* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667271
  • Edition : 4
  • Publishing Year : MAY 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS JIHAD? IT MEANS PUTTING IN OUR GREATEST EFFORTS TO ACHIEVE OUR MISSION AND AIM. ‘JIHAD’ IS NOT JUST A WAR PLAYED FOR RELIGION. THERE ARE PEOPLE WHO TAKE PRIDE IN ACHIEVING THEIR PERSONAL AIMS. THEY ARE FOREVER ACHIEVERS. THEY LEAVE NO STONE UNTURNED WHILE TRYING TO CONQUER THE SET AIM. THEY OFFER BLOOD, SWEAT AND SOUL IN THE PROCESS. THEY WORE THEMSELVES OUT. IN REALITY, THEY ARE THE TRUE ‘JIHADIS’.
एखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे `जिहाद` होय. जिहाद म्हणजे केवळ धर्मयुद्धा नव्हे. जी व्यक्ती सदा-सर्वकाळ आपल्या ध्येयाच्या धुंदीत मग्न असते, आपले धन, आपली वाणी, आणि आपली लेखणी आदींनी ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयन्तशील असते व त्यासाठी स्वतःला क्षीणवत असते, ती वास्तवात `जिहाद` च करत असते.
* भैरू रतन दमाणी पुरस्कार १९९३ * महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार १९९४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JIHAD #JIHAD #जिहाद #AUTOBIOGRAPHY #MARATHI #HUSSAINJAMADAR "
Customer Reviews
  • Rating StarSurya Misal

    जिहाद हुसेन जमादार मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा रूढी परंपरा यांच्या विरोधात जाऊन समाजप्रबोधन करायचं असा ध्यास घेतलेल्या हमीद दलवाई यांच्या प्रेरणेने ऊर्जा मिळवलेल्या एका मुस्लिम तरुणाची ही कहाणी आहे. 1)मुस्लिम तोंडी तलाख पद्धत बंद करा. 2) ताख भेटलेल्या स्त्रियांना पोटगी मिळावी अशा अनेक अनिष्ट प्रथा विरुद्ध लढा देताना त्यांना आलेल्या संकटाना तोंड देत उभारलेली चळवळ खरच स्तुत्य आहे एक वाचनीय पुस्तक. ...Read more

