* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TIME
  • Availability : Available
  • Translators : PURUSHOTTAM DESHMUKH
  • ISBN : 9788184988260
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
TIME HAS ALWAYS BEEN THE GREAT GIVEN, THE ELEMENT THAT ESTABLISHES THE GOVERNING FACTS OF HUMAN FATE THAT CANNOT BE CIRCUMVENTED, DECONSTRUCTED, OR WISHED AWAY. BUT THESE DAYS WE ARE TAMPERING WITH TIME IN WAYS THAT AFFECT HOW WE LIVE, THE TEXTURES OF OUR EXPERIENCE, AND OUR VERY SENSE OF WHAT IT IS TO BE HUMAN. WHAT IS THE NATURE OF TIME IN OUR TIME? WHY IS IT THAT EVEN AS WE LIVE LONGER THAN EVER BEFORE, WE FEEL THAT WE HAVE EVER LESS OF THIS BASIC GOOD? WHAT EFFECTS DO THE HYPERFAST TECHNOLOGIES--COMPUTERS, VIDEO GAMES, INSTANT COMMUNICATIONS--HAVE ON OUR INNER LIVES AND EVEN OUR BODIES? AND AS WE EXAMINE BIOLOGY AND MIND ON EVERMORE MICROSCOPIC LEVELS, WHAT ARE WE LEARNING ABOUT THE PROCESS AND PARAMETERS OF HUMAN TIME? HOFFMAN REGARDS OUR RELATIONSHIP TO TIME--FROM JET LAG TO AGING, SLEEP TO CRYOGENIC FREEZING--IN THIS BROAD, EYE-OPENING MEDITATION ON LIFE`S ESSENTIAL MEDIUM AND ITS CONTEMPORARY CHALLENGES.
‘काळ’ ही मानवाला नेहमीसाठीच मिळालेली एक श्रेष्ठ देणगी आहे. अस्तित्वात असलेलं हे वास्तव नाकारताही येत नाही किंवा टाळताही येत नाही; पण जगलेल्या काळाचं स्वरूप नाट्यपूर्ण रीतीनं बदलत चाललं आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे आपली आयुर्मर्यादा वाढते आहे, तर डिजिटल साधनं छोट्या छोट्या घटकांमध्ये काळ दाबून-दडपून बसवतायत. सध्या आपण एकाच वेळी अनेक काल प्रदेशात राहू शकतो; पण काळाच्या कमतरतेची लागण आपल्याला झाली आहे. सध्या आपण खूप वेळ काम करतो. इतकं की, काम आणि विश्रांती यांमधल्या सीमारेषा धूसर झाल्या आहेत. अनेक लोकांच्या आयुष्यात पैशापेक्षा वेळ ही अधिक मौल्यवान चीज झाली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या समजांवर आणि आपल्या स्वत:वर काय परिणाम होतोय? कॉम्प्युटर्स, व्हिडिओ गेम्स आणि तत्काळ संदेशवहन अशांसारख्या अतिवेगवान तंत्रज्ञानाचा आपल्या एकाग्रतेच्या आणि चिंतनाच्या क्षमतांवर काय परिणाम होतो? एकाच वेळी अनेक कामं आणि काळाची शकलं करणारी भावनिक अस्वस्थता गेल्या काही दशकांनी अनुभवली आहे. शरीरविज्ञानशास्त्र आणि बोधावस्थेचं निरीक्षण आपण अधिक सूक्ष्म पातळीवर करतो, तेव्हा आपल्या मनावर आणि शरीरावर होणाऱ्या काळाच्या प्रक्रियांपासून आपण काय शिकतो आहोत? नैसर्गिक मानवी कालिकता अशी काही चीज आहे का, जिच्या पलीकडे जाण्याचं साहस आपण केलं, तर आपला विनाश ओढवेल? जीवशास्त्र ते संस्कृती आणि मनोविश्लेषण ते चेतामानसशास्त्र अशा जीवनातल्या विस्तीर्ण आणि शब्दातीत असलेल्या तत्त्वांचं मूलगामी संशोधन करणारी इव्हा हॉफमन विचारते : आपल्याला जाणवतं तसं, आपण काळाच्या शेवटाकडे जातोय का?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #REFERENCE #KALAYNAMAHA #SELFHELP #TIME #PURUSHOTTAMDESHMUKH #EVAHOFFMAN
