* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666144
  • Edition : 9
  • Publishing Year : JANUARY 1952
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS COLLECTION INCLUDES THE SHORT STORIES BY RANJIT DESAI WHICH HE PENNED DOWN DURING HIS EARLY YEARS AS A WRITER. THESE STORIES WERE PUBLISHED IN STANDARD MAGAZINES LIKE MAUJ, SATYAKATHA, KIRLOSKAR, ABHIRUCHI, JANWANI ETC. RANJIT DESAI REVEALS HIS SECRET ABOUT THESE SHORT STORIES, WHATEVER COMES TO MY MIND TAKES FROM OF STORY. WHATEVER I WRITE IS WRITTEN WITH ALMOST HONESTY. THERE MIGHT BE MANY DRAWBACKS, MANY FAULTS, MANY A TIMES I MIGHT HAVE GIVEN MORE WEIGHTAGE TO RURAL LIFE THAN THAT COMPARED TO URBAN LIFE, BUT NO WHERE I HAVE BEEN DECEITFUL. I HAVE ONLY ONE REQUEST TO THE READERS, IF EVER YOU DECIDE TO CHECK THE TRUENESS OF MY STORIES, REMEMBER MY HONEST AND FRANKNESS.
रणजित देसाई यांनी अगदी आरंभीच्या काळात ज्या काही लघुकथा लिहिल्या, त्यांतील निवडक कथा या संग्रहात संग्रहित केल्या आहेत. या कथा ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रसाद’, ‘किर्लोस्कर’, ‘अभिरुचि’ व ‘जनवाणी’ अशा दर्जेदार नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. या कथांविषयी लिहिताना स्वत: रणजित देसाई म्हणतात : ‘.... एक ‘गुजगोष्ट’ सांगावीशी वाटते, की मी जे काही लिहिले आहे, ते अगदी मनापासून लिहिले आहे. त्यात उणिवा असतील, दोष असतील, विस्तार कमीअधिक असेल, नागरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनाचेच जास्त चित्रण असेल; परंतु त्यात अप्रामाणिकपणा मात्र खास नाही. माझ्या कथांना कसोटी लावलीच, तर ती ‘प्रांजलपणा’चीच लावावी, एवढेच ‘पसायदान’ मी वाचकांपुढे मागतो.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA# SANCHIT# BHAIRAV# NANDA# MAIDAN# SEEMOLANGHAN# ROOPMAHAL# CHEI AGAD CHEI# ABAJI PATIL# DHANGARACHI JAAT# JEEVA-SHIVA# #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे – #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित# नाटक # भैरव# नंदा# मैदान# सीमोल्लंघन# रुपमहाल# चै आगद चै# आबाजी पाटील# धनगराची जात# जीवा-शिवा#
Customer Reviews
  • Rating StarAstana Pathan

    vachale he pustak.chhan aahe.

