A.G.KRISHNAMURTHY.

About Author

Birth Date : 28/04/1942
Death Date : 05/02/2016


ATCHYUTANI GOPALA KRISHNAMURTHY WAS AN INDIAN ADVERTISING PROFESSIONAL. HE WAS CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR OF MUDRA COMMUNICATIONS LIMITED, WHICH HE FOUNDED, FROM 1980 TO 2003.

ए.जी. कृष्णमूर्ती (अच्युतानी गोपाल कृष्णमूर्ती) यांनी आंध्र प्रदेश विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी प्राप्त केली. 1968 मध्ये त्यांनी ’कॅलिको मिल्स’मध्ये नोकरीला सुरुवात केली. 1980मध्ये एक क्लायन्ट आणि पस्तीस हजार रुपये या भांडवलावर त्यांनी ’मुद्रा कम्युनिकेशन्स’ची मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या नऊ वर्षांत ती भारतातली तिसर्या क्रमांकाची सर्वांत मोठी जाहिरात एजन्सी बनली. ’मुद्रा कम्युनिकेशन्स प्रा.लि.’चे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कृष्णमूर्तींची ओळख निर्माण झाली. त्यांच्या एजन्सीकडे असलेले दोन प्रमुख ब्रँड्स म्हणजे ’विमल फॅब्रिक्स’ आणि ’रसना सॉफ्ट ड्रिंक कॉन्सन्ट्रेट.’ त्यानंतर आणखी बरेच भारतीय ब्रँड्स त्यांच्या एजन्सीकडे आले. तेवीस वर्षांच्या कार्यकालात या एजन्सीला 844 पुरस्कार लाभले. त्यामध्ये कित्येक राष्ट्रपती पुरस्कारांचा समावेश आहे. ’मुद्रा’ने सलग दहा वर्षं ’द एजन्सी ऑफ द इअर’ पुरस्कार पटकावला. सन 2000मध्ये त्यांनी जाहिरात क्षेत्रासाठी स्ुग्ह्ग्.म्दस् हे पहिलं ऑनलाइन संदर्भ ठांथालय सुरू केलं. कृष्णमूर्ती यांनी इंठाजी आणि तेलुगू भाषेत स्तंभलेखन केलं. त्यांची इंठाजीमध्ये चार आणि तेलुगूमध्ये नऊ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. ’एजीके ब्रॅन्ड कन्सल्टिंग’चं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
ASAMANYA YASHPRAPTISATHI DAHA SAMANY... Rating Star
Add To Cart INR 120
DHIRUBHAISM Rating Star
Add To Cart INR 140
PRATIKULTEVAR MAT Rating Star
Add To Cart INR 95

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more