* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MULANCHYA SAMRUDDHA JIVANASATHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665925
  • Edition : 10
  • Publishing Year : JANUARY 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS POPULAR BOOK WHICH IS HAVING A TO Z FROM BEFORE BIRTH TO 18 YEARS. THIS IS WRITTEN BY EMINENT DEVELOPMENTAL PAEDIATRICIAN DR.SUCHIT TAMBOLI. THIS BOOK GIVES INFORMATION REGARDING PHYSICAL, MENTAL DEVELOPMENT OF CHILD, PARENTING, DIET, & CALORIES, PSYCHOSOCIAL DEVELOPMENT, BEHAVIOURAL PROBLEMS, LEARNING DISORDERS, REMEDIAL EDUCATION, MENTAL RETARDATION, GIFTED CHILD, CREATIVITY, BRINGING BEST OUT OF CHILD, SCHOOLING, STAMMERING, THUMB SUCKING, NOCTURNAL ENURESIS, LYING, STEALING, IMMUNIZATION, COMMON DISEASES - IDENTIFICATION & PREVENTION, SLEEP & DEVELOPMENT, LANGUAGE DEVELOPMENT, SOCIAL DEVELOPMENT, EFFECTS OF TELEVISION & COMPUTER ETC. THIS BOOK GIVES DETAIL DEVELOPMENTAL STIMULATION PROGRAMS FROM BIRTH TO 6 YEARS & THIS IS VERY SPECIAL FEATURE OF THIS BOOK. A GUIDANCE TO TOY IS TO PE PURCHASED & HOW THAT TOY SHOULD BE APPLIED IN DEVELOPMENT OF CHILD IS GIVEN. ALL THOSE PROGRAMMES ARE STANDARDIZED. ALL INFORMATION IN THIS BOOK IS VERY SCIENTIFIC & REFERENCES ARE ALSO GIVEN. THIS BOOK IS AN EXPERIENCE OF 16 YEARS PRACTICE IN PAEDIATRICS & CHILD DEVELOPMENT & BEHAVIOURAL PAEDIATRICS BY AN EXPERT IN FIELD. IT HELPS EVERY MOTHER TO BRING BEST OUT OF HER CHILD. DURING LAST 7 YEARS 5 EDITIONS HAVE BEEN PRINTED.
लहान मुलांच्या आरोग्यविषयक समस्या अनंत प्रकारच्या असतात. मुलांच्या जन्मापासून त्यांचं पुढचं आयुष्य सुसह्य व्हावं, यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्षपणे रुग्णांवर आणि अप्रत्यक्षपणे त्यांच्या पालकांवर उपचार करावे लागतात. पालकांचे पाय जमिनीवर ठेवून त्यांच्या अपेक्षा व वास्तव यांची सांगड घालून, बाळाला त्याच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत नेण्यासाठी डॉक्टरला शर्थ करावी लागते. लहान मुलांच्या बाबतीत गादीत शू करणे, अंगठा चोखणे, तोतरे बोलणे, अडखळत बोलणे, इ. वर्तन समस्या या स्थूल स्वरूपाच्या आहेत. महत्त्वाच्या समस्या असतात, मुलांची नैसर्गिक वाढ कशी होईल आणि त्यांचा बौद्धिक विकास कसा होईल, ह्या गतिमंद, मतिमंद–शाळेत मागं पडणं या समस्याही तेवढ्याच गंभीर असतात. मुलांच्या जन्माआधीच्या काळापासून तो शाळेत जाईपर्यंतच्या काळात पालकांना आपल्या मुलांच्या संदर्भात कोणकोणत्या चित्रविचित्र समस्यांना तोंड द्यावे लागते, आणि या समस्यांवर धैर्याने व चिकाटीने कशी मात करावी, याचे घरबसल्या शास्रशुद्ध मार्गदर्शन मिळावे, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुद्दाम सहज आणि सोप्या भाषेत लिहवून घेतलेले हे बहुमोल पुस्तक प्रत्येक सुजाण पालकाने सदैव हाताशी ठेवावे, असे आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#CHIRANJIV CLINIC #DR.SUCHIT TAMBOLI #CHILD ADOLESCENT #चिरंजीव क्लिनिक #डॉक्टर सूचित तांबोळी #बाल पौगंडावस्था
