* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665277
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 286
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DUE TO THE ADVENT OF ART DEVELOPMENT, THE MENTAL, FAMILY, ECONOMIC, POLITICAL, SOCIAL AND CULTURAL DIVIDE OF DIFFERENT COMMERCIAL DISPLACED PERSONS IN GAKKUSA DUE TO THE ADVENT OF ARTISTIC DEVELOPMENT OF THE PEASANTS AND PEASANTS. THE WHOLE OF TRADITIONAL AND NATURAL FOLKLORE AND SLOWLY GETTING POISONED! WAMAN NAVYA, WHO FACES MANY STRUGGLES AT THE SAME TIME, HAS TO DEAL WITH PEOPLE`S INTERESTS IN THE FIELD OF MARKETING, COMPETITION AND ADVERTISING. STILL, HE WAS GIVEN NEW ENERGY TO THE GROUP OF LONELY GROUPS AGAINST THE CORRUPT SYSTEM.
सावेगावच्या तिन्ही बाजूनं वाहणार्या नदीवर धरण मंजुरतं. गावातील सत्ताधार्यांच्या विरोधामुळे बांधाची उंची घटवून नदीकाठच्या अर्ध्या गावाचं माथ्याकडल्या हेटीवर पुनर्वसन होतं. पुनर्वसनाच्या पैशातून नव्या वस्तीत वामनच्या पुतण्यानं सुरू केलेल्या अद्ययावत सलूनमुळं, वामनची पोत्यावरच्या बैठ्या हजामतीची ग्राहकी कमी होते. वामनच्या मुलाला- सागरला त्याचे मित्र बाजारात दुकान लावण्याचा सल्ला देतात. पण वामन दुकानासाठी घरची गाय विकायचं नाकारतो. सागरच्या शहरी बायकोला- प्रगतीला घरच्या हजामतीच्या केसांचा तिटकारा असतो. त्यातून सासरा-सुनेचे खटके उडतात. सागर बाजारात टिनांचं शेड उभारून त्याचं सलून सुरू करतो. वामनची उरलीसुरली ग्राहकी सागरकडं वळते. वामनच्या मुक्या मुलीचा शकूनचा पुलावच्या मजुराकडून विनयभंग होतो. सागरला त्याच्या दुकानच्या सामानसाठी शेत गहाण करू दिलं नाही, म्हणून सागर एक दिवस घर सोडून किरायाच्या घरात हेटीवर राहू लागतो. नर्मदा पेचात पडते. पुलाजवळ सपाटीकरणाचे काम करणाऱ्या रोलरच्या पुढल्या चाकाखाली सावलीत लोटलेला रमेश- चिंधाईचा मुलगा रोलर सुरू होताच भुईसपाट होतो. चिंधाई आकांत मांडते. धरण भरताच गावाभोवतीची नदी तुंबून शेतशिवाराचे रस्ते पाण्याखाली बुडतात. उंदीर, घुशी, मसण्याउद, सापांचा उपद्रव गावात वाढू लागतो. चिंधाईला सर्पदंश होतो. मुसळधार पावसानं गावाचं बेट तयार होतं. अवघं गाव सामानसुमानासह नव्या हेटीवरील धर्मशाळेत जातं. बापूरावची बंडी परतताना पुलाच्या नालीमुळं उलटते. बापूराव जायबंदी होतो तर धुरकरी लक्ष्मणाचा मृत्यू. स्मशानाची पूर्वापार वाट पाण्यात बुडाल्यानं शेताच्या कुपाटीतून शिरताना लक्ष्मणाचे प्रेत तिरडीवरून खाली पडते. लोक पळू लागतात. वामनच्या मुक्या शकूनचं एका बिजवराशी लग्न होतं. नवऱ्याचा लैंगिक छळ असह्य होऊन ती परत माहेरी येते. नदीकाठची झाडी उखडल्यामुळे वामनला आसपास पत्रावळींकरिता पानं मिळत नाहीत. हजामत पत्रावळीच्या बुडालेल्या धंद्यामुळे विडीकाडीलाही महाग झालेला वामन बाजारात तट्ट्यांचं दुकान उभारतो. तिथेही धंदा चालेना म्हणून न पेलवणाऱ्या किरायाची खोली भाड्यानं घेतो. नर्मदा पोराकरिता त्याला विरोध करते, पण तो बायकोला जुमानत नाही. बापलेकांचे समोरासमोर दुकानं. ग्राहकांसाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू होते. ’एका कटिंगीवर दाढी फ्री’सारख्या अनेक चढ्या व विनोदी जाहिराती बापलेकांकडून केल्या जातात. चिंधाईची मुलगी अन् तिच्या चोळी-बांगडीची साधी अपेक्षाही भावानं पूर्ण न केल्यामुळे त्याला धरणात गेलेल्या शेताच्या रकमेत वाटा मागते. बहिणभावांत वितुष्ट येतं. गुलब्या हा कारागीर कुंभार त्याची चवचाल बायको धरणाच्या सुपरवायझरमागं लागलेली बघून पागल होतो. इमली सुपरवायझरचा हात धरून पळून जाते. वामनच्या घरामागच्या भिंतीत धरणामुळं तुंबलेल्या नदीचं पाणी मुरल्यामुळं रात्री झोपेतच भिंत कोसळते. वामन नुकसानभरपाईचा मिळालेला शंभर रुपयांचा चेक बँकेत फाडून टाकतो. कन्यालाल जहागिरराव- हुकूमसह यांचं पायखेच राजकारण गावाच्या मुलावर येते. बापूरावचे दोन्ही पोरं पैश्यांचा वादामुळं कुटुंबातून वेगवेगळे होतात. बापूराव शेवंताईला गोठ्यात राहायला पाठवतात. वामन दुकानाचा थकलेला किराया भरता यावा म्हणून नर्मदाच्या विनंतीवरून म्हसी भादरायला जातो. त्याचवेळी निवडणुकीचा नारळ नेणारी मिरवणूक रस्त्यानं वाजतगाजत जाते. वाजंत्र्याच्या आवाजानं म्हैस भुजाडून वामनला पायाखाली तुडवते. हाडं खिळखिळून लोळागोळा झालेला वामन गुबडं घासत दारात बसतो. नातवाला व उमेशला धरणामुळं झालेली गावाची वाताहत तळमळून सांगतो. पोरांना प्रेरणा मिळून ते निवडणुकीवर बहिष्कार घालायचं ठरवतात. लोकांना प्रवृत्त करण्यासाठी मोर्चा काढतात. मोर्चाच्या घोषणात वामन बसल्याजागी त्याचाही आवाज मिसळवतो. नदीकाठी पाण्यानं सडलेलं जुने चिंचेचं झाड उन्मळून पडतं. विझण्यापूर्वी वामननं दिलेल्या घोषणा वाऱ्यानं मोर्चापर्यंत पोचून मोर्चाला बळ येतं. भालचंद्रा सुतार खड्या आवाजात सूर धरतो- तिफनीच्या नळीतून रे ऽऽ ...कष्टकऱ्या ऽ माझ्या ऽऽ पेरू ठासून बारूद आता होऊ द्या उठाव करू गिधाडं गारद!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AABHALZUNJ #AABHALZUNJ #आभाळझुंज #FICTION #MARATHI #BHOYARANANT "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 29-01-2006

