* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GO KISS THE WORLD
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184981568
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GO, KISS THE WORLD WERE SUBROTO BAGCHI S BLIND MOTHER S LAST WORDS TO HIM. THESE WORDS BECAME THE GUIDING PRINCIPLE OF HIS LIFE. SUBROTO BAGCHI GREW UP AMIDST WHAT HE CALLS THE MATERIAL SIMPLICITY OF RURAL AND SMALL-TOWN ORISSA, IMBIBING FROM HIS FAMILY A SENSE OF CONTENTMENT, CONSTANT WONDER, CONNECTEDNESS TO A LARGER WHOLE AND LEARNING FROM UNUSUAL SOURCES. FROM HUMBLE BEGINNINGS, HE WENT ON TO ACHIEVE EXTRAORDINARY PROFESSIONAL SUCCESS, EVENTUALLY CO-FOUNDING MINDTREE, ONE OF INDIA S MOST ADMIRED SOFTWARE SERVICES COMPANIES. THROUGH PERSONAL ANECDOTES AND SIMPLE WORDS OF WISDOM, SUBROTO BAGCHI BRINGS TO THE YOUNG PROFESSIONAL LESSONS IN WORKING AND LIVING, ENERGIZING ORDINARY PEOPLE TO LEAD EXTRAORDINARY LIVES. GO KISS THE WORLD WILL BE AN INSPIRATION TO YOUNG INDIA , AND TO THOSE WHO COME FROM SMALL-TOWN INDIA, URGING THEM TO RECOGNIZE AND DEVELOP THEIR INNER STRENGTHS, THEREBY HELPING THEM REALIZE THEIR OWN, UNIQUE POTENTIAL.
असे प्रेरणादायी अनुभव वाचणं हा कोणत्याही वयोगटाच्या वाचकाला अत्यंत श्रीमंत करणारा अनुभव ठरतो. ‘माइन्ड-ट्री’ या भारतातल्या अत्यंत नामवंत अशा सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागची म्हणतात, ‘‘देशातील लाखो व्यावसायिकांना आणि लहान लहान गावातील तरुणांना संदेश देणं की, माझ्याप्रमाणेच तेसुद्धा आयुष्यात यशस्वी होऊ शकतील, हा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे.’’ व्यावसायिक आयुष्याचा प्रारंभ असतो जीवनातला अत्यंत निर्णायक टप्पा! या टप्प्यावर बुजुर्ग व्यक्तीनं स्वानुभवाद्वारे, तरुणाईला हसत-खेळत केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरतं. ‘गो, किस द वर्ल्ड’ (जा, सारी दुनिया कवेत घे!) हा ‘माइन्ड-ट्री’ या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक श्री. सुब्रतो बागचींच्या मृत्युशय्येवरच्या अंध मातु:श्रींनी त्यांना दिलेला संदेश, हेच प्रेरणादायी पुस्तकाचं शीर्षक आहे. चला तर मग! पाहू या की, श्री. बागचींनी आपली आंतरिक शक्ती ओळखून ती विकसित करताना कोणती आव्हानं पेलली आणि नव्या अनुभवांसाठी मनाची कवाडं उघडी ठेवून कोणता बोध घेतला!!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SUBROTO BAGCHI #सुनीति काणे #गो किस द वर्ल्ड #GO KISS THE WORLD #SUNITI KANE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-02-2011

