* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ADNEYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982770
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A JOURNEY OF 6 PEOPLE, ALL FROM DIFFERENT PLACES BOUND TOGETHER WITH A DREAM IN THEIR EYES, SET OUT TOGETHER TO FIND OUT THE PLACE WHERE THEIR DREAM WOULD COME TRUE DHARINI, SAKHI, CHETAN, KANCHAN, NAKUL AND ABHIMANYU. THEY DID NOT KNOW EACH OTHER UNTIL THEY SET OUT FOR THIS JOURNEY IN A BOAT. ABHIMANYU BECAME THEIR GUIDE DURING THIS JOURNEY. THEY WERE LEAST AWARE OF WHAT THEY WANTED OR WHERE WOULD THEY GO ON LIKE THIS, BUT FAITH MADE IT SIMPLE FOR THEM. WITHOUT HESITATION, THEY CONTINUED THEIR JOURNEY, ONE STEP AFTER OTHER. IT WAS SAKHI WHO FOUND HER DESTINATION FIRST. SHE MET HER PRINCE CHARMING ON THE WAY. KANCHAN, FINDS HIS PARIS, THE PHILOSOPHER’S STONE WHILE CHETAN FINDS THE TRUE COLOURS OF LIFE. DHARINI AND NUKUL FIND SOLACE IN EACH OTHER’S COMPANY. AT THE END, ABHIMANYU REALIZES THAT HE WAS THE GUIDE BUT HIS DESTINATION WAS BLISS THAT WAS AT THE END OF THE JOURNEY. A WONDERFUL FORMAT OF LITERARY WORK LEAVES YOU THINKING ABOUT THE JOURNEY OF LIFE, THE THINGS WHICH WE REALLY CRAVE FOR, THE DESIRE THAT WE HAVE IN OUR MINDS FOR THE THINGS AROUND US AND EVERY SUCH THING THAT WE HAVE IN OUR MINDS BUT HAVE NEVER GIVEN IT ANY SERIOUS THOUGHT UNTIL TODAY. A MUST TO READ AND LATER TO RETROSPECT
‘‘तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?’’ आदिवासी ‘‘मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती.’’ चेतन ‘‘प्रतिकृती कोणाची?’’ आदिवासी ‘‘माणसांची.’’ चेतन ‘‘माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. झाडात जीव असतो. ती पुन:पुन्हा उगवतात. तुमचे धातूचे देव असे पुन:पुन्हा उगवतात का? किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार राहते. मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं; झाडं, किडे, प्राणी! कारण माती मूर्तिरूपात असताना आपण श्रद्धा पेरलेली असते. धातू तर साधा ध्वनी स्वीकारू शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो. तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADNEYA #ADNEYA #अज्ञेय #FICTION #MARATHI #REKHABAIJAL #रेखाबैजल "
Customer Reviews
  • Rating StarPanchdhara Magazine July-Dec.17

    लेखनातील सातत्य अन् बरोबरीने वाचकप्रियता टिकविणे हे तसे सेपे काम नसते. रेखा बैजल यांच्या लेखनाने मात्र ते साधले आहे. आतापर्यंत कादंबरी, कथा, नाटके, एकांकिका, ललित असे बहुविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत यशस्वीरित्या. अनेक पुरस्कार, मानसन्मान देील त्यांना लाभले आहेत. यातच ज्याला मानाचा शिरपेच म्हणता येईल अशी अज्ञेय ही साधारण शंभर पानी लघुकादंबरी मेहता पब्लिशिंगतर्पेâ प्रसिद्ध झाली आहे. अनेक अर्थांनी हे लेखन आगळेवेगळे आहे. हे एक अतिसुंदर रुपक आहे. लेखिकेनेच म्हटल्याप्रमाणे एखाद्या सार्वत्रिक, विश्वव्यापी विचार मांडायचा तर रुपक शैली उपयोगाची ठरते. इथे व्यक्ती, काळ, स्थळ त्याच्या मर्यादा ओलांडून लेखनस्वातंत्र्य घेता येते. हा एक मुक्तविहार असतो, अज्ञेयाच्या प्रवासाचा. खरं तर हे लेखन म्हणजे एक सुंदर प्रवासच आहे. कल्प प्रदेशाचा प्रवास. एका वाटाड्यासह अभिमन्यूसह इथे सहा प्रवासी आहेत. त्यातले पाच ज्ञात. एक अज्ञात. रुपक बंधात वि.