* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JIHAD
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667271
  • Edition : 4
  • Publishing Year : MAY 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS JIHAD? IT MEANS PUTTING IN OUR GREATEST EFFORTS TO ACHIEVE OUR MISSION AND AIM. ‘JIHAD’ IS NOT JUST A WAR PLAYED FOR RELIGION. THERE ARE PEOPLE WHO TAKE PRIDE IN ACHIEVING THEIR PERSONAL AIMS. THEY ARE FOREVER ACHIEVERS. THEY LEAVE NO STONE UNTURNED WHILE TRYING TO CONQUER THE SET AIM. THEY OFFER BLOOD, SWEAT AND SOUL IN THE PROCESS. THEY WORE THEMSELVES OUT. IN REALITY, THEY ARE THE TRUE ‘JIHADIS’.
एखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे `जिहाद` होय. जिहाद म्हणजे केवळ धर्मयुद्धा नव्हे. जी व्यक्ती सदा-सर्वकाळ आपल्या ध्येयाच्या धुंदीत मग्न असते, आपले धन, आपली वाणी, आणि आपली लेखणी आदींनी ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयन्तशील असते व त्यासाठी स्वतःला क्षीणवत असते, ती वास्तवात `जिहाद` च करत असते.
* भैरू रतन दमाणी पुरस्कार १९९३ * महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार १९९४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JIHAD #JIHAD #जिहाद #AUTOBIOGRAPHY #MARATHI #HUSSAINJAMADAR "
Customer Reviews
  • Rating StarSurya Misal

    जिहाद हुसेन जमादार मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा रूढी परंपरा यांच्या विरोधात जाऊन समाजप्रबोधन करायचं असा ध्यास घेतलेल्या हमीद दलवाई यांच्या प्रेरणेने ऊर्जा मिळवलेल्या एका मुस्लिम तरुणाची ही कहाणी आहे. 1)मुस्लिम तोंडी तलाख पद्धत बंद करा. 2) ताख भेटलेल्या स्त्रियांना पोटगी मिळावी अशा अनेक अनिष्ट प्रथा विरुद्ध लढा देताना त्यांना आलेल्या संकटाना तोंड देत उभारलेली चळवळ खरच स्तुत्य आहे एक वाचनीय पुस्तक. ...Read more

