* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GO KISS THE WORLD
  • Availability : Notify Me
     
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184981568
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GO, KISS THE WORLD WERE SUBROTO BAGCHI S BLIND MOTHER S LAST WORDS TO HIM. THESE WORDS BECAME THE GUIDING PRINCIPLE OF HIS LIFE. SUBROTO BAGCHI GREW UP AMIDST WHAT HE CALLS THE MATERIAL SIMPLICITY OF RURAL AND SMALL-TOWN ORISSA, IMBIBING FROM HIS FAMILY A SENSE OF CONTENTMENT, CONSTANT WONDER, CONNECTEDNESS TO A LARGER WHOLE AND LEARNING FROM UNUSUAL SOURCES. FROM HUMBLE BEGINNINGS, HE WENT ON TO ACHIEVE EXTRAORDINARY PROFESSIONAL SUCCESS, EVENTUALLY CO-FOUNDING MINDTREE, ONE OF INDIA S MOST ADMIRED SOFTWARE SERVICES COMPANIES. THROUGH PERSONAL ANECDOTES AND SIMPLE WORDS OF WISDOM, SUBROTO BAGCHI BRINGS TO THE YOUNG PROFESSIONAL LESSONS IN WORKING AND LIVING, ENERGIZING ORDINARY PEOPLE TO LEAD EXTRAORDINARY LIVES. GO KISS THE WORLD WILL BE AN INSPIRATION TO YOUNG INDIA , AND TO THOSE WHO COME FROM SMALL-TOWN INDIA, URGING THEM TO RECOGNIZE AND DEVELOP THEIR INNER STRENGTHS, THEREBY HELPING THEM REALIZE THEIR OWN, UNIQUE POTENTIAL.
असे प्रेरणादायी अनुभव वाचणं हा कोणत्याही वयोगटाच्या वाचकाला अत्यंत श्रीमंत करणारा अनुभव ठरतो. ‘माइन्ड-ट्री’ या भारतातल्या अत्यंत नामवंत अशा सॉफ्टवेअर सव्र्हिसेस कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागची म्हणतात, ‘‘देशातील लाखो व्यावसायिकांना आणि लहान लहान गावातील तरुणांना संदेश देणं की, माझ्याप्रमाणेच तेसुद्धा आयुष्यात यशस्वी होऊ शकतील, हा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे.’’ व्यावसायिक आयुष्याचा प्रारंभ असतो जीवनातला अत्यंत निर्णायक टप्पा! या टप्प्यावर बुजुर्ग व्यक्तीनं स्वानुभवाद्वारे, तरुणाईला हसत-खेळत केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरतं. ‘गो, किस द वर्ल्ड’ (जा, सारी दुनिया कवेत घे!) हा ‘माइन्ड-ट्री’ या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक श्री. सुब्रतो बागचींच्या मृत्युशय्येवरच्या अंध मातु:श्रींनी त्यांना दिलेला संदेश, हेच प्रेरणादायी पुस्तकाचं शीर्षक आहे. चला तर मग! पाहू या की, श्री. बागचींनी आपली आंतरिक शक्ती ओळखून ती विकसित करताना कोणती आव्हानं पेलली आणि नव्या अनुभवांसाठी मनाची कवाडं उघडी ठेवून कोणता बोध घेतला!!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SUBROTO BAGCHI #सुनीति काणे #गो किस द वर्ल्ड #GO KISS THE WORLD #SUNITI KANE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-02-2011

