* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANGELS & DEMONS
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9788184980455
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 448
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN ANCIENT SECRET BROTHERHOOD. A DEVASTATING NEW WEAPON OF DESTRUCTION. AN UNTHINKABLE TARGET. WORLD -RENOWNED HARVARD SYMBOLOGIST ROBERT LANGDON IS SUMMONED TO A SWISS RESEARCH FACILITY TO ANALYZE A CRYPTIC SYMBOL SEARED INTO THE CHEST OF A MURDERED PHYSICIST. WHAT HE DISCOVERS IS UNIMAGINABLE: A DEADLY VENDETTAAGAINST THE CATHOLIC CHURCH BY A CENTURIES-OLD UNDERGROUND ORGANIZATION THE LLLUMINATI. DESPERATE TO SAVE THE VATICAN FROM A POWERFUL TIMEBOMB, LANGDON JOINS FORCES IN ROME WITH THE BEAUTIFUL AND MYSTERIOUS SCIENTIST VITTORIA VETRA. TOGETHER THEY EMBARK ON A FRANTIC HUNT THROUGH SEALED CRYPTS, DANGEROUS CATACOMBS, DESERTED CATHEDRALS, AND THE MOST SECRETIVE VAULT ON EARTH TE LONG-FORGOTTEN LLLUMINATI LAIR. ""A BREATHLESS, REAL-TIME ADVENTURE.... EXCITING, FAST-PACED, WITH AN UNUSULLLY HIGH IQ.`` - SAN FRANCISCO CHRONICLE.""DAN BROWN HAS TO BE ONE OF THE BEST, SMARTEST, AND MOST ACCOMPLISHED WRITERS IN THE COUNTRY.`` - NELSON DEMILLE
प्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना – कधी ऐकले नाही असे अस्त्र आणि कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य. रॉबर्ट लँग्डन या हार्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्त्र तज्ज्ञाला स्वित्झर्लंडमधल्या सुप्रसिद्ध ‘सर्न’ या संशोधन संस्थेकडून त्यांच्या एका खून पडलेल्या फिजिसिस्टच्या छातीवर उमटवलेल्या प्रतीकाचा अर्थ कळून घेण्यासाठी बोलावले गेले. व्हिट्टोरिया वेत्रा या सुंदर शास्त्रज्ञाबरोबर, कॅथलिक चर्चचा भीषण सूड उगवण्यासाठी शेकडो वर्षे टपलेल्या, इल्युमिनाटी या पंथाचे गुप्त ठिकाण शोधण्यासाठी धोकादायक भुयारे, दफनभूमी, एकाकी कथीड्रल्स, यांच्यामधून शोध घेताना ते अपहरण केलेल्या चार कार्डिनल्सच्या भीषण आणि क्रूर हत्यांचेही साक्षीदार बनतात. स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेले प्रसंग आणि या भयानक कटकारस्थानाच्या मुळाशी पोहोचताना त्यांनी व्हॅटिकनचा बचाव करण्यासाठी जिवावर उदार होऊन केलेले अतुलनीय साहस यांचा खरा अर्थसुद्धा किती विलक्षण धक्कादायक ठरावा?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #डिजिटल फॉट्र्रेस # द दा विंची कोड#द लॉस्ट सिम्बॉल #एन्जल्स अ‍ॅण्ड डेमन्स #डिसेप्शन पॉर्इंट #THE LOST SYMBOL #FICTION #बाळ भागवत #अशोक पाध्ये #DIGITAL FORTRESS #DIGITAL FORTRESS #ANGELS & DEMONS #THE DA VINCI CODE #AJIT THAKUR #डॅन ब्राउन #DAN BROWN
Customer Reviews
  • Rating Starजस्मिन जोगळेकर

