* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TRANSLATED BY MRINALINI GADKARI. THIS LIFE IS A HARMONIOUS BRAID WOVEN TOGETHER WITH THE BEAUTIFUL FEELINGS OF HUMAN BEINGS. NATURE IS ALWAYS IN ACCORDANCE WITH IT. RAVINDRANATH`S LITERATURE HOLDS A SPECIAL PLACE FOR HUMAN BEINGS AND NATURE. IN HIS STORIES, NATURE IS NOT THERE FOR THE SAKE OF BEING. IT IS THERE AS A SEPARATE CHARACTER. IT PLAYS IMPORTANT ROLE WITH THE MOOD SWINGS OF HUMAN BEINGS. ITS CHANGING NATURE REFLECTS THE CHANGING OF MOODS. THESE STORIES WHERE EQUAL WEIGHTAGE IS GIVEN TO MAN AND NATURE SHOWS RAVINDRANATH`S QUALITIES AS A WORLD FAMOUS POET, OF A SPECIAL, DIVINE HUMAN BEING.
माणूस आहे म्हणूनच या जगात भावनांचा सुंदर गोफ विणला जातो, आणि त्याला साथ असते निसर्गाची. रवीन्द्रनाथांच्या जीवनात ‘माणूस’ आणि ‘निसर्ग’ यांना असाधारण स्थान आहे. त्यांच्या कथेत निसर्ग हा फक्त वर्णनाकरिता येत नाही, तर भावभावनांच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावतो. निसर्गाची बदलणारी रूपं माणसाच्या बदलणाया भावनांच्या प्रतिमा असतात. निसर्ग आणि माणूस यांच्या संयोगातूनफुललेली विश्वकवीची कथा तो महामानव होता हे नकळत सांगून जाते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
  • Rating StarPRABHAT 13-02-2008

    स्त्रीची विविध रुपे ... विश्वकवी म्हणून रवींद्रनाथ टागोरांना ओळखलं जातं. परंतु आशिया खंडात नोबेल पारितोषिकाने सन्मानिक झालेल्या टागोरांची एवढीच ओळख नव्हती. ते तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, गीतकार, संगीतकार, नाटककार, कादंबरीकार णि कथाकारही होते. ‘माणूस’ आणि ‘निसर्ग’ हे त्यांचे आवडते विषय असल्याचे जाणवते. माणसामध्ये पुन्हा स्त्री आणि पुरुष हे भिन्नच त्यात स्त्रीच्या जीवनाची कहाणी काही वेगळीच. मुलगी, आई, पत्नी, प्रियसी, विधवा अशी स्त्रीची विविध रुपे असतात. काळानुसार ती आपल्यावर पडलेली भूमिका निभावत असतात. स्त्रीच्या या विविध रुपांचे कांगोरे टागोरांनी आपल्या ‘पोस्टमास्तर आणि इतर कथा’ या कथासंग्रहात उलगडून दाखविले आहे. या कथासंग्रहाचा अनुवाद मृणालिनी गडकरी यांनी केला असून, मेहता प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. गावात आलेल्या पोस्टमास्तरची सेवा करणारी आणि त्याने गाव सोडताना आपल्याला बरोबर न्यावे, अशी मनोमन अपेक्षा करणारी अनाथ रतन, आपल्या जावेच्या मुलावर प्रेम करणारी विधवा कादंबिनी, दीराने केलेल्या खुनाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेणारी चंदरा, लिहिण्या-वाचण्यातील निर्भेळ आनंद घेणारी चिमुरडी उमा, नवऱ्याला कमीपणा नको म्हणून स्वत:च्या प्रतिभेला मुरड घालणारी निर्झरणी, प्रियकराला दिलेला शब्द पाळण्यासाठी चितेवरून उठून येणारी महामाया अशी विविध रूपे आणि भूमिकांतील स्त्रिया रवींद्रनाथांच्या या कथासंग्रहात आहेत. वाचकांशी सहज संवाद साधत कथा सांगण्याची रवींद्रनाथ टागोरांची खास शैली. त्याचा प्रत्यय हा कथासंग्रह वाचताना येतो. त्यांच्या मनात स्त्रीचे असलेले आदरणीय स्थान हेही अनुभवायला मिळते. एकीकडे दुर्लक्षित असलेल्या या नायिका केवळ परिस्थितीच्या गुलाम आहेत, असे नाही तर त्यांच्यातील प्रत्येकीच्या अंगी काहींना काही विशेष गुण आहे. परिस्थितीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी, सबल होण्यासाठी त्यांची धडपड चालू असल्याचेही जाणवते. स्वातंत्र्यपूर्व काळात रवींद्रनाथांच्या कथांमधून उलगडलेल्या या स्त्री जीवनाच्या विविध छटा आजही तशाच पहायला मिळतात. त्यामुळे या कथांना काळाचे बंधन जाणवत नाही. रवींद्रनाथांच्या कथांचा मराठी अनुवाद करताना मृणालिनी गडकरी यांनी कथांचा सहजपणा, ओघवतेपणा आणि संवाद साधण्याची शैली या बाबींना धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे अनुवादातही कथाचा ताजेपणा जाणवतो. वाचकाला भुरळ घालण्यात त्या यशस्वी होतात. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT 15-06-2008

    अनंत मनोहर रवींद्रनाथजी म्हणजे गीतांजली, शांतिनिकेतन म्हणजे रवीबाबू आणि काबुलीवाला कथा म्हणजे तेच. गांधीजी आवर्जून भेटायला गेले होते ते टागोरजींना. पण रवींद्रनाथ यांनी, काबुलीवाला प्रमाणे अन्यही खूप कथा लिहिल्या, गीतांजली नंतरही कविता केल्या, हे आपलयाला माहित नसते. टागोरजींचा काबुलीवाला याच्या पाठोपाठ वाचकांसमोर ``पोस्टमास्तर आणि इतर कथा`` हा मृणालिनी गडकरी यांचा भाषांतरित संग्रह आला आहे. रवींद्रनाथ एका एकत्र कुटुंबात वाढले. त्यांची आई, वहिनी, पत्नी या प्रेमळ स्वभावाच्या होत्या. जमीनदारीचा पसारा सांभाळताना त्यांचा जनसामान्यांशी संबंध येई. भारतीय स्त्री कष्टाळू, त्यागी, सोशिक किती आहे ते त्यांनी पाहिले होते.त्यांच्या मनात भारतीय स्त्रीची एक मनोज्ञ मूर्ती साकार झाली होती. तिचे दु:ख, तिच्या व्यथाभरल्या कहाण्या, तिचे कर्तुत्व, व्यक्तिमत्व, त्यागमयी जीवन, पतिपरायणता यांचे चित्रण रवीबाबूंच्या साहित्यात अनेकदा आले आहे. बंगाली विधवेचे जीवन आपल्याकडील गतधवेच्या आयुष्याप्रमाणे अति करुणामय असे. एवूâण त्या काळातील स्त्री हा समाजव्यवस्थेचा एक शापित घटक असे. तिची बुध्दी, शक्ती, समज, कलाप्रियता, तिची ज्ञानलालसा यांना काही किंमत नव्हती. टागोरजींच्या अनेक कथांचा केंद्रबिंदू तत्कालीन स्त्री व तिचे जीवन हा असतो त्याचे हे रहस्य आहे. ते स्त्रीचा कधीही अधिक्षेप करीत नसत. स्त्रीची प्रतिष्ठा जपणारी अशी त्यांची कथा असे. बंगाली स्त्री वेळप्रसंग आल्यास आत्मसन्मानासाठी समाजाविरुध्द बंड करुन उठत असते. तशी ती कणखर होती. रवींद्रनाथांच्या