* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BLASPHEMY
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177665017
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 252
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS FAR AS I WAS CONCERNED, IT WAS MY HUSBAND WHO HAD KILLED MY SON. HE WAS THE ONE WHO HAD TRIED TO RAPE MY DAUGHTER. HE WAS A PARASITE, HE WAS LUCIFER, GNAWING THE HOLY KORAN. HE WAS THE MONSTER WHO DRAGGED ME TOWARDS DARKNESS EVERY NIGHT, CLUTCHING MY NECK IN HIS STRONG HANDS. HE WAS A DEMON, RAPING THE ORPHANS; HE GAINED HIS STRENGTH FROM SUCKING THE WEEK. BUT ON THE TOP OF THIS, HE WAS CONSIDERED TO BE THE MESSENGER OF THE GOD, HE WAS SUPPOSED TO BE THE ONE WHO COULD REACH THE ALLAH, THE MESSENGER OF GOD WHO COULD PROTECT US FROM REACHING THE HELL.
माझ्या दृष्टीनं — माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ – पवित्र ग्रंथाला कुरतडणारं. तो ल्यूसिफर होता. माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान होता. अनाथांवर बलात्कार करणारा, दुर्बलांचं रक्तशोषण करून स्वत: पुष्ट होणारा राक्षस. परंतु... या सर्वांहून अधिक भयंकर होतं – त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं — अल्लाजवळ पोचू शकणारा – आमचं सर्वांचं नरकापासून रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BLASPHEMY #BHARATIPANDE #TEHMINADURRANI #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating StarHarshda Maheshwari

    नक्की वाचा विषेशतः महिला वर्गानी..

  • Rating StarYashashri Rahalkar

    वाचलय... काही दिवस अत्यंत अस्वस्थपणा वाटत होता वाचून पार हादरले होते मी .... प्रत्येक स्त्री ने जरूर वाचावे .... हे पुस्तक वाचले की आपल्या धर्माची, देशाची आणि स्वातंत्र्याची खरी किंमत कळते .

  • Rating StarSandip R Chavan‎

    चीड,राग,संताप आणणारी सत्य घटनेवर आधारित कादंबरी...... एखादा मनुष्य(?) किती हैवान होऊ शकतो? सैतान कोणाला म्हणतात? या प्रशांची उत्तरे पाकिस्तानातील एक धर्मगुरू ‘पीरसाई’ याच्याबद्दल वाचल्यावर मिळतात. ही कादंबरी एका हिर नावाच्या सुंदर तरुणीची करुण कहणी आहे. तिच्या स्वप्नांचा चुराडा होऊन तिला किती अनन्वित अत्याचाराला बळी पडावं लागते हे वाचल्यावर मनाचा थरकाप उडतो. धर्माच्या नावाखाली किती निचपणा केला जातो हे या कादंबरीत समजते. पाकिस्तान सारख्या धर्मांध राष्ट्रात धर्मगुरूविरुद्ध एखादं पुस्तक लिहणे व धर्माच्या नावाने कोणते काळे धंदे होतात हे जगापुढे आणण्याचे धाडस तेहमिना दुर्रानी यांनी केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे एवढे थोडेच आहे. भारती पांडे यांनी केलेला अतिशय उत्तम असा अनुवाद वाचकास जागच्याजागी खिळवून ठेवतो. पुस्तकाच्या सुरवातीला पुस्तकाबद्दल थोड्यात माहिती आहे ती खालीलप्रमाणे:- ही कादंबरी दक्षिण पाकिस्तानमध्ये घडते. एका सत्य घटनेतून स्फुरलेली ही कादंबरी पराकोटीच्या दुष्टत्वाचे कठोर दर्शन घडवते. रक्तपिपासू धर्मनेत्यांनी भ्रष्ट केलेल्या इस्लामचे स्वरूप कोणतीही लपवाछपवी न करता वाचकांपुढे ठेवण्याचे धाडसाचे काम ही कादंबरी करते. हीर नावाच्या एका सुंदर तरुणीची करुण कहाणी लेखिकेने अत्यंत उत्कटतेने, प्रभावशाली भाषेत सांगितली आहे. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी या अलौकिक सुंदरीचा विवाह तिच्याहून अठरा वर्षांनी मोठ्या असलेल्या पीरसाई या धर्मगुरुशी होतो. हीरवर अनन्वित अत्याचार करत पीरसाईने हीरला अध:पतनाच्या अंतहीन खाईत नेऊन ठेवले आहे. परंतु ज्या भयंकर दुःस्वप्नामध्ये हीर कैद झालेली आहे, ते दुःस्वप्न तिचे एकटीचे नाही; पीरसाईशी, धर्माशी एकनिष्ठ असणाऱ्या त्या साऱ्या जमातीचेच ते दुर्दैव आहे. पीरच्या हवेलीमध्ये रोज दिवस-रात्र वर्णन करता येणार नाहीत, अशी भयंकर क्रूर कृत्ये केली जातात - हे सारे अल्लाच्या नावाने केले जाते. तिच्या धन्याने निर्माण केलेल्या या रौरवामध्ये ओढली गेल्यावर हीरची आत्मप्रतिष्ठा, तिचे स्वातंत्र्य तर नष्ट होतेच, परंतु तिच्यामधील उपजत माणुसकीही संपून जाते....अखेर एका भयंकर निर्णयाने हीरला आपले अस्तित्व गवसते. एक संतप्त आणि धाडसी कादंबरी. या कादंबरीने उपखंडातील आघाडीच्या साहित्यिकांमध्ये तेहमिना दुर्रानी यांची प्रस्थापना केली आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ तेहमिना दुर्रानी यांचेच आहे. ‘अ मिरर टू द ब्लाईंड’ हे अब्दुल सत्तार एढी यांचे चरित्र हे दुर्रानी यांचे दुसरे पुस्तक. ‘ब्लास्फेमी’ ही त्यांची पहिली कादंबरी. तेहमिना दुर्रानी पाकिस्तानामध्ये लाहोर येथे राहतात. ...Read more

  • Rating StarArchana Chinchanikar

    सुन्न करणारे पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.