    स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध `सर्न` या संशोधन संस्थेत पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ लिओनार्दो वेत्रा यांची गूढ रीतीने हत्या होते. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहताना हल्लेखोराला जे हवंय ते कधीच मिळणार नाही असं वेत्राला वाटत असतं. पण तो त्याचा गैरसमज असतो. हललेखोराला वेत्राच्या लॅब मध्ये प्रवेश करायचा असतो. त्यासाठी पासवर्ड त्याला हवा असतो. पासवर्डच नाही म्हटल्यावर वेत्राला वाटतं आता तो काही करु शकणार नाही. पण जेव्हा धारदार सुऱ्याने अगदी काळजीपूर्वक हल्लेखोर वेत्राचा डोळा काढून घेतो तेव्हा मात्र वेत्राला पुढे घडणाऱ्या भयानक गोष्टीची जाणीव होते पण सगळ्याला फार उशीर झालेला असतो. आपल्या छातीवर हल्लेखोराने भाजवून उमटवलेला एक ठसा घेऊन वेत्रा मरण पावतो. या हत्येबद्दल संस्थेचा डायरेक्टर कोहलर पोलिसांना काही न कळवता हार्वर्डमधून रॉबर्ट लँग्डन या प्रसिध्द चिन्हशास्त्र तज्ञाला बोलावून घेतो. अपरात्री आलेल्या फोनवरच्या संभाषणामुळे गोंधळून गेलेल्या लँग्डनला फॅक्स मधल्या मृतदेहाच्या छातीवर उमटवलेला ठसा पाहून जबरदस्त धक्का बसतो. इथूनच कथेला सुरुवात होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या कथेला सुरुवात होते, असं म्हणणं योग्य होईल. सर्न मध्ये ही गडबड सुरु असते तेव्हाच व्हॅटिकन सिटीमध्ये एका महत्त्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते. पोपचा मृत्यू झाल्यामुळे नवीन पोपची निवड करण्याचा हा पवित्र कार्यक्रम. यासाठी व्हॅटिकन मध्ये सुरक्षा व्यवस्था फार काटेकोर केलेली असते. तरीसुद्धा व्हॅटिकन सिटी मध्ये अशा काही घटना घडतात की ज्याने स्विस गार्डस हबकून जातात. भावी पोप म्हणून ज्यांची वर्णी लागू शकेल अशा चार कार्डिनल्सचे व्हॅटिकन सिटी मधून अपहरण झालेले असते. तसेच सुरक्षा व्यवस्थेतला एक लक्ष ठेवणारा कॅमेरा त्याच्या जागेवरुन हलवून दुसऱ्या अनोळखी ठिकाणी लावलेला दिसतो, ज्यात एक भलतीच वस्तू स्विस गार्डस् ना दिसत असते. त्यामुळे ते चक्रावून गेलेले असतात. त्यातच अपहरणकर्त्याचा फोन येतो, ज्यात चारी कार्डिनल्स ची दर तासाने एक अशी सार्वजनिक ठिकाणी हत्या करणार आणि मग व्हॅटिकन सिटीला एका शक्तिशाली पदार्थाने उडवून देण्याची धमकी तो देतो. मग व्हॅटिकन सिटीला वाचवण्यासाठी कामेरलेंगो, जो मृत पोपचा सहाय्यक असतो आणि नवीन पोपची नियुक्ती होईपर्यंत सूत्रे ज्याच्या हाती असतात तो स्वतः लक्ष घालतो. वेत्राच्या छातीवरचा ठसा, त्याच्या लॅबमधून चोरीला गेलेला पदार्थ याच्या तपासाची जबाबदारी नकळत लँग्डनवर येते. त्यात त्याला वेत्राची शास्त्रज्ञ मुलगी व्हिट्टोरिया वेत्रा मदत करते. तिला लॅब मधून चोरीला गेलेल्या पदार्थाची आणि त्याच्या गैर वापराने होणाऱ्या विनाशाची भयंकर काळजी असते. तर लँग्डनला वेत्राच्या छातीवरच्या निशाणी बद्दल उत्कंठा असते. कारण ती निशाणी `इल्युमिनाटी` या प्राचीन पंथाची असते. अशी निशाणी जी दोन्हीकडून