A.G.KRISHNAMURTHY.

About Author

Birth Date : 28/04/1942
Death Date : 05/02/2016


ATCHYUTANI GOPALA KRISHNAMURTHY WAS AN INDIAN ADVERTISING PROFESSIONAL. HE WAS CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR OF MUDRA COMMUNICATIONS LIMITED, WHICH HE FOUNDED, FROM 1980 TO 2003.

ए.जी. कृष्णमूर्ती (अच्युतानी गोपाल कृष्णमूर्ती) यांनी आंध्र प्रदेश विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी प्राप्त केली. 1968 मध्ये त्यांनी ’कॅलिको मिल्स’मध्ये नोकरीला सुरुवात केली. 1980मध्ये एक क्लायन्ट आणि पस्तीस हजार रुपये या भांडवलावर त्यांनी ’मुद्रा कम्युनिकेशन्स’ची मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या नऊ वर्षांत ती भारतातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी जाहिरात एजन्सी बनली. ’मुद्रा कम्युनिकेशन्स प्रा.लि.’चे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कृष्णमूर्तींची ओळख निर्माण झाली. त्यांच्या एजन्सीकडे असलेले दोन प्रमुख ब्रँड्स म्हणजे ’विमल फॅब्रिक्स’ आणि ’रसना सॉफ्ट ड्रिंक कॉन्सन्ट्रेट.’ त्यानंतर आणखी बरेच भारतीय ब्रँड्स त्यांच्या एजन्सीकडे आले. तेवीस वर्षांच्या कार्यकालात या एजन्सीला 844 पुरस्कार लाभले. त्यामध्ये कित्येक राष्ट्रपती पुरस्कारांचा समावेश आहे. ’मुद्रा’ने सलग दहा वर्षं ’द एजन्सी ऑफ द इअर’ पुरस्कार पटकावला. सन 2000मध्ये त्यांनी जाहिरात क्षेत्रासाठी स्ुग्ह्ग्.म्दस् हे पहिलं ऑनलाइन संदर्भ ग्रंथालय सुरू केलं. कृष्णमूर्ती यांनी इंग्रजी आणि तेलुगू भाषेत स्तंभलेखन केलं. त्यांची इंग्रजी मध्ये चार आणि तेलुगूमध्ये नऊ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. ’एजीके ब्रॅन्ड कन्सल्टिंग’चं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
ASAMANYA YASHPRAPTISATHI DAHA SAMANY... Rating Star
Add To Cart INR 120
DHIRUBHAISM Rating Star
Add To Cart INR 140
PRATIKULTEVAR MAT Rating Star
Add To Cart INR 95

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more