VIJAYA JAHAGIRDAR

About Author

Birth Date : 12/09/1932
Death Date : 01/04/2020


VIJAYA JAGIRDAR HAS A TOTAL OF 54 BOOKS – 11 NOVELS, 9 SHORT STORIES, 3 ESSAYS, 3 SHORT STORIES, 6 POETRY ANTHOLOGIES, 3 PLAYS AND 23 CHILDRENS LITERATURE. TWO PEOPLE HAVE DONE M.PHIL ON KARMAYOGINI. HAS DONE, PH.D THESIS ON STORY COLLECTIONS. SOME HAVE DONE M.PHIL ON ANTHOLOGIES TOO. HAS DONE HE HAS RECEIVED 13 AWARDS FOR HIS WRITING, AND KARMAYOGINIS HAS BEEN AWARDED BHA BY MADHYA PRADESH SAHITYA PARISHAD. RES. TAMBE AWARD.

विजया जहागीरदार यांची एकूण ५४ पुस्तके – ११ कादंबर्या, ९ कथासंग्रह, ३ लेखसंग्रह, ३ कथाचरित्रे, ६ काव्यसंग्रह, ३ नाटके आणि २३ बालसाहित्य. ‘कर्मयोगिनी’वर दोन जणांनी एम.फिल. केले असून, कथासंग्रहांवर पीएच.डी.चा प्रबंध आहे. काव्यसंग्रहांवरही काहींनी एम.फिल. केले आहे. लेखनास १३ पुरस्कार मिळाले असून, ‘कर्मयोगिनी’स मध्यप्रदेश साहित्य परिषदेचा ‘भा. रा. तांबे पुरस्कार’ लाभला आहे. त्याच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, सौ. संगीता सोमण यांनी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. विसाव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, ‘ययातिकन्या माधवी’ पुस्तकाचे आकाशवाणीवर अभिवाचन, अनेक फीचर्स व स्तंभलेखन, ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकावर रंगमंचीय कार्यक्रम – ‘गाथा कर्मयोगिनीची’, ‘आकाशमोगरा’ ही ध्वनिफीत, आरोग्य खाते, धुळे यांच्यातर्फे चित्रफीत, साहित्य संमेलने आणि काव्यसंमेलनांत सहभाग.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
KARMAYOGINI (AHILYABAI HOLKAR) Rating Star
Add To Cart INR 620
KARMAYOGINI : LIFE OF AHILYABAI HOLKAR Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more