* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY STORY
  • Availability : Available
  • Translators : ASHA KARDALE
  • ISBN : 9788171615995
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 512
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE GREAT ACTRESS`S ACCOUNT OF HER CAREER, HER PERSONAL LIFE, AND THOSE WITH WHOM SHE HAS WORKED IS ACCOMPANIED BY INFORMATION ABOUT AND REACTIONS TO HER FROM HER DIRECTORS, CO-STARS, HUSBANDS, AND CHILDREN INCLUDES CHRONOLOGY OF THE FILMS, PLAYS, AND TELEVISION APPEARANCES OF INGRID BERGMAN FILMOGRAPHY ONE OF THE WORLD`S FINEST STAGE AND SCREEN ACTRESSES GIVES US AN AUTOBIOGRAPHY AS OUTSTANDING AS SHE IS. MORE THAN JUST AN ACCOUNT OF HER ILLUSTRIOUS CAREER, HERE IS A TOTALLY CANDID SELF-PORTRAIT OF A REMARKABLE WOMAN: HER PERSONAL FAILURES AS WELL AS HER PUBLIC SUCCESSES..
जगप्रसिद्ध स्वीडिश अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिचं हे गाजलेलं आत्मकथन. तीन वेळा ऑस्कर पारितोषिकं आणि तीन वेळा न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स अवार्ड्स मिळवणाऱ्या या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीनं या पुस्तकात स्वत:ची पडद्यावरची कहाणी तर सांगितलेली आहेच; पण पडद्यामागची कहाणीही हातचं राखून न ठेवता, प्रांजळपणे सांगितलेली आहे. नाटक आणि चित्रपट हे तिचे जणू श्वास आणि उच्छ्वास होते. त्यापुढं तिनं आपलं वैयक्तिक जीवन सदैव तुच्छ मानलं. या आत्मकथनात तिच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या खुणा वाचकांना ठायी ठायी आढळतील. हा केवळ तिच्या एकटीच्याच कलाजीवनाचा प्रवास नाही, तर 1934 ते 1979 या जवळजवळ अर्धशतकाच्या कालखंडातील चित्रनाट्य व्यवसायाचा आणि कलावंतांचाही चालता-बोलता, समृद्ध इतिहास आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#29AUGUST1915 #29AUGUST1982 #MYSTORY #INGRIDBERGMAN #ACADEMYAWARDS #ALANBURGESS #ASHAKARDALE #ROBERTOROSSELLINI #OSCARAWARWINNER #LARSSCHMIDT # PETTER LINDSTROM #ROBINISABELLA #SWEDISHACTRESS #DAVIDOSELZNICK #FRIEDELPIALINDSTROM # INTERMEZZO: A LOVE STORY (1939) #CASABLANCA (1942) #FOR WHOM THE BELL TOLLS (1943) #GASLIGHT (1944) #SARATOGA TRUNK (1945) #HITCHCOCK FILMSJOAN OF ARC (1948)#STROMBOLI AND "NEOREALISM" #ANASTASIA (1956) #MURDER ON THE ORIENT EXPRESS (1974) #AUTUMN SONATA (1978) #A WOMAN CALLED GOLDA (1982) #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #
Customer Reviews
  • Rating StarEknath Marathe

    माय स्टोरी. मूळ लेखक -- इनग्रिड बर्गमन आणि ॲलन बर्गेस , मराठी अनुवाद -- आशा कर्दळे प्रकाशक -- मेहता पब्लिशिंग हाऊस ..... सिनेमा हा विषय मला अभ्यासाच्या दृष्टीने आवडतो. मी सिनेमे फारसे बघितले नसले तरी ते बनतात कसे हा माझ्या आवडीचा विषय आहे. हिंी सिने सृष्टीतील राजेश खन्ना, रफी, हेमा मालिनी, ऋषी कपूर यांची आत्मचरित्रे / चरित्रे मी वाचली आहेत. मराठीत माडगुळकर, सुधीर फडके, मोहन जोशी, सचिन पिळगावकर यांची सुद्धा चरित्रे वाचलेली आहेत. हॉलीवूड अभिनेत्री इनग्रीड बर्गमन हीचे चरित्र सुद्धा एका आगळ्या कुतूहलाने वाचून काढले. इनग्रीड बर्गमन ही स्वीडिश अभिनेत्री 1920 ते 1960 हा काळ गाजवून गेली. सिनेमा व रंगभूमी , दोन्ही तिने चार दशके गाजवून सोडले. तिची आई लहानपणीच गेली तर वडील 13 व्या वर्षी गेले. काकांनी मोठे केले पण त्यांना सिनेमा क्षेत्र अजिबात आवडत नव्हते. पण हिला मात्र अगदी लहानपणापासून अभिनयाचे प्रचंड वेड. काकांशी हट्ट करून ती नाटक शिकवणाऱ्या शाळेत प्रवेश घेते पण तिकडे वर्षे पूर्ण होण्या आधीच तिला सिनेमात काम करायची संधी मिळते. 40 वर्षाच्या तिच्या कारकीर्दीत तिने इटालियन, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश अशा सर्व भाषिक सिनेमात काम केले. कारकीर्दीत तिने अनेक चढउतार बघितले. आपल्या सर्वच दिग्दर्शकां बरोबर तिचे कडाक्याचे वाद झाले. काहीनी तिच्या हट्टापुढे मान तुकवली काही ठाम राहिले. या अशा वादातून सिनेमा किंवा नाटक कसे आकार घेते हे सुद्धा छान आले आहे. समकालीन तारकांबरोबर तिचे सूर अजिबात जुळले नाहीत. लोकांचे प्रचंड प्रेम व तेवढीच हेटाळणी सुद्धा तिने अनुभवली.पत्रकार कलाकारांच्या खाजगी आयुष्यात कोणताही विधिनिषेध न बाळगता कसे डोकावतात याचे सुद्धा भयंकर वर्णन यात आले आहे. जवळपास 6 फूट उंच असल्याने, उंची दिसू नये म्हणून काम करताना तिला सतत वाकून रहावे लागे. उंच टाचांच्या चपला ती कधी घालूच शकली नाही ! ती दिसायला मादक नव्हती पण आकर्षक मात्र होती आणि आपला अनोखा ठसा उमटवू शकली. तिचे खाजगी जीवन सुद्धा साधे सरळ नव्हते. तिची 3 लग्ने झाली व तेवढेच घटस्फोट. 3 मुली व एक मुलगा यांचा ताबा मिळवा म्हणून केलेली कायदेशीर लढाई यात वाचायला मिळते. युरोप आणि अमेरिका यांच्या संस्कृतीत किती टोकाचा फरक यात दिसतोच पण अगदी युरोपात सुद्धा प्रत्येक देशात लोकांचे वेगवेगळे स्वभाव तिने अनुभवातून उलगडून दाखवले आहेत. आई, आदर्श पत्नी, हाडाची कलाकार, सामाजिक दायित्व हे सर्व घटक सांभाळताना आपली कलेशी असलेली निष्ठा जपताना होणारी तिची घालमेल अस्वस्थ करते. हे सर्व सांभाळताना तिला अखंड संघर्ष करावा लागला. तत्कालीन अनेक थोर लेखक, कलाकार, राजकारणी यांचा सहवास तिला लाभला. शेवटच्या प्रकरणात तिने दिलेली कर्करोगाशी झुंज आहे. मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद आशा कर्दळे यांनी खूप सुंदर केला आहे. कादंबरी बऱ्यापैकी मोठी आहे. निवांत शनिवार रविवार असे जोडून घेवून तब्येतीत वाचावी अशी आहे ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more