KADAMBINI DHARAP

About Author


KADAMBINI DHARAP RECEIVED A RICH CULTURAL HERITAGE FROM HER FATHER, RENOWNED MARATHI NOVELIST, SHIVAJI SAWANT, THE AUTHOR OF HIGHLY ACCLAIMED NOVELS SUCH AS MRITYUNJAYA, CHHAVA AND YUGANDHAR. SHE HAS DONE MASTERS IN ENGLISH LITERATURE FROM SAVITRIBAI PHULE UNIVERSITY OF PUNE. SHE ALSO HOLDS THE DEGREE OF BACHELOR OF COMMUNICATION AND JOURNALISM (BCJ) FROM RANADE INSTITUTE. SHE LOVES TO WRITE POEMS IN MARATHI, HINDI AND ENGLISH, AND HAS PUBLISHED HER OWN BOOK OF POEMS TITLED, “KINARA HOUN AAPANACH” IN 2011. HER ENGLISH TRANSLATION OF HER FATHER’S NOVEL ‘YUGANDHAR’ BASED ON THE LIFE OF BHAGWAN SRIKRISHNA WAS PUBLISHED IN 2019 AND IS AVAILABLE ON AMAZON.COM. SHE LIVES IN REDMOND, WA, USA WITH HER HUSBAND, PARAG DHARAP AND TWO SONS, SOHAM AND SIDDHANT.

कादंबिनी धारप यांना त्यांचे वडील, प्रसिद्ध मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्याकडून समृद्ध सांस्कृतिक वारसा मिळाला आहे. मृत्युंजय, छावा आणि युगंधर यासारख्या अत्यंत प्रशंसित कादंबऱ्या लिहिणारे लेखक आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. रानडे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी कम्युनिकेशन अँड जर्नलिझम (बीसीजे) ही पदवी देखील घेतली आहे. त्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये कविता लिहिण्याची आवड आहे आणि २०११ मध्ये त्यांनी "किनारा हों आपनाच" हे त्यांचे स्वतःचे कवितासंग्रह प्रकाशित केले आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित त्यांच्या वडिलांच्या युगंधर या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद २०१९ मध्ये प्रकाशित झाला आणि तो AMAZON.COM वर उपलब्ध आहे. त्या अमेरिकेतील रेडमंड, डब्ल्यूए येथे राहतात. त्यांचे पती पराग धारप आणि दोन मुले सोहम आणि सिद्धांत यांच्यासोबत त्या राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more