* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PAHILI PAVALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668193
  • Edition : 2
  • Publishing Year : 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARATHI LITERARY LEGEND V.S.KHANDEKAR HAD PLANNED TO WRITE HIS AUTOBIOGRAPHY IN THREE PARTS. HE WROTE HIS FIRST AUTOBIOGRAPHICAL STORY FROM BIRTH TILL MARRIAGE IN THE BOOK ‘EKA PANACHI KAHANI’ WHICH WAS PUBLISHED IN 1981. KHANDEKAR COULD ONLY PENNED THREE DECADES OF HIS LIFE. AFTER THAT AUTHOR SUNILKUMAR LAWATE TOOK THE TASK IN HIS HAND. LAWATE EDITED KHANDEKAR’S AUTOBIOGRAPHICAL ESSAYS . ‘PAHILI PAVALA’ IS THE FIRST PART OF THOSE ESSAYS. THIS BOOK DESCRIBES V.S.KHANDEKAR’S EARLY LITERARY LIFE.
हा आहे तसा लेखसंग्रह; पण संपादकाच्या कौशल्यामुळे त्यास साहित्यिक आत्मकथनाच रूप आलय! मराठी सारस्वतातल हे पहिल साहित्यिक आत्मचरित्र. यात वि.स.खांडेकरांनी आपण साहित्याकडे आकर्षित का झालो इथपासून ते अनुवादाच्या माध्यामातून आपण भारतीय लेखक कसे झालो, इथंवरचा सारा प्रवास आत्मसंवादाच्या रूपात व्यक्त केलाय.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #पहिली पावलं
Customer Reviews
  • Rating Starलोकमत, कोल्हापूर दि. ३१ मे २०१८

    मानवी जीवनात ‘पहिलं पाऊल’ विशेष महत्त्वाचे असते. सृष्टीनिर्मितीचा नवारंभ ते मानवी जगातल्या गोष्टींना अनेक अर्थांनी महत्त्व आहे. भुईतून अंकुर बाहेर पडणे, झाडाला फांदी फुटणे,फुलांचे उमलणे, पहिला उच्चार, पहिले अक्षर अशा अनेक गोष्टी या दृष्टीने महत्त्ाच्या ठरतात. पहिल्या अविष्कारात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. पहिल्या अविष्कारात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. भविष्यातील घडणींचे भरणपोषण असते. त्यादृष्टीने लेखनातील पहिल्या उर्मीही अशाच आनंददायी, सुफळ असू शकतात. वि.स.खांडेकरांच्या वाङ्मयातील पहिल्या अविष्काराच्या वाटा जाणून घेणं तितकंच कुतूहलजनक आहे. खांडेकरांनी त्यांच्या वाङ्मयाच्या व घडणीच्या अनेक गोष्टी त्यांच्या ‘पहिलं पाऊल’ या आत्मपर लेखनात मांडल्या आहेत. वि.स.खांडेकरांना लेखक म्हणून अफाट लोकप्रियता लाभली. ध्येयवादाचे आणि स्वप्नकांक्षेची चित्रे त्यांनी रेखाटली. मध्यमवर्गीय ध्येयवादी स्वप्नसृष्टीचे जादूगार म्हणून त्यांनी ख्याती लाभली. भारतीय भाषांमध्ये ते पसरले. अशा या लेखकाच्या एवंâदर पहिल्या उर्मी सांगणारा ‘पहिलं पाऊल’ हा लेखसंग्रह आहे. त्यामध्ये खांडेकरांनी आपल्या आयुष्यभरातील कामगिरीच्या वाटा सांगितल्या आहेत. खांडेकरांचे लेखन, वाचन, संपादन व वक्तृत्वातील आरंभकाळातील अविष्कार रूपे सांगितली आहेत. लोकप्रिय ठरलेल्या लेखकाच्या लेखकाची स्वप्नभूमी घडविलेल्या काळाचे कथन त्यात आहे.