वाचता येईल, ज्याला अँबिग्राम म्हणतात. तो पंथ आता अस्तित्वात नाही या समजुतीत असलेल्या लँग्डनला ती खूण बघून म्हणूनच धक्का बसतो. इल्युमिनाटी हा खूपच प्राचीन पंथ होता ज्यात तेव्हाच्या विज्ञानवादी, कलाकार, शिल्पकार अशा प्रसिद्ध व्यक्ती होत्या. त्यांनी केलेले संशोधन बायबलमधल्या संकल्पनांच्या विरुद्ध असल्यामुळे चर्च आणि या पंथात वैर होते. चर्चने ४०० वर्षांपूर्वी या पंथातल्या चार शास्त्रज्ञांच्या केलेल्या हत्येचा बदला आता कोणीतरी घेऊ पहात असतो. म्हणून चार कार्डिनल्स चे अपहरण केलेले असते. चार कार्डिनल्स ची हत्या कुठे होऊ शकते हे शोधण्याबरोबरच इल्युमिनाटीचे गुप्त ठिकाण शोधण्यातही लँग्डनला स्वारस्य असते. या विश्वाची निर्मिती पंचतत्त्वामधून झालेय यावर इल्युमिनाटी पंथाचा विश्वास असतो. त्यामुळे अपहरण, हत्येच्या ठिकाणांचा पंचतत्वाशी संबंध असणार असा निष्कर्ष लँग्डन काढतो आणि त्यादृष्टीने तपासाला लागतो. त्याच्या तपासाला यश येते का? कामेरलेंगो व्हॅटिकनला वाचवू शकतो का? वेत्राच्या लॅब मधून चोरलेला पदार्थ नक्की काय असतो आणि त्याचा शोध लागतो का? चारी कार्डिनल्सच्या हत्या अपहरणकर्ता कशाप्रकारे करतो? इल्युमिनाटी पंथाचे अस्तित्व, त्यांचे इतर अँबिग्राम, त्यांची गुप्त जागा याबद्दल काय काय माहिती पुढे येते हे सगळं पुस्तकातून हळूहळू आपली उत्कंठा वाढवत उलगडत जातं. धर्म आणि विज्ञान यांच्यातील हा संघर्ष. कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल करताना क्रूरता आणि शौर्य, धर्म आणि विज्ञान, धोकेबाजपणा आणि निष्ठा या सगळ्यांच सुंदर मिश्रण या पुस्तकात दिसून येतं. प्रत्यक्षातली ठिकाण, घडून गेलेल्या घटना, इतिहास, खरे लावले गेलेले शोध यांच्या जोडीने काल्पनिक कथा येत असल्यामुळे ती वाचता वाचता काल्पनिक नसून सत्य घटना वाचतोय असं वाटायला लागतं. डॅन ब्राऊन सुप्रसिद्ध होण्यात हे फार महत्त्वाचे कारण असेल असं वाटतंय. पण एकूणच त्याचे लिखाण, त्याची शैली खूपच परिणामकारक आहे. मुख्य म्हणजे डॅन ब्राऊनच्या सगळ्याच कथांमधील घटना फारच कमी कालावधीत घडून जातात..जेमतेम २४ तासात वगैरे. त्यामुळे तो स्पीड कथेतही वाचताना जाणवत राहतो. त्याचा मराठी अनुवादही तितकाच परिणामकारक उतरला आहे. इतका की एकदा वाचायला सुरुवात केली की पुस्तक संपल्याशिवाय ते खाली ठेवावे वाटत नाही. डॅन ब्राऊनची सगळीच अनुवादित पुस्तकं जी माझ्या वाचनात आली ती छान आहेत. वेगवेगळे विषय खूप परिणामकारक उतरले आहेत. ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    स्वित्झर्लंड येथे सर्न नावाच्या संशोधनकेंद्रात नेहमीच वेगवेगळे संशोधन चालू असते . त्यात त्यांना प्रतिवस्तूचे अर्थात अँटीमॅटरचे काही कण बनविण्यात यश आले आहे .या प्रतिवस्तूच्या एका कणातून संपूर्ण शहराला वीजपुरवठा होईल इतकी ताकद आहे . त्यामध्ये कोणतेह प्रदूषण नाही ,किरणोत्सर्ग नाही . पण जर ते हवेच्या किंवा इतर कश्याच्याही संपर्कात आले तर त्याच्या प्रचंड स्फोट होऊ शकतो . पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ लिओनार्दो वेत्रा याने प्रतिवस्तूचा शोध लावला आणि तीच प्रतिवस्तू आज सर्नच्या संशोधनकेंद्रातून चोरीला गेली. इतकेच नव्हे तर चोराने लिओनार्दो वेंत्राला क्रूरपणे ठार मारले होते .