* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PALAVARACH JAG
  • Availability : Available
  • ISBN : 9789395477116
  • Edition : 3
  • Publishing Year : 26 JANUARY 1990
  • Weight : 275.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :LAXMAN MANE COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE AUTHOR PRESENTS THE STORIES OF EXPLOITED PEOPLE. EACH ARTICLE MAKES US SHIVER. THE WANDERING TRIBES LEAD INHUMAN LIFE. THEY SUFFER INJUSTICE, POVERTY, IGNORANCE, AND PAIN. ‘YALLAPPACHA CHANG’ IS A STORY OF THE STRUGGLE AND EMANCIPATION OF A SOCIETY ALMOST COLLAPSED. THOSE LIVING IN THE TEMPORARY SETTLEMENTS SURVIVE ONLY BECAUSE THEY CANNOT DIE. THEIR LIFE IS FULL OF UNCERTAINTY AND OPPRESSION. THEY ARE DISROBED OF THEIR SELF-RESPECT (VAIDU, KAIKADI, KOLHATI, GOSAVI-BAIRAGI, DAVARI GOSAVI, BHARADI-KAANFATE, KINGRIVALE, BALSANTOSHI, PARADHI, TAKARI BHAMTA, RAJPUT BHAMTA, KANJAARBHAAT AND ALL THE 18 TRIBES). THE HIGH SOCIETY CONSIDERS THEM LOWLY. WHO IS THEIR SAVIOUR? WHEN WILL THEY WAKE UP? WHEN WILL THEIR MINDS IGNITE? THE AUTHOR AND HIS WORKERS HAVE CALLED IN A MOVEMENT FOR THEIR FREEDOM AND HAVE BEEN PUNISHED AND LOCKED UP. THE AUTHOR HAS JUST ONE AIM – FREEDOM FOR THESE TRIBES. HIS STORIES LIKE ‘MANUSKICHI NAVI WAAT’, JAHIRNAMA-NANDIVALYANCYA DUHKHACHA’, ‘MARNANANTARAHI JAAT ADAVI’, ‘FATALELA ABHAL’ PORTRAY THE UNIMAGINABLE POVERTY, MISERY, STRUGGLE, PROBLEMS, DEFIANCE, ETC. THIS SOCIETY IS STAMPED AS ‘CRIMINALS’. THEY ARE BURIED DEEP IN POVERTY AND MISERY. THE DALIT MOVEMENT IS CURSED BY LEADERSHIP, AND THIS SOCIETY IS CURSED BY ITS UNDESIRABLE PRACTICES. THIS HAS RESULTED IN CREATING HOARDS OF UNEMPLOYED AND HELPLESS PEOPLE. THEY ARE CURSED, LABELLED AS CRIMINALS, AND LEFT UNFED. THE WOMEN FOLK HAVE TO UNDERGO TERRIBLE ANGUISH, INJUSTICE, AND RAPE; LIFE BECOMES A NIGHTMARE FOR THEM. THEY ARE TERRORISED CONTINUOUSLY. BEING BORN AS A WOMAN IS LIKE THE BIGGEST CURSE FOR THEM. LIFE IN THEIR TEMPORARY SETTLEMENTS IS DISGUSTING. ‘PALAVARCHA JAG.’ IN HIS ‘UPARA’, HE PRESENTS THEIR AGONY AND DEPRIVATION. HIS ‘BAND DARWAJA’ IS A PLATFORM FROM WHERE HE TALKS AS A TRUE SOCIAL WORKER ABOUT THE WANDERING TRIBES. THE NAKED TRUTH SCORCHES OUR HEARTS. THE AUTHOR SEARCHED FOR THE SETTLEMENTS OF THESE WANDERING TRIBES, TALKED TO THEM, AND SPOKE ABOUT THE INJUSTICE THEY HAD TO SUFFER. HIS WRITING AIMS AT ONE THING – HE DOES NOT WANT THEM TO BE DEPRIVED OF SOCIAL JUSTICE AND HUMAN RIGHTS ANYMORE. HIS WRITING HIGHLIGHTS THESE POINTS. HE CRAVES TO BRING THEM INTO THE MAINSTREAM, ALLOWING THEM TO LEAD A LITERATE AND CULTURED LIFE, A LIFE OF A HUMAN BEING WHERE IGNORANCE IS DRIVEN FAR AWAY. HENCE, AUTHOR LAXMAN MANE BRINGS FATHOMLESS AND LIMITLESS AGONY THROUGH HIS STORIES. EACH OF HIS STORIES MAKES US SEE THROUGH WORDS AND REACH REALITY. HE IS SURE THAT THE SETTLEMENTS WILL SOMEDAY FIND A DEFINITE SHAPE. THE ‘PALAVARCHA JAG’ IS A BRUTAL, TERRIBLE, BURNING REALITY.
