* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DHIRUBHAISM
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177669824
  • Edition : 8
  • Publishing Year : AUGUST 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 90
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :A.G.KRISHNAMURTHY BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SO MUCH IS WRITTEN ABOUT THIS WORLD FAMOUS INDIAN BUSINESS TYCOON! HE STARTED FROM SCRAP IN A VERY SMALL VILLAGE IN GUJARAT AND CREATED THE VAST EMPIRE OF `RELIANCE`. THERE ARE NO SUITABLE WORDS TO DESCRIBE HIS ACHIEVEMENT. HE WAS NOT VERY QUALIFIED IN TERMS OF FORMAL EDUCATION; BUT STILL HE HIMSELF WAS A FULL ENCYCLOPEDIA, A UNIVERSITY. HE HAD DEVELOPED HIS OWN PHILOSOPHY AND CULTURE FOR WORKING. HE HAD EMBRACED A FEW PRINCIPLES IN HIS LIFE AND HE STOOD BY THEM THROUGHOUT HIS LIFE; THEY WERE HIGH AIM, A WILL TO WORK TIRELESSLY AND THE POWER OF COMMITMENT. ALMOST EVERYBODY CONSIDERED HIS DREAMS TO BE IMPOSSIBLE TO ACHIEVE. BUT HE CONTINUED HIS JOURNEY; HE NEVER SET APART THE PRINCIPLES EVEN FOR A SINGLE MINUTE. TODAY, WE ALL ARE WELL AWARE OF THE MAGNIFICENT SUCCESS HE ACHIEVED. HIS PRINCIPLES SIMPLE YET VERY SUCCESSFUL ARE WORTHY OF GUIDING COMMON PEOPLE ON THE WAY TOWARDS ACHIEVEMENT. THE AUTHOR OF THIS BOOK A.G. KRISHNAMURTI; IS THE FOUNDER-CHAIRMAN OF THE ADVERTISING COMPANY; MUDRA COMMUNICATION. HE ESTABLISHED THIS COMPANY WITH A SMALL DEPOSIT OF RS. 35 THOUSAND AND ONE ESTEEMED CUSTOMER. TODAY; HIS COMPANY IS ONE OF THE THREE TOPMOST ADVERTISING COMPANIES IN INDIA. HE IS ALSO THE CONSULTING CHAIRMAN OF A.G.K. BRAND. HE DIVIDES HIS TIME BETWEEN AHMADABAD AND HYDERABAD. HE HAS THREE DAUGHTERS AND ONE SON.
गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ते ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा अतिभव्य विस्तार हा विलक्षण टप्पा सर करणा-या धीरुभाई अम्बानींच्या कार्यकर्तृत्वाची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. फारसं औपचारिक शिक्षण नसलेले धीरुभाई स्वत:च एक चालतंबोलतं विद्यापीठ होते. त्यांनी स्वत:चं असं एक कार्यविषयक तत्त्वज्ञान व संस्कृती जोपासली होती. भव्य स्वप्नं, खडतर परिश्रमांची तयारी, निश्चयाचं बळ यांच्या जोडीला त्यांनी काही साधी-सोपी तत्त्वं अनुसरली होती. अशक्य कोटीतल्या वाटणा-या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी याच तत्त्वांच्या साथीनं मार्गक्रमण केलं आणि त्यात नेत्रदीपक यशही मिळवलं. त्यांची हीच तत्त्वं सर्वसामान्यांच्या जीवनातही आशा जागवतील व मार्गदर्शक ठरतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
UNIQUEINSIGHTSOFDHIRUBHAIAMBANI #MUKESHAMBANI #ENTERPRENUERSHIP # TRANSLATED FROM ENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #A.G.KRISHNAMURTHY. #ए.जी.कृष्णमूर्ती
Customer Reviews
  • Rating StarGOADOOT 9-8-2009

    गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा विलक्षण टप्पा सर करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांच्या कर्तृत्वाची ओळख साऱ्या जगाला आहे. त्यांचं कार्यविषयक तत्त्वज्ञान नेमकं कसं होतं, हे मेहता प्रकाशनच्या ‘धीरूभाईझम’ या पुस्तकातून प्रतित हों. त्याविषयी... एखादी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाची शिखरं पादाक्रांत करते त्यावेळी तिची वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. तिच्या वाटचालीचा धांडोळा घेताना अनेकांना यशाचा मूलमंत्र सापडतो. आजवर अशा अनेक दिग्गजांच्या यशोगाथा शब्दबद्ध झाल्या आहेत. ‘धीरूभाईझम’ हे मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित करण्यात आलेलं असंच एक पुस्तक. ए. जी. कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ‘धीरुभाईझम’ हे शीर्षकच फार बोलकं आहे. आजपर्यंत आपण अनेक ‘इजम’ ऐकले, वाचले आहेत, पण हा ‘धीरुभाईझम’ जगावेगळा म्हणावा लागेल. आज रिलायन्स उद्योगाचा दबदबा केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगामध्ये आहे. या उद्योगाच्या उभारणीमागील धीरूभाई अंबानी यांचे अथक कष्ट, जिद्द सर्वश्रुत आहेत. फारसं औपचारिक शिक्षण न लाभलेले धीरूभाई स्वतःच एक चालतं बोलकं विद्यापीठ होते, असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख साऱ्या जगाला आहेच. पण त्यांचं कार्यविषयक तत्त्वज्ञान नेमकं काय होतं, याचा परिचय ए. जी. कृष्णमूर्ती यांनी ‘धीरुभाईझम’द्वारे करून दिला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करताना मूळ शीर्षक कायम ठेवण्यात आलं आहे. धीरुभार्इंनी ज्या उमेदीने व्यवसाय केला, अनेक संकटांवर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक या पुस्तकाद्वारे मिळते. पुस्तकाला ज्येष्ठ उद्योगपती आणि धीरुभार्इंचे सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरुभाई ‘आशा हे तुमचं सर्वांत शक्तिमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास ही सर्वांत मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरुभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहेत. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरुभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा ‘धीरुभाईझम’ मध्ये घेण्यात आला आहे. या पुस्तकाचे ए. जी. कृष्णमूर्ती हे मुद्रा कम्युनिकेशन्स या जाहिरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. अंबानी परिवाराशी त्यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे ‘धीरुभाईझम’ नेमका काय होता, याची त्यांना चांगली कल्पना आहे. एकूण १५ प्रकरणांमधून हा ‘धीरुभाईझम’ उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रत्येक प्रकरण सुटसुटीत, नेमक्या शब्दांमध्ये मांडण्यात आलं असून त्याची शीर्षकही लक्षवेधी आहेत. या प्रत्येक शीर्षकातून धीरुभार्इंचं कार्यविषयक तत्त्वज्ञान प्रतित होतं. ‘बाह्या सरसावून मदतीला पुढं व्हा’, ‘तुमच्या टीमसाठी सुरक्षाकवच बना’, ‘गाजावाजा न करता कल्याणकारी कार्य करा, भव्य स्वप्न बघा, पण डोळे उघडे ठेवून बघा’, अशी शीर्षकं फार बोलकी आहेत. भव्य-दिव्य गोष्टी साध्य करण्यासाठी धीरुभाईप्रमाणे फक्त साध्या, सोप्या तत्त्वज्ञानावर निष्ठा ठेवणं पुरेसं आहे, असं लेखकाने म्हटलं आहे आणि ते खरंही आहे. धीरुभार्इंची जीवनकहाणी हे सकारात्मक वृत्तीच्या सामथ्र्यांचं मूर्तीमंत उदाहरण असून आजचं ‘रिलायन्स’ त्याची साक्ष देत आहे. आवर्जून वाचावी अशी ही कहाणी. ...Read more

  • Rating StarNAVPRABHA 20-7-2009

    धीरूभाईझम आणि प्रतिकूलतेवर मात या ए. जी कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांमधून धीरूभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्त्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरूभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटावर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरूभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरूभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरूभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ‘प्रतिवूâलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास-एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य? - ते काय असतं? विशालहृदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरूभार्इंचे नेमकं व्यक्तिमत्त्व उलगडतं. धीरूभार्इंनी म्हटलं होतं, ‘आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं,’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठराविक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. दोन्ही पुस्तके सुमारे ७० पानांची असून त्यांची किंमत अनुक्रमे ८० आणि ७० रुपये अशी आहे. ...Read more

  • Rating StarJYOTI GRANTH WARTA 15-8-2009

    धीरूभाई अंबानींनी स्वप्नपूर्तीच्या मार्गात आलेल्या अनंत अडथळ्यांवर मात करत ‘रिलायन्स’चं भव्य साम्राज्य उभारलं. धीरूभाई व रिलायन्सचं यश इतकं अपूर्व आहे की, बऱ्याच जणांना त्यांच्या संपत्तीच्या झगमगाटापलीकडचं पाहताच येत नाही. पण त्याचं यश असं सहजी लाभलें नव्हतं. ते कष्टसाध्य होतं. या कहाणीतून वाचकांना केवळ स्वप्नं पाहण्याची स्फूर्तीच नव्हे, तर त्यावर पकड मिळवण्याचं धाडसही लाभेल. ...Read more

  • Rating StarPUNYANAGARI 5-2-2009

    आयुष्यात आपण बरेचदा कोड्यात पडतो. स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल का ? प्रतिकूल परिस्थितीत तग धरता आला का ? स्वत:ला सिद्ध करण्यात कमी पडलो का असे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. त्यामुळे वेळ येते ती आत्मपरिक्षणाची. ते करताना आजूबाजूला विविध मातब्बरांची मातबबरी पहायला मिळते. ही माणसं मोठी कशी झाली आणि त्यांनी पाहता पाहता आकाशाल गवसणी कशी घातली हे तपासून पाहताना आश्चर्य वाटतं. म्हणूनच अशा विलक्षण उमेद लाभलेल्या व्यक्तिमत्वांची जीवनगाथा पडताळून पाहण्याची संधी मिळाली की गमवावीशी वाटत नाही. ’मेहता प्रकाशन तर्फे अलीकडेच अशी चार पुस्तके बाजारात आणण्यात आली आहेत. धीरुभाईझम, प्रतिकूलतेवर मात, नवभारताचे शिल्पकार आणि इट हॅपन्ड इन इंडिया या चार पुस्तकांनी प्रत्येक सामान्य माणसाची जिगर जागवल्यास नवल नाही. ’धीरुभाईझम’ आणि ’प्रतिकूलतेवर मात’ या ए.जी. कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकातून धीरुभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाणी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरुभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटांवर मात केली आणि ’आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरुभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरुभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ’गुरु’ या चित्रपटातून धीरुभार्इंना समांतर असे एक व्यक्तीमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रुपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशीलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ’प्रतिकूलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास - एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य ? - ते काय असतं?, विशालह्रदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरुभार्इंचं नेमकं व्यक्तीमत्व उलगडतं. धीरुभार्इंनी म्हटलं होतं, आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं.’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठरावीक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk