MANOHAR MALGONKAR

About Author

Birth Date : 12/07/1913
Death Date : 14/06/2010


MANOHAR MALGONKAR WAS AN EMINENT POST-INDEPENDENCE WRITER WHOM R.K. NARAYAN ONCE REFERRED TO AS HIS FAVOURITE INDIAN NOVELIST IN ENGLISH. HE WAS HAILED AS ONE OF INDIAS MOST EXUBERANT STORYTELLERS IN AN ARTICLE PUBLISHED BY THE NEW YORK TIMES IN 1965. BORN NEAR BELGAUM, MALGONKAR WAS THE GRANDSON OF THE PRIME MINISTER OF A FORMER PRINCELY STATE OF DEWAS. HE SERVED IN THE ARMY DURING WORLD WAR II, WAS A BIG-GAME HUNTER, A FARMER, A MINE OWNER AND AN ADVENTURER. LATER, HE STARTED WORKING AS A JOURNALIST AND THEREAFTER TOOK TO BOOK WRITING. HIS WORKS ARE AS DIVERSE AS HIS PERSONAL LIFE AND HAVE A BLEND OF HISTORY, ROMANCE AND MILITARY LIFE. SOME OF HIS MAJOR WORKS INCLUDE THE PRINCES, THE DEVILS WIND: NANA SAHEBS STORY AND THE SEA HAWK: LIFE AND BATTLES OF KANHOJI ANGREY.

मनोहर माळगोनकर (१९१३-२०१०) हे स्वातंत्र्योत्तर काळातील प्रख्यात लेखक होते. आर.के. नारायण यांनी माळगोनकर यांचा उल्लेख माझे इंग्रजीतील आवडते भारतीय कादंबरीकार म्हणून केला आहे. १९६५ मध्ये द न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या लेखात त्यांना भारतातील विपुल लेखन करणार्‍या कथाकारांपैकी एक म्हणून गौरवण्यात आले होते. बेळगावजवळ जन्मलेले माळगोनकर हे देवास या माजी संस्थानाच्या पंतप्रधानांचे नातू. त्यांनी दुसर्‍या महायुद्धात सैन्यात सेवा केली, ते एक मोठे शिकारी, शेतकरी, खाण मालक आणि साहसी स्वभावाचे होते. पुढे त्यांनी पत्रकार म्हणून काम सुरू केले आणि त्यानंतर पुस्तक लेखनाला सुरुवात केली. त्यांचे कार्य त्यांच्या वैयक्तिक जीवनाप्रमाणेच वैविध्यपूर्ण आहे आणि त्यात इतिहास, प्रणय आणि लष्करी जीवन यांचे मिश्रण आहे. त्यांच्या काही प्रमुख कामांमध्ये द प्रिन्सेस, द डेव्हिल्स विंड: नाना साहेब्स स्टोरी, आणि द सी हॉक: लाइफ अँड बॅटल्स ऑफ कान्होजी आंग्रे यांचा समावेश आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ITHE THABAKALI GANGAMAI Rating Star
Add To Cart INR 450
KANHOJI ANGRE Rating Star
Add To Cart INR 420
THE PRINCES Rating Star
Add To Cart INR 499
VADALVARA Rating Star
Add To Cart INR 490

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more