* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO WIN FRIENDS & INFLUENCE PEOPLE
  • Availability : Available
  • Translators : SHUBHADA VIDVANS
  • ISBN : 9788184983098
  • Edition : 11
  • Publishing Year : NOVEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Sub Category : FAMILY & RELATIONSHIPS, PARENTING
  • Available in Combos :DALE CARNEGIE COMBO SET- 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FOR MORE THAN SIXTY YEARS THE ROCKSOLID, TIMETESTED ADVICE IN THIS BOOK HAS CARRIED THOUSANDS OF NOW FAMOUS PEOPLE UP THE LADDER OF SUCCESS IN THEIR BUSINESS AND PERSONAL LIVES. NOW THIS PREVIOUSLY REVISED AND UPDATED BESTSELLER IS AVAILABLE AS EBOOK FOR THE FIRST TIME TO HELP YOU ACHIEVE YOUR MAXIMUM POTENTIAL THROUGHOUT THE NEXT CENTURY! LEARN:THREE FUNDAMENTAL TECHNIQUES IN HANDLING PEOPLE.THE SIX WAYS TO MAKE PEOPLE LIKE YOU . THE TWELVE WAYS TO WIN PEOPLE TO YOUR WAY OF THINKING.THE NINE WAYS TO CHANGE PEOPLE WITHOUT AROUSING RESENTMENT
तुम्हाला तुमच्या पसंतीचे काम हवे आहे का? ते तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला जे काम मिळाले आहे ते तुम्ही आवश्य घ्या आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करा. तुम्ही कोणत्याही संकटात सापडला असाल तर त्याचा उपयोग संधी म्हणून करा. डेल कार्नेगी ह्यांच्या अजरामर आणि काळाच्या कसोटीला उत्तरलेल्या उपदेशांमुळे आज अगणित लोकांनी यशाचे शिखर गाठले आहे. त्यांना व्यावसायिक यश तर मिळालेच पण त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही समृद्ध झाले. त्यांच्या कालातील अनेक उत्तम मार्गदर्शनपरपुस्तकांपैकी `मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा` हे पुस्तक तुम्हाला पुढील गोष्टी शिकवते. * लोकांना तुम्ही आवडावे म्हणून करायच्या सहा युक्त्या. * लोक तुमच्याशी सहमत व्हावेत म्हणून करायच्या बारा युक्त्या. * लोकांना राग न येऊ देता त्यांच्यात बदल घडवून आणण्याच्या सहा युक्त्या. आणि आणखीही खूप काही. `मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा` ह्या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ घ्या.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MITRAJODAANILOKANVARPRABHAVPADA #LOKANSHIKASEVAGAVE #YABADDALCHIMULBHUT TANTR #LOKANAJINKUNGHENYACHAMULMANTRA #NETRUTVASWIKARA #LAKSHANIYAYASHMILAVINYACHAZATPATMARG
Customer Reviews
  • Rating StarNilesh Shinde

    लेखमाला - भाग पहिला लेखकाविषयी : माणूस नावीन्यपूर्ण कल्पनेने पछाडलेला आणि उत्साहाने भारलेला असेल तर तो मोठे यश मिळवू शकतो हयाचे उत्तम उदाहरण म्हणजे "डेल कार्नेगी" त्यांचा जन्म वायव्य अमेरिकेतील मिसुरी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबातला झाला. एकेकाळी काऊबाँय असणारा मुलगा पुढे जाऊन मोठमोठ्या कंपन्यांच्या उच्चाधिकार्यांना व्यक्त कसे व्हावे हे शिकवणारा सर्वात जास्त फी आकारणारा प्रशिक्षक बनेल असे स्वप्नात सुद्धा कुणाला खरे नसते वाटले. घरचे अठराविश्व दारिद्रय ,काबाडकष्ट आणि कर्जाचा वाढता डोंगर हया कशानेच नाउमेद न होता शिकत होता. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्न करून त्याने वक्तृत्व कलेवर प्रभुत्व मिळवले. शिक्षणांतर काही काळ विक्रेत्याचे काम करून काही काळ अभिनय केल्यानंतर त्याला लेखक होण्याचे वेध लागले. दिवसभर पुस्तक वाचन लिखाण आणि रात्री प्रौढ शिक्षण वर्ग असा त्याचा दिनक्रम बनला. त्यांचे पब्लिक स्पिकींग कोर्स अल्पावधीतच लोकप्रिय झाले त्यांचे विद्यार्थी असलेले व्यवसायिक नोकरदार हयांना मित्रांवर छाप पाडायची, व्यवसाय नोकरीत तत्काळ वापरता येतील अशी व्यवहारी तंत्र जाणून घ्यायची होती त्यानुसार त्यांनी व्यावहारिक शहाणपणाचा कोर्स बनवला ज्यात भाषण,विक्री, नातेसंबंध आणि हयासर्वामागचे मानसशास्त्र शिकवायचे त्यांनी ठरवले हयातूनच पुढे ज्या पुस्तकाचा जन्म झाला ते म्हणजे " मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा" पुस्तकाविषयी : हया पुस्तकातून लेखकाने लोकांना कसे हाताळावे जेणेकरुन ते तुमचे ऐकतील, तुमच्या विचारांशी सहमत होतील, तुमचे जिवलग बनतील. लोकांवर छाप पडण्यासाठी लागणारी संवाद कौशल्य आणि पथ्ये सांगितली आहेत. लोकांना प्रेमाने जिंकण्यासाठी वादविवाद कसे टाळावेत तसेच चांगले वागण्यासाठी आव्हान कसे द्यायचे तसेच प्रतिकूल परिस्थितीत संयम ढळू न देता बाजी कशी पलटवायची याची सूत्रे सांगितली आहोत तसेच लोकांना राग येऊ न देता टीका न करता त्यांच्यात बदल कसे घडवायचे त्यांच्या चुका सह्रदयतेने कशा सुधारायच्या हयाबाबत पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. ...Read more

  • Rating StarVaibhav Pathrudkar

    संग्रही असावे असे सुंदर पुस्तक.

  • Rating StarChandrashekhar Sakpal

    वाचून पूर्ण...... thank you so much

  • Rating StarDhanraj Bhandare April 8

    डेल कार्नेगी यांनी लिहलेले - मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे पुस्तक नुकतेच वाचुन झाले त्या विषयी हे एक कृतीशील असे पुस्तक असुन आपला भविष्यकाळ अधिक आणि अधिक आनंददायी व यशस्वी व्हायला हवा असे आपना सर्वानांच वाटते अश्या प्रत्येकांनी किमान एक वेळ तरी हे पुस्तक वाचायला हवे किती तरी वेळा आपन सर्वत्र अनुभव घेत असतो रोजचे आयुष्य जगतेवेळी विनाकारण किती वाद होत असतात हे आपन पाहतो. आपला मराठी माणूस तर मोडेल पन वाकणार नाही हीच वृत्ती ठेऊन वागत असतो (मोडल्यानंतर कोणतीही गोष्ट पहिल्या सारखी होईल का ? ) शकतो एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा यात सुर्वणमध्ये नेहमीच वर्तमान व भविष्यासाठी फलदायी असतो. आयुष्यातील किती तरी वादविवाद निव्वळ शब्दाने शब्द वाढल्याने होत असतात या कार्नेगी सरांनी या मध्ये अंत्यत सोप्या शब्दात हजारो उदाहरणे देऊन वाद विवाद कसे टाळता येतात हे यात सांगितले आहे ते असे सांगतात कि व्यक्ती कितीही छोटा असु द्या आत्मसन्मान त्यांच्यात असतोच लोकांना स्वतः विषयी बोलणे आवडते या बाबत कार्नेगी सर म्हणतात की लोक तुमच्यात रूची घेत नाहीत ना ते माझ्यात घेतात ते अगदी तिन्ही त्रिकाळ फक्त स्वतः मध्ये रूची घेतात अगदी सकाळी दुपारी रात्री जेवणानंतर सुध्दा एखाद्या माणसाला दुखःवल्याने त्यांच्या मनात रागाची भावना ईतकी तीव्र असते की मृत्यू नंतरही शोकाच्या ऐवजी त्याने केलेला अपमानच आठवतो यातुन प्रत्येकाने बोध घेतला पाहिजे की आपन कधी कधी आपल्या जीभेवरचा ताबा सुटल्याने व क्षणिक रागामुळे एखाद्याचे मन कायमचे दुरावेल अशी कृती कटाक्षाने टाळायला हवी वादविवाद जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वादविवाद टाळा नेहमीच इतरांच्या मनाचा आदर करा तुम्ही चुकला असे म्हणने शक्यतो टाळा पुढच्या व्यक्तीचे नेहमी शांतपणे ऐकून घ्यायला हवे चांगल्या वक्ता होण्याचा आपन प्रयत्न करतो पन कधी आपणास चांगला श्रोता व्हायला पाहिजे हे कोणीही आपणास सांगत नाही ते यातुन समजते कितीही नाजुक प्रसंगात मनावर ताबा असायला हवा आरडाओरडा केल्याने समस्या कधीच सुटणार नाही मात्र परिस्थिती आणखीण बिकट होईल असे कार्नेगी म्हणतात आपली चुक आपन मान्य केली तर तुम्ही कधीच अडचणीत येऊ शकत नाही त्यामुळे सगळे वादविवाद मिटतात आणि तुमच्या विरोधकालासुध्दा न्याय बुध्दीने वागण्याची स्फुर्ती मिळते हे लक्षात असू द्यावे या बाबत त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. समोरच्याशी बोलताना आधी त्याचे कौतुक करा ज्याला नेतृत्व करायचे आहे त्याने ही हातोटी वापरायला हवी एखाद्या कठीण प्रसंगात व्यक्ती ने कसे तोंड द्यायला हवे या बद्दल ते सांगतात की थिओडोर रूझवेल्ट यांच्या कारकिर्दीत एखाद्या बाबतीत कठीण प्रसंगात निर्णय घ्यायचा प्रसंग आला तर ते White House मधील लिंक न यांच्या तैलचित्रा कडे पाहुन स्वतःला असे विचारत असे जर माझ्या जागी लिंकन असते तर त्यांनी ही समस्या कशी सोडवली असती. या पुस्तकातील एक उतारा जो मला खुप आवडला तो असा आहे `आपन कसे असायला हवे व आपण काय आहोत अशी स्वतःशीच तुलना केली तर आपण अर्धजागृत आहोत अशी आपली खात्री पटते. आपण आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा फारच थोडा वापर करतो. अधिक सुस्पष्टपणे सांगायचे झाले,तर प्रत्येक माणुस स्वतःभोवती कुंपण घालून जगतो. त्याच्याकडे इतक्या अनेक प्रकारच्या अर्मयाद क्षमता असतात,पण त्याच्या सवयीमुळे त्यांचा वापर करण्यात तो अपयशी ठरतो.` शेवटी एवढच सांगेन की हे पुस्तक वाचून आपन कसे वागायला हवे हे जरी नाही शिकलो तरी कसे वागू नये हे मात्र नक्की शिकतो! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more