* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SPY PRINCESS
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788190734493
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN INDIAN PRINCESS, WHO IS IN THE LINEAGE OF TIPU SULTAN, PARTICIPATES IN THE SECOND WORLD WAR, SHE SPIES FOR THE BRITISH. THIS BRAVE AND FIERCE TIGRESS GETS CAUGHT BY THE GERMANS, AS A RESULT OF TREACHERY. HER FUTURE IS CLEAR; SHE SUFFERS IMMENSE PAINS AT THE HANDS OF GERMANS. TREACHERY, TORTURE AND TERRIBLE TORMENT.. ONE DAY, A BULLET REVEALS HER FROM ALL THIS TORTURE. SHE WAS THE ONE WHO KEPT THE FLAME OF BRAVERY ENLIGHTENED.
टिपू सुलतानाची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या दुसऱ्या महायुद्धात सामील होते, ब्रिटिश गुप्तहेर बनून! नसानसांत अपार धैर्य भिनलेली ही शूर वाघीण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात, अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना... पिस्तुलाची गोळीच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागतं ठेवणारी...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #SHRABANIBASU #BHARATIPANDE #SPYPRINCESS #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating StarPUJA KUCHEKAR

    टिपू सुलतान ची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या. दुसऱ्या महायुद्धात सामील होते एक "ब्रिटिश गुप्तहेर" बनून!!!!! नसानसांत अपार धैर्य भिनलेली हि शूर वाघिण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात ,अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना..... पिस्तुलाची गोळच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागत ठेवणारी एक रोचक ,थरारक सत्यकथा . गुप्तहेर युवराज्ञी "नूर इनायत खान" हिची. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 04-04-2010

    नूरच्या शौर्याचा मागोवा... नूर इनायत खान एका पारंपरिक आणि आध्यात्मिक वळणाच्या मुस्लीम कुटुंबातील मुलगी गुप्तहेर बनते आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात सर्वांत धोकादायक अशा सुद्धक्षेत्रात गुप्तहेर म्हणून काम करते. या एकाच गोष्टीने मूळ लेखिका श्रवणी बसू यांचे लक्ष वेधले आणि तिने नूरचा तपशीलावर अभ्यास करण्याचे ठरवले. नूरचा मुळाचा पिंड हेरगिरीचा नव्हता, तर तीही सर्वसामान्य चारचौघींसारखीच स्वप्नाळू, सुंदर आणि सौम्य मुलगी होती. तिला मुलांसाठी कथा लिहिणे फार आवडे. नेमबाज, विशेष शारीरिक कौशल्य यापैकी कोणतीही गोष्ट सूरकडे नव्हती. तरीही तिने प्रचंड धैर्य, हिंमत दाखवली. नूरने युद्धकाळात जी गुप्तहेरगिरी केली त्या वेळचे तिचे सर्व सहकारी फ्रान्समध्ये मारले गेले. तिचे वरिष्ठी हयात नसल्याने नूरचे कुटुंबीय भाऊ, एसओई कंपनीच्या गुप्त फाइल्स एवढ्याच आधारावर नूरचे जीवन उलगडले. नूर ही मुळची भारतीय. तिचे वडील सूफी तत्त्वज्ञानी. त्यांनी नूरला ती एक भारतीय राजकन्या असून तिच्या नसानसात टिपू सुलतानचे रक्त खेळत असल्याची शिकवण दिली. त्यामुळेच ती ब्रिटिश गुप्तहेर बनली. नसानसात अपार धैय भिनलेली ही शूर वाघीण अखेर जर्मनीच्या हाती लागते. जर्मन अधिकारी अंधार कोठडीत तिचा अन्वनित छळ करतात. पण तरीही नूर त्या अधिकाऱ्यांना आपल्याबरोबरच्या गुप्तहेर सहकाऱ्यांची नावे सांगत नाही. एखादी स्त्री जरा हटके पेशा पत्करून एवढे धाडस दाखवते हे वाचतानाही अंगावर काटा येतो. नूरच्या बरोबर तीन महिला गुप्तहेरांना तुरुंग अधिकाऱ्यांनी मानेच्या मागच्या बाजूला गोळ्या घालून संपवले. पण नूर हिच्यावर अतिशय धोकादायक असा शिक्का असल्यामुळे तिला अधिक छळ करण्यासाठी निवडण्यात आले. जर्मन अधिकाऱ्यांनी मृत्यूच्या आदल्या दिवशी तिला रात्रभर लाथाबुक्यांनी रक्तबंबाळ केले आणि सकाळी तिच्या डोक्याशी अगदी जवळून गोळी घातली तेव्हा नूरने ‘लिबर्ते’ (स्वातंत्र्य) शब्दाचा उच्चार करून प्राण सोडला त्यावेळी नूरचे वय अवघे तीस वर्षे होते. केवढे धाडस होते तिच्या अंगी. शत्रूची गोळी खातानाही ‘मी मुक्त झाले आहे’ याचाच आनंद नूरला होता. पिस्तुलाच्या गोळीने तिची यमयातनांमधून मुक्तता केली. नूरच्या शौर्याने अनोखे स्फुल्लिंग जागते ठेवणाऱ्या या स्फूर्तिदायक सत्यकथेवर आधारित ही कादंबरी अंगावर थरार आणणारी आहे. ...Read more