    ग्रामीण भागाचा स्वातंत्र्यानंतर शिक्षणामुळे, साखर कारखान्यांमुळे व अन्य उद्योगांमुळे कायापालट झाला; पण त्यात वरच्या थरावरचे नेते, गुंड वगैरेंनीच हात धुऊन घेतले. भोयर यांनी ग्रामीण भागातील धरणामुळे काही लोक कसे गब्बर झाले आणि त्यांनी इतरांना फसवून आपल तुंबडी कशी भरली याचे दाहक चित्रण ‘आभाळझुंज’मध्ये वामन न्हाव्याच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेतून केले आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 08-01-2006

    ‘आभाळझुंज’ ही अनंत भोयर यांची किमान गरजांसाठी केलेल्या जीवघेण्या धडपडीची केविलवाणी कहाणी आहे. विदर्भातील वऱ्हाडी मातीचा जिवंत बाज आणि साज गुंफताना लेखकांनी स्वाभाविकत:च तेथील प्रादेशिक जीवनशैली, लोकसंस्कृती, त्यांची विचारसरणी, राहणीमान, वैशिष्ट्यपूर् बोली कादंबरीत एकजीव केलेली आहे. ...Read more

  • Rating Starडॉ. देवमन द. कामडी

    धरणच मरणाच्या दारात कोंडते तेव्हा... ‘आभाळझुंज’च्या निर्मितिप्रक्रियेबाबतचा अनंत भोयरांचा अनुभव जिवंत आहे. ज्या गावात लहानाचे मोठे झालेले भोयर त्याच गावाचे पुनर्वसन शासन करते, परंतु ते पुनर्वसन अर्ध्याच गावाचे झाल्याने पुनर्वसितांचे ‘अवॉर्ड’ने निर्मण केलेले प्रश्न आणि उरलेल्या जुन्या गावातील बलुतेदारापासून तर अलुतेदारापर्यंतचे पोटासाठी जगण्याचा जीवघेणा संघर्ष अशा दुहेरी टप्प्यावर ही कादंबरी झुंजताना विचारते, माणसाचा कोणता विकास ‘जगण्याचा’ की ‘मरणाचा’, हा संदिग्ध सवाल जिवंत मनाच्या माणसाला कादंबरी वाचताना वेळोवेळी छळतो आणि अजब शासनाचा गजब कारभार ही न्यायपूर्ण शासनाची विसंगत विकासाची प्रगती जगणाऱ्या माणसाच्या मनोधैर्याला धरणात कोंडते. सावेगावातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पडझड हा या कादंबरीचा मुख्य विषय असून मानवाला नैसर्गिक जगण्याचा अधिकारच शासन कसा हिसकावून घेतो, याचा सर्वसाक्षेपी विचार लेखकांनी बेंबीच्या देठापासून मांडलेला आहे. मेलेल्या जनावरांचे सांगाडे जसे शिंदबनात आढळावे तसे घरांचे सांगाडे प्रकल्पबाधित आणि पुनर्वसित अशा जुन्या-नव्या गावामध्ये आपल्या जगण्याची आणि मरणाची हकीकत बयाण करतात. जुन्या गावातील ही खंडारे मरणपंथी माणसासारखी शेवटची घटका मोजत आहे, तर नव्या गावातील विटामाती-सिमेंटच्या नव्या कोऱ्या घरांवर अद्यापि स्लॅब किंवा कवेलू न पडल्याने आपल्या मालकाच्या आटल्या गेलेल्या पैशाची कारुणिकता विशद करते. कादंबरीतील दाहकता रसिक मायबापाला क्षणोक्षणी आपली झुरलेली केविलवाणी काया आपल्या आस्वादक सौंदर्याच्या