* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THIRD PERSON
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668216
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 216
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE STORY OF YASHODHARA DOES NOT FOLLOW THE USUAL CHRONOLOGICAL ORDER. SHE INCARNATES IN THE SELF-ABSORBED AND REJUVENATING STYLE OF ATMA VISHKARA. THIS INVENTION OF HERS MOVES FORWARD FROM THE SMALL AND NATURAL EVENTS THAT HAPPEN AT THAT TIME. TWO CHARACTERS IN A STORY EASILY MEET OR ENCOUNTER EACH OTHER AND A DIALOGUE BEGINS BETWEEN THEM. THE AUTHOR DOES NOT REFER BACK AND FORTH TO THOSE CHARACTERS.
यशोधराची कथा रूढ असलेल्या कालक्रमनिष्ठ पद्धतीने अवतरत नाही. ती अवतरते आत्माविष्काराच्या आत्ममग्न टवटवीत शैलीत. तिचा हा आविष्कार त्या त्या वेळी घडणाऱ्या आणि स्वाभाविक वाटणाऱ्या लहानमोठ्या घटना-प्रसंगांतून पुढे सरकत असतो. कथेतील दोन पात्रे एकमेकांना सहज भेटतात किंवा सामोरी येतात आणि त्यांच्यात संवाद सुरू होतो. त्या पात्रांचा मागचापुढचा संदर्भ लेखिका तिथल्या तिथे देत नाही. त्यामुळे पात्रांच्या नात्याला वाचकांच्या दृष्टीने धूसरता प्राप्त होते. त्यांची कथा वाचकाला आरंभापासूनच खिळवून ठेवते. त्यातूनच वाचकाची जिज्ञासा वाढत जाते आणि ती कथा पूर्ण वाचायची ओढच त्याला लागते.
* भैरू रतन दमाणी पुरस्कार २०१७ . * साहित्य समन्वय संस्था पुरस्कार, धारवाड २००९.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THIRDPERSON #THIRDPERSON #थर्डपर्सन #SHORTSTORIES #MARATHI #YASHODHARAKATKAR "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA (UTSAV) 08-03-2009

    नाट्यपूर्ण कथासंग्रह... परत तो, आकाशाचे गाणे. अ‍ॅन एन्काऊंटर, माघातरण शेवटचा दिवस. थिंग्ज हॅपन, अंत. डॉग्ज. मियाँव आणि थर्ड पर्सन अशा दहा कथांचा यशोधरा काटकर लिखित कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला आहे. यशोधरा काटकर हे नाव आज बुजुर्गकथा लेखिकेच्या नामावलीत केव्हाच जमा झालेले आहे. १९९९ पासून २००४ पर्यंतच्या कालावधीत हेमांगी: साप्ताहिक वृत्तमानस. बेळगाव - तरुण भारत, अनुष्टुभ, तन्मय, कदंब, कथाश्री. चतुरंग अन्वय अशा विविध नियतकालिकांच्या खास अंकांमधून पूर्वप्रसिद्धी लाभलेल्या या कथासंग्रहातील दहाही कथा शहरातील भाऊगर्दीतील स्त्रीमनाचे, तिच्या एकाकीपणाचे भावविश्व बोलके करणाऱ्या आहेत. पाश्चात्त्य लेखकांच्या सहजतेने अंतर्मनात डोकावत वाचकांना त्या भावविश्वाशी साक्षीभावाने विचारात पाडणाऱ्या आहेत. जीवनातील स्वानुभवाची आत्मीयता बोलकी व्हावी अशा प्रत्ययकारितेने वाचकाच्या मनाला भिडणाऱ्या आहेत. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, अपेक्षाभंग, एकटेपण आणि संवेदन यातले हळवेपण कुठल्याही अभिनिवेशाने दाटलेले नसून ते प्रामाणिक भावोत्कटतेतून आकारलेल्या सहानुभावाने भिडणारे झाले आहे. शब्दप्रभुत्व, कलात्मक मांडणी, वातावरण आणि अवतीभवतीचे व्यावहारिकपण याचे सुजाण भान लक्षात आणून देणाऱ्या या कथांवरील प्रत्येक नाट्यपूर्ण प्रसंगाच्या जोडीने जीवनानुभवाचे विविधांगीपणही या कथांतून वाचकाला गुंतवून टाकणारे झाले आहे. परतमधील सुधा, तिला आठवणारे तिच्या आजीचे घर, आजी, रघुमामा सारे नातेसंबंध आणि बालपण व आजी अशी गुंफण झालेल्या आठवणी अगदी ओळखून मियाँव करणाऱ्या मांजरीपर्यंतच्या या भावविश्वाशी चित्रमय रंगविणे सहज त्या माळरानावर घेऊन जाते. तोमधील भावविश्व एकदम आगळेवेगळे कलाकाराच्या चित्रमय धडपडीशी एकजीव करणारे नाव. प्रसिद्धी जगण्याची धडपड आणि कीडा-मुंगीसारख्या जगण्यात दमछाक होत मरुन जाणारे क्षुद्रपण शहरातील नाव प्रसिद्धीच्या धडपडताना बसणाऱ्या परिस्थितीच्या जीवनसंघर्षाची ही लक्ष वेधणारी. विचारात पाडणारी कथा. आकाशाचे गाणे अगदी वेगळ्या विश्वात नेणारे मांजराच्या कावळ्याच्या कोकिळेच्या म्हाताऱ्या झुळकेच्या अगदी गाण्याच्या आकाशात झेपावणारे. अ‍ॅन एन्काऊंटर आहे. झाडाखली कुडकुडून गोठलेल्या मिनू आणि पार्टी धमालीत रमलेल्या ललितच्या निमित्ताने अंतरंगातील आगडोंब. विषमतेची घृणा आणि थंड खुनी अचकट विचकटाशी केलेला सामना आषाढस्य प्रथम दिवसेच्या विरोधाभासाने भरलेला माघातला शेवटचा दिवस उदासवाणा, निर्जीव. चैतन्यशून्य वाजणारा कर्कश फोन. हुंदके, आक्रोश, धावणारी रिक्षा असे सारंच हरवत चालल्याच्या मन:स्थितीत अचानक फुलून आलेल्या लालभडक फुलोऱ्याचे दर्शन नवीन सृजन, नवीन निर्मिती आणि त्यातून आकारणारा आनंदमयी नवा जन्म साहित्य समंलेनाध्यक्ष आनंद यादव याची प्रस्तावना, चंद्रमोहन कुलकर्णी यांनी सजवलेले मुखपृष्ठ, वाजवी किंमत आणि निर्दोष छपाई असलेले थर्ड पर्सन, आल्बेरकाम्पू, रिचर्ड बाख, ओ हेन्री, मोपासाँ, आणि पी.जी. वुडहाऊस अशा कथालेखक पाश्चात्य दिग्गजांच्या वरदहस्तालाच शोभणारे जाणवल्यावाचून राहत नाही. - ललिता बापट ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more