ASHA BAGE

About Author

Birth Date : 28/07/1939


ASHA ARVIND BAGHE IS A SAHITYA AKADEMI AWARD WINNING WRITER. HE WAS BORN IN NAGPUR. TILL DATE, 5 NOVELS AND 9 COLLECTIONS OF SHORT STORIES HAVE BEEN PUBLISHED. SOME OF THE STORIES HAVE BEEN TRANSLATED INTO OTHER INDIAN LANGUAGES. TRANSLATIONS FROM ENGLISH, FRENCH, GERMAN AND URDU LANGUAGES ​​ARE ALSO POPULAR. RENOWNED HINDI WRITER SHRI. HIS STORY IS INCLUDED IN THE FIRST FIVE STORIES SELECTED BY KAMLESHWAR FROM MARATHI.

आशा अरविंद बगे या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका. यांचा जन्म नागपूर येथे झाला. आजपर्यंत त्यांच्या ५ कादंबऱ्या व ९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. काही कथांचे भारतातील इतर भाषांतून अनुवाद प्रकाशित झाले आहेत. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन व उर्दू या भाषांतूनही अनुवाद प्रसिध्द आहेत. विख्यात हिंदी साहित्यिक श्री. कमलेश्वर यांनी मराठीतून निवडलेल्या पहिल्या पाच कथांमध्ये यांच्या कथेचा समावेश आहे. दिल्लीला कथा या आंतरभारतीय संस्थेतर्फे इंग्रजी अनुवादाकरिता तुफान (१९९२) आणि पंख (१९९४) या कथांचा निवड झाली आहे. पुरस्कार : मारवा, अत्तर, पुजा, मांडव या कथासंग्रहांना व झुंबर या कादंबरीस महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्याच बरोबर नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा डॉ. अ.बा. वर्टी पुरस्कार, कै. राधाबाई बोबडे स्मृती पुरस्कार, कै. दि. बा. मोकाशी पुरस्कार, कै. काकासाहेब गाडगीळ पुरस्कार, पत्र या कथेला शांताराम कथा पुरस्कार, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र या कादंबरीला विदर्भ साहित्य संघ, नागपूर पुरस्कार, कथा शताब्दी वर्षात विदर्भ साहित्य संघाच्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद, यंदाचा सु.ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, दर्पण या कथासंग्रहास यंदाचा कै. केशवराव कोठावले पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लेखनाव्यतिरिक्त त्यांना संगीताची आणि आई-वडील, आजोबांकडून वारसाने आलेली नाटकांचीही आवड आहे. पूर्वी अधून-मधून आकाशवाणी व रंगभूमीवर नाटकातून भूमिका केलेली आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार
Sort by
Show per page
Books not found in this category.

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more