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 12-08-2001

    ‘‘डॉक्टर बाळ रात्री खूपच रडते. झोपतच नाही.’’ ‘‘डॉक्टर, बाळाचे डोळे सारखे चिकटतात, बाळ वर्षाचे झाले तरी अजून उभे राहत नाही.’’ ‘‘डॉक्टर माझा दोन वर्षांचा मुलगा अजून बोलतच नाही. काय करावे.’’ ‘‘डॉक्टर माझी मुलगी पाचवीत आहे; पण वजन खूपच वाढलंय तिचं! सतत टव्ही पाहत असते.’’ ‘‘डॉक्टर आजपर्यंत मुलाचं सगळं व्यवस्थित चालू होते; पण या ९वी, १०वीच्या वर्षात तो अचानक बदललाय. फारसा बोलत नाही. फारच ‘इरिटेबल’ झालाय. त्याच्याशी कसे वागायचे हेच कळत नाही.’’ हे आणि असे असंख्य प्रश्न, शंका पालकांच्या मनात असतात. त्यांना योग्य उत्तरे, योग्य मार्गदर्शन मिळणे मुलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. मुलगा दोन वर्षांचा झाला; पण अजून बोलत नाही म्हणून अतिशय ‘टेन्शन’मध्ये असलेले ‘डॉक्टर, पालक’ मी पाहिलेत. आई, वडील व मुलगा असे तिघांचेच कुटुंब असलेल्या या मुलाच्या कानावर शब्दच पडत नव्हते, तर तो बोलणार काय? डॉ. सुचित तांबोळी यांचे ‘मुलांच्या समृद्ध जीवनासाठी’ हे पुस्तक या २१व्या शतकातल्या पालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. बालविकास व बालमानसशास्त्र यावर डॉ. तांबोळी यांचे प्रभुत्व दिसते. तसेच या क्षेत्रातील त्यांचे कार्यही उल्लेखनीय आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे महत्त्व जास्त वाढते. ‘बाळाच्या जन्मापूर्वी’ या पहिल्याच प्रकरणात होऊ घातलेल्या पालकांनी घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती आहे. यात लग्नाच्या वेळेस वधु-वरांच्या रक्तगट, एड्स चाचणी, मेडिकल चेकअप पत्रिकेपेक्षा जास्त आवश्यक आहे, हा मुद्दा स्वागतार्ह आहे. निरोगी व सृदृढ बाळासाठी या प्रकरणात बाळ जन्माला आल्यावर येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी, शंका उदा. गुटी घालावी-घालू नये, टाळू तेलाने भरावी-भरू नये, बाळ उलटी का करते, रडते का? आदींविषयी सखोल चर्चा केली आहे. त्यानंतर बाळाच्या मानसिक वाढीसाठी बाळ जन्मल्यापासूनच काय करावे, बाळाची खोली, बाळाची खेळणी, बाळाचे कपडे, त्याच्याशी बोलणे, त्याला संगीत ऐकवणे इ. टप्प्याटप्प्याने कसे करावे हे सांगितले आहे. ‘मुलांच्या सुयोग्य आहार’मध्ये बाळ जन्मल्यापासून त्याला द्यावयाच्या आहाराबद्दल महत्त्वाची माहिती आहे. बाळाचे वय, उंची, वजन यांच्या इंडियन मुलांसाठीचा चार्ट दिला आहे. नेहमीच्या वापरातले पदार्थ, त्यातील कॅलरिज यांचे कोष्टक आहे. पुढील प्रकरणात मुलातील मतिमंदत्व कसे ओळखावे, त्यासाठी काय नियोजन करावे हा भाग येतो. बालकांचा मनोविकास, बौद्धिक विकास हा जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने कसा होईल, त्यासाठी पालकांनी काय प्रयत्न केले पाहिजेत, पालकांनी मुलांशी कसे वागले पाहिजे, याचा तक्ताच दिला आहे. सगळ्यांचा सारांश एकच आहे, मुलांना प्रेम द्या. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करा. मुलाचा आहे त्या बौद्धिक क्षमतेसह परिपूर्ण स्वीकार करा. त्याच्यातील सुप्त गुण आपोआपच बाहेर पडतील. मुलांचा भाषिक विकास, सामाजिक विकास, शैक्षणिक विकास या पुढील सर्व प्रकरणात सविस्तरपणे पालक-बालक-समाज यांच्यातील संवाद, मुलांची खेळणी, झोप इ. विषयी माहिती आहे. दूरदर्शनचे मुलांवरील परिणाम, ते कसे टाळावेत याचे विवेचन आहे. डॉ. आनंद पंडित यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक पालकांइतकेच उपयुक्त ठरेल. पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात नक्कीच सापडतील. -प्रमिला पाटील (मुळे) ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-12

    अपघाताने आई-वडिल होणे शक्य; पण सुजाण पालक होण्यासाठी परिश्रमाची गरज... डॉ. सुचित तांबोळी यांनी १९९२ साली अहमदनगर येथे चिरंजीव बालविकास केंद्र सुरू केले. पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या टीडीएच सेंटरचया द्वारे आजारी नवजात अर्भकाचे भावी आयुष्य सुसह्य करण्याबाबत दक्षता घेण्याचा उपक्रम चालू होता, त्याचा डॉ. तांबोळी यांच्यावर प्रभाव पडला. त्यानंतर बडोदा येथे ह्युमन डेव्हलपमेंट विभागात बेलीज स्केलचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. ‘लवकर हस्तक्षेप उपचार पद्धती’चा अवलंब करून गतिमंद, मतिमंद व वर्तनसमस्या असणाऱ्या मुलांच्या व पालकांच्या मानसिकेतेचा अभ्यास करण्यासाठी खासगी स्वरूपात निघालेले महाराष्ट्रातील पहिले केंद्र म्हणून चिरंजीव बालविकास केंद्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुढे त्याला विवेक पौंगंड क्लिनिकची जोड देण्यात आली. बालविकास केंद्र कसे चालवावे याविषयी बालरोग तज्ज्ञ व मानसशास्त्र यांच्या सहकार्याने संगणकासाठी एक आज्ञावली (सॉफ्टवेअर) त्यांनी विकसित केली आहे. औषधाची मुलाला गरज पडू नये बालविकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. तांबोळी यांनी आपल्या अभ्यास अनुभवाच्या आधारे पालकवर्गात जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी लेखन केले. ‘मुलांचा समृद्ध जीवनसाठी’ या पुस्तकातील लेखांद्वारे मुलांच्या सुयोग्य संगोपनाच्या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले गेले आहे. एकतर गरोदर अवस्थेत दक्षता घेतली तर मूल निरोगी व सुदृढ होऊ शकते. औषधाची मुलाला शक्यतो गरज पडू नये, अशा प्रकारे पुढेही त्याचे संगोपन होत राहावे. जन्मानंतर पहिल्या सहा आठवड्यात अर्भकाला वेळोवर दूध पाजले की झाले, बाकी त्याला काय कळते अशी बहुतेक मातापित्यांची भावना असते; परंतु डॉ. तांबोळी हे या काळातही बाळाला रोज तीन तास संगीत ऐकवावे, आवाजाची खेळणी वाजवून दाखवावी, रंगीत व वेगवेगळ्या आकाराची खेळणी त्याच्या पाळण्यावर टांगून ठेवावी, त्याकडे त्याचे लक्ष वेधावे, असे सुचवितात. दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात संगीताबरोबर हलणारी, मोठी रबराची खेळणी वापरावी, चौथ्या पाचव्या महिन्यात प्लॅस्टिकचे मोठे मणी, विविध स्पर्शाचे प्राणी खेळण्यांमध्ये विविधता आणण्याचा आग्रह धरतात. या खेळण्याद्वारे त्यांची ज्ञानेंद्रिये तल्लख होतात. त्याच्या विविध अवयवांच्या हालचालींना चालना मिळते. जन्मापासून ते पहिल्या दहा वर्षांपर्यंत वापरता येण्याजोगा १०० खेळण्याची त्यांनी वयानुसार दिली आहे. दहाव्या वर्षी खेळणी