स्त्री व्यक्तीरेखा सबल आहेत. त्यातील काही उघडउघड बंड करतात. तर काही उघड बंड करीत नसल्या तरी त्या मूकपणे प्रस्थापितांना वैचारिक धक्के देतातच. त्यातून समाज पुढे सरतो. त्यात ता स्त्रियांचा स्वार्थ नसतो. त्यांच्या कृतीमागे प्रबल भावोत्कटतेपेक्षा डोळस विचार असतो आणि समाजगाड्याला चालना मिळावी ही प्रबळ इच्छा असते. रवींद्रनाथ कविहृदयी खरे परंतु ते वास्तवसन्मुख आहेत. त्याचं चटकन उदाहरण द्यायचं तर ते ``वही``कथेचं देता येईल. या कथेतील छोटी उमा तिचे मनोगत तिच्या वहीमध्ये लिहून ठेवायची. तिच्या सासरच्या लोकांना उमा लिहित्येय ही गोष्ट सहन होण्यासारखी नव्हती. तीला हा हिशेब समजण्यासारखा नव्हता, तिच्या हातातून वही काढली गेली. ``गर्वहरण`` मधली निर्झरिणी ही लेखिका आणि तिचा नवरा दोघेही एका कथास्पर्धेत भाग घेतात. तिला पारितोषिक मिळते पण ती शहाणी व समजूतदार असते. ती स्वत:ची वही स्वत:च फाडून टाकते. ती आपल्या संसाराला जपण्यासाठी हा निर्णय घेते. पहिला नंबर आलेली अनिला तिला आत्मभान येताच घर सोडून निघून जाते. कारण नवऱ्याचं वागणं तिला असह्य झालेलं असतं. ``पत्नीच पत्र`` मधील मृणाल कुरूप बिंदूला आसरा देते. अन्यायापासून ती बिंदूचे रक्षण करू पाहते. शेवटी बिंदूने आत्मघात करून घेतला. मृणालच्या मनात हे असं का ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला. घर सोडण्याचा मृणालने कठोर निर्णय घेतला. घर सोडले, आपण हा निर्णय का घेतला हे तिने पतीला पत्राने कळवले. कधीकधी परिस्थिती एवढी प्रतिकूल ठरते की कळत असून या बुद्धिवान नायिकांना प्रतिकूल वास्तव स्वीकारावं लागतं. त्या अगतिक होतात. पण त्या आपलं असमाधान नोंदवून ठेवतात. कधीतरी समाजपुरुषाला स्त्रियांच्या या असंतोषाची दखल घ्यावीच लागते. सगळ्याच कथा अशा आहेत असं नाही. समाप्ती ही कथा विलक्षण ताकदीची, हळूवार अशी आहे. रवींद्रनाथांच्या कथांचे नायक म्हणजे तळागाळातील माणसं, अशिक्षित - सुशिक्षित, नाना स्वभावाची माणसं. उलापूर या अरिष्ट खेड्यातील अनाथ, निरक्षर रतन. सहृदय पोस्टमास्तरांच्या आसऱ्यामुळे त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मनात स्वप्न उमलू लागलेली रतन. पण पोस्टमास्तर बदली होत नाही म्हणून नोकरी सोडून निघून गेले आणि शिकण्याचं, माणूस होऊन जगण्याचं तिचं स्वप्न तुटून गेलं. अशा विविधरंगी पंधरा कथांचा हा गुच्छ. मृणालिनी गडकरी आणि मेहता प्रकाशन यांच्यामुळे मराठी वाचकाला रवींद्रनाथ ठाकूर यांच्या कथा उपलब्ध झाल्या. पूर्वी मामा वरेरकर, अशोक शहाणे, थोडेफार पु. ल. देशपांडे अशा मूठभर मराठी लोकांनी थोडेफार अनुवाद केले होते. आता साहित्य अकादमी आणि मेहतांसारखे प्रकाशक यांनी अनुवादांचे जग विस्तृत केले आहे. आपण अनुवाद आवर्जून वाचायला हवेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more