* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ADNEYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982770
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A JOURNEY OF 6 PEOPLE, ALL FROM DIFFERENT PLACES BOUND TOGETHER WITH A DREAM IN THEIR EYES, SET OUT TOGETHER TO FIND OUT THE PLACE WHERE THEIR DREAM WOULD COME TRUE DHARINI, SAKHI, CHETAN, KANCHAN, NAKUL AND ABHIMANYU. THEY DID NOT KNOW EACH OTHER UNTIL THEY SET OUT FOR THIS JOