* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO WIN FRIENDS & INFLUENCE PEOPLE
  • Availability : Available
  • Translators : SHUBHADA VIDVANS
  • ISBN : 9788184983098
  • Edition : 10
  • Publishing Year : NOVEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Sub Category : FAMILY & RELATIONSHIPS, PARENTING
  • Available in Combos :DALE CARNEGIE COMBO SET- 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FOR MORE THAN SIXTY YEARS THE ROCKSOLID, TIMETESTED ADVICE IN THIS BOOK HAS CARRIED THOUSANDS OF NOW FAMOUS PEOPLE UP THE LADDER OF SUCCESS IN THEIR BUSINESS AND PERSONAL LIVES. NOW THIS PREVIOUSLY REVISED AND UPDATED BESTSELLER IS AVAILABLE AS EBOOK FOR THE FIRST TIME TO HELP YOU ACHIEVE YOUR MAXIMUM POTENTIAL THROUGHOUT THE NEXT CENTURY! LEARN:THREE FUNDAMENTAL TECHNIQUES IN HANDLING PEOPLE.THE SIX WAYS TO MAKE PEOPLE LIKE YOU . THE TWELVE WAYS TO WIN PEOPLE TO YOUR WAY OF THINKING.THE NINE WAYS TO CHANGE PEOPLE WITHOUT AROUSING RESENTMENT
तुम्हाला तुमच्या पसंतीचे काम हवे आहे का? ते तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला जे काम मिळाले आहे ते तुम्ही आवश्य घ्या आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करा. तुम्ही कोणत्याही संकटात सापडला असाल तर त्याचा उपयोग संधी म्हणून करा. डेल कार्नेगी ह्यांच्या अजरामर आणि काळाच्या कसोटीला उत्तरलेल्या उपदेशांमुळे आज अगणित लोकांनी यशाचे शिखर गाठले आहे. त्यांना व्यावसायिक यश तर मिळालेच पण त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही समृद्ध झाले. त्यांच्या कालातील अनेक उत्तम मार्गदर्शनपरपुस्तकांपैकी `मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा` हे पुस्तक तुम्हाला पुढील गोष्टी शिकवते. * लोकांना तुम्ही आवडावे म्हणून करायच्या सहा युक्त्या. * लोक तुमच्याशी सहमत व्हावेत म्हणून करायच्या बारा युक्त्या. * लोकांना राग न येऊ देता त्यांच्यात बदल घडवून आणण्याच्या सहा युक्त्या. आणि आणखीही खूप काही. `मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा` ह्या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ घ्या.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MITRAJODAANILOKANVARPRABHAVPADA #LOKANSHIKASEVAGAVE #YABADDALCHIMULBHUT TANTR #LOKANAJINKUNGHENYACHAMULMANTRA #NETRUTVASWIKARA #LAKSHANIYAYASHMILAVINYACHAZATPATMARG
Customer Reviews
  • Rating StarNilesh Shinde

    लेखमाला - भाग पहिला लेखकाविषयी : माणूस नावीन्यपूर्ण कल्पनेने पछाडलेला आणि उत्साहाने भारलेला असेल तर तो मोठे यश मिळवू शकतो हयाचे उत्तम उदाहरण म्हणजे "डेल कार्नेगी" त्यांचा जन्म वायव्य अमेरिकेतील मिसुरी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबातला झाला. एकेकाळी काऊबाँय असणारा मुलगा पुढे जाऊन मोठमोठ्या कंपन्यांच्या उच्चाधिकार्यांना व्यक्त कसे व्हावे हे शिकवणारा सर्वात जास्त फी आकारणारा प्रशिक्षक बनेल असे स्वप्नात सुद्धा कुणाला खरे नसते वाटले. घरचे अठराविश्व दारिद्रय ,काबाडकष्ट आणि कर्जाचा वाढता डोंगर हया कशानेच नाउमेद न होता शिकत होता. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्न करून त्याने वक्तृत्व कलेवर प्रभुत्व मिळवले. शिक्षणांतर काही काळ विक्रेत्याचे काम करून काही काळ अभिनय केल्यानंतर त्याला लेखक होण्याचे वेध लागले. दिवसभर पुस्तक वाचन लिखाण आणि रात्री प्रौढ शिक्षण वर्ग असा त्याचा दिनक्रम बनला. त्यांचे पब्लिक स्पिकींग कोर्स अल्पावधीतच लोकप्रिय झाले त्यांचे विद्यार्थी असलेले व्यवसायिक नोकरदार हयांना मित्रांवर छाप पाडायची, व्यवसाय नोकरीत तत्काळ वापरता येतील अशी व्यवहारी तंत्र जाणून घ्यायची होती त्यानुसार त्यांनी व्यावहारिक शहाणपणाचा कोर्स बनवला ज्यात भाषण,विक्री, नातेसंबंध आणि हयासर्वामागचे मानसशास्त्र शिकवायचे त्यांनी ठरवले हयातूनच पुढे ज्या पुस्तकाचा जन्म झाला ते म्हणजे " मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा" पुस्तकाविषयी : हया पुस्तकातून लेखकाने लोकांना कसे हाताळावे जेणेकरुन ते तुमचे ऐकतील, तुमच्या विचारांशी सहमत होतील, तुमचे जिवलग बनतील. लोकांवर छाप पडण्यासाठी लागणारी संवाद कौशल्य आणि पथ्ये सांगितली आहेत. लोकांना प्रेमाने जिंकण्यासाठी वादविवाद कसे टाळावेत तसेच चांगले वागण्यासाठी आव्हान कसे द्यायचे तसेच प्रतिकूल परिस्थितीत संयम ढळू न देता बाजी कशी पलटवायची याची सूत्रे सांगितली आहोत तसेच लोकांना राग येऊ न देता टीका न करता त्यांच्यात बदल कसे घडवायचे त्यांच्या चुका सह्रदयतेने कशा सुधारायच्या हयाबाबत पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. ...Read more

  • Rating StarVaibhav Pathrudkar

    संग्रही असावे असे सुंदर पुस्तक.

  • Rating StarChandrashekhar Sakpal

    वाचून पूर्ण...... thank you so much

  • Rating StarDhanraj Bhandare April 8

    डेल कार्नेगी यांनी लिहलेले - मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे पुस्तक नुकतेच वाचुन झाले त्या विषयी हे एक कृतीशील असे पुस्तक असुन आपला भविष्यकाळ अधिक आणि अधिक आनंददायी व यशस्वी व्हायला हवा असे आपना सर्वानांच वाटते अश्या प्रत्येकांनी किमान एक वेळ तरी हे पुस्तक वाचायला हवे किती तरी वेळा आपन सर्वत्र अनुभव घेत असतो रोजचे आयुष्य जगतेवेळी विनाकारण किती वाद होत असतात हे आपन पाहतो. आपला मराठी माणूस तर मोडेल पन वाकणार नाही हीच वृत्ती ठेऊन वागत असतो (मोडल्यानंतर कोणतीही गोष्ट पहिल्या सारखी होईल का ? ) शकतो एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा यात सुर्वणमध्ये नेहमीच वर्तमान व भविष्यासाठी फलदायी असतो. आयुष्यातील किती तरी वादविवाद निव्वळ शब्दाने शब्द वाढल्याने होत असतात या कार्नेगी सरांनी या मध्ये अंत्यत सोप्या शब्दात हजारो उदाहरणे देऊन वाद विवाद कसे टाळता येतात हे यात सांगितले आहे ते असे सांगतात कि व्यक्ती कितीही छोटा असु द्या आत्मसन्मान त्यांच्यात असतोच लोकांना स्वतः विषयी बोलणे आवडते या बाबत कार्नेगी सर म्हणतात की लोक तुमच्यात रूची घेत नाहीत ना ते माझ्यात घेतात ते अगदी तिन्ही त्रिकाळ फक्त स्वतः मध्ये रूची घेतात अगदी सकाळी दुपारी रात्री जेवणानंतर सुध्दा एखाद्या माणसाला दुखःवल्याने त्यांच्या मनात रागाची भावना ईतकी तीव्र असते की मृत्यू नंतरही शोकाच्या ऐवजी त्याने केलेला अपमानच आठवतो यातुन प्रत्येकाने बोध घेतला पाहिजे की आपन कधी कधी आपल्या जीभेवरचा ताबा सुटल्याने व क्षणिक रागामुळे एखाद्याचे मन कायमचे दुरावेल अशी कृती कटाक्षाने टाळायला हवी वादविवाद जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वादविवाद टाळा नेहमीच इतरांच्या मनाचा आदर करा तुम्ही चुकला असे म्हणने शक्यतो टाळा पुढच्या व्यक्तीचे नेहमी शांतपणे ऐकून घ्यायला हवे चांगल्या वक्ता होण्याचा आपन प्रयत्न करतो पन कधी आपणास चांगला श्रोता व्हायला पाहिजे हे कोणीही आपणास सांगत नाही ते यातुन समजते कितीही नाजुक प्रसंगात मनावर ताबा असायला हवा आरडाओरडा केल्याने समस्या कधीच सुटणार नाही मात्र परिस्थिती आणखीण बिकट होईल असे कार्नेगी म्हणतात आपली चुक आपन मान्य केली तर तुम्ही कधीच अडचणीत येऊ शकत नाही त्यामुळे सगळे वादविवाद मिटतात आणि तुमच्या विरोधकालासुध्दा न्याय बुध्दीने वागण्याची स्फुर्ती मिळते हे लक्षात असू द्यावे या बाबत त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. समोरच्याशी बोलताना आधी त्याचे कौतुक करा ज्याला नेतृत्व करायचे आहे त्याने ही हातोटी वापरायला हवी एखाद्या कठीण प्रसंगात व्यक्ती ने कसे तोंड द्यायला हवे या बद्दल ते सांगतात की थिओडोर रूझवेल्ट यांच्या कारकिर्दीत एखाद्या बाबतीत कठीण प्रसंगात निर्णय घ्यायचा प्रसंग आला तर ते White House मधील लिंक न यांच्या तैलचित्रा कडे पाहुन स्वतःला असे विचारत असे जर माझ्या जागी लिंकन असते तर त्यांनी ही समस्या कशी सोडवली असती. या पुस्तकातील एक उतारा जो मला खुप आवडला तो असा आहे `आपन कसे असायला हवे व आपण काय आहोत अशी स्वतःशीच तुलना केली तर आपण अर्धजागृत आहोत अशी आपली खात्री पटते. आपण आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा फारच थोडा वापर करतो. अधिक सुस्पष्टपणे सांगायचे झाले,तर प्रत्येक माणुस स्वतःभोवती कुंपण घालून जगतो. त्याच्याकडे इतक्या अनेक प्रकारच्या अर्मयाद क्षमता असतात,पण त्याच्या सवयीमुळे त्यांचा वापर करण्यात तो अपयशी ठरतो.` शेवटी एवढच सांगेन की हे पुस्तक वाचून आपन कसे वागायला हवे हे जरी नाही शिकलो तरी कसे वागू नये हे मात्र नक्की शिकतो! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more