    तरुणाईला हसत खेळत केलेलं मार्गदर्शन... गो, किस द वर्ल्ड’ (जा, सारी दुनिया कवेत घे!) हा माइन्ड - ट्री’ या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागचींच्या मृत्युशय्येवरच्या अंध मातोश्रींनी त्याना दिलेला संदेश हेच प्रेरणादायी पुस्तकाचं शीर्षक आहे. बुजु्ग व्यक्तींनं स्वानुभवाद्वारे, तरुणाईला हसत खेळत केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरतं. बागचींनी आपली आंतरिक शक्ती ओळखून ती विकसित करताना कोणती आव्हानं पेलली आणि नव्या अनुभवांसाठी मनाची कवाडं उघडी ठेवून कोणता बोध घेतला, याचे विस्तृत विवेचन पुस्तकामध्ये आहे. सुब्रतो बागची यांचा जन्म १९५७ साली ओरिसा येथील पटनागढ येथे झाला. हे ‘माइन्ड ट्री चे सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत. पहिली आठ वर्षे तिचे सी. ओ. ओ. (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) म्हणून कार्यरत होते. २००८ साली सुब्रतो यांनी या कार्यातून बाजूला होऊन ‘माइन्ड ट्री’चे बागवान, माळी बनायचं ठरवलं. माइन्ड ट्रीच्या सर्वोत्कृष्ट १०० मनांची निगराणी ठेवणं आणि संस्थेच्या तीस विभागांना प्रशिक्षणाची मदत देणं हा त्यांच्या कार्याचा प्रमुख भाग आहे. सुब्रतोंच्या पत्नी सुस्मिता बागची प्रसिद्ध लेखिका आहेत. हे पुस्तक म्हणजे धैर्य, सचोटी आणि साहसाची एक असामान्य कथा आहे. ‘ह्रदय आणि आत्मा असलेली कंपनी संस्थापीत करण्यावर सुब्रतोबागचींनी दिलेला विशेष जोर हा आजच्या व्यवस्थापनात अत्यंत प्रचलित असलेल्या हायर अँड फायर (कामावर घ्या आणि डच्चू द्या) ह्या प्रथेवर रामबाण उतारा ठरेल.’ असे उद्गार मार्क टुली यांनी काढले आहेत. ही आत्मकहाणी सुब्रतो बागचींनी आत्मपरिक्षण करत आयुष्याचा आढावा घेतानाच पुन:प्रत्ययाचा आनंद लुटत लिहीलेली आहे. ओरिसाच्या लहान खेड्यांमध्ये गेलेलं बालपण, आईबापांनी आपल्या वागणुकीनं ठसा उमटवलेली उच्च नीतिमूल्यं, स्वत:चं व्यक्तिमत्व घडवताना आई वडिल आणि भावंडांची झालेली मदत जिवंत कुतूहल,नव्याच्या आनंद आणि घरातील ममता यांनी समृद्ध झालेलं बालपण हे सर्व पुस्तकाच्या पहिल्या भगात रेखाटलं आहे. दुसऱ्या भागात आपली ओळख होते, त्यांच्या चाळिशी पर्यंतच्या व्यावसायिक आयुष्याशी! राज्य शास्त्रातल्या पदवीनंतर ओरिसरच्या सचिवालयात कनिष्ठतम कारकून म्हणून व्यवसायाला सुरुवात करून डीसीएममध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जाऊन, तत्त्वासाठी आणि सचोटी राखण्यासाठी डीसीएम सोडून कंम्प्युटर विक्रीच्या व्यवसायात जाऊन, अखेरीस विप्रो कंपनीत मोठं योगदान देऊन उच्चपद मिळवेपर्यंतचा यातला अत्यंत बोधप्रद प्रवास आपल्याला भारावून टाकतो. तिसऱ्या भागात ‘माइंड-ट्री’ची संस्थापना आणि प्रवास रेखाटला आहे़ मध्यायुष्यात विप्रो सोडून पुरेसा विचार न करता आपल्या स्वभावाला विसंगत अशी नोकरी स्वीकारण्याची चूक त्यांनी प्रांजळपणे कबूल केली आहे. उच्च ध्येय ठेवून नवीन कंपनीची संस्थापना करण्यासाठी त्यांना समानधर्मीय कसे भेटले आणि ही मध्यायुष्यातली चूक सुधारताना त्यांनी अलौकिक अशी झेप समर्थपणे कशी घेतली, त्यात कोणत्या अडचणी आल्या आणि त्यातून ते सहसंस्थापक म्हणून यशस्वीरित्या कसे बाहेर पडले याचं अत्यंत ह्रद्य वर्णन तिसऱ्या भागात आहे. सामान्य परिस्थितीत जन्म घेऊन, उच्च नीतिमूल्यांची पायमल्ली न करता तेही असामान्य उंची गाठू शकले, पण तरीही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहणं, अंगी