्या एका गुणामुळे. कुणाच्याही, कुठल्याही अडचणीला धावून जाऊन मदत करण्याचा मोठेपणा तिच्यात आहे. मुळात शहाणी असून स्वाभावाला चांगले वळण न लागल्याने स्वभावात आलेला विचित्रपणा आहे. गंगा एक सुंदर, कलाकुसर निपुण, वाचनाची आवड असणारी सुशिक्षित स्त्री. आपल्यातील या गुणांचा गर्व असलेली गंगा कुणात मिसळत नाही. इतरांवर टीका करणे, त्यांच्यातले न्यून शोधून तिरस्कार करणे, चेष्टा करणे हा स्वभावच बनून गेला. लग्नासाठी प्रत्येक मुलात काही तरी खोड काढण्याच्या सवयीमुळे अखेर लग्नापासून वंचित रहावे लागले. त्याचे पर्यवसान रागीटपणा, चिडचिड यात होते. स्त्रीला तडजोड करावी लागेल हे तिला वेळेवर न उमजल्याने आयुष्याची फरफट अटळ ठरते. अक्कमा स्वभावत:च परोपकारी. गावातल्या कोणासाठीही कोणत्याही प्रसंगी तिला वडीलकीच्या नात्याने बोलावले जाते. कोणत्याही अडचणीतून खंबीरपणे मार्ग काढू शकणारी अक्कमा निरपेक्ष वृ्तीने लोकांसाठी झटते. पण लोक तिला गृहीत धरतात. कोणत्याही स्वरूपात त्याची परतफेड करण्याचे भानही ठेवत नाहीत. ‘कोणी किती कृतज्ञता ठेवायची हे प्रत्येकाला त्याच्या आईनं जेवढं, जसं शिकवलं असेल त्यावर अवलंबून असतं. ती सगळ्यांना जगणारी गोष्ट नाही.’ हे अक्कमाचं तत्त्वज्ञान तिला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. बण्णभट्ट व पार्वती या विजोड जोडप्याचं वर्णन लेखिका नर्मविनोदी शैलीत करते. ‘नॉट मेड फॉर इच अदर’ अशी स्पर्धा आयोजित केली तर पहिला पुरस्कार मिळेल, पार्वती अत्यंत देखणी, हौशी, लिहा-वाचायची आवड, सिनेमाची आवड, स्वच्छतेची आवड असणारी, नटणारी चैत्रगौरीसारखी स्त्री. याउलट बण्णभट्ट तेलकट चेहरा, पुढे आलेलं पोट, जुनकट कपडे, पान खाऊन लाल झालेले, पुढे आलेले दात असं ध्यान. दोघांचे स्वभावही विरुद्ध रसिक पार्वतीला स्वप्नातला राजकुमार भेटलाच नाही. तिच्या इच्छा-आकांक्षा त्याला उमजल्याच नाहीत. तो अलिप्तसाच राहिला. पण पार्वतीच्या मृत्यूनंतर अगदी लवकरच बण्णभट्टही गेला. मनात तिच्याविषयी ओढ असूनही स्वभाववैशिष्ट्यामुळे त्याच्या भावना अव्यक्त राहिल्या. पण तिचं जाणं मात्र तो सहन करू शकला नाही. काही काही व्यक्ती अत्यंत स्वार्थी असतात. त्यांच्यामध्ये हा अवगुण वारशाने येत असावा. आई-वडिलांच्या शिकवणीमुळेच स्वत:वरची जबाबदारी टाळणे, स्वत:चं सुख, धन यापुढे पती, पुत्र यांचं प्रेमही दुय्यम ठरतं. सावित्री ही अशीच एक स्त्री. पराकोटीचा स्वार्थीपणा हेच त्यांचं असामान्यत्व! भागव्वा कणखर व्यक्तिमत्त्वाची, अपार आत्मविश्वास असणारी धाडसी, कोणत्याही परिस्थितीत मनाचं संतुलन ढळू न