नजरेने टिपण्यास ही कादंबरी आकृष्ट करते, हेच तिच्या यशाचे सर्वांत मोठे गमक ठरते. या कादंबरीतील नायक वामन न्हाव्याचा एकाकी संघर्ष आणि मोडेन पण वाकणार नाही हा त्याचा बाणा मुर्दाड शासनाच्या छाताडावर बसून त्याला लोकशाही मूल्याचा डोस पाजते. वामनचे घडविलेले व्यक्तिदर्शन कणखर, स्वाभिमानी, कष्टाळू आदी व्यूहातून मांडल्याने त्याचा परिस्थितीजन्य जगण्याचा संघर्ष आपणास ऊर्जस्वलता देऊन जगण्याचा नवा मंत्र देते म्हणून ही कादंबरी दुर्मुखलेल्या, भरकटलेल्या, झुरलेल्या माणसाला जगण्याची नवी उभारी देऊन जाते. ‘आभाळझुंज’मधील सर्वच पात्रे आपली सिद्धता स्वत:हून सिद्ध करीत असल्याने त्या पात्रांची निकड आपणास खिळवून ठेवते. वामनची बायको नर्मदा, मुलगी शकून, मुलगा सागर, सून प्रगती या सर्वांची स्थाननिश्चिती कादंबरीत स्वयंभू असल्याने ‘आभाळझुंज’चा ते एक अविभाज्य भाग बनते.’ सावेगावची करुण कहाणी हेरून अनंत भोयरांनी बाधित, वंचित प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न ‘आभाळझुंज’मध्ये केला आहे. धरणापूर्वी गावाची एकता, गुण्यागोविंदाने नांदणारे गाव, गावगाड्यात खूश असणारी जनसंपदा, गावचा रचलारमला डाव, गावाचे वैभव या संपूर्ण गोष्टींवर धरणाने पाणी सोडल्याने आणि शासकीय विकासाच्या नावाने माणसाला माणसापासून तोडल्याने गावात आता एकीनेकीच्या ऐवजी ताटातुटी आली आहे. कादंबरीच्या संदर्भात लेखकांचे मनोगत आपणास अंतर्मुख करून जातं. ...Read more

  • Rating StarSantosh Bobade

    आभाळझुंज हे पुस्तक काल वाचून पूर्ण झाल.वामनची शक्ती आणि तुमच्यात बरच साम्य असाव,अस वाटत.एका धरणाने नुकसान होत हे वाचून होत पण इतक खोलवर होणार नुकसान,मग त्यात पैसा,भावना अन नाती आलीच.मुळात धरण बांधणे हा एकच मुद्दा नसून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी घेला जाणारा निर्णय हा कधीही गावकरी,गावाचा निसर्ग पाहून न घेण्याची पद्धत आपल्या सरकारने बऱ्याच वर्षांपासून चालवली आहे.ह्याचा उपहासात्मक फायदा वामनसारख्याना भोगावा लागतो हे तितकच खर.तुम्ही घर पडताना,नाती तुटताना,माणसाचा नरक होताना केलेलं वर्णन शहारे आणत.सगळ्यांची हालत त्या गुलब्या सारखीच आहे,पण सगळे वेडे असल्याच सोंग करतात.वामन काही अंशी खटकलादेखील,आणि सागर कधीकधी पटलादेखील.सरकारला नेहमी खडसावल पाहिजे,नेहमी विचारल पाहिजे,नाहीतर acमध्ये बसून दुष्काळ भागावर निबंधच्या निबंध लिहणारे पुष्कळ आहेत.धन्यवाद हे पुस्तक लिहल्याबद्दल.लिहित रहा.आमचे डोळे उघडत ठेवा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more