    तरुणाईला हसत खेळत केलेलं मार्गदर्शन... गो, किस द वर्ल्ड’ (जा, सारी दुनिया कवेत घे!) हा माइन्ड - ट्री’ या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागचींच्या मृत्युशय्येवरच्या अंध मातोश्रींनी त्याना दिलेला संदेश हेच प्रेरणादायी पुस्तकाचं शीर्षक आहे. बुजु्ग व्यक्तींनं स्वानुभवाद्वारे, तरुणाईला हसत खेळत केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरतं. बागचींनी आपली आंतरिक शक्ती ओळखून ती विकसित करताना कोणती आव्हानं पेलली आणि नव्या अनुभवांसाठी मनाची कवाडं उघडी ठेवून कोणता बोध घेतला, याचे विस्तृत विवेचन पुस्तकामध्ये आहे. सुब्रतो बागची यांचा जन्म १९५७ साली ओरिसा येथील पटनागढ येथे झाला. हे ‘माइन्ड ट्री चे सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत. पहिली आठ वर्षे तिचे सी. ओ. ओ. (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) म्हणून कार्यरत होते. २००८ साली सुब्रतो यांनी या कार्यातून बाजूला होऊन ‘माइन्ड ट्री’चे बागवान, माळी बनायचं ठरवलं. माइन्ड ट्रीच्या सर्वोत्कृष्ट १०० मनांची निगराणी ठेवणं आणि संस्थेच्या तीस विभागांना प्रशिक्षणाची मदत देणं हा त्यांच्या कार्याचा प्रमुख भाग आहे. सुब्रतोंच्या पत्नी सुस्मिता बागची प्रसिद्ध लेखिका आहेत. हे पुस्तक म्हणजे धैर्य, सचोटी आणि साहसाची एक असामान्य कथा आहे. ‘ह्रदय आणि आत्मा असलेली कंपनी संस्थापीत करण्यावर सुब्रतोबागचींनी दिलेला विशेष जोर हा आजच्या व्यवस्थापनात अत्यंत प्रचलित असलेल्या हायर अँड फायर (कामावर घ्या आणि डच्चू द्या) ह्या प्रथेवर रामबाण उतारा ठरेल.’ असे उद्गार मार्क टुली यांनी काढले आहेत. ही आत्मकहाणी सुब्रतो बागचींनी आत्मपरिक्षण करत आयुष्याचा आढावा घेतानाच पुन:प्रत्ययाचा आनंद लुटत लिहीलेली आहे. ओरिसाच्या लहान खेड्यांमध्ये गेलेलं बालपण, आईबापांनी आपल्या वागणुकीनं ठसा उमटवलेली उच्च नीतिमूल्यं, स्वत:चं व्यक्तिमत्व घडवताना आई वडिल आणि भावंडांची झालेली मदत जिवंत कुतूहल,नव्याच्या आनंद आणि घरातील ममता यांनी समृद्ध झालेलं बालपण हे सर्व पुस्तकाच्या पहिल्या भगात रेखाटलं आहे. दुसऱ्या भागात आपली ओळख होते, त्यांच्या चाळिशी पर्यंतच्या व्यावसायिक आयुष्याशी! राज्य शास्त्रातल्या पदवीनंतर ओरिसरच्या सचिवालयात कनिष्ठतम कारकून म्हणून व्यवसायाला सुरुवात करून डीसीएममध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जाऊन, तत्त्वासाठी आणि सचोटी राखण्यासाठी डीसीएम सोडून कंम्प्युटर विक्रीच्या व्यवसायात जाऊन, अखेरीस विप्रो कंपनीत मोठं योगदान देऊन उच्चपद मिळवेपर्यंतचा यातला अत्यंत बोधप्रद प्रवास आपल्याला भारावून टाकतो. तिसऱ्या भागात ‘माइंड-ट्री’ची संस्थापना आणि प्रवास रेखाटला आहे़ मध्यायुष्यात विप्रो सोडून पुरेसा विचार न करता आपल्या स्वभावाला विसंगत अशी नोकरी स्वीकारण्याची चूक त्यांनी प्रांजळपणे कबूल केली आहे. उच्च ध्येय ठेवून नवीन कंपनीची संस्थापना करण्यासाठी त्यांना समानधर्मीय कसे भेटले आणि ही मध्यायुष्यातली चूक सुधारताना त्यांनी अलौकिक अशी झेप समर्थपणे कशी घेतली, त्यात कोणत्या अडचणी आल्या आणि त्यातून ते सहसंस्थापक म्हणून यशस्वीरित्या कसे बाहेर पडले याचं अत्यंत ह्रद्य वर्णन तिसऱ्या भागात आहे. सामान्य परिस्थितीत जन्म घेऊन, उच्च नीतिमूल्यांची पायमल्ली न करता तेही असामान्य उंची गाठू शकले, पण तरीही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहणं, अंगी