  • Rating StarDyneshwar

    samaj sudharnesathi avirat prayatnachi kahani

  • Rating Starप्रभाकर करंजकर

    कोर्टाचा आढावाच आपण या पुस्तकात घेतलेला आहे. सामाजिक काम करताना येणाऱ्या अडचणी फक्त अडचणीच कसल्या? अडचणींचा डोंगरच तो. तो अडचणींचा डोंगर चढून उतरल्यानंतर पुन्हा नवीन उत्साहाने समाजासाठी मार्गक्रमणा चालुच! आपल्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या आदर्ामुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते कार्यरत असतात. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    हुसेन जमादार यांचे जिहाद हे आत्मकथन हे मराठी भाषेतले पहिलेच मुस्लिम आत्मकथन असावे. आपले बाझ आणि आंतर जीवन यथातथ्यपणे त्यांनी प्रस्तुत केले आहे. त्यांच्या जीवनाच्या प्रारंभीच्या काळाचे त्यांनी रेखाटलेले चित्र हृदयात कालवाकालव निर्माण करते. खरे म्हणजे ारतातील गरीब, दुबळ्या समाजाची ही एक प्रकारची सामाईक कहाणीच आहे. हुसेन जमादारांनी ती सुबोध मराठीत प्रस्तुत केली आहे. त्यांच्या आत्मकथनाचा प्रारंभ कर्नाटक, महाराष्ट सीमा भागातील मुसलमानी बोली भाषेत आलेला आहे. मुसलमानांची मातृभाषा उर्दू असते हा सनातनी मुसलमानांचा आग्रह किती बेबुनियाद असतो ते हुसेन जमादारांनी फार सूचकपणे व्यक्त केले आहे. मुसलमानांच्या कौटुंबिक संबंधांच्या गुंतागुंतीचे जे चित्र जमादारांनी प्रस्तुत केले आहे ते फार विदारक आहे. सनातनीपणामुळे किती धडधडीत अन्याय मुस्लिम समाजात घडतात त्याची जमादारांनी प्रस्तुत केलेली कहाणी माणुसकी जागी असणारया कोणाच्याही हृदयाला घरे पाडल्यावाचून राहणार नाही. एका व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या या घटनांना एक व्यापक प्रातिनिधिक स्वरूपही आहे. सर्व समाजात अन्यायाची कुहाड चालते ती प्रामुख्याने स्त्रीवर. त्यामुळे धर्मचिकित्सेचा प्रारंभ स्त्रियांच्या प्रश्नांच्या अनुषंगानेच होतो. मुस्लिम समाजही त्याला अपवाद नाही. इस्लाममध्ये जिहादची कल्पना आहे ती अधर्म आणि अन्याय यांच्या विरुद्ध प्राणपणाने लढण्याची, पण त्याचे विकृतीकरण धार्मिक नेत्यांनी केले आणि स्वधर्मातील सुधारकांविरुद्धच जिहाद शब्दाचा उपयोग होऊ लागला. हुसेन जमादार यांनी त्याचे परिशुद्ध स्वरूप आपल्या या आत्मकथनातून स्पष्ट केले आहे. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीचा इतिहासही पुस्तकात ओघाओघाने विविध घटनांच्या अनुषंगाने आला आहे. धर्माला विरोध करणे वेगळे आणि धर्मात शिरलेल्या अनिष्ट प्रथा, परंपरा आणि अन्याय यांना विरोध करणे वेगळे, पण धार्मिक अंधत्व आलेल्यांना एवढा पोच नसतो. समाजातील अगतिकता, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा फायदा उठवून धार्मिक नेते सामान्य माणसांना आपल्या जरबेत ठेवत असतात. त्यांची विचारशक्ती पांगळी करून टाकतात. जो धर्मग्रंथ त्यांना धड वाचता देखील येत नाही, समजणे लांबच, त्या धर्मग्रंथाचा वापर करून ते सामान्य माणसाला छळतात, त्याची कोंडी करतात, धर्माच्या नावाने चालणारया या अधर्माशी शांततापूर्ण मार्गाने लढणे हे खरेखुरे जिहाद आहे, असे हुसेन जमादारांना वाटते. त्यांचे आत्मकथन ही अशा प्रकारे जिहादची जाणीवपूर्वक घेतलेली नोंदच आहे. मुळात हुसेन जमादार हे पापभिरू आणि इस्लाम प्रेमी. ग्रंथाच्या पहिल्या खंडात त्यांच्या धडपडीची हकिगत त्यांनी तपशिलात सांगितली आहे. आपल्या तारुण्यसुलभ भावना त्यांनी धर्मकारणी लावण्याचा कसोशीचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हळूहळू त्यांचा मुस्लिम धार्मिक नेतेच भ्रमनिरास करतात. धर्मवचने आणि धार्मिक वर्तन यात मेळ बसत नाही तेव्हा ते विचाराला प्रवृत्त होतात. खऱ्या धर्माची शिकवण सर्वसामान्य मुसलमानाला मिळत नसल्याने त्याची दुर्दशा होते अशा समजुतीने ते खऱ्या धर्माची शिकवण देऊ पाहतात. तवलिघच्या नावाखाली तर्कहीन व बुद्धिविरोधी प्रकार घडतात. ज्या बहिणीच्या शिक्षणासाठी त्यांनी कळकळीने प्रयत्न केलेले असतात ती बहीण तवलिघच्या नादी लागून जे प्रकार करते ते पाहून हुसेन जमादार विषण्ण होतात. या निमित्ताने जमादार वाचन करु लागतात, महात्मा गांधीच्या आत्मकथेच्या वाचनाचा विलक्षण परिणाम त्यांच्यावर होतो. मग त्यांचे हात लिहिण्यासाठी शिवशिवू लागतात. जीभही वळवळू लागते. या वेळापर्यंत वेगवेगळ्या नोकऱ्या उदरनिर्वाहासाठी ते करतात आणि उरलेला वेळ आपल्या समाजाच्या सेवेसाठी खर्च करतात. पण नंतर त्यांना उच्च शिक्षणाची तळमळ लागते. ते पदवी संपादन करतात जेव्हा एकदा समाज अपरिहार्य असलेली सुधारणा आत्मबळाने करण्याला नकार देतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे बाह्य हस्तक्षेपाला आमंत्रणच