कुठली असा कोणाला प्रश्न पडेल. (पुस्तके, तिकिट संग्रह, सायकल, स्केटिंग, टेबल टेनिस, क्रिकेट इ. खेळ चित्रकला, नृत्य, पोहणे, समूह खेळ, विज्ञान खेळणी इ.) बालवाड्यांमध्ये मुलांकडून करून घेता येतील असे दीडशे उपक्रमही दिले आहेत. (१३९-१४०) मुलाच्या शारीरिक वाढीचेही काही ठोकताळे आहेत. त्यानुसार त्याच्या आहारात कोणते घटक असावेत याकडे लक्ष द्यावे लागते, नाष्टा, सकाळाचे व रात्रीचे जेवण, पालेभाज्या, उसळी, सुकामेवा, मधल्या वेळचे पदार्थ, त्यातून मिळाणाऱ्या कॅलरीज यांनी माहिती मुलांच्या सुयोग्य आहार या प्रकरणात देण्यात आली आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय? बालकांचा मनोविकास, बौद्धिक विकास, भाषिक विकास, समाजिक विकास, इतर मुलांशी संपर्क, मैत्री, भांडणे, हट्टीपणा, भीती इ. याबद्दल वयानुसार किमान तयारी दिसून यायला हवी. तशी ती न दिसली तर त्यांच्या वर्तनसमस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करायची गरज भासते. बुद्धी ही नैसर्गिक व अनुवंशिक असते. ती कोणत्याही औषधाने व आहाराने वाढवता येत नाही. पण आहे ती बुद्धी कुपोषणाने, आळसाने, अयोग्य वातावरणामुळे काम करेनाशी होऊ शकते. बुद्धिमत्तेमध्ये प्रत्यभिज्ञान (अनुभवग्रहण), स्मृती, भिन्नरचन, संयोजक रचना, मूल्यांकन या बोधात्मक प्रक्रिया मुख्य असतात. सहेतुक, विचारपूर्वक व समर्थपणे परिस्थितीशी समायोजन साधण्याची व्यक्तीची सर्वांगीण क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ही वेशलेरची व्याख्या डॉ. तांबोळी यांना सोयीची व स्वीकारार्ह वाटते. प्रत्येक मुलाची एक विशिष्ट बौद्धिक क्षमता असते. काही बाबतीत त्याला आरंभापासूनच विशेष गती असते. (भाषा, संगीत, गणित इ.) अंगी असणाऱ्या शक्तींच्या सहाय्याने बाहृयजगतात बालकाची आवड-निवड करण्याची वृत्ती बनते. वृत्ती सवयीच्या झाल्या की त्या स्थिर बनतात व त्यात बदल करणे कठीण होते. वृत्ती म्हणजे एखादे काम करण्याबद्दलची सज्जता. कृतिप्रवण इच्छाशक्ती, लहानापासून चिकाटी, मेहनत, अभ्यास आकलन, शिस्त, इत्यादी गोष्टी त्याच्या मनावर ठसवायला हव्या. पालक-शिक्षक-मित्रसहकारी यांच्या वर्तनाचा, विचारांचा व मूल्य प्रणालीचा प्रभाव मुलांवर पडतो. मात्र मूल भावनाप्रधान असेल व पालकांविषयी त्याची वृत्ती प्रतिकारात्मक असेल तर सूचनेचा उलटाच परिणाम होऊ शकतो. मुलांच्या पूर्वानुभवावरून त्यांच्या आवडीनिवडी तयार होतात. विविध कामे करण्याची आवड त्यांच्यात निर्माण व्हायला हवी. तशी कौशल्ये त्यांनी संपादन करायला हवी. एखाद्या कामात चटकन यश आले तर त्या प्रकारची कामाची टाळाटाळ करतात. योग्य आवडीनिवडीच्या दृष्टीने पालकांना काय करता येईल हे नेमके सांगणे अवघड आहे; परंतु त्यांचे स्वत:चे वर्तन हाच मुलांसमोर प्रारंभी तरी आदर्श असतो हे विसरता कामा नये. त्यामुळे त्यांनी योग्य ते गुण आधी आपल्या अंगी बाणवून ते प्रकट करायला हवे. भाषिक क्षमता मुलांची भाषिक क्षमता क्रमाक्रमाने वाढत जाते. एक वर्षांचे मूल तीन शब्द बोलते, पंधरा महिन्याचे मूल १९ अर्थपूर्ण शब्द, १८ महिन्याचे मूल २२ शब्द बोलू शकते. २१ महिन्याचे मूल २२ शब्द बोलू शकते. २१ महिन्याचे मूल शंभरावर शब्द आत्मसात करते. दोन वर्षाचे