  • Rating StarDyneshwar

    samaj sudharnesathi avirat prayatnachi kahani

  • Rating Starप्रभाकर करंजकर

    कोर्टाचा आढावाच आपण या पुस्तकात घेतलेला आहे. सामाजिक काम करताना येणाऱ्या अडचणी फक्त अडचणीच कसल्या? अडचणींचा डोंगरच तो. तो अडचणींचा डोंगर चढून उतरल्यानंतर पुन्हा नवीन उत्साहाने समाजासाठी मार्गक्रमणा चालुच! आपल्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या आदर्ामुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते कार्यरत असतात. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    हुसेन जमादार यांचे जिहाद हे आत्मकथन हे मराठी भाषेतले पहिलेच मुस्लिम आत्मकथन असावे. आपले बाझ आणि आंतर जीवन यथातथ्यपणे त्यांनी प्रस्तुत केले आहे. त्यांच्या जीवनाच्या प्रारंभीच्या काळाचे त्यांनी रेखाटलेले चित्र हृदयात कालवाकालव निर्माण करते. खरे म्हणजे ारतातील गरीब, दुबळ्या समाजाची ही एक प्रकारची सामाईक कहाणीच आहे. हुसेन जमादारांनी ती सुबोध मराठीत प्रस्तुत केली आहे. त्यांच्या आत्मकथनाचा प्रारंभ कर्नाटक, महाराष्ट सीमा भागातील मुसलमानी बोली भाषेत आलेला आहे. मुसलमानांची मातृभाषा उर्दू असते हा सनातनी मुसलमानांचा आग्रह किती बेबुनियाद असतो ते हुसेन जमादारांनी फार सूचकपणे व्यक्त केले आहे. मुसलमानांच्या कौटुंबिक संबंधांच्या गुंतागुंतीचे जे चित्र जमादारांनी प्रस्तुत केले आहे ते फार विदारक आहे. सनातनीपणामुळे किती धडधडीत अन्याय मुस्लिम समाजात घडतात त्याची जमादारांनी प्रस्तुत केलेली कहाणी माणुसकी जागी असणारया कोणाच्याही हृदयाला घरे पाडल्यावाचून राहणार नाही. एका व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या या घटनांना एक व्यापक प्रातिनिधिक स्वरूपही आहे. सर्व समाजात अन्यायाची कुहाड चालते ती प्रामुख्याने स्त्रीवर. त्यामुळे धर्मचिकित्सेचा प्रारंभ स्त्रियांच्या प्रश्नांच्या अनुषंगानेच होतो. मुस्लिम समाजही त्याला अपवाद नाही. इस्लाममध्ये जिहादची कल्पना आहे ती अधर्म आणि अन्याय यांच्या विरुद्ध प्राणपणाने लढण्याची, पण त्याचे विकृतीकरण धार्मिक नेत्यांनी केले आणि स्वधर्मातील सुधारकांविरुद्धच जिहाद शब्दाचा उपयोग होऊ लागला. हुसेन जमादार यांनी त्याचे परिशुद्ध स्वरूप आपल्या या आत्मकथनातून स्पष्ट केले आहे. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीचा इतिहासही पुस्तकात ओघाओघाने विविध घटनांच्या अनुषंगाने आला आहे. धर्माला विरोध करणे वेगळे आणि धर्मात शिरलेल्या अनिष्ट प्रथा, परंपरा आणि अन्याय यांना विरोध करणे वेगळे, पण धार्मिक अंधत्व आलेल्यांना एवढा पोच नसतो. समाजातील अगतिकता, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा फायदा उठवून धार्मिक नेते सामान्य माणसांना आपल्या जरबेत ठेवत असतात. त्यांची विचारशक्ती पांगळी करून टाकतात. जो धर्मग्रंथ त्यांना धड वाचता देखील येत नाही, समजणे लांबच, त्या धर्मग्रंथाचा वापर करून ते सामान्य माणसाला छळतात, त्याची कोंडी करतात, धर्माच्या नावाने चालणारया या अधर्माशी शांततापूर्ण मार्गाने लढणे हे खरेखुरे जिहाद आहे, असे हुसेन जमादारांना वाटते. त्यांचे आत्मकथन ही अशा प्रकारे जिहादची जाणीवपूर्वक घेतलेली नोंदच आहे. मुळात हुसेन जमादार हे पापभिरू आणि इस्लाम प्रेमी. ग्रंथाच्या पहिल्या खंडात त्यांच्या धडपडीची हकिगत त्यांनी तपशिलात सांगितली आहे. आपल्या तारुण्यसुलभ भावना त्यांनी धर्मकारणी लावण्याचा कसोशीचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हळूहळू त्यांचा मुस्लिम धार्मिक नेतेच भ्रमनिरास करतात. धर्मवचने आणि धार्मिक वर्तन यात मेळ बसत नाही तेव्हा ते विचाराला प्रवृत्त होतात. खऱ्या धर्माची शिकवण सर्वसामान्य मुसलमानाला मिळत नसल्याने त्याची दुर्दशा होते अशा समजुतीने ते खऱ्या धर्माची शिकवण देऊ पाहतात. तवलिघच्या नावाखाली तर्कहीन व बुद्धिविरोधी प्रकार घडतात. ज्या बहिणीच्या शिक्षणासाठी त्यांनी कळकळीने प्रयत्न केलेले असतात ती बहीण तवलिघच्या नादी लागून जे प्रकार करते ते पाहून हुसेन जमादार विषण्ण होतात. या निमित्ताने जमादार वाचन करु लागतात, महात्मा गांधीच्या आत्मकथेच्या वाचनाचा विलक्षण परिणाम त्यांच्यावर होतो. मग त्यांचे हात लिहिण्यासाठी शिवशिवू लागतात. जीभही वळवळू लागते. या वेळापर्यंत वेगवेगळ्या नोकऱ्या उदरनिर्वाहासाठी ते करतात आणि उरलेला वेळ आपल्या समाजाच्या सेवेसाठी खर्च करतात. पण नंतर त्यांना उच्च शिक्षणाची तळमळ लागते. ते पदवी संपादन करतात जेव्हा एकदा समाज अपरिहार्य असलेली सुधारणा आत्मबळाने करण्याला नकार देतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे बाह्य हस्तक्षेपाला आमंत्रणच