विनय राखणं, त्रयस्थपणे आपल्या यशची कारणमीमांसा करत असताना त्यासाठी कारणीभूत असलेल्यांना योग्य श्रेय देणं, सतत नव्या अनुभवांसाठी मनाची कवाड उघडी ठेवून त्यातून बोध घेत राहणं ह्या गोष्टी या आत्मकथनात जाणवतात. त्यामुळे सुब्रोतो बागची हे एक माणूस म्हणूनही फार श्रेष्ठ वाटतात. ते म्हणतात, ‘देशातील लाखो व्यावसायिकांना आणि मुख्यत्वेकरून भारतातील लहान लहान गावातील माणसांना तेही आयुष्यात यशस्वी होऊ शकतील असा संदेश देणं हा पुस्तक लिहिण्याचा हेतू आहे.’ पण याहूनही महत्त्वाचा संदेश पुढील ओळीत येतो. ‘पण यशस्वी होणं म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या यशस्वी होऊन भैतिक सुखं मिळवणं नव्हे. यशस्वी होणं म्हणजे तेजाकडून आणखी उच्च तेजाकडे जाणं आणि जाताना समवेत इतरांनाही घेऊन जाणं. यशस्वी होण म्हणजे मोठा माणूस बनणं नव्हे! यशस्वी होणं म्हणजे चांगला माणूस बनणं!’ या माणसाला आयुष्यात अनेक देवदूत भेटले. जाताजाता संदेश देऊन गेले. प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीनंतर घरी परतत असताना निवड समितीच्या प्रमुखाने सांगितले, ‘बाळा, कधीही लष्करात, नौदलात किंवा वायुदलात जाऊ नकोस.’ शिकागोला भेटलेल्या एका स्त्रीने म्हटले होते ‘तुम्ही जेव्हा एखादा पर्याय स्वीकारत असता, तेव्हा तुम्ही त्यांचे परिणामही स्वीकारत असता. ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवणं एवढीच गोष्ट चांगल्या आईबापांच्या हाती असते.’ हवाईला एक ऐंशीपेक्षा जास्त वयाचा माणूस भेटला. तो म्हणाला,‘कधी निवृत्तीचा विचार करु नको. तुझं वय वाढलं की, कामाचा ताण कमी कर. कमी वेळ काम कर. पण कामं थांबवू नकोस.’ न्यूजर्सीच्या घरमालकाने सांगितले होते, ‘तुमचं तोंड उघडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनाची कवाडं उघडा!’ आयुष्यात शिकलेल्या काही महत्त्वाच्या धड्यांबद्दल ते लिहितात... १) साऱ्याची सुरुवात मनातूनच होते, २) स्वीकारण्याची क्षमता, ३) स्वीकारण्याच्या क्षमतेसाठी तुम्हाला प्रथम देता यायला हवं ४) लोकांशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करा, ५) आयुष्य सततची वाटाघाट असतं. ६) अपेक्षेपलीकडचं यश मिळवण्यामुळं होणारी घसरगुंडी, ७) अगदी शेवटचा माणूसही महत्त्वाचा असतो, ८) इच्छेची तीव्रता त्याच्या परिणामकारकतेवरून मोजावी, ९) स्थितिस्थापकतेची, लवचीकपणाची शक्ती, १०) धन ही सुखाची गुरु-किल्ली नव्हे, ११) स्वत:पलीकडे बघायला शिका, १२) थोर माणसं चूक कबूल करतात, १३) स्वत:ला माफ करायला शिका, १४) स्वत:बद्दल शंका वाटणं सकारात्मकतेचं लक्षण असतं ‘कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी ‘गो, किस द वर्ल्ड’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. त्यातून शहाणपणाच्या आणि प्रामाणिकपणाच्या सोन्याच्या लगडी झळाळून उठतात,’ हे उद्गार आहेत एन. आर. नारायणमूर्ती यांचे. सुनीति काणे यांनी या ह्रद्य आत्मकहाणीचा सुंदर अनुवाद मराठीत केला आहे. अगदी स्वतंत्र लिखाण असावं एवढा यथार्थ. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more