वाङ्मयाकडे आकर्षित कसे झाले हे सांगत असताना त्यांनी पुंगीवाल्याची लोककथा दिली आहे. पुंगीच्या सुरांमागे जसे उंदीर जातात, तशा आंतरिक उर्मीतून ते वाङ्मयाकडे ओढले गेले. सांगली, पुणे, शिरोडे व कोल्हापूर या स्थळावकाशाला खांडेकरांच्या घडवणुकीत महत्त्व आहे. बालपण सांगलीत गेले. सांगलीतील नाट्यवेडाने त्यांना वेगळ्या स्वप्नसृष्टीत नेले. वाङ्मयातील निर्मळ जगाच्या अस्पष्ट हाका या काळात त्यांना ऐकू येत होत्या. बालपणीच्या अनुभवाचा आयुष्यावर झालेल्या परिणाम प्रभावाच्या नोंदी त्यात आहेत. सामाजिक सुधारणा, पुराणमतवादाबद्दल अधिक्षेप, आगरकर व गडकरयांच्या लेखनाने कलेला संस्कार महत्त्वाचा ठरला. लेखनकला चंद्राप्रमाणे मोहक; पण तिचे चांदणे जीवनाच्या सूर्याप्रमाणे अलगद पडल्याचे ते सांगतात. खांडेकरांच्या आदर्शवादी, ध्येयवादी, भावनाप्रधान विचारदृष्टीच्यादेखील खुणा त्यात आहेत. आईप्रमाणे देखकाची मायाही आंधळी असते, असे ते म्हणतात. पुण्यात विद्यार्थीदशेत केशवसुतांची ‘तुतारी’ ही कविता वाचल्यानंतर त्यांना निरभ्र आकाशात वीज चमकल्याचे भासले. पहिले टीकालेखन, कथालेखन, लघुनिबंध, रुपककथा, नाटक, चित्रपट, कथालेखन, लघुनिबंध, रुपककथा, नाटक, चित्रपट, पटकथा व वक्तृत्वातील मनोगत या लेखनात आहे. सुरवंटाचे फुलपाखरात रुपांतर होण्याच्या काळाचे तसेच खांडेकरांच्या लेखनक्रमातील स्थित्यंतर नोंदी आहेत. शिरोड्यातील चिमुकल्या खेड्यात राहताना गांधींच्या रूपानं तेजःपुंज तारा समाजमनाशी सुसंवाद साधन होता असे त्यांनी म्हटले आहे. कादंबरीकार म्हणून खांडेकरांचे वेगळे असे स्थान आहे. स्वतःच्या कादंबरी रुचीबद्दल खांडेकरांनी विस्तृतपणे माहिती दिली आहे. कृष्णाकाठची काळी कुळकुळीत वांगी, लुसलुशीत कणसे आणि अवतीभोवतीची रसपूर्ण नाटके व भरमसाट वाचन यातून वाचनाचे स्रोत पसरविले. बालपणीच हरिभाऊ आपटे यांच्या ठिकाणी असणाNया निराळ्या शक्तीची जाणीव झाली. ह.ना. आपटे यांच्या ऐतिहासिक व सामाजिक कादंबNयांनी मन उत्कंठीत आणि प्रज्वलित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘मी त्यांच्या कादंबNयांचा दोस्त झालो’ असे म्हटले आहे. ‘उषःकाल’ ही कादंबरी त्यांनी रात्रभर जागून वाचून काढली. पहिली कादंबरी लिहित असताना ‘आतल्या उमाळ्यापेक्षा बाह्य परिस्थितीच अधिक कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कलाकृती ही नदीसारखी असते. तसेच लेखन आणि वाचन ही जुळी भांवडे आहेत, अशी वाक्ये या लेखनात ठिकठिकाणी आहेत. स्थळावकाश, वैचारिक, वाङ्मयीन जडणघडण, पहिले लेखनाविष्कार यांचा संबंध दर्शविणारे अतिशय प्रांजळ असे हे आत्मनिवेदनपर लेखन आहे. खांडेकर व्यक्ती आणि लेखक, तसेच त्या काळातील मराठी वाङ्मय समजून घ्यायलाही ‘पहिलं पावलें’ महत्त्वाची ठरतात. एका लेखकाच्या निर्मितीच्या या सृजनवाटा ‘पहिलं पाऊल’ मध्ये आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 15-07-2007

