DR. BHALBA VIBHUTE

About Author


PROFESSOR (DR.) BHALCHANDRA BABURAO ALIAS BHALBA VIBHUTE, M.A., PH.D. (POLITICAL SCIENCE), DIRECTOR & HEAD, DEPARTMENT OF ADULT, CONTINUING EDUCATION & EXTENSION WORK, SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR HAS A REWARDING CAREER AS A TEACHER FOR LAST 31 YEARS. HE HAS SUCCESSFULLY ADDRESSED THE NEEDS OF THE AMBIENT SOCIELY CONSISTENT WITH THE WORLD’S TRANSITION TO THE NEW MILLENNIUM BY IDENTIFYING LIFELONG LEARNING AS A KEY TO THE TWENTY – FIRST CENTURY

प्रा. डॉ. भालबा विभुते यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. (१९७५) आणि पीएच.डी. (१९८१) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून प्राप्त केली. डॉ. विभुते हे शिवाजी विद्यापीठातील प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाचे माजी संचालक आहेत. संचालक पदाच्या काळात त्यांनी शिवाजी विद्यापीठ संचलित श्रमिक विद्यापीठाचे संचालक आणि मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक म्हणून ४ वर्षे कर्तव्य बजावले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. १९७८ ते १९८४ या काळात कोल्हापूर येथील न्यू कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. डॉ. विभुते यांनी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, सिनेट, अ‍ॅकॅडमिक कौन्सिल इत्यादी अधिकार मंडळांवर काम केले आहे. तसेच युजीसी, राज्यशासन, देशातील विविध विद्यापीठे, राज्य साधन केंद्र, पुणे आकाशवाणी (महाराष्ट्र), कामगार कल्याण मंडळ (महाराष्ट्र) इत्यादी संस्था, मंडळांवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. तसेच महाविद्यालयांच्या विविध व्यवस्थापनावरही काम केले आहे. डॉ. विभुते यांनी ३० ग्रंथांचे लेखन, संपादन केले आहे. त्यांच्या ‘महात्मा फुले विचारधन’ या पुस्तकात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर ‘प्रौढ शिक्षण योजना, यंत्रणा आणि कार्यवाही’ या ग्रंथास शिवाजी विद्यापीठाने उत्कृष्ट ग्रंथ म्हणून पुरस्कृत केले आहे. डॉ. विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्याथ्र्यांनी पीएच.डी. संशोधन तर पाच विद्याथ्र्यांनी एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ९ संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. उत्तम वक्ते, लेखक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून त्यांना ओळखले जाते. विशेषत: संसदीय लोकशाही आणि आजीवन अध्ययन या क्षेत्रांत राष्ट्रीय पातळीवर त्यांना मान्यता प्राप्त झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.