मूल पावणेतीनशे शब्दापर्यंत मजल मारते. दूरदर्शनमुळे हल्ली मुलांची शब्दसंख्या बरीच वेगाने वाढते. मुलांनी एकलकोंडे, धुमे, घाबरट लाजाळू असू नये. त्यांना मित्र मिळवता यायला हवे, अनोळखी व्यक्तीशीही संवाद साधता यायला हवा, सहकाऱ्यांबरोबर समंजसपणे राहता यायला हवे, प्रसंगी आपले वर्चस्व व चूक कबूल करण्याने बळ दाखवला यायला हवे. जरूर तेव्हा भांडताही यायला हवे. भांडखोरपणा, हट्टीपणा, अरेरावी वृत्ती, आपलेच म्हणणे सर्वांनी ऐकायला हवे, अशी दादागिरीची वर्चस्व प्रस्थापक वृत्ती यांनाही योग्य त्या टप्प्याबाहेर जाऊ देता कामा नये. मुलांची निणर्यक्षमता ही देखील विकसित करायला हवी. मी माझा निर्णय कसा ठरवणार आहे? तो निर्णय कसा अंमलात अणणार आहे? त्या निर्णयात आवश्यक तो बदल करण्याची तयारी आहे का? याबाबत त्याचा आत्मविश्वास वाढायला हवा. पालकांनी निर्णय घेऊन मुलांनी फक्त आज्ञाधारकपणे त्यापुढे मान तुकवावी, अशी अपेक्षा करणे गैर आहे. आपलं स्वत्व टिकवण्याचा प्रयत्न प्रत्येक मूल वा व्यक्ती स्वाभाविकपणे करीत असते हे विसरता कामा नये. अगदी पहिल्या वर्षांतही मूल आपल्या आवडीनिवडी प्रकट करून आपला स्वतंत्र बाणा प्रकट करण्यासाठी धडपडत असते. मुलांना परावलंबी बनवू नये. मुलांनी निर्णय घेऊन तो अंमलात आणला तर त्या निर्णयाचे परिणाम सहन करण्याची मानसिकताही सिद्ध होते, आणि त्यांची त्यांची क्षमता वाढते. सुखाबद्दलची कल्पना सुखाबद्दलची कल्पनाही मुलांच्या नीट लक्षात आणून दिली पाहिजे. सुख म्हणजे काय? ते कशावरून ठरते? प्रत्यक्ष परिस्थिती कशी आहे आणि तिच्याकडे तुम्ही कसे पाहता यावर सुख ठरते, असे सांगून डॉ. तांबोळी उदाहरण देतात. शेजारच्या बागेकडे आशाळभूपणे बघण्यापेक्षा स्वत:ची बाग काळजीपूर्वक जोपासावी. आपण कोण आहोत, आपल्याजवळ काय आहे याचा स्वीकार करता आला तर सुख लाभणे सुलभ जाते. आपल्या अपेक्षा व उपलब्ध यांच्यात समतोल राहू शकतो. भरमसाट अपेक्षा या बहुतांशी सुखाच्या आड येतात. दु:ख व नैराश्य देतात. मुलांच्या शारीरिक आजाराची दखल कशी घ्यावी, त्यांना कोणती औषधे द्यावी याबद्दलचे मार्गदर्शन ‘औषधे देताना काय काहजी घ्यावी’ या प्रकरणात कले आहे. लहान मुलांना येणारा ताप, तापामुळे येणारे झटके, जुलाब, बाल दमा किंवा अ‍ॅलर्जीचा कफ, सर्दी या संदर्भात अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मतिमंद व गतिमंद मुलांच्या समस्यांवरही विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यांच्यातील फरक व उपचार यांची माहिती देताना मज्जासंस्था, मेंदू व शिक्षण यांच्याशी आहे. पौंगंडावस्थेतील मुलांच्या प्रश्नांचा संबंध तारुण्यपीटिका, उंची, तोंडावरील कमीजास्त केस, स्तनांची वाढ, स्वप्नावस्था, हस्तमैथुन, लिंग आकार, अश्लील चित्रपट समवस्कांमधील हिंसाचार यांच्याशी असतो तर मुलींबाबत सौंदर्यकल्पना, तारुण्यपीटिका, हातापायावरचे केस, स्तनांचा आकार व वाढ, मासिक पाळी, लैंगिक छळ, लैंगिक आकर्षण, एकान्तपणा असणाऱ्या अडचणींचा मागोवा घरच्या लोकांनी घेऊन त्यांच्यात प्रेम, विश्वास व दिलासा निर्माण होईल, अशी त्यांची हाताळणी केली पाहिजे. मानसिक आधार शालेय व सामाजिक अकार्यक्षमता (नापास होणे, वाईट दर्जा मिळणे, मित्र नसणे, शिकण्यात