देता निर्णय घेऊ शकणारी स्त्री. बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षण नाही आणि म्हणूनच बालपणीच लग्नबंधनात अडकलेली भागव्वा परिस्थितीला शरण जात नाही. तिचा नवरा रामण्णा स्वभावाने गरीब असल्याने जमिनीवर दिराचा कब्जा असतो. भागव्वा न घाबरता दिराकडे वाटणी मागते. कर्नाटकातल्या कडेकोट बंदोबस्तात, पुरुषप्रधान समाजाच्या बालेकिल्ल्याला या घटनेने प्रचंड धक्का बसतो. दिराच्या शिव्या, धमक्यांना भीक न घालता किडूकमिडूक विकून ती कोर्टात जाते. केस जिंकून जमीन ताब्यात घेते, संसार सांभाळते. प्रचंड मानसिक बळ, लीडरशिप हे तिचे अंगभूत गुण. सौदामिनीची कथाच वेगळी. सर्वसाधारण रूपाची दामिनी हुशार, धीट, चांगल्या स्वभावाची मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात दामिनी पदवीधर होऊन बँकेत नोकरी करते. नशिबानं देखणा, डॉक्टर नवरा मिळतो. उत्कर्ष होऊन वैभव प्राप्त होतं. मग नातेवाईकांची, लोकांची, गरजूंची रीघ लागते मदतीसाठी. असं असूनही तिच्या मनात खंत आहे. दानधर्म केला तर तो काळा पैसा, केलेलं पाप फेडण्यासाठी देतात ही भावना. नाही दिले पैसे तर पेपरातून टीकास्त्र. लोकांची ही वृत्ती तिला व्यथित करते. फणीवेणी व नागवेणी या जुळ्या बहिणी. फणी चुणचुणीत, बुद्धिमान, सर्व विषयांत पहिला नंबर. म्हणून ‘फस्र्ट रँक फणी’. तर नागू सावळी, काटकुळी, सर्वसामान्य. त्यामुळे दोघींची नकळत तुलना होईल. दोघींमुळे स्नेह नव्हता. नागू अबोल. ती सामान्य स्थळी पडली पण सासरी कौतुक होतं. उलट फणीचं रूप, गुण, बुद्धिमत्ता हे अवगुण ठरले. नवरा अतिबुद्धिमान, गर्विष्ठ म्हणून फणीला दुय्यम मानून तिची अवहेलना होत राहिली. फणीची ‘ईर्षा’ नाहीशी होऊन तिचं मन कोमेजून जातं. पीएच. डी. करायची इच्छा अपूर्ण राहते. करिअर नाही, स्वत:चं अस्तित्वच उरत नाही. गुणी फणीच्या नशिबी असं जिणं येतं. शीनप्पा-सीताबाई हे मेड फॉर इच अदर जोडपं. दोघांनाही पैसा हेच सर्वस्व. त्यांच्या जीवनाची मूल्येच वेगळी. दोघंही गर्भश्रीमंत त्यामुळे फक्त बरोबरीच्या लोकांशीच संबंध ठेवणे, त्यांचे आदरातिथ्य करणे ही वृत्ती. गरिबांच्या वेदना, दु:खाशी त्यांचा काहीच संबंध नाही. पण कधी कधी काळाचा महिमा अगाध असतो. सून व मुलगी यांच्या उधळपट्टीमुळे, स्वार्थी वृत्तीमुळे संपत्तीस ओहोटी लागते आणि काळाच्या प्रवाहात सारे सामान्य होऊन जाते. सरसक्का सुंदर आहे पण बेताचं शिक्षण, बेताची परिस्थिती यामुळे रेड्यासारख्या श्रीपादशी विवाह होतो. श्रीमंत घराणं पण श्रीपाद अवगुणी, बाहेरख्याली असल्याने रोगग्रस्त असतो. फसवणूक झालेली सरसक्का