MANOHAR MALGONKAR

About Author

Birth Date : 12/07/1913
Death Date : 14/06/2010


MANOHAR MALGONKAR WAS AN EMINENT POST-INDEPENDENCE WRITER WHOM R.K. NARAYAN ONCE REFERRED TO AS HIS FAVOURITE INDIAN NOVELIST IN ENGLISH. HE WAS HAILED AS ONE OF INDIAS MOST EXUBERANT STORYTELLERS IN AN ARTICLE PUBLISHED BY THE NEW YORK TIMES IN 1965. BORN NEAR BELGAUM, MALGONKAR WAS THE GRANDSON OF THE PRIME MINISTER OF A FORMER PRINCELY STATE OF DEWAS. HE SERVED IN THE ARMY DURING WORLD WAR II, WAS A BIG-GAME HUNTER, A FARMER, A MINE OWNER AND AN ADVENTURER. LATER, HE STARTED WORKING AS A JOURNALIST AND THEREAFTER TOOK TO BOOK WRITING. HIS WORKS ARE AS DIVERSE AS HIS PERSONAL LIFE AND HAVE A BLEND OF HISTORY, ROMANCE AND MILITARY LIFE. SOME OF HIS MAJOR WORKS INCLUDE THE PRINCES, THE DEVILS WIND: NANA SAHEBS STORY AND THE SEA HAWK: LIFE AND BATTLES OF KANHOJI ANGREY.

मनोहर माळगावकर (१९१३-२०१०) हे स्वातंत्र्योत्तर काळातील प्रख्यात लेखक होते. आर.के. नारायण यांनी माळगावकर यांचा उल्लेख माझे इंग्रजीतील आवडते भारतीय कादंबरीकार म्हणून केला आहे. १९६५ मध्ये द न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या लेखात त्यांना भारतातील विपुल लेखन करणार्‍या कथाकारांपैकी एक म्हणून गौरवण्यात आले होते. बेळगावजवळ जन्मलेले माळगावकर हे देवास या माजी संस्थानाच्या पंतप्रधानांचे नातू. त्यांनी दुसर्‍या महायुद्धात सैन्यात सेवा केली, ते एक मोठे शिकारी, शेतकरी, खाण मालक आणि साहसी स्वभावाचे होते. पुढे त्यांनी पत्रकार म्हणून काम सुरू केले आणि त्यानंतर पुस्तक लेखनाला सुरुवात केली. त्यांचे कार्य त्यांच्या वैयक्तिक जीवनाप्रमाणेच वैविध्यपूर्ण आहे आणि त्यात इतिहास, प्रणय आणि लष्करी जीवन यांचे मिश्रण आहे. त्यांच्या काही प्रमुख कामांमध्ये द प्रिन्सेस, द डेव्हिल्स विंड: नाना साहेब्स स्टोरी, आणि द सी हॉक: लाइफ अँड बॅटल्स ऑफ कान्होजी आंग्रे यांचा समावेश आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ITHE THABAKALI GANGAMAI Rating Star
Add To Cart INR 450
KANHOJI ANGRE Rating Star
Add To Cart INR 420
THE PRINCES Rating Star
Add To Cart INR 499
VADALVARA Rating Star
Add To Cart INR 490

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more