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    KALAY NAMAH by EVA HOFFMAN काळ ही संकल्पना सर्वसामान्य माणसाला फारच ढोबळमानानं ठाऊक असते. ‘काल-आज-उद्या’ एवढ्याच खंडित परिमाणांमध्ये काळाकडं पाहिलं जातं. मात्र, माणसाचं शरीर, मन-मेंदू, संस्कृती यांना काळ कसा घडवतो (आणि बिघडवतोही!) यासंबंधीचं वेगळय पद्धतीचं विवेचन या पुस्तकात ाचायला मिळतं. इव्हा हॉफमन यांच्या ‘टाइम’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा हा अनुवाद केला आहे प्रा. पुरुषोत्तम देशमुख यांनी.‘काळ’ ही मानवाला नेहमीसाठीच मिळालेली एक श्रेष्ठ देणगी आहे. अस्तित्वात असलेलं हे वास्तव नाकारताही येत नाही किंवा टाळताही येत नाही; पण जगलेल्या काळाचं स्वरूप नाट्यपूर्ण रीतीनं बदलत चाललं आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे आपली आयुर्मर्यादा वाढते आहे, तर डिजिटल साधनं छोट्या छोट्या घटकांमध्ये काळ दाबून-दडपून बसवतायत. सध्या आपण एकाच वेळी अनेक काल प्रदेशात राहू शकतो; पण काळाच्या कमतरतेची लागण आपल्याला झाली आहे. सध्या आपण खूप वेळ काम करतो. इतकं की, काम आणि विश्रांती यांमधल्या सीमारेषा धूसर झाल्या आहेत. अनेक लोकांच्या आयुष्यात पैशापेक्षा वेळ ही अधिक मौल्यवान चीज झाली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या समजांवर आणि आपल्या स्वत:वर काय परिणाम होतोय? कॉम्प्युटर्स, व्हिडिओ गेम्स आणि तत्काळ संदेशवहन अशांसारख्या अतिवेगवान तंत्रज्ञानाचा आपल्या एकाग्रतेच्या आणि चिंतनाच्या क्षमतांवर काय परिणाम होतो? एकाच वेळी अनेक कामं आणि काळाची शकलं करणारी भावनिक अस्वस्थता गेल्या काही दशकांनी अनुभवली आहे. शरीरविज्ञानशास्त्र आणि बोधावस्थेचं निरीक्षण आपण अधिक सूक्ष्म पातळीवर करतो, तेव्हा आपल्या मनावर आणि शरीरावर होणाऱ्या काळाच्या प्रक्रियांपासून आपण काय शिकतो आहोत?नैसर्गिक मानवी कालिकता अशी काही चीज आहे का, जिच्या पलीकडे जाण्याचं साहस आपण केलं, तर आपला विनाश ओढवेल? जीवशास्त्र ते संस्कृती आणि मनोविश्लेषण ते चेतामानसशास्त्र अशा जीवनातल्या विस्तीर्ण आणि शब्दातीत असलेल्या तत्त्वांचं मूलगामी संशोधन करणारी इव्हा हॉफमन विचारते : आपल्याला जाणवतं तसं, आपण काळाच्या शेवटाकडे जातोय का? ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 4-10-2015

    काळ ही संकल्पना सर्वसामान्य माणसाला फारच ढोबळमानानं ठाऊक असते. ‘काल-आज-उद्या’ एवढ्याच खंडित परिमाणांमध्ये काळाकडं पाहिलं जातं. मात्र, माणसाचं शरीर, मन-मेंदू, संस्कृती यांना काळ कसा घडवतो (आणि बिघडवतोही!) यासंबंधीचं वेगळया पद्धतीचं विवेचन या पुस्तकात ाचायला मिळतं. इव्हा हॉफमन यांच्या ‘टाइम’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा हा अनुवाद केला आहे प्रा. पुरुषोत्तम देशमुख यांनी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more