जाताजाता खुन्याने त्याच्या छातीवर इल्युमिनाटीचा प्रसिद्ध सिम्बॉल उमटवला . सन १५०० च्या आसपास काहीजण चर्चच्या विरोधात उभे राहिले.त्यात बहुसंख्य शास्त्रज्ञ होते .त्यांनी चर्चच्या खोट्या शिकवणूकी विरुद्ध आवाज उठवला . यात काही खगोलशास्त्रज्ञ होते काही गणितज्ञ होते. चर्चच्या खोट्या विचारसरणीमुळे ज्ञानाचा लोप होईल अशी त्यांना भीती वाटू लागली . मग त्यांनी एक गट स्थापन केला .या गटाने स्वतःला इल्यूमिनाटी म्हणवून घ्यायला सुरुवात केली . गॅलिलिओ न्यूटन सारखे शास्त्रज्ञ यात होते. कॅथलिक चर्च त्यांच्यामागे लागले . त्यांनी गॅलिलिओ ला अटक केली . सर्नच्या डायरेक्टरने तो सिम्बॉल पहातच सुप्रसिद्ध पुरातन अंकचिन्ह लिपी प्राध्यापक रॉबर्ट लँग्डनला बोलावले . आता त्याला आणि वेत्राची मुलगी व्हिक्टोरिया त्या प्रतिवस्तूचा शोध घ्यायचा आहे . व्हॅटिकन सिटीत आज एक महत्वाची घटना घडणार आहे . पंधरा दिवसांपूर्वी पोपचा मृत्यू झालाय आणि नवीन पोपची निवड आज होणार आहे . पण पोपच्या शर्यतीत असणारे चार कार्डिनल अचानक नाहीसे झालेत . वेत्राचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांनेच त्यांना पळवून नेलेय. बीबीसीला फोन करून त्याने त्यांची सार्वजनिक ठिकाणी हत्या होणार असे घोषित केले. ही सार्वजनिक ठिकाणे शोधण्याची जबाबदारी रॉबर्ट लँग्डनने घेतली . गॅलिलिओने तुरुंगात असताना एक पुस्तक लिहिले होते त्यात पाथ ऑफ इल्युमिनेशन बनवला होता . त्यासाठी त्याने व्हॅटिकनच्या सुप्रसिद्ध शिल्पांचा चतुराईने वापर केला होता . त्यात पृथ्वी ,वायू ,अग्नी ,जल यागोष्टींचा समावेश होता . याशिवाय ती प्रतिवस्तूही व्हॅटिकनमध्येच लपविली होती . आपल्या अभ्यासाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर रॉबर्ट लँग्डन त्यांना शोधून काढले का ...?? प्रतिवस्तूचा स्फोट थांबवून व्हॅटिकनला वाचवू शकेल ....?? एक वेगवान , थरारक ,कादंबरी . ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 04-10-2009

    चित्तथरारक संघर्ष सत् आणि सत्चाच! एक प्राचीन आणि गुप्त संघटना. तिचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा विध्वंस करण्यासाठी त्यांनी मिळवलेलं अस्त्र, हे दोन्ही कल्पनेच्या पलीकडलं. त्यांच्या कारावायांची सुरुवात होते, ती एका शास्त्रज्ञापासून. तो शास्त्रज्ञ जगाती एका नामवंत संस्थेत एका वेगळ्याच प्रयोगात गुंतलेला असतो. तो प्रयोग असतो, विश्वाच्या निर्मितीचं, खरंतर शून्यातून निर्माण होणाऱ्या पार्टिकल्सचं रहस्य शोधण्याचा. शोध पूर्ण होतो; पण त्याबरोबरच निर्माण होतो, प्रतिवस्तू! इथं प्रवेश करतो, रॉबर्ट लँग्डन, चिन्ह शास्त्राचा अभ्यासक. काही लक्षात येतंय? अशाच प्रकारची एक कादंबरी यापूर्वीही आली होती आणि तिचा नायकही रॉबर्ट लँग्डनच होता. त्या कादंबरीचं नाव आहे, ‘द दा विंची कोड!’ आणि दोन्हीचा लेखक तोच, डॅन ब्राऊन. याच मालिकेतली ही दुसरी कादंबरी आहे. तीच धावपळ, तीच विविध चिन्हं, धोकादायक भुयारं, दफनभूमी, एकाकी कॅथिड्रल्स आणि त्यांच्यामागे धावणारा रॉबर्ट, त्या संघटनेशी जोडलेली मोठमोठी नावं! (यात गॅलिलिओ आहे.) ‘द दा विंची कोड’ वाचलेल्यांना ही कादंबरी त्यापेक्षाही एक पाऊल पुढेच असल्याचं जाणवेल. ‘व्हॅटिकन’चा द्वेष करणाऱ्या, चर्चपासून सामान्यांना मुक्ती देऊ इच्छिणाऱ्या काही शास्त्रज्ञांची गुप्त संघटना. शेकडो वर्षं अंधारात असलेली, खरंतर फक्त कथांमध्ये राहिलेली ही संघटना आपलं अस्तित्व दाखवून देते. गुप्त संघटना, तिचं चिन्ह म्हटल्यावर रॉबर्ट त्यात आपसूकच ओढला जातो. या वेळी त्याच्या साथीला आहे व्हिट्टोरिया वेत्रा नावाची त्या खून झालेल्या शास्त्रज्ञाची मुलगी. मग त्या चिन्हांचा शोध. संघटनेने धमकी दिल्याप्रमाणे पडणारे कार्डिनलचे खून. या साऱ्यांचा साक्षीदार ‘मीडिया’ आणि शेवट. हा या पुस्तकाचा साधारण आराखडा; पण या चौकटीत जे काही घडतं, ते मात्र रॉबर्टबरोबरच आपल्यालाही धावायला लावतं. डॅन ब्राऊन हा फक्त एकात एक गुंतलेल्या घटना आपल्यासमोर वेगानं आणत नाही, तर त्यामागचा कार्यकारण भावही सांगतो. विविध चिन्हं, धर्म, दोन धर्मांची एकमेकांत असलेली गुंतवणूक, एका धर्माच्या अंतानंतर उदयाला येणाऱ्या दुसऱ्या धर्माचा प्रवास, जुन्या धर्माचे नव्या धर्मात येणारे प्रवाह, त्यामागची विचारप्रक्रिया अशा साऱ्या गोष्टी उलगडून दाखवतो. पुस्तकाच्या प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे यातील संदर्भ, जागा (अगदी भुयारंही!), संस्था खऱ्या आहेत. आपण त्या प्रत्यक्षात पाहू शकतो. त्यामुळे या पुस्तकालाही आपोआप संदर्भमूल्य येतं. कलावस्तूंकडे पाहण्याची आपलीही दृष्टी थोडी का होईना; पण बदलते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे कथानक खिश्चन धर्माशी निगडीत असलं, तरीदेखील त्यातील विचारप्रवाह, बदल हे आपण आपापल्या धर्मांमध्येही पाहू शकतो. त्या अनुषंगाने आपल्याही धर्मांचा वेध घेऊ शकतो, हे विशेष. एकूणच कथानकात गुंतवून ठेवणारे, त्या बरोबर धावायला लावणारे आणि हे सारं सुरू असतानाच नवी माहिती, नवा विचार पुढे ठेवणारे, असे हे पुस्तक आहे. मूळ इंग्लिशमधल्या या पुस्तकाचा अनुवाद बाळ भागवत यांनी केला आहे आणि तोही तितकाच प्रवाही, पुस्तक मराठीतच लिहिले असावे, असं वाटण्याएवढा उत्तम झाला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसनं पुस्तकाचे तेवढेच लाड केले आहेत, हेही महत्त्वाचं. जाता जाता एकच- मुखपृष्ठ पाहिल्यानंतर, पुस्तकाचं शीर्षक वाचताना आपण घोटाळ्यात पडतो; पण पुस्तक वाचून झाल्यानंतर तेच शीर्षक अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं. त्यामुळे ते साकारणाऱ्या फाल्गुन ग्राफिक्सचं विशेष अभिनंदन! -अभिजित थिटे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more