* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SPY PRINCESS
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788190734493
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN INDIAN PRINCESS, WHO IS IN THE LINEAGE OF TIPU SULTAN, PARTICIPATES IN THE SECOND WORLD WAR, SHE SPIES FOR THE BRITISH. THIS BRAVE AND FIERCE TIGRESS GETS CAUGHT BY THE GERMANS, AS A RESULT OF TREACHERY. HER FUTURE IS CLEAR; SHE SUFFERS IMMENSE PAINS AT THE HANDS OF GERMANS. TREACHERY, TORTURE AND TERRIBLE TORMENT.. ONE DAY, A BULLET REVEALS HER FROM ALL THIS TORTURE. SHE WAS THE ONE WHO KEPT THE FLAME OF BRAVERY ENLIGHTENED.
टिपू सुलतानाची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या दुसऱ्या महायुद्धात सामील होते, ब्रिटिश गुप्तहेर बनून! नसानसांत अपार धैर्य भिनलेली ही शूर वाघीण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात, अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना... पिस्तुलाची गोळीच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागतं ठेवणारी...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #SHRABANIBASU #BHARATIPANDE #SPYPRINCESS #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating StarPUJA KUCHEKAR

    टिपू सुलतान ची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या. दुसऱ्या महायुद्धात सामील होते एक "ब्रिटिश गुप्तहेर" बनून!!!!! नसानसांत अपार धैर्य भिनलेली हि शूर वाघिण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात ,अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना..... पिस्तुलाची गोळच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागत ठेवणारी एक रोचक ,थरारक सत्यकथा . गुप्तहेर युवराज्ञी "नूर इनायत खान" हिची. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 04-04-2010

    नूरच्या शौर्याचा मागोवा... नूर इनायत खान एका पारंपरिक आणि आध्यात्मिक वळणाच्या मुस्लीम कुटुंबातील मुलगी गुप्तहेर बनते आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात सर्वांत धोकादायक अशा सुद्धक्षेत्रात गुप्तहेर म्हणून काम करते. या एकाच गोष्टीने मूळ लेखिका श्रवणी बसू यांचे लक्ष वेधले आणि तिने नूरचा तपशीलावर अभ्यास करण्याचे ठरवले. नूरचा मुळाचा पिंड हेरगिरीचा नव्हता, तर तीही सर्वसामान्य चारचौघींसारखीच स्वप्नाळू, सुंदर आणि सौम्य मुलगी होती. तिला मुलांसाठी कथा लिहिणे फार आवडे. नेमबाज, विशेष शारीरिक कौशल्य यापैकी कोणतीही गोष्ट सूरकडे नव्हती. तरीही तिने प्रचंड धैर्य, हिंमत दाखवली. नूरने युद्धकाळात जी गुप्तहेरगिरी केली त्या वेळचे तिचे सर्व सहकारी फ्रान्समध्ये मारले गेले. तिचे वरिष्ठी हयात नसल्याने नूरचे कुटुंबीय भाऊ, एसओई कंपनीच्या गुप्त फाइल्स एवढ्याच आधारावर नूरचे जीवन उलगडले. नूर ही मुळची भारतीय. तिचे वडील सूफी तत्त्वज्ञानी. त्यांनी नूरला ती एक भारतीय राजकन्या असून तिच्या नसानसात टिपू सुलतानचे रक्त खेळत असल्याची शिकवण दिली. त्यामुळेच ती ब्रिटिश गुप्तहेर बनली. नसानसात अपार धैय भिनलेली ही शूर वाघीण अखेर जर्मनीच्या हाती लागते. जर्मन अधिकारी अंधार कोठडीत तिचा अन्वनित छळ करतात. पण तरीही नूर त्या अधिकाऱ्यांना आपल्याबरोबरच्या गुप्तहेर सहकाऱ्यांची नावे सांगत नाही. एखादी स्त्री जरा हटके पेशा पत्करून एवढे धाडस दाखवते हे वाचतानाही अंगावर काटा येतो. नूरच्या बरोबर तीन महिला गुप्तहेरांना तुरुंग अधिकाऱ्यांनी मानेच्या मागच्या बाजूला गोळ्या घालून संपवले. पण नूर हिच्यावर अतिशय धोकादायक असा शिक्का असल्यामुळे तिला अधिक छळ करण्यासाठी निवडण्यात आले. जर्मन अधिकाऱ्यांनी मृत्यूच्या आदल्या दिवशी तिला रात्रभर लाथाबुक्यांनी रक्तबंबाळ केले आणि सकाळी तिच्या डोक्याशी अगदी जवळून गोळी घातली तेव्हा नूरने ‘लिबर्ते’ (स्वातंत्र्य) शब्दाचा उच्चार करून प्राण सोडला त्यावेळी नूरचे वय अवघे तीस वर्षे होते. केवढे धाडस होते तिच्या अंगी. शत्रूची गोळी खातानाही ‘मी मुक्त झाले आहे’ याचाच आनंद नूरला होता. पिस्तुलाच्या गोळीने तिची यमयातनांमधून मुक्तता केली. नूरच्या शौर्याने अनोखे स्फुल्लिंग जागते ठेवणाऱ्या या स्फूर्तिदायक सत्यकथेवर आधारित ही कादंबरी अंगावर थरार आणणारी आहे. ...Read more