मागे पडणे), शारीरिक आरोग्य (पटकन आजारी पडणे, कायमचा आजार असणे, शारीरिक तक्ररी व दुर्बलता जाणवणे), कौटुंबिक कलह (पालकांशी न पटणे, आई वडीलांतील भांडणे व संघर्ष, वडिलांची व्यसनाधीनता, शारीरिक व लैंगिक अत्याचार पालकांचे दारिद्र्य व विसंवाद), भावनिक प्रश्न (न्यूनगंड, औदासीन्य आत्मविश्वासाच अभाव, तणावर व चिंतन, आत्महत्येच विचार मादक द्रव्ये व व्यसने), लैंगिक समस्या (लैंगिक संबंधातून होणाऱ्या व्याधी, वेश्याव्यवसाय मुलींमध्ये गर्भ राहणे) याबाबत पालकाने जागरुक राहून मुलामुलींना मानसिक आधार दिला पाहिजे. मुलांच्या कमकुवतपणाचा स्वीकार करून त्यांच्यातील सुप्त शक्तींना प्रोत्साहन द्या, साहसाची संधी द्या. असा सल्ला डॉ. तांबोळी पालकांना देतात. मुलांचे धोक्यापासून रक्षण करा. पण त्याला अतिसंरक्षण देऊ नका. आपण जे करतो ते सर्व मुलांनी सहजपणे करावे, ही अपेक्षाही अवास्तव असते. आपले ध्येय हे मुलांसाठी निरनिराळी दारे उघडून देण्याचे असावे. बंद करण्याचे नव्हे. पालक-शिक्षक-शाळा-मुले-मित्र या सर्वांत एक प्रकारची संवाद सुलभ जवळीक हवी, संगणक, पुस्तके, खेळ, अभ्यास, करमणूक, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, लेखल, वक्तत्व, समाजकार्य या सर्वांना दिनक्रमात स्थान हवे. मुला-मुलींच्या आयुष्याची डौलदार उभारणी होण्यासाठी अनेक बाबतीत भक्कम पाया घालावा लागतो. त्यासाठी अनेक घटकांचे सहकार्य लागते. अनेक समस्यांतून मार्ग काढावा लागतो. डॉ. सुचित तांबोळी यांनी या पुस्तकात ‘बालविकासा’चे विविध पैलू स्पष्ट करून पालकांपुढे एक प्रचंड आव्हानात्मक पट खुला केला आहे. तारुण्यात स्त्री-पुरुषांनी जवळ येणे आणि त्यातून अपत्याचा जन्म होणे हा निसर्गाचा वंशसातत्य टिकवण्याचा एक सहजमार्ग आहे; परंतु अपघातने आई’वडिल होणे शक्य असले तरी चांगले पालक होणे हा अभ्यासाचा जागरुकपणा व परिश्रमाचा भाग आहे, हे सदैव लक्षात ठेवायला हवे. तसा संदेश देणारे हे पुस्तक आहे. सुजाण पालकत्वाचा पाया घालणारे बहुमोल कानमंत्र त्यात पानोपानी विखुरलेले आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 03-12

    बालकांच्या विकासासाठी... डॉ. सुचित तांबोळी यांचे ‘मुलांचे समृद्ध जीवनासाठी’ हे पुस्तक बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हा विकास साधण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. अशा विविध गोष्टींची माहिती देणारेआहे. मूल जन्मण्यापूर्वी आई-वडिलांनी कोणती काळजी घ्यावी, बाळ सुदृढ राहावे यासाठी त्यांनी काय करायला हवे, बाळास लस कधी द्यावी, त्याचा सुयोग्य आहार कोणता असावा, सकाळच्या-रात्रीच्या जेवणात तसेच मधल्या वेळेतील खाण्यात कोणते पदार्थ असावेत अशा अनेक मुद्यांची चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे. मुलांचा मनोविकास साधण्यासाठी पालकांची भूमिका किती महत्त्वाची असते तेही लेखकाने स्पष्ट केले आहे. मुलांचा शैक्षणिक, भाषिक, सामाजिक विकास साधण्यासाठी काय करावे याची सोप्या भाषेत लेखकाने माहिती दिली आहे. पालकांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळावे या हेतूने लिहिलेले हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more