  • Rating StarMAITRIN 01-03-2011

    टिपू सुलतानाची नात ब्रिटिश गुप्तहेर... नोरा इनायत खान या भारतीय गुप्तहेर तरुणीला जर्मनांनी छळ छावणीत डांबून निर्घृणपणे ठार मारले. टिपू सुलतानाच्या वंशातील या तरुणीची माहिती आपल्याला फारशी नाही किंवा खरे तर अजिबात नाही. दुसऱ्या महायुद्धातील एस ओ ई चीगोपनीय कागदपत्रे आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नोरा इनायत खानच्या कार्याची आणि बेडरपणाची कहाणी आता सुसूत्रपणे सांगता येणे शक्य झाले आहे. श्रावणी बासू या लंडनमधील पत्रकार महिलेने मूल कागदपत्रे अभ्यासून नूरचे चरित्र लिहून ‘स्पाय प्रिन्सेस’ या नावाने प्रसिद्ध केले. त्याचा मराठी अनुवाद भारती पांडे यांनी केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने बाजारात आणला आहे. सुफी पंथाचा प्रभाव असलेल्या एका मुस्लीम कुटुंबातील नूर ही मुलगी स्वप्नाळू, सुंदर आणि समंजस होती. तिचे वडील इनायत खान. आई अमेरिकन. मुलांसाठी कथा लिहिण्याची तिला आवड होती. दिसायला नाजूक, मूळ भारतीय पण आता पॅरिसमध्ये स्थायिक. विलायत आणि हिदायत हे तिचे धाकटे भाऊ. ती ब्रिटिश, फ्रेंच आणि भारतीय होती. ब्रिटिशांची गुप्तहेर म्हणून ती पॅरिसमध्ये काम करू लागली. पॅरिस जर्मनांच्या ताब्यात गेल्यावर तिला पकडण्यात आले आणि जर्मनीतील छळछावणीत पाठविण्यात आले. तिचा भयंकर छळ करण्यात आला आणि शेवटी तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. जनरल चार्ल्स द गॉल यांनी तिच्या मृत्यूनंतर तिला क्वा द गेर हा सर्वोच्च मुलकी पुरस्कार देऊन सुवर्णताऱ्यासह तिचा गौरव केला. सन्मानपत्रात म्हटले आहे. ‘‘ए.एस.ओ. नोरा इनायत खान, डब्ल्यू एएएफ, हिला १६ जून १९४३ रोजी लायसँडर विमानाने फ्रान्समध्ये पाठविण्यात आले. बिनतारी यंत्रचालक म्हणून पॅरिसमधील बंडखोरांची एक संघटना आणि लंडन यांच्यातील संपर्क चालू ठेवण्याची कामगिरी तिच्यावर सोपवलेली होती. त्या बंडखोर संघटनेतील अनेक लोकांना पकडण्यात आले. तेव्हा तिला पळून जावे लागले. तरीही तिने आपले काम चालू ठेवले. १९४३ जुलैमध्ये ती ग्रिग्राँ येथे चकमकीत सापडली. जर्मन सैनिकांना जखमी करून तिने पळ काढला. परंतु तिला ऑक्टोबर १९४३ मध्ये पकडूनच जर्मनीला पाठविण्यात आले.’’ या प्रशस्तिपत्रासोबत सुवर्ण ताऱ्यासह तिला क्रवा द गेर हा सन्मान देण्यात आला. जनरल द चार्ल्स द गॉल यांची स्वाक्षरी या पत्रावर आहे. नोराला १९४९ मध्ये जॉर्ज क्रॉस देण्यात आला. खरे तर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्याची तिची इच्छा होती. १९४२ मध्ये आर.ए.एफ. मध्ये नोकरीसाठी तिने अर्ज केला होता आणि इंग्लंडमध्ये मी युद्धकाळात ब्रिटिशांना सहाय्य करीत असले तरी युद्ध संपल्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणार आहे असे ती स्पष्ट सांगत होती... डाखाऊ येथे तीस हजार व्यक्तींची रक्षा पुरण्यात आली आहे. तेथेच नूरचे स्मरण जागवणारी छोटी फुलबाग आहे. एका भारतीय पराक्रमी स्त्रीची नव्याने ओळख करून देणारे हे पुस्तक वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more