स. खांडेकरांनी लिहिलंय फार पूर्वी. गंगाधर गाडगीळांची बिनचेहेNयाची संध्याकाळ पटकन आठवते या संदर्भात. गूढ, अगम्याचा शब्दप्रवास सहज घडविणाNया जी.ए. कुलकर्णी यांच्या रुपक कथाही आठवतात. या शिवाय मला आठवण झाली ती ग्रेस यांच्या कवितेची. कवितेची म्हणू की महाकाव्याची? पण रेखा बैजल यांचे प्रस्तुत लिखाण वाचताना या थोर प्रतिभावंताचे स्मरण व्हावे यातच त्यांच्या लेखनाचा गौरसव आहे, असे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते. खरे तर या लिखाणाला कादंबरी म्हणावे की, आणखीच काही हा देखील साहित्यिक समीक्षेच्या क्षेत्रात वादाचा, चर्चेचा विषय ठरू शकतो. पण आपण त्या वादात पडू या नको..... ज्यांना थोडे ‘हटके’ वाचायची ऊर्मी येते अधूनमधून त्यांनी वाचायलाच हवे असे हे लेखन आहे. हे एक तत्त्वचिंतक रसाळ प्रवचन आहे. प्रवचनात विंâवा कीर्तनात दाखले असतात. रूप (क), रंग असतात. विचार असतो, अनुभव असतो, विवेचन असते. इथेही हे सारे काही एकवटले आहे. सुंदररित्या परस्परात गुंफले गेले आहे. अभिमन्यू, चेतन, कांचन, नकुल, धारिणी यांचा हा अज्ञात प्रदेशाचा प्रवास एका वास्तव, न्याय-अन्याय, नीती-अनीती, सत्य-असत्य अन् ऋ़तू अशा तात्त्विक परिभाषांच्या विश्लेषणातून हे लेखन आपल्यापुढे अवकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य रेखाटतं. इंद्रधनुष्याच्या सातही रंगांची नांव आपल्याला माहिती असतात. वर्णपटलातील त्या रंगांचा क्रमदेखील आपल्याला अचंबित करते, संभ्रमित करते. माणूस अन् निसर्गातले वाढते अंतर, आपल्यातल्या चंगळवादातून अंकुरलेला भोगवाद, नैतिकतेविषयी बदललेल्या संकल्पना, कीर्ती, अहंभाव या मोहजालाची आपल्या शरीराभवतीची पकड, आपल्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवरचे उंचसखल खाचखळगे या या साNया धवलकृष्ण पाश्र्वभूमीवर आयुष्याला रंगीत, सुगंधित करण्याची माणसाची केविलवाणी धडपड सहा प्रवासांची ही प्रवाही कथा प्रत्येक पानावर एक नवा धडा शिकवून जाते. आपण सारेच स्वप्न बघतो. आपण कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कांचनमृगाचा ध्याय घेतो. स्पर्धेच्या जाळ्यात अडकतो. मोहपाशात गुंतत जातो. विवेक-अविवेकाच्या हिंदोळ्यांवर झुलत कधी, वर आकाशात तर कधी धरणीवर असे हिंदकळत राहतो. खरं काय खोटं काय या प्रश्नांची उत्तरं शोध घेऊनही मिळत नाहीत. मग आपले आपणच ठरवत जातो चांगले-वाईट. आपणच आपला न्यायदेखील करत जातो. स्वतःच स्वतःला शाबासकी देऊन टाकतो. लेखिकेचं हे तिला सर्वाधिक आवडलेलं लिखाण असल्याचं त्यांनी सुरुवातीला म्हटलयं. ते सार्थ आहे. कारण लेखिकेची प्राजंळ, स्फटिकासारखी पारदर्शी अन् प्रतिभेची उत्कट परिसस्पर्श लाभलेली तत्त्वचिंतक भूमिका पानोपानी अनुभवता येते. लेखन अल्पाक्षरी असल्याने हे चिंतन बोजड होत नाही हे महत्त्वाचे. त्यातले ललित्य टिवूâन राहते-शेवटपर्यंत! या कल्प प्रदेशाच्या प्रवासात जीवन अन् निसर्ग हे हातात हात घालून आपल्याबरोबर वाटचाल करतात. नैसर्गिक शक्ती कुठल्यातरी असामान्य शक्तीत आपसूक परिवर्तित होत जाते आपल्या नकळत. आपल्या विचारांच्या परिघाची त्रिज्यादेखील आपसुक वाढत जाते. रबर ताणलं की लांबी वाढते तशी. पण तरीही ताण कुठे जाणवत नाही. इच्छांचं कक्षा ओलांडून स्वप्नांचं रूप धारण करणं बघताना हरखून जायला होतं. चेतनच्या चित्रातले रंग असोत की बासरीवाल्याच्या वेणुतले सप्तसूर. रंग, गंध, स्वर, ताल, शब्द, काव्य या प्रतिभेच्या, कलेच्या छटा आयुष्याच्या विविधांगांना लपेटून एक अद्भू नवा, सृजनात्मक कलाविष्कार घडवून वाचकाला अचंबित करतात. इथे