  • Rating StarMAITRIN 01-03-2011

    टिपू सुलतानाची नात ब्रिटिश गुप्तहेर... नोरा इनायत खान या भारतीय गुप्तहेर तरुणीला जर्मनांनी छळ छावणीत डांबून निर्घृणपणे ठार मारले. टिपू सुलतानाच्या वंशातील या तरुणीची माहिती आपल्याला फारशी नाही किंवा खरे तर अजिबात नाही. दुसऱ्या महायुद्धातील एस ओ ई चीगोपनीय कागदपत्रे आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नोरा इनायत खानच्या कार्याची आणि बेडरपणाची कहाणी आता सुसूत्रपणे सांगता येणे शक्य झाले आहे. श्रावणी बासू या लंडनमधील पत्रकार महिलेने मूल कागदपत्रे अभ्यासून नूरचे चरित्र लिहून ‘स्पाय प्रिन्सेस’ या नावाने प्रसिद्ध केले. त्याचा मराठी अनुवाद भारती पांडे यांनी केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने बाजारात आणला आहे. सुफी पंथाचा प्रभाव असलेल्या एका मुस्लीम कुटुंबातील नूर ही मुलगी स्वप्नाळू, सुंदर आणि समंजस होती. तिचे वडील इनायत खान. आई अमेरिकन. मुलांसाठी कथा लिहिण्याची तिला आवड होती. दिसायला नाजूक, मूळ भारतीय पण आता पॅरिसमध्ये स्थायिक. विलायत आणि हिदायत हे तिचे धाकटे भाऊ. ती ब्रिटिश, फ्रेंच आणि भारतीय होती. ब्रिटिशांची गुप्तहेर म्हणून ती पॅरिसमध्ये काम करू लागली. पॅरिस जर्मनांच्या ताब्यात गेल्यावर तिला पकडण्यात आले आणि जर्मनीतील छळछावणीत पाठविण्यात आले. तिचा भयंकर छळ करण्यात आला आणि शेवटी तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. जनरल चार्ल्स द गॉल यांनी तिच्या मृत्यूनंतर तिला क्वा द गेर हा सर्वोच्च मुलकी पुरस्कार देऊन सुवर्णताऱ्यासह तिचा गौरव केला. सन्मानपत्रात म्हटले आहे. ‘‘ए.एस.ओ. नोरा इनायत खान, डब्ल्यू एएएफ, हिला १६ जून १९४३ रोजी लायसँडर विमानाने फ्रान्समध्ये पाठविण्यात आले. बिनतारी यंत्रचालक म्हणून पॅरिसमधील बंडखोरांची एक संघटना आणि लंडन यांच्यातील संपर्क चालू ठेवण्याची कामगिरी तिच्यावर सोपवलेली होती. त्या बंडखोर संघटनेतील अनेक लोकांना पकडण्यात आले. तेव्हा तिला पळून जावे लागले. तरीही तिने आपले काम चालू ठेवले. १९४३ जुलैमध्ये ती ग्रिग्राँ येथे चकमकीत सापडली. जर्मन सैनिकांना जखमी करून तिने पळ काढला. परंतु तिला ऑक्टोबर १९४३ मध्ये पकडूनच जर्मनीला पाठविण्यात आले.’’ या प्रशस्तिपत्रासोबत सुवर्ण ताऱ्यासह तिला क्रवा द गेर हा सन्मान देण्यात आला. जनरल द चार्ल्स द गॉल यांची स्वाक्षरी या पत्रावर आहे. नोराला १९४९ मध्ये जॉर्ज क्रॉस देण्यात आला. खरे तर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्याची तिची इच्छा होती. १९४२ मध्ये आर.ए.एफ. मध्ये नोकरीसाठी तिने अर्ज केला होता आणि इंग्लंडमध्ये मी युद्धकाळात ब्रिटिशांना सहाय्य करीत असले तरी युद्ध संपल्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणार आहे असे ती स्पष्ट सांगत होती... डाखाऊ येथे तीस हजार व्यक्तींची रक्षा पुरण्यात आली आहे. तेथेच नूरचे स्मरण जागवणारी छोटी फुलबाग आहे. एका भारतीय पराक्रमी स्त्रीची नव्याने ओळख करून देणारे हे पुस्तक वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more