OSHO

About Author

Birth Date : 11/12/1931
Death Date : 19/01/1990


RAJNEESH, ALSO KNOWN AS ACHARYA RAJNEESH, BHAGWAN SHREE RAJNEESH, AND LATER AS OSHO, WAS AN INDIAN GOD MAN, MYSTIC, CULT LEADER, AND FOUNDER OF THE RAJNEESH MOVEMENT. DURING HIS LIFETIME, HE WAS VIEWED AS A CONTROVERSIAL NEW RELIGIOUS MOVEMENT LEADER AND MYSTIC. HE REJECTED INSTITUTIONAL RELIGIONS.

ओशो..! एक प्रतिभावान विचारवंत..! काळाच्या कित्येक योजनं पुढे जाणारे विचार मांडणारा हा अवलिया..! थेट मानवी भावभावनांना आव्हान देणारे विचार मांडून करोडो माणसांना ‘प्रॉQक्टकल’ मार्ग सांगणारा थोर विचारवंत..! ओशोंनी सतत समाजाला धक्के देणारे विचार मांडले. आजच्या एकविसाव्या शतकातसुद्धा अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत असणाNया आपल्या समाजासमोर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ओशोंनी काही ठणठणीत उपाय सांगितले. परंतु आपण सामान्य माणसं प्रत्येक विचारवंताला विरोध करत राहतो, काळाच्या पुढे जाणारा माणूस आपल्या आवाक्यात येत नाही, आपण पेलू शकत नाही. ओशोंनी मात्र सगळ्या विरोधाला टक्कर देत, समाजाला सतत जागृत ठेवण्याचं काम अखंडपणे केलं. रोजच्या जगण्याशी पटणारे, शुद्ध विचार समोर ठेवले.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 38 total
AIKA SANTANO Rating Star
Add To Cart INR 160
BANDKHOR Rating Star
Add To Cart INR 150
BHAKTIT BHIJALA KABIR Rating Star
Add To Cart INR 160
DHARMA…KABIRANCHYA MANATALA Rating Star
Add To Cart INR 250
DHYANSUTRA Rating Star
Add To Cart INR 240
EK EK PAUL Rating Star
Add To Cart INR 250
HA SHODH VEGALA Rating Star
Add To Cart INR 190
HASAT KHELAT DHYANADHARANA Rating Star
Add To Cart INR 220
KRISHNA SAKHA Rating Star
Add To Cart INR 270
KRISHNAMRUT Rating Star
Add To Cart INR 270
KRISHNARANG SAVALA Rating Star
Add To Cart INR 270
MAHAVEER ANI ANTARTAP Rating Star
Add To Cart INR 420
1234

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more