DR. BHALBA VIBHUTE

About Author


PROFESSOR (DR.) BHALCHANDRA BABURAO ALIAS BHALBA VIBHUTE, M.A., PH.D. (POLITICAL SCIENCE), DIRECTOR & HEAD, DEPARTMENT OF ADULT, CONTINUING EDUCATION & EXTENSION WORK, SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR HAS A REWARDING CAREER AS A TEACHER FOR LAST 31 YEARS. HE HAS SUCCESSFULLY ADDRESSED THE NEEDS OF THE AMBIENT SOCIELY CONSISTENT WITH THE WORLD’S TRANSITION TO THE NEW MILLENNIUM BY IDENTIFYING LIFELONG LEARNING AS A KEY TO THE TWENTY – FIRST CENTURY

प्रा. डॉ. भालबा विभुते यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. (१९७५) आणि पीएच.डी. (१९८१) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून प्राप्त केली. डॉ. विभुते हे शिवाजी विद्यापीठातील प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाचे माजी संचालक आहेत. संचालक पदाच्या काळात त्यांनी शिवाजी विद्यापीठ संचलित श्रमिक विद्यापीठाचे संचालक आणि मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक म्हणून ४ वर्षे कर्तव्य बजावले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. १९७८ ते १९८४ या काळात कोल्हापूर येथील न्यू कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. डॉ. विभुते यांनी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, सिनेट, अ‍ॅकॅडमिक कौन्सिल इत्यादी अधिकार मंडळांवर काम केले आहे. तसेच युजीसी, राज्यशासन, देशातील विविध विद्यापीठे, राज्य साधन केंद्र, पुणे आकाशवाणी (महाराष्ट्र), कामगार कल्याण मंडळ (महाराष्ट्र) इत्यादी संस्था, मंडळांवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. तसेच महाविद्यालयांच्या विविध व्यवस्थापनावरही काम केले आहे. डॉ. विभुते यांनी ३० ग्रंथांचे लेखन, संपादन केले आहे. त्यांच्या ‘महात्मा फुले विचारधन’ या पुस्तकात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर ‘प्रौढ शिक्षण योजना, यंत्रणा आणि कार्यवाही’ या ग्रंथास शिवाजी विद्यापीठाने उत्कृष्ट ग्रंथ म्हणून पुरस्कृत केले आहे. डॉ. विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्याथ्र्यांनी पीएच.डी. संशोधन तर पाच विद्याथ्र्यांनी एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ९ संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. उत्तम वक्ते, लेखक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून त्यांना ओळखले जाते. विशेषत: संसदीय लोकशाही आणि आजीवन अध्ययन या क्षेत्रांत राष्ट्रीय पातळीवर त्यांना मान्यता प्राप्त झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more