* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DHIRUBHAISM
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177669824
  • Edition : 8
  • Publishing Year : AUGUST 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 90
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SO MUCH IS WRITTEN ABOUT THIS WORLD FAMOUS INDIAN BUSINESS TYCOON! HE STARTED FROM SCRAP IN A VERY SMALL VILLAGE IN GUJARAT AND CREATED THE VAST EMPIRE OF `RELIANCE`. THERE ARE NO SUITABLE WORDS TO DESCRIBE HIS ACHIEVEMENT. HE WAS NOT VERY QUALIFIED IN TERMS OF FORMAL EDUCATION; BUT STILL HE HIMSELF WAS A FULL ENCYCLOPEDIA, A UNIVERSITY. HE HAD DEVELOPED HIS OWN PHILOSOPHY AND CULTURE FOR WORKING. HE HAD EMBRACED A FEW PRINCIPLES IN HIS LIFE AND HE STOOD BY THEM THROUGHOUT HIS LIFE; THEY WERE HIGH AIM, A WILL TO WORK TIRELESSLY AND THE POWER OF COMMITMENT. ALMOST EVERYBODY CONSIDERED HIS DREAMS TO BE IMPOSSIBLE TO ACHIEVE. BUT HE CONTINUED HIS JOURNEY; HE NEVER SET APART THE PRINCIPLES EVEN FOR A SINGLE MINUTE. TODAY, WE ALL ARE WELL AWARE OF THE MAGNIFICENT SUCCESS HE ACHIEVED. HIS PRINCIPLES SIMPLE YET VERY SUCCESSFUL ARE WORTHY OF GUIDING COMMON PEOPLE ON THE WAY TOWARDS ACHIEVEMENT. THE AUTHOR OF THIS BOOK A.G. KRISHNAMURTI; IS THE FOUNDER-CHAIRMAN OF THE ADVERTISING COMPANY; MUDRA COMMUNICATION. HE ESTABLISHED THIS COMPANY WITH A SMALL DEPOSIT OF RS. 35 THOUSAND AND ONE ESTEEMED CUSTOMER. TODAY; HIS COMPANY IS ONE OF THE THREE TOPMOST ADVERTISING COMPANIES IN INDIA. HE IS ALSO THE CONSULTING CHAIRMAN OF A.G.K. BRAND. HE DIVIDES HIS TIME BETWEEN AHMADABAD AND HYDERABAD. HE HAS THREE DAUGHTERS AND ONE SON.
गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ते ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा अतिभव्य विस्तार हा विलक्षण टप्पा सर करणा-या धीरुभाई अम्बानींच्या कार्यकर्तृत्वाची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. फारसं औपचारिक शिक्षण नसलेले धीरुभाई स्वत:च एक चालतंबोलतं विद्यापीठ होते. त्यांनी स्वत:चं असं एक कार्यविषयक तत्त्वज्ञान व संस्कृती जोपासली होती. भव्य स्वप्नं, खडतर परिश्रमांची तयारी, निश्चयाचं बळ यांच्या जोडीला त्यांनी काही साधी-सोपी तत्त्वं अनुसरली होती. अशक्य कोटीतल्या वाटणा-या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी याच तत्त्वांच्या साथीनं मार्गक्रमण केलं आणि त्यात नेत्रदीपक यशही मिळवलं. त्यांची हीच तत्त्वं सर्वसामान्यांच्या जीवनातही आशा जागवतील व मार्गदर्शक ठरतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
UNIQUEINSIGHTSOFDHIRUBHAIAMBANI #MUKESHAMBANI #ENTERPRENUERSHIP # TRANSLATED FROM ENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #A.G.KRISHNAMURTHY. #ए.जी.कृष्णमूर्ती
Customer Reviews
  • Rating StarGOADOOT 9-8-2009

    गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा विलक्षण टप्पा सर करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांच्या कर्तृत्वाची ओळख साऱ्या जगाला आहे. त्यांचं कार्यविषयक तत्त्वज्ञान नेमकं कसं होतं, हे मेहता प्रकाशनच्या ‘धीरूभाईझम’ या पुस्तकातून प्रतित हों. त्याविषयी... एखादी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाची शिखरं पादाक्रांत करते त्यावेळी तिची वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. तिच्या वाटचालीचा धांडोळा घेताना अनेकांना यशाचा मूलमंत्र सापडतो. आजवर अशा अनेक दिग्गजांच्या यशोगाथा शब्दबद्ध झाल्या आहेत. ‘धीरूभाईझम’ हे मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित करण्यात आलेलं असंच एक पुस्तक. ए. जी. कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ‘धीरुभाईझम’ हे शीर्षकच फार बोलकं आहे. आजपर्यंत आपण अनेक ‘इजम’ ऐकले, वाचले आहेत, पण हा ‘धीरुभाईझम’ जगावेगळा म्हणावा लागेल. आज रिलायन्स उद्योगाचा दबदबा केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगामध्ये आहे. या उद्योगाच्या उभारणीमागील धीरूभाई अंबानी यांचे अथक कष्ट, जिद्द सर्वश्रुत आहेत. फारसं औपचारिक शिक्षण न लाभलेले धीरूभाई स्वतःच एक चालतं बोलकं विद्यापीठ होते, असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख साऱ्या जगाला आहेच. पण त्यांचं कार्यविषयक तत्त्वज्ञान नेमकं काय होतं, याचा परिचय ए. जी. कृष्णमूर्ती यांनी ‘धीरुभाईझम’द्वारे करून दिला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करताना मूळ शीर्षक कायम ठेवण्यात आलं आहे. धीरुभार्इंनी ज्या उमेदीने व्यवसाय केला, अनेक संकटांवर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक या पुस्तकाद्वारे मिळते. पुस्तकाला ज्येष्ठ उद्योगपती आणि धीरुभार्इंचे सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरुभाई ‘आशा हे तुमचं सर्वांत शक्तिमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास ही सर्वांत मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरुभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहेत. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरुभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा ‘धीरुभाईझम’ मध्ये घेण्यात आला आहे. या पुस्तकाचे ए. जी. कृष्णमूर्ती हे मुद्रा कम्युनिकेशन्स या जाहिरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. अंबानी परिवाराशी त्यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे ‘धीरुभाईझम’ नेमका काय होता, याची त्यांना चांगली कल्पना आहे. एकूण १५ प्रकरणांमधून हा ‘धीरुभाईझम’ उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रत्येक प्रकरण सुटसुटीत, नेमक्या शब्दांमध्ये मांडण्यात आलं असून त्याची शीर्षकही लक्षवेधी आहेत. या प्रत्येक शीर्षकातून धीरुभार्इंचं कार्यविषयक तत्त्वज्ञान प्रतित होतं. ‘बाह्या सरसावून मदतीला पुढं व्हा’, ‘तुमच्या टीमसाठी सुरक्षाकवच बना’, ‘गाजावाजा न करता कल्याणकारी कार्य करा, भव्य स्वप्न बघा, पण डोळे उघडे ठेवून बघा’, अशी शीर्षकं फार बोलकी आहेत. भव्य-दिव्य गोष्टी साध्य करण्यासाठी धीरुभाईप्रमाणे फक्त साध्या, सोप्या तत्त्वज्ञानावर निष्ठा ठेवणं पुरेसं आहे, असं लेखकाने म्हटलं आहे आणि ते खरंही आहे. धीरुभार्इंची जीवनकहाणी हे सकारात्मक वृत्तीच्या सामथ्र्यांचं मूर्तीमंत उदाहरण असून आजचं ‘रिलायन्स’ त्याची साक्ष देत आहे. आवर्जून वाचावी अशी ही कहाणी. ...Read more

  • Rating StarNAVPRABHA 20-7-2009

    धीरूभाईझम आणि प्रतिकूलतेवर मात या ए. जी कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांमधून धीरूभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्त्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरूभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटावर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरूभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरूभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरूभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ‘प्रतिवूâलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास-एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य? - ते काय असतं? विशालहृदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरूभार्इंचे नेमकं व्यक्तिमत्त्व उलगडतं. धीरूभार्इंनी म्हटलं होतं, ‘आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं,’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठराविक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. दोन्ही पुस्तके सुमारे ७० पानांची असून त्यांची किंमत अनुक्रमे ८० आणि ७० रुपये अशी आहे. ...Read more

  • Rating StarJYOTI GRANTH WARTA 15-8-2009

    धीरूभाई अंबानींनी स्वप्नपूर्तीच्या मार्गात आलेल्या अनंत अडथळ्यांवर मात करत ‘रिलायन्स’चं भव्य साम्राज्य उभारलं. धीरूभाई व रिलायन्सचं यश इतकं अपूर्व आहे की, बऱ्याच जणांना त्यांच्या संपत्तीच्या झगमगाटापलीकडचं पाहताच येत नाही. पण त्याचं यश असं सहजी लाभलें नव्हतं. ते कष्टसाध्य होतं. या कहाणीतून वाचकांना केवळ स्वप्नं पाहण्याची स्फूर्तीच नव्हे, तर त्यावर पकड मिळवण्याचं धाडसही लाभेल. ...Read more

  • Rating StarPUNYANAGARI 5-2-2009

    आयुष्यात आपण बरेचदा कोड्यात पडतो. स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल का ? प्रतिकूल परिस्थितीत तग धरता आला का ? स्वत:ला सिद्ध करण्यात कमी पडलो का असे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. त्यामुळे वेळ येते ती आत्मपरिक्षणाची. ते करताना आजूबाजूला विविध मातब्बरांची मातबबरी पहायला मिळते. ही माणसं मोठी कशी झाली आणि त्यांनी पाहता पाहता आकाशाल गवसणी कशी घातली हे तपासून पाहताना आश्चर्य वाटतं. म्हणूनच अशा विलक्षण उमेद लाभलेल्या व्यक्तिमत्वांची जीवनगाथा पडताळून पाहण्याची संधी मिळाली की गमवावीशी वाटत नाही. ’मेहता प्रकाशन तर्फे अलीकडेच अशी चार पुस्तके बाजारात आणण्यात आली आहेत. धीरुभाईझम, प्रतिकूलतेवर मात, नवभारताचे शिल्पकार आणि इट हॅपन्ड इन इंडिया या चार पुस्तकांनी प्रत्येक सामान्य माणसाची जिगर जागवल्यास नवल नाही. ’धीरुभाईझम’ आणि ’प्रतिकूलतेवर मात’ या ए.जी. कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकातून धीरुभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाणी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरुभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटांवर मात केली आणि ’आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरुभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरुभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ’गुरु’ या चित्रपटातून धीरुभार्इंना समांतर असे एक व्यक्तीमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रुपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशीलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ’प्रतिकूलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास - एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य ? - ते काय असतं?, विशालह्रदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरुभार्इंचं नेमकं व्यक्तीमत्व उलगडतं. धीरुभार्इंनी म्हटलं होतं, आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं.’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठरावीक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more