* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JEEVANKALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668179
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 1934
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS EVER FLOWING YAMUNA AND THIS TAJMAHAL. LIFE AND ART. LIFE ITSELF IS THE SOCKET FOR ART! BUT THE REFLECTION OF TAJMAHAL IN THE RIVER IS MORE BEAUTIFUL THAN THE TAJMAHAL ITSELF, WHICH IS ON THE RIVER BANK ISN`T IT?
‘हे यमुनेचं पाणी आणि हा ताजमहाल! जीवन आणि कला! जीवनाचं हृदय हेच कलेचं कोंदण! काठावरल्या ताजमहालापेक्षा हा पाण्यातला ताजमहालच अधिक सुरेख दिसत आहे, होय ना?’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #जीवनकला
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 16-07-1989

    वि. स. खांडेकरांची कालातीत कथा… लहानपणी वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या, काही गोष्टी मनात कायमचं घर करून रहातात. मराठी दुसरी किंवा तिसरी असताना माझ्या पाठ्यपुस्तकांत एक गोष्ट होती. मला खूप आवडायची ती गोष्ट. ती छोटी कथा अशीच माझ्या मनाच्या कोपऱ्यात र करून बसली होती. सात-आठ वर्षाचं वय असताना वाचलेली आणि आवडलेली गोष्ट का आवडली, हे सांगता येत नाही. या कथेचे लेखक कोण, कथेचं रसग्रहण वगैरे गोष्टी तर दूरच. गोष्ट आवडली आणि तिनं मनात घर केलं ही एकच बाब महत्त्वाची. त्या गोष्टीचं नाव होतं ‘चंद्रकोर’ अंतोनच आणि वसंत हे दोन त्यावेळच्या माझ्या वयाचे जीवलग मित्र आणि त्यांच्या मैत्रीच्या आड आलेला अंतोनचा वडिलांचा दारू विकण्याचा धंदा. ‘‘माझे बाबा रोज संध्याकाळी तुझ्या बाबांच्या दुकानात जातात, आणि मग घरी येऊन आईला मारतात.’ ही त्या दोन छोट्या जीवांच्या निर्मळ मैत्रीमध्ये असलेली काळी छाया, अशी मनाच्या कोपऱ्यात आठवणींचं मोहोळ करून राहिलेली ती गोष्ट. आज जवळजवळ तीस-पस्तीस वर्षानंतर अगदी अलिबाबाची गुहा सापडावी तसं मला झालं. मेहता पब्लिशिंग हाऊसने पुनर्प्रकाशित केलेली वि.स.खांडेकरांची चार पुस्तकं माझ्या हातात पडली. चारही पुस्तकं एकापेक्षा एक अशी सरस आहेत. त्यापैकी दवबिंदू, विद्युतप्रकाश आणि जीवनकला हे तीन कथासंग्रह आहेत आणि वायुलहरीमध्ये ललितलेख वाचायला मिळतात. तीनही कथासंग्रह अगदी साध्या सरळ, पण मनाला भिडणाऱ्या कथांनी परिपूर्ण आहेत. ‘चंद्रकोर’ कथेत तर समुद्र आणि चांदणं यांचा उल्लेख सुरेख रीतीने सतत केला आहे. अंतोनच्या मनातल्या वेगवेगळ्या भावनांचे नाते, समुद्राच्या वेगवेगळ्या रूपाशी जोडून साधलेली भावनिक तरलता मनाला मोहवून टाकते. इंग्रजी शाळेत जायला मिळणार या आनंदाने भारावलेल्या अंतोनच्या मनात ‘‘पौर्णिमेचे चांदणे फुलले. त्याला समुद्राचा आवाज मुलांच्या गोंगाटासारखा वाटू लागला.’’ इंग्रजी शाळेत गेल्यावर भीतीने लटलट कापणाऱ्या अंतोनला एक सुरेख पोषाख केलेला मुलगा हसून जवळ बोलावतो तेव्हा, ‘‘समुद्रात बुडणाऱ्या मनुष्याला जहाज दिसावे.’’ तसे अंतोनला वाटते. या संग्रहातल्या सर्वच कथा १९३४-३५च्या सुमारास लिहिलेल्या आहेत. कालपरत्वे आलेले काही प्रसंग सोडले तर या कथा कुठेही कालबाह्य वाटत नाहीत. या सर्व कथांमध्ये एक गोष्ट विशेषकरून जाणवली ती अशी की, कमीत कमी वर्णन करूनही कथेतल्या व्यक्तिरेखा आकार घेतात. सहज घडणाऱ्या घटनांमधूनच कथानक आकार घेत जातं. त्यासाठी वेगळं वर्णन किंवा उकल करण्याची धडपड कुठेही जाणवत नाही. या सर्व सहजतेमुळेच सुमारे पन्नास वर्षापूर्वीच्या या कथा आजही तितक्याच टवटवीत वाटतात. खांडेकरांच्या कथांच्या विषयात विविधता आढळते. जुन्या चाकोरीबद्ध कथालेखनातून कथेला बाहेर काढून नवा मार्ग दाखवण्याचे श्रेय खांडेकरांचेच आहे. वेगवेगळ्या थरांतून सतत नवा वाचकवर्ग तयार होत असतो आणि अशा वाचकांना हे कथासंग्रह नक्कीच आवडतील असा विश्वास वाटतो. गेल्याच वर्षी साहित्याचं मानाचं असं ज्ञानपीठ अवॉर्ड कुसुमाग्रजांना मिळालं. त्या सोहळ्याचा आस्वाद मराठी साहित्याचे रसिक घेत असतानाच या पारितोषिकाचे पहिले मानकरी असलेल्या खांडेकरांच्या साहित्याचं पुनर्प्रकाशन करून, अनिल मेहता यांनी वाचकांच्या आनंदात भरघोस भर टाकली आहे. -सुचेता खोत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more