फक्त नीती, सत्य, पावित्र्य, चांगलेपण, विवेक याचाच बोलबाला नाही. इथे धारिणीच्या माध्यमातून स्खलनदेखील आहे. मुळातच माणूस स्खलनशील आहे. चुका करणं हा आपला धर्म आहे. असं वचन आहे. धारिणी इतरांना ऊब देण्यासाठी स्वतःच्या शरीराचं वस्र त्यांना पांघरते. त्यातून ती गर्भ धारण करते. या गर्भाचा नेमका पिता कोण हा प्रश्न पडतो. पण तो इथे चुटकीसरशी सोडवला जातो. ज्याने संगच केला नाही, ते फक्त प्रेम असा नकुल पितृत्त्व स्वीकारतो. शारीरिक गरजांवर शाश्वत प्रेमभावना (इथे प्लेटो आठवतो प्लेटॉनिक लव्ह ही संज्ञा आठवते) मात करून जाते. या प्रवाशांबरोबर वाचकदेखील एका उंच कड्यावर जाऊन मोकळा श्वास घेतो शुद्ध हवेत! आपल्या अवतीभवतीच्या शकडो, हजारो, लाखो माणसांचं प्रतिनिधित्व करणारे हे पाच प्रवासी एकेका चक्रव्यूहातून आपली अलवार सुटका करीत जातात. अभिमन्यू ते की आपण हेही कळत नाही. तशी प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत एक असते. पण कुवत मात्र सारखी नसते. त्या त्या वेळच्या भावना आपल्या कृतीला वेगवेगळ्या दिशा देतात. हा नव्या दिशेचा शोध आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. जाणीवा जागवणारा, चैतन्य पुâलविणारा. कारण वेगवेगळ्या कारणाने आपल्या शरीरावर, विचारांवर, प्रतिभेवर चेतनेवर राख पसरत जातो. त्यामुळे आतली उष्णतेची धग असूनही नसल्यासारखी वाटते. अभिमन्यू ही राख बाजूला सारण्याचे, पुंâकर मारून निखारे पेटविण्याचे काम करतो. जंगलात अस्वल मारल्यावर ध्यानात येतं तर गर्भार, पोटुशी अस्वलीण होती. इथे धरिणीतलं ममत्व पाझरतं. धारिणी धरिणी होते. तिच्या मातृत्वाचा नैसर्गिक पान्हा पाझरतो. मोठ्या कष्टानं अस्वलिणीच्या पिलाचा जन्म होतो. आई शेवटी एकच असते. प्राण्यातली, पक्ष्यातली, माणसातली! मातृत्व हे फक्त शरीराशी संबंधित नसतं. ते मनाशी, अंतरंगाशी संबंधित असतं. संग, गर्भधारणा, पालनपोषण, जीवन अन् शेवटी मरण या नैसर्गिक पायNया.. हा एकसंध प्रवास जे निसर्गात, जे चार पायांच्या प्राण्यांत तेच माणसांत पायांच्या संख्येने काही फरक पडत नाही. माणूस हा सारखा काही तरी मिळविण्यासाठी धडपडतो. कीर्ती हवी असते. नाव हवंच असतं. इथे मला अकारण अण्णा हजारे, मेधा पाटकर अन् केजरीवाल यांची आठवण झाली. साNयांचे उद्देश चांगले. पण कीर्तीच्या हव्यासापोटी, नावाच्या प्रसिद्धीच्या मोहापायी चांगल्याचं वांगलं होतं. काही मिळवलं की काय मिळवायचं राहिले ते कळतं. मग ते उरलं सुरलं मिळविण्यासाठी वेगळी धडपड. वेगळी पडझड धडपडीपोटी पडझड आलीच. संन्याशाचं विवेचन उत्तम. आपल्यातल्या प्रत्येकाला दृष्टी असते; पण दृष्टिकोन नसतो. शब्दांच्या या अवघड वाटा लेखिकेनं सहजरित्या ओलांडल्या. पार केल्या. हे एक शिवधनुष्य म्हणायला हवं. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वाचताना मला का कुणास ठाऊक ग्रेसची कविता वाचत असल्यासारखं वाटलं. गूढ अनाकलनीय तरीही मोहून टाकणारं, आनंद देणारं वाचनाचं समाधान देणारं. सत्य दाहक असतं. हादरविणारं असतं. हे सारं वाचताना मनाची पूर्वतयारी हवी. म्हणजे हादरे कमी बसतील. उलट आकाशपाळण्यात उंच उंच झुलण्याचं समाधान लाभेल. रेखा बैजल यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देणारी ही कादंबरी. अज्ञेय प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. पण हे वाचण्यासाठी पेशन्स मात्र हवेत. सर्वांगसुंदर लेखनासाठी, प्रकाशनासाठी लेखिकेचे, प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन. डाॅ.विजय पांढरीपांडे, पंचधारा नियतकालिक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more