वर्षभरातच विधवा होते आणि अपशकुनी म्हणून अवमानित होते. पण कोणाचं भाग्य कसं पालटेल ते कल्पनेच्या पलीकडचं असतं. तिचे कुटुंब बद्रीकेदारला यात्रेला जाते. तिथं लक्ष्मणझुल्यावर योगयोगाने सरसक्का व दीर श्रीहरी नदीत फेकले जातात. त्यांचा पत्ता लागत नाही पण ते सुदैवाने वाचतात. दूर निघून जाऊन विवाह करतात, सुखी होतात. जीवण्णा एक गर्भश्रीमंत माणूस, पण त्याच्या बाह्यरूपावरून व चिकट स्वभावावरून याची कल्पना येणेही कठीण. भिक्षुकासारखे कपडे, जेवणातही काटकसर. त्याच्या या स्वभावामुळे मुलगा व मुलगी दुरावले पण अर्धांगवायू व परावलंबित याने चिकट जीवण्णाला चांगलाच धडा शिकला. अंबक्का सर्वसामान्य पण सुगरण, स्वयंपाकघरात रमणारी गृहिणी. तिचा सुशिक्षित पती यामुळे कंटाळलेला पण तिच्या आजारपणामुळे तिचं महत्त्व पटतं. ताराबाईला भांडण अतिशय प्रिय. त्यासाठी तिला कोणत्याही प्रसंगाची गरज वाटत नाही. भांडण समोर आलं की तिचं व्यक्तिमत्त्व वेगळं होतं. उत्साह द्विगुणित होतो. समोरच्याला हिणवण्यात, नामोहरम करण्यात तिचा हात कुणीही धरणार नाही पण भांडण संपल्यावर मन शांत होऊन त्याचा मागमूसही राहत नाही. अशा शब्दात लेखिका तिचं वर्णन करते. सीमा संधिसाधू, चतुर आहे. कुणी डोनेशन मागायला आलं तर सरळ सासूच्या हातात अधिकार आहेत म्हणून सुटका करून घेते. डब्बावाली नलिनी एक अजब व्यक्तिमत्त्व. कार्याला जायला जमलं नाही तर रिकामा डबा पाठवून देऊन कोणाकडून मागवते. वरकरणी हे विचित्र वायतं पण तिचं मन निर्मळ आहे, हेतू उदात्त आहे, डबा आणणाऱ्याशी बोलता येतं. स्वत: डबा पोचवायला, परत करायला जाते तेव्हा त्यांच्याशी बोलून त्यांची दु:खं हलकी करता येतात. सांत्वन करता येतं. मन मोकळं होतं, हा चांगला हेतू त्यामागे असतो. याची किती जणांना जाणीव असते? माणसामध्ये असलेले गुण-अवगुण हेरून ते शब्दबद्ध करताना लेखिकेने कुठेही वाईट हेतू किंवा अढी ठेवलेली नाही. माणसाच्या स्वभावाचे हे विविध पैलू उलगडणे एवढाच हेतू. माणूस कोणत्याही प्रांतातला, प्रदेशातला असो, त्याची भाषा, संस्कृती यात वेगळेपणा असो पण माणूस म्हणून तो अंतर्बाह्य फार वेगळा नसतो. त्याच्यामधील सत्-असत्, स्वार्थ, परोपकार, कठोरपणा, मृदुता, प्रेम, स्नेह, त्वेष, मत्सर, हेवा हे सारेच सर्वांच्या ठायी असतेच. अशा विविध गुणावगुणांनी युक्त माणसावर आपण प्रेम करतो. त्याच्यामधल्या अवगुणाकडे सहानुभूतीने पाहून त्याला जवळ करतो. मग त्यातच माणुसकीचं दर्शन घडतं. लेखिकेच्या अशा उदार दृष्टिकोनातून हे साध्य झालेलं दिसतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more