    खांडेकरांची पहिली पावलं... ज्ञानपीठाचे मानकरी वि. स. खांडेकर यांनी विपुल लेखन केले. काव्य, टीका, कादंबरी, कथा, लघुनिबंध, नाट्यलेखन, रूपककथा, पटकथा, अनुवाद अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात त्यांनी स्वैर संचार केला. या प्रत्येक प्रकारातील आरंभीची त्यांच वाटचाल कशी सुरू झाली याबद्दल वाचकांना कुतूहल असते. खांडेकरांनी त्याबद्दल ‘पहिली पावलं’ नावानं एक आत्मकथन लिहिण्याचा संकल्प सोडला होता. परंतु तो काही पूर्ण झाला नाही. ‘एका पानाची कहाणी’ हे त्यांचे आत्मकथन १९८१ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यात १८९८ ते १९२९ पर्यंतचा तीस वर्षांचा कालखंड, आला आहे. त्याशिवाय ‘सशाचे सिंहावलोकन’ असाही एका आत्मवृत्ताचा खंड त्यांना लिहायचा होता. त्यांचे एक निष्ठावंत अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यांच्या लेखनाचा अपूर्ण राहिलेला हा भाग पूर्ण करण्याचे मनावर घेतले आहे. खांडेकरांनी ‘पहिली पावलं’ आणि ‘सशाचे सिंहावलोकन असे स्वतंत्र लेखन केलेले नसले तरी या शीर्षकांना साजेल असे लेखनसंदर्भ तयांच्या प्रकाशित साहित्यात विखुरलेले आहेत. ते सर्व संकलित करून पुस्तरूपाने प्रसिद्ध करण्याचा डॉ. लवटे यांचा प्रयत्न आहे. ‘पहिली पावलं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने त्यातील एक भाग वाचकांना उपलब्ध होत आहे. हे एका अर्थाने स्फुट लेखांच्या रूपातील खांडेकरांचे वाङ्मयीन आत्मकथन आहे असे त्यांना वाटते. मराठी साहित्यिक आत्मकथनाच्या प्रांतातीलही हे पहिले पाऊल असावे, असे डॉ. लवटे यांना वाटते. खांडेकरांची पुस्तके वाचत असताना आणि अप्रकाशित कागदपत्रे बघत असताना विशिष्ट वाङ्मयप्रकारातील आरंभीच्या लेखनाबद्दलचे जे उतारे सापडले, ते संकलित करून डॉ. लवटे यांनी पहिली पावलं हे शंभर पृष्ठांचे पुस्तक सिद्ध केले आहे. यात निवडलेल्या उताऱ्यांपैकी मी वाङ्मयाकडे का आकर्षित झालो, मी लेखक कसा झालो? हे दोन पानी उतारे अप्रकाशित आहेत. पटकथा लेखनासंबंधी जया दडकरांच्या प्रश्नांची उत्तरे देणारे टिपणही अप्रकाशित होते. रुपककथांबद्दलचे विवेचन कलिकाच्या प्रस्तावनेतून घेतले आहे. उमेदवारी आणि काव्यलेखन याबद्दलचा मजकूर ‘ते दिवस ती माणसे’ या पुस्तकातून तर लघुनिबंध लेखनाविषयक मजकूर ‘एका पानाची कहाणी’ या पुस्तकातून घेतला आहे. बाकीचे लेख हे वृत्तपत्रातून व मासिकातून आलेले आहेत. एकूण १५ लेख या पुस्तकात आहेत. आपण लेखनाकडे, वाङ्मयाकडे आकृष्ट का झालो याचे उत्तर खांडेकरांनी आत्मप्रतिमेच्या परिपुष्टीसाठी असे दिले आहे. नियती, पूर्वकर्म, विशिष्ट ग्रहांचा प्रभाव वगैरे माझ्या बुद्धीला पटत नाही. लेखनाविषयक माझ्या जन्मजात आकर्षणाचं कारण लेखनात माझ्यातला मी ला काहीतरी मोठं समाधान वाटत असलं पाहिजे. मुरलीवाल्याच्या मागं जाणाऱ्या मुलांप्रमाणं त्यांना आंतरिक ओढ लेखन करण्याला प्रेरक ठरली असावी. माध्यमिक शाळेत व महाविद्यालयात असतानाच लेखक व्हावं, चांगला नामांकित लेखक व्हावं अशा विचित्र महत्त्वाकांक्षेने आपल्याल पछाडले, असे म्हणतात. पालक व शिक्षक यांच्यापैकी कुणातच वाङ्मय प्रेम नव्हते, तरीही मॅट्रिक होईपर्यंत खांडेकरांनी भरपूर वाचन केले. कोल्हटकर, गडकरी हे त्यांचे आदर्श. नाट्यवेड्या सांगलीत त्यांचे बालपण गेले, तेथे नाटककार देवलांच्या अवतीभोवती असणारी गर्दी बघून लेखक या प्राण्याविषयी खांडेकरांच्या मनात