‘पालावरचं जग’ या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडितांच्या व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेखांतून अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांचं अमानवी जगणं, अन्याय, दुःख-दैन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट झालेल्या समाजाचा उद्धार व संघर्षगाथा-‘यल्लपाचा चंग’मधून दिसते. ‘मरण येत नाही, म्हणून जगायचं!’ हे पालावरचं बेभरवशाचं हीन व शोषित जगणं, भटक्या-विमुक्तांचं स्वत्वं-स्वाभिमान हिरावून घेणारं. (वैदू, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी-बैरागी, डवरी गोसावी, भराडी-कानफाटे, किंग्रीवाले, बालसंतोषी, पारधी, टकारी भामटा, रजपूत भामटा, कंजारभाट या व इ. अठरापगड जातींना) उच्चभ्रू समाजाने हीन व उपरं ठरवलेलं. या समाजाचा वाली कोण? कधी जाग येणार या पतितांना? त्यांची मनं कधी पेटून उठणार? त्यांच्यासाठीचा तीव्र संघर्ष, चळवळ व आंदोलने लेखकाने व कार्यकर्त्यांनी छेडलेली, तुरुंगवास पत्करलेला. त्यांच्या स्वातंत्र्याचा ध्यास, हेच लेखकाचे जगणे बनले आहे. म्हणूनच माणुसकीची नवी वाट, जाहिरनामा : नंदीवाल्यांच्या दु:खाचा, मरणानंतरही जात आडवी, फाटलेलं आभाळ या लेखांतून मानवी जीवनातील दारिद्र्य, लाचारी, त्यांच्या समस्या, संघर्ष व अवहेलनेला लेखक वाचा फोडतो. गुन्हेगारीचा शाप मागं लेवून जगणारा हा समाज दिवसेंदिवस दु:खाच्याच दलदलीत फसलेला आणि पिचलेला. दलित चळवळीला नेतृत्वस्पर्धेचा शाप आणि या समाजाला अनिष्ट चालीरीति-रूढीं-परंपरांचा शाप. त्यामुळे गावगाडा उचकटून लाचारांच्या/बेरोजगारांच्या फौजा तयार झालेल्या. सत्यानास, अन्नानदशा व कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का जगणं नकोसं करतो; शिवाय स्त्री जातीचे धिंडवडे, अन्यायाची परिसीमा-बलात्काराने पोखरलेलं हीन-दीन जगणं, दहशत, अपमान व स्त्री जन्माला मिळालेला शाप म्हणजे हे नकोसं वाटणारं, पालावरचं जग. लक्ष्मण माने यांनी ‘उपरा`मधूनही या दु:खाला वाचा फोडली आहेच. व्यासपीठावरूनही भटक्या विमुक्तांचे प्रश्न लेखकाने मांडले ते ‘बंद दरवाजा` या नावाने. लेखकाने सच्च्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून हे ‘पालावरचं जग’ आपल्यासमोर मांडलंय, त्यातील धगधगते दाहक सत्य काळजाला पीळ पाडते. भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या-पालं यांचा शोध घेऊन, लेखकाने त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांची स्थितिगती जाणून घेऊन, त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे... मानवी हक्क व न्याय यांपासून भटका-विमुक्त समाज वंचित राहू नये, हीच तळमळ या सर्व लेखनातून स्पष्ट होते. समाजासाठी सामाजिककार्यांतून चळवळींना बळ देऊन मानवी उन्नत्ती व माणुसकीचं, साक्षरतेचं-सुसंस्कृत जगणं भटक्या-विमुक्तांचं असावं, अज्ञानाला थारा नसावा, हाच लेखकाला ध्यास आहे. म्हणूनच या अत्याचाराच्या कहाण्या, मसणजोग्यांचं अपरिमित दु:ख, अंगात देव येणं, एका लाडवाची गोष्ट, वहिवाटीसाठीची लढाई, आभाळाएवढ्या छत्रपतींचा आदर्श लेखक लक्ष्मण माने समाजापुढे उभा करतात. या पालावरच्या जगण्याला निश्चितच एके दिवशी आकार प्राप्त होईल, हा दुर्दम्य विश्वास लेखकाला आहे. म्हणूनच ‘पालावरचं जग’ म्हणजे धगधगतं-भयानक अमानवी वास्तव म्हणता येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पालावरचंजग #लक्ष्मणमाने #लेखसंग्रह #उपरा #किटाळ #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #PALAVARCHJAG #LAXMANMANE #LEKHSANGRAH #UPRA #KITAL #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more