* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHALA JANUN GHEU YA UPAYUKTA KANMANTRA
  • Availability : Available
  • Translators : MANJUSHA AMDEKAR
  • ISBN : 9788177668049
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 72
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :POCKET BOOKS COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
N/A
साध्या किरकोळ समस्या घरगुती उपायांनी घरच्या घरी सोडवता येऊ शकतात. अशा वेळी उपयुक्त ठरतील असे कानमंत्र या पुस्तकात सापडतील. पण हे घरगुती उपाय डॉक्टरांना पर्याय नक्कीच नसतात. गंभीर समस्या असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांकडे जाणेच योग्य असते. पण तिथे पोहोचेपर्यंत तात्पुरती उपाययोजना करायला काहीच हरकत नसते. यातले साधेसुधे कानमंत्र आजमावून, आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य सुधारायला वाचकांना मदत होऊ शकेल अशी आशा वाटते.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 29-04-2007

    सर्वांसाठी सर्व काही… मेहता पब्लिशिंग हाऊसने चला जाणून घेऊया या ग्रंथ मालिकेत सौंदर्याचे रहस्य आणि उपयुक्त कानमंत्र अशा दोन पुस्तिका अलीकडे प्रकाशित केल्या आहेत. सध्या सौंदर्याबद्दल युवक आणि युवती विशेष काळजी घेतात. सौंदर्य स्मार्टनेस आणि बुद्धिचे तज या गोष्टींचा संगम व्यक्तिमत्त्वात अपेक्षित असतो. प्रत्येक युवतीला आपण गोरेपान आणि सुंदर दिसावे असे वाटते. सौंदर्य खुलवण्यासाठी आणि चेहरा गोरा होण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती दूरदर्शन वाहिन्यावर दाखवल्या जातात, पण अशी क्रिम लावून सात-आठ दिवसात गोरे होता येत नाही. शिवाय अशा काही सौंदर्य प्रसाधनात रसायनेही वापरली जातात. त्याचा प्रतिकूल परिणाम त्वचेवर होतो हे लक्षात घेऊन सौंदर्याचे रहस्य या पुस्तिकेत मंजुषा आमडेकर यांनी सौंदर्यासाठी उपाययोजना आणि गोरेपणासाठी सोप्या आयुर्वेदिक औषधांचा खजिना खुला केला आहे. सौंदर्यासाठी वापरावयाच्या बऱ्याचशा वस्तू घरातच आणि शहरातच मिळतात, हे या पुस्तकातील औषधे वाचून लक्षात येते. केस वाढण्यासाठी रिठे, आवळा, शिकेकाई, संत्र्यांची साल, लिंबाची साल, मसूर डाळ, चहाची पावडर, कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने, मेथी कोरफड, आल्याचा रस खूप उपयोगी पडतो. हे या पुस्तकात कृतीसह सांगितले आहे. चारोळीची पावडर, काकडीचा रस, जवसाचे तेल, पपईचा लगदा, लिंबाची साल, त्वचेचा रंग उजळण्यासाठी उपयोगी पडते. अशी अनेक औषधे या पुस्तकात दिली आहेत. घरात अनेकवेळा समस्या उद्भवतात तेव्हा काय करावे? याचे उपयुक्त कानमुंत्र या पुस्तिकेत आमडेकर यांनी दिले आहे. चांगल्या आरोग्यासाठी रोज आठ ग्लास पाणी प्या, उजव्या कुशीवर झोपण्याने घोरणे थांबते, पेरु खाण्याने पोट साफ राहते, लिफ्टचा वापर करण्याऐवजी जिने चढावेत त्यामुळे उत्साह वाढतो. लहान मुलांना कडू औषधे देताना मधातून द्यावीत. रोज दीर्घश्वसन करावे. गाईचे दूध आणि मध हे दोन्ही पदार्थ सौंदर्यासाठी आवश्यक आहेत. असे अनेक कानमंत्र या पुस्तिकेत आहेत. वाचकांनी दोन्ही पुस्तके आपल्यासाठी विकत घेवून संग्रही ठेवायला हवीत. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more