TARA PARKER-POPE

About Author


TARA PARKER-POPE AUTHOR OF THE ‘WELL’ COLUMN, IS ONE OF THE NEW YORK TIMES MOST POPULAR AND MOST E-MAILED JOURNALISTS. SHE WROTE FOR THE WALL STREET JOURNAL BEFORE MOVING TO THE TIMES. HER WORK IS REGULARLY FEATURED ON TELEVISION AND RADIO. SHE HAS APPEARED ON TODAY, GOOD MORNING AMERICA, CNN, CHARLIE ROSE AND NUMEROUS NATIONAL PUBLIC RADIO SHOWS.

तारा पार्कर-पोप या द न्यू यॉर्क टाइम्स वर्तमानपत्रात वाचकांचा आवडता, सुप्रसिद्ध स्तंभलेख वेल ब्लॉग लिहित असतात. यामधून दैनंदिन जीवनातल्या निर्णयांचा, उत्तम स्वास्थ्य राखण्यावर होणारा परिणाम या मुद्द्यावर अधिक भर दिला जातो. टाइम्स मध्ये कार्यरत होण्यापूर्वी, तारा पार्कर-पोप या द वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये वैयक्तिक स्वास्थ्य या विषयाच्या स्तंभलेखक म्हणून काम करत होत्या. त्या द सेकंड सेन्चुरी अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन हेल्थ केअर फ्रॉम द कोलंबिया युनिव्र्हिसटी स्कूल ऑफ नर्सिंगच्या मानकरी आहेत. टूडे शो, गुडमॉर्निंग अमेरिका, सीएनएन, एनपीआर या वाहिन्या व इतर काही प्रमुख वृत्तवाहिन्या यांमधून त्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित होत असतात. त्यांची सुकन्या लॅनी, तीन कुत्रे आणि तीन मांजरी यांच्यासोबत पोन्सील्वेनिया राज्यातल्या बक्स काउन्टीमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. वेल या स्तंभाच्या या लेखिका द न्यू यॉर्क टाइम्स मधल्या, नावाजलेल्या पत्रकारांपैकी एक पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. वाचकांकडून त्यांना प्रशंसेच्या भर ई-मेल येणाऱ्यांमध्ये असतात. टाइम्स मध्ये रुजू होण्यापूर्वी त्या द वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये लिखाण करत असत. त्यांच्या लिखाणावर रेडिओ व टीव्ही या माध्यमांमधून नियमितपणे अनेक कार्यक्रम होत असतात. टुडे, गुड मॉर्निंग अमेरिका, सीएनएन, चार्ली रोझ यांसारख्या कार्यक्रमांमधून त्या अनेकवेळा टीव्हीवर झळकल्या आहेत आणि नॅशनल पब्लिक रेडिओच्या अनेक कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी झाल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SHUBH SHUBHMANGAL Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more