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    रणजित देसार्इंच्या कसदार ग्रामीणकथा… शालेय जीवनातच ‘भैरव’या कथेने लेखनाची सुरुवात केलेल्या रणजित देसार्इंचा पहिला कथासंग्रह १९५२मध्ये ‘रूपमहाल’द्वारे प्रकाशित झाला. त्यांच्या बहुतांश कथा ग्रामीण समाजजीवनावर आधारित असून काही ऐतिहासिक, प्राणिविषयक, संीतविषयक आणि विनोदी कथा त्यांनी लिहिल्या आहेत. ‘रूपमहाल’या पहिल्या कथासंग्रहात नऊ कथा असून त्यातील आठ ग्रामीण जीवनावरील तर एक कथा ऐतिहासिक स्वरूपाची आहे. विशेष म्हणजे ‘रूपमहाल’ ही एकच कथा ऐतिहासिक असूनही तिचे शिर्षक लेखकाने कथासंग्रहाला दिलेले आहे. यावरून ‘रूपमहाल’चे महत्त्व लक्षात येते. ग्रामीण समाजजीवन हा या कथासंग्रहाचा गाभा असून बैलांच्या शर्यती, हत्तीची साठमारी, कुस्ती, शिकार इत्यादी विषय त्यांनी हाताळले आहेत. प्रत्येक कथेत एका संघर्षाची योजना करून त्याभोवती पोषक अशा घटनांची व ग्रामीण वातावरणाची पाश्र्वभूमी त्यांनी कलात्मकरित्या रंगविली आहे. म्हणूनच या सर्व कथा वाचकांच्या मनाची पकड घेतात. भोवतालच्या रूक्ष व कृत्रिम वातावरणातून काहीशा अद्भूतरम्य सृष्टीत घेऊन जातात. नाट्यपूर्ण संघर्ष रंगवताना रणजित देसाईच्या भाषेच्या सामथ्र्याची आणि सूक्ष्म अवलोकनशक्तीची प्रचिती येते. मग ते ‘भैरव’मधील बैलांच्या शर्यतीचे रोमहर्षक वर्णन असो, ‘नंदा’मधील जीवघेण्या शिकारीचे वर्णन असो, ‘मैदान’मधील भैरू आणि शिद्दा यांच्यातील अटीतटीच्या निकाली कुस्त्यांचे वर्णन असो किंवा ‘चै आनंद चै’ या कथेतील साठमारीचे वर्णन असो; ही सर्व वर्णने वाचत असताना ते ते प्रसंग परिणामकारक रीतीने वाचकांच्या नजरेसमोर उभे करण्याचे शब्दसामर्थ्य दिसून येते. किंबहुना आकर्षक वर्णनशैली हेच या कथांच्या लोकप्रियतेचे रहस्य असल्याचे सतत जाणवते. संघर्षाचे परिणामकारक वर्णन करण्याबरोबरच प्रभावी समरप्रसंग हेही रणजित देसार्इंच्या कथालेखनाचे एक वैशिष्ट्य प्रस्तुत कथासंग्रहात पाहावयास मिळते. त्यांच्या कथेतील व्यक्ती किंवा प्राणी यांची वर्णने वाचकांच्या मनाला चटकन आकर्षित करून घेतात. हा पहिला कथासंग्रह असूनही यात पहिलेपणाच्या मर्यादा किंवा उणिवा अभावानेच व्यक्त होतात. कोल्हापुरातील संस्थानी वातावरणात वावरल्याच्या पाऊलखुणा यातून प्रकर्षाने जाणवतात. विशेषत: ‘भैरव’, ‘नंदा’, ‘चै अगद् चै’ यासारख्या प्राणिकथांतील जिवंत चित्रण पाहता लेखकाच्या संवेदनशील व्यक्तित्वाची आणि प्राणिविषयक जिव्हाळ्याची कल्पना येते. ‘रूपमहाल’विषयी प्रा.म.ना.अदवंत लिहितात, ‘‘घटना व व्यक्तिरेखन यांच्या जोडीला वातावरण निर्माण करण्याचे लेखकाचे कौशल्य विसरून चालावयाचे नाही. त्यासाठी अनेक सूक्ष्म तपशीलांचा त्याने उपयोग केला आहे. शकुनापशकुनाच्या कल्पना, जत्रेची व भेकनाची वर्णने, कुस्तीच्या फडाची वर्णने हा तपशील कथेत जिवंतपणा आणतो यात शंका नाही. थोडक्यात, अस्सल ग्रामीण जीवनाची प्रचिती देण्याचे सामर्थ्य या संग्रहात आहे व म्हणूनच त्यांच्या पुढील लेखनाबद्दल आशा वाटते.’’ प्रा. अदवंत यांची अपेक्षा सार्थ ठरावी अशाचप्रकारचे लेखन रणजित देसाईच्या हातून पुढील काळात झाले. नवकथा ऐन बहरात असताना कथालेखनाला प्रारंभ केला असूनही स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य त्यांनी दाखवून दिले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more