विनय राखणं, त्रयस्थपणे आपल्या यशची कारणमीमांसा करत असताना त्यासाठी कारणीभूत असलेल्यांना योग्य श्रेय देणं, सतत नव्या अनुभवांसाठी मनाची कवाड उघडी ठेवून त्यातून बोध घेत राहणं ह्या गोष्टी या आत्मकथनात जाणवतात. त्यामुळे सुब्रोतो बागची हे एक माणूस म्हणूनही फार श्रेष्ठ वाटतात. ते म्हणतात, ‘देशातील लाखो व्यावसायिकांना आणि मुख्यत्वेकरून भारतातील लहान लहान गावातील माणसांना तेही आयुष्यात यशस्वी होऊ शकतील असा संदेश देणं हा पुस्तक लिहिण्याचा हेतू आहे.’ पण याहूनही महत्त्वाचा संदेश पुढील ओळीत येतो. ‘पण यशस्वी होणं म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या यशस्वी होऊन भैतिक सुखं मिळवणं नव्हे. यशस्वी होणं म्हणजे तेजाकडून आणखी उच्च तेजाकडे जाणं आणि जाताना समवेत इतरांनाही घेऊन जाणं. यशस्वी होण म्हणजे मोठा माणूस बनणं नव्हे! यशस्वी होणं म्हणजे चांगला माणूस बनणं!’ या माणसाला आयुष्यात अनेक देवदूत भेटले. जाताजाता संदेश देऊन गेले. प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीनंतर घरी परतत असताना निवड समितीच्या प्रमुखाने सांगितले, ‘बाळा, कधीही लष्करात, नौदलात किंवा वायुदलात जाऊ नकोस.’ शिकागोला भेटलेल्या एका स्त्रीने म्हटले होते ‘तुम्ही जेव्हा एखादा पर्याय स्वीकारत असता, तेव्हा तुम्ही त्यांचे परिणामही स्वीकारत असता. ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवणं एवढीच गोष्ट चांगल्या आईबापांच्या हाती असते.’ हवाईला एक ऐंशीपेक्षा जास्त वयाचा माणूस भेटला. तो म्हणाला,‘कधी निवृत्तीचा विचार करु नको. तुझं वय वाढलं की, कामाचा ताण कमी कर. कमी वेळ काम कर. पण कामं थांबवू नकोस.’ न्यूजर्सीच्या घरमालकाने सांगितले होते, ‘तुमचं तोंड उघडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनाची कवाडं उघडा!’ आयुष्यात शिकलेल्या काही महत्त्वाच्या धड्यांबद्दल ते लिहितात... १) साऱ्याची सुरुवात मनातूनच होते, २) स्वीकारण्याची क्षमता, ३) स्वीकारण्याच्या क्षमतेसाठी तुम्हाला प्रथम देता यायला हवं ४) लोकांशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करा, ५) आयुष्य सततची वाटाघाट असतं. ६) अपेक्षेपलीकडचं यश मिळवण्यामुळं होणारी घसरगुंडी, ७) अगदी शेवटचा माणूसही महत्त्वाचा असतो, ८) इच्छेची तीव्रता त्याच्या परिणामकारकतेवरून मोजावी, ९) स्थितिस्थापकतेची, लवचीकपणाची शक्ती, १०) धन ही सुखाची गुरु-किल्ली नव्हे, ११) स्वत:पलीकडे बघायला शिका, १२) थोर माणसं चूक कबूल करतात, १३) स्वत:ला माफ करायला शिका, १४) स्वत:बद्दल शंका वाटणं सकारात्मकतेचं लक्षण असतं ‘कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी ‘गो, किस द वर्ल्ड’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. त्यातून शहाणपणाच्या आणि प्रामाणिकपणाच्या सोन्याच्या लगडी झळाळून उठतात,’ हे उद्गार आहेत एन. आर. नारायणमूर्ती यांचे. सुनीति काणे यांनी या ह्रद्य आत्मकहाणीचा सुंदर अनुवाद मराठीत केला आहे. अगदी स्वतंत्र लिखाण असावं एवढा यथार्थ. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more