LEE CHILD

About Author

Birth Date : 29/10/1954


LEE CHILD IS ONE OF THE WORLD’S LEADING THRILLER WRITERS : IT IS SAID THAT ONE OF HIS BOOKS IS BOUGHT EVERY FOUR SECONDS SOMEWHERE IN THE WORLD. HIS NOVELS FEATURING HIS HERO JACK REACHER CONSISTENTLY ACHIEVE THE NUMBER-ONE SLOT IN HARDBACK AND PAPER BACK ON BESTSELLER LISTS ON BOTH SIDES OF THE ATLANTIC, WIN PRIZES, AND ARE TRANSLATED INTO OVER FORTY LANGUAGES. BORN IN COVENTRY, HE NOW LIVES IN AMERICA. JACK REACHER, A MAJOR MOTION PICTURE STARRING TOM CRUISE, BASED ON THE NOVEL ONE SHOT, WAS RELEASED IN DECEMBER 2012.

१९५४ मध्ये इंग्लंडमधील कॉव्हेन्ट्री येथे जन्मलेल्या जिम ग्रॅन्ट या ब्रिटिश लेखकाने ली चाइल्ड या टोपण नावाने अमेरिकेत भटकणारा मिलिटरी पोलीस जॅक रीचर या नायकाच्या साहसकथा लिहिल्या आहेत. १९७४ मध्ये त्यांनी शेफिल्ड युनिव्हर्सिटीच्या लॉ स्कूलमध्ये नाव घातले, पण ग्रॅज्युएशननंतर १९७७ साली मॅन्चेस्टर येथील गॅ्रनडा टेलिव्हिजनसाठी प्रेझेन्टेशन डायरेक्टर म्हणून काम स्वीकारले. ब्राईड्सहेड, द ज्युवेल ऑफ द क्राऊन, प्राईम सस्पेक्ट या शोजशी त्यांचा संबंध होता. अठरा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ४०,००० तासांचे प्रोग्रॅमिंग केले, हजारो कमर्शिअल्स, नवीन कथा, ट्रेलर्स यांचे लेखन केले. १९९५ मध्ये ही नोकरी सुटली. १९९७ मध्ये त्यांनी किलिंग फ्लोअर ही त्यांची पहिली कादंबरी लिहिली. किलिंग फ्लोअर, डाय ट्रार्इंग, विदाऊट फेल, परसुएडर, द एनिमी, वन शॉट, बॅड लक अ‍ॅन्ड ट्रबल या त्यांच्या पुस्तकांना कुठले ना कुठले पुरस्कार लाभले आहेत. २००७ मध्ये त्यांनी चौदा सहलेखकांसह द चॉपिन मॅन्युस्क्रिप्ट या सतरा भागांच्या सिरीयलचे लेखन केले. २००८मध्ये शेफिल्ड युनिव्हर्सिटीत व्हिजिटिंग प्रोफेसरशिप घेतली आणि तिथल्या बावन्न विद्याथ्र्यांना जॅक रीचर स्कॉलरशिप साठी पैसेही पुरवले.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
A WANTED MAN Rating Star
Add To Cart INR 750
TBC Classic Book
NEVER GO BACK Rating Star
Add To Cart INR 550
TBC Classic Book
NOTHING TO LOSE Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book
ONE SHOT Rating Star
Add To Cart INR 340
TBC Classic Book

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more