देत असतो. सती बंदीच्या बाबतीत असे घडले. इंग्रजी राज्यकर्त्यांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यासारखी सतीबंदी केली आणि बहुसंख्य हिंदूंनी ती निमूटपणे मान्यही केली. मागास देशात शासनाने अशी पावले टाकली तर समाज निमूटपणे त्या गोष्टी मान्य करतो. पण शासन पक्ष मताच्या मतलबापोटी आपली ही ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्याबाबत अंगचुकारपणा करतो. तलाक मुक्ती मोर्च्यांच्या संदर्भात या गोष्टी ढळढळीतपणे पुढे येतात. आपल्या संविधानाशी राज्यकर्त्यांनी सतत द्रोह मांडला आहे. जात, वंश, धर्म, भाषा आणि यौनभेदापायी नागरिका-नागरिकता भेद न करण्याच्या संविधानातील आश्वासनाला राज्यकर्ते बिनदिक्कत हरताळ फासतात. गैर मुस्लिम स्त्रियांना असणारे अधिकार मुस्लिम स्त्रीला नाकारले जातात. संविधानाने असे स्पष्ट आश्वासन दिले आहे की, कायद्यासमक्ष सर्व नागरिकांना समान समजले जाईल आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण दिले जाईल. पण त्यासाठी समान कायदा असायला हवा तो मात्र केलेला नाही. हिंदू स्त्रीला जे संरक्षण आहे ते मुस्लिम स्त्रीला नाही. जबानी तलाक आणि चार सवतींच्या कात्रीत मुस्लिम स्त्री अडकली आहे. या कात्रीतून तिची सोडवणूक करण्यासाठी वा सुधारणावादी मंडळींनी किती निकराचे प्रयत्न केले ते वाचले की, कोणीही सहृदय माणूस विपण्ण होईल. आपल्याला एक वाईट खोड जडली आहे, अस्पृश्यता हा हिंदूंचा आपसातला मामला, त्यांचे ते पाहून घेतील असे गैरहिंदूंनी मानणे आणि जबानी तलाक आणि चारपर्यंत सवती नांदवण्याची मुभा हा मुसलमानांचा अंतर्गत प्रश्न असल्याने त्यांचा ते सोडवतील. सुदैवाने हमीद दलवाई, हुसेन जमादार, सैयद भाई, वजीर पटेल, रजिया पटेल यांना राष्ट्र सेवा दलातील व साने गुरुजींना मानणाऱ्या आंतर भारतीयाच्या कार्यकर्त्यांनी समाजवाद्यांनी नेहमीच साथ दिली. त्याची कृतज्ञतापूर्वक नोंद हुसेन जमादारांनी केली आहे. धर्मनिरपेक्षता मानणाऱ्यांची साथ सुधारणावाद्यांना मिळावी इ. स्वाभाविकच म्हटले पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूरमध्ये सुधारणावाद्यांना अनुकूल अशी पार्श्वभूमी मिळालेली आहे. मुस्लिम समाज प्रबोधनाच्या कार्यालाही पार्श्वभूमी उपकारक ठरली असे म्हटले पाहिजे. मुस्लिम सत्य शोधक मंडळाची स्थापना पुण्यात झाली. तिथे त्याने मूळ धरले पण मुसलमानांच्या सुधारणावादी चळवळीला कोल्हापूरकरांनी नेहमीच साथ दिली. हुसेन जमादारांचे तेच कार्यक्षेत्र असल्याने त्यांना या गोष्टींचा फायदा झाला. आजही त्यांना तेथे अनेकांची साथ मिळत आहे. सुधारणवाद्यांना त्यामुळे स्वाभाविकच आनंद झाला होता. पण जमातवाद्यांपुढे सरकारचे गुडघे टेकले आणि सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा धाब्यावर बसवून त्यांनी मुस्लिम स्त्रीला पुन्हा वाऱ्यावर सोडणारा कायदा केला. देशात मताधिकोशाचा व्होट बँक जो खेळ चालला आहे त्याचाच हा प्रताप आहे. ज्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आपल्या राजकीय सोयीकरता धाब्यावर बसवला तेच सरकार राम-जन्मभूमी-बाबरी मशीद वादात सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवते तेव्हा त्यांच्या ढोंगीपणाची चीड आल्यावाचून राहत नाही. मुस्लिम सनातनी सुधारणवाद्यांना काफिरची उपाधी उत्साहाने देतात. त्या शब्दाचा आपल्या लोकांवर जादूसारखा परिणाम होतो असे त्यांना वाटते. कारण मग युक्तिवाद करण्याची गरजच राहात नाही. प्रत्येक सुधारणवादी नास्तिक असतो असे नाही, हुसेन जमादार नास्तिक नाहीत, पण अंध धर्मश्रद्धही नाहीत. हमीद दलवाई हे नास्तिक होते, तसे जाहीरपणे ते सांगत आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणींना ते हिमतीने तोंडही देत. पण तरी ते स्वतःला मुसलमान म्हणवत. त्यांना जेव्हा एक मौलानांनी बिनतोड वाटणारा प्रश्न विचारला की, तुम्ही मुसलमान आहात काय तेव्हा दलवाई म्हणाले की, मी जोवर स्वतःला मुसलमान म्हणवतो तोवर कोणाही मुल्ला मौलवीला मी मुसलमान नाही असे लेखण्याचा अधिकार नाही, पण हल्ली काही मंडळींनी धर्माची प्रमाणपत्रे वाटण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला आहे. हुसेन जमादारांच्या लिखाणाच्या एका वैशिष्ट्याचा खास उल्लेख केला पाहिजे. हा एक दुर्मिळ गुण आहे. त्यांच्या लिखाणामागची भूमिका रागे भरावे कवणासी अशी सर्वांबद्दलच्या करुणेची आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. फासावर लटकविणाऱ्यांबद्दल खिस्त म्हणाला होता, ‘देवा त्यांना क्षमा कर. ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.’ - यदुनाथ थत्ते ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more