देत असतो. सती बंदीच्या बाबतीत असे घडले. इंग्रजी राज्यकर्त्यांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यासारखी सतीबंदी केली आणि बहुसंख्य हिंदूंनी ती निमूटपणे मान्यही केली. मागास देशात शासनाने अशी पावले टाकली तर समाज निमूटपणे त्या गोष्टी मान्य करतो. पण शासन पक्ष मताच्या मतलबापोटी आपली ही ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्याबाबत अंगचुकारपणा करतो. तलाक मुक्ती मोर्च्यांच्या संदर्भात या गोष्टी ढळढळीतपणे पुढे येतात. आपल्या संविधानाशी राज्यकर्त्यांनी सतत द्रोह मांडला आहे. जात, वंश, धर्म, भाषा आणि यौनभेदापायी नागरिका-नागरिकता भेद न करण्याच्या संविधानातील आश्वासनाला राज्यकर्ते बिनदिक्कत हरताळ फासतात. गैर मुस्लिम स्त्रियांना असणारे अधिकार मुस्लिम स्त्रीला नाकारले जातात. संविधानाने असे स्पष्ट आश्वासन दिले आहे की, कायद्यासमक्ष सर्व नागरिकांना समान समजले जाईल आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण दिले जाईल. पण त्यासाठी समान कायदा असायला हवा तो मात्र केलेला नाही. हिंदू स्त्रीला जे संरक्षण आहे ते मुस्लिम स्त्रीला नाही. जबानी तलाक आणि चार सवतींच्या कात्रीत मुस्लिम स्त्री अडकली आहे. या कात्रीतून तिची सोडवणूक करण्यासाठी वा सुधारणावादी मंडळींनी किती निकराचे प्रयत्न केले ते वाचले की, कोणीही सहृदय माणूस विपण्ण होईल. आपल्याला एक वाईट खोड जडली आहे, अस्पृश्यता हा हिंदूंचा आपसातला मामला, त्यांचे ते पाहून घेतील असे गैरहिंदूंनी मानणे आणि जबानी तलाक आणि चारपर्यंत सवती नांदवण्याची मुभा हा मुसलमानांचा अंतर्गत प्रश्न असल्याने त्यांचा ते सोडवतील. सुदैवाने हमीद दलवाई, हुसेन जमादार, सैयद भाई, वजीर पटेल, रजिया पटेल यांना राष्ट्र सेवा दलातील व साने गुरुजींना मानणाऱ्या आंतर भारतीयाच्या कार्यकर्त्यांनी समाजवाद्यांनी नेहमीच साथ दिली. त्याची कृतज्ञतापूर्वक नोंद हुसेन जमादारांनी केली आहे. धर्मनिरपेक्षता मानणाऱ्यांची साथ सुधारणावाद्यांना मिळावी इ. स्वाभाविकच म्हटले पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूरमध्ये सुधारणावाद्यांना अनुकूल अशी पार्श्वभूमी मिळालेली आहे. मुस्लिम समाज प्रबोधनाच्या कार्यालाही पार्श्वभूमी उपकारक ठरली असे म्हटले पाहिजे. मुस्लिम सत्य शोधक मंडळाची स्थापना पुण्यात झाली. तिथे त्याने मूळ धरले पण मुसलमानांच्या सुधारणावादी चळवळीला कोल्हापूरकरांनी नेहमीच साथ दिली. हुसेन जमादारांचे तेच कार्यक्षेत्र असल्याने त्यांना या गोष्टींचा फायदा झाला. आजही त्यांना तेथे अनेकांची साथ मिळत आहे. सुधारणवाद्यांना त्यामुळे स्वाभाविकच आनंद झाला होता. पण जमातवाद्यांपुढे सरकारचे गुडघे टेकले आणि सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा धाब्यावर बसवून त्यांनी मुस्लिम स्त्रीला पुन्हा वाऱ्यावर सोडणारा कायदा केला. देशात मताधिकोशाचा व्होट बँक जो खेळ चालला आहे त्याचाच हा प्रताप आहे. ज्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आपल्या राजकीय सोयीकरता धाब्यावर बसवला तेच सरकार राम-जन्मभूमी-बाबरी मशीद वादात सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवते तेव्हा त्यांच्या ढोंगीपणाची चीड आल्यावाचून राहत नाही. मुस्लिम सनातनी सुधारणवाद्यांना काफिरची उपाधी उत्साहाने देतात. त्या शब्दाचा आपल्या लोकांवर जादूसारखा परिणाम होतो असे त्यांना वाटते. कारण मग युक्तिवाद करण्याची गरजच राहात नाही. प्रत्येक सुधारणवादी नास्तिक असतो असे नाही, हुसेन जमादार नास्तिक नाहीत, पण अंध धर्मश्रद्धही नाहीत. हमीद दलवाई हे नास्तिक होते, तसे जाहीरपणे ते सांगत आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणींना ते हिमतीने तोंडही देत. पण तरी ते स्वतःला मुसलमान म्हणवत. त्यांना जेव्हा एक मौलानांनी बिनतोड वाटणारा प्रश्न विचारला की, तुम्ही मुसलमान आहात काय तेव्हा दलवाई म्हणाले की, मी जोवर स्वतःला मुसलमान म्हणवतो तोवर कोणाही मुल्ला मौलवीला मी मुसलमान नाही असे लेखण्याचा अधिकार नाही, पण हल्ली काही मंडळींनी धर्माची प्रमाणपत्रे वाटण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला आहे. हुसेन जमादारांच्या लिखाणाच्या एका वैशिष्ट्याचा खास उल्लेख केला पाहिजे. हा एक दुर्मिळ गुण आहे. त्यांच्या लिखाणामागची भूमिका रागे भरावे कवणासी अशी सर्वांबद्दलच्या करुणेची आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. फासावर लटकविणाऱ्यांबद्दल खिस्त म्हणाला होता, ‘देवा त्यांना क्षमा कर. ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.’ - यदुनाथ थत्ते ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more