विलक्षण भक्तीची भावना निर्माण झाली. नवं जग निर्माण करण्याची लेखकाची शक्ती त्यांना दिव्य भव्य वाटत असावी. काही उताऱ्यांवरून निश्चित काही हाती न लागण्याचीही शक्यता आहे. ‘हृदयाची हाक’ ही कदाचित माझी शेवटचीच कादंबरी म्हणणारे खांडेकर पुढे डझनावर कादंबऱ्या लिहितात तेव्हा लेखकाची विधाने ही त्या वेळेपुरती असतात हेही लक्षात घेणे जरूर असते. खांडेकरांच्या प्रस्तावना, भाषणे, स्वैर चिंतनात्मक लेख, मुलाखती यांचीही दखल घेऊन त्यांच्या लेखनप्रक्रियेचा आणि प्रेरणांचा अधिक खोलात जाऊन अभ्यास व्हायला हवा. अडीच रुपयांच्या कुड्या बायकोला घेणे शक्य व्हावे म्हणून कादंबरी लिहायला घेतली, यासारखी विधाने वाचकांची दिशाभूल करू शकतात. कादंबरीला फक्त अडीच रुपये एवढाच मोबदला मिळाला असाही अर्थ त्यातून निघू शकतो. अशा ठिकाणी स्पष्टीकरणात्मक, वस्तुस्थितीनिदर्शक टीपाही जरूर ठरतात. तरीही विविध वाङ्मयप्रकारामध्ये रस घेणाऱ्या खांडेकरांच्या त्याबद्दलच्या भावनांची थोडीफार कल्पना येण्यासाठी हे संकलन उपयुक्त आहेच. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMNA 13-09-2009

    ललिता बापट युगकर्ते आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर हे साहित्याच्या सर्व प्रांतात आपला ठसा उमटवून राहिलेले थोर सारस्वत! कथा, कादंबरी, लघुनिबंध, रुपक कथा, वैचारिक लेख, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, पटकथा, गीत लेखन, टीका, भाांतर, भाषण, पत्र, प्रस्तावना, पुस्तक परीक्षण, संपादन, मुलाखत अशा वैविध्यपूर्ण लेखनाने नुसते मराठीच नव्हे तर इतर भाषिक चोखंदळ वाचकांना आकर्षित करणारे थोर साहित्यिक! एका पानाची कहाणी; पहिली पावलं, सशाचे सिंहावलोकन अशा तीन आत्मकथनांसाठी त्यांनी व्यक्तिगत टिपणे केलेली होती. त्यांपैकी एका पानाची कहाणी - अर्थात वि.स. खांडेकर यांच्या जन्मापासून विवाहापर्यंतची - अर्थात १८९८ ते १९२९ पर्यंतचा त्यांचा जो तीन दशकांचा जीवनकाल त्यांनी शब्दबद्ध केला होता ते आत्मकथनपर पुस्तक १९८१ मध्ये प्रकाशित झाले आहे. १८९८ ते १९७६ या ७८ वर्षांच्या वि. स. खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या जीवनकालांपैकी उरलेल्या कालासाठीची दोन आत्मकथनपर टिपणांचा धांडोळा घेऊन ही दोन्ही उर्वरित आत्मकथनपर पुस्तके संपादित करण्याचे महत्त्वाचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी पूर्ण करण्याचे ठरवले. त्यापैकी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने अभ्यासू, चोखंदळ आणि युगकत्र्या वि. स. खांडेकर यांच्या साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्यांच्या हाती ‘पहिली पावलं’ हे दुसरे आणि साहित्यातील विविध प्रांतात टाकलेल्या त्यांच्या पहिल्या पावलांचा साद्यंत मागोवा घेणे शक्य व्हावे असे पुस्तक दिले आहे. साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या अगदी साहित्यप्रांतातील उमेदवारीच्या कालखंडापासून ते त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्याचे विविध भाषांमध्ये अनुवाद कसे झाले इथपर्यंतचा मागोवा घेणारे हे ‘पहिली पावलं’ पुस्तक. मी वाड्:मयाकडे का आकर्षित झालो - अर्थात दुरून डोंगर साजरे हा या पहिल्या पावलांमधील पावलांचे ठसे लक्षात आणून देणारा पहिला लेख! वि. स. खांडेकर यांच्या साहित्याविष्कारांच्या संदर्भातील कुतुहलाची पूर्ती करणारे पंधरा लेख या संपादित ‘पहिली पावलं’मध्ये आहेत. मी लेखक कसा झालो. अंतर्मनातलं पूजास्थान तर माझ्या आयुष्याचा माझ्या लेखनावर परिणाम - प्रांजळपणे उलगडून सांगणारा तिसरा लेख सामाजिक सुधारणेचा कैवार चौथा लेख वाचकांना घेऊन जातो या अष्टपैलू लेखकाच्या उमेदवारी कालखंडातील पहिलं पाऊल - अर्थात, रखरखीत उन्हातील वाटचाल कथन करणाऱ्या जीवनानुभवातून! पाचव्या लेखामध्ये पहिलं पाऊल उमगते ते काव्यलेखन - ज्याची ते स्वत:च ट ला ट री ला री अशी गंमत करीत आपल्या या पहिल्या वाहिल्या काव्याच्या प्रांतातील पावलांचा मागोवा घेताना नवनीतमुळे प्राचीन कवितेची गोडी लागली आणि त्यानंतरचा वृत्तबद्ध काव्यलेखन छंद आणि वृत्तदर्पण कालापासून राजकीय चळवळी, सामाजिक सुधारणांच्या नानाविध पडसादातून मनात उमटलेल्या कवितेच्या मनाला आधार झालेल्या गोल्डन ट्रेझरचे दर्शन घडवतात! सहावा लेख - पहिलं पाऊल आहे - टीका लेखन! रसिकता अधिक डोळस व्हावी म्हणून - म्हणत हत्यारासारखी लेखणी चालविता येते या विचारातून चुरचुरीत, खुसखुशीत आणि लेखणीच्या स्वैरलीलांना पूर्ण अवसर देणाऱ्या रंगमंच विहाराबद्दल बोलता बोलता बऱ्याच सखोल अभ्यासाची गवाक्षे उघडून देतात. पहिलं पाऊल, कथालेखन - सुकुमार अर्थगर्भकला पहिलं पाऊल - वकृत्त्व - समाजमनाशी सुसंवाद, पहिलं पाऊल संपादन - तांबड्या मातीतील उठा-बशा या नऊ लेखांमधून वाचकांना आपल्या मिश्किल शैलीने, प्रांजळ कथनाद्वारे वि. स. खांडेकर १९२० ते १९३० च्या दशकात असहकार युगाच्या कालखंडात त्यांच्या वैनतेयमधील मजकुराचा माल पुरवणाऱ्या मदतनीसांच्या भूमिकेच्या रंगातून साहित्यिक आणि पत्रकार या अंशत: भिन्न प्रकृतीधर्माच्या जपणुकीने घेतलेले विविधांगी अनुभवच लक्षात आणून देतात. पहिलं पाऊल - पहिलं पुस्तक (नाटक) - मातृपदाच्या सुखाचा (आणि प्रसववेदनेचाही) लाभ - १९२८ साली सांगलीला रंगभूमीवर सादर झालेले ‘रंकाचे राज्य’ आणि या नाटकाने भाऊसाहेबांना त्यांच्या नाटकात नायिकेचे काम करणाऱ्या कमळाबार्इंविषयी चांगले उद्गार काढणारे पत्र पाठवणारे केशवराव दाते या किश्शापर्यंतचा साहित्याचा या सर्व प्रांतातील मुशाफिरीचा घेतलेला प्रामाणिक लेखाजोखा पुन:पुन्हा वाचण्यासारखाच आहे. रायटर्स आर्ट वर्कसारख्या ललित लेखकांचं अंतरंग आणि लेखन प्रक्रिया - त्या मागील प्रेरणा यांचा मागोवा घेणाऱ्या पाश्चात्य पुस्तकांच्या धर्तीवरील हे पहिलं पाऊल संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादन कुशलतेने अत्यंत माहितीपूर्ण करतानाच वि. स. खांडेकर यांच्या लेखन विशेषांचेच दर्शन घडवणारा हा जीवन तसाच लेखन प्रवास आत्मसंवादाच्या जोडीने मनाला भिडणारा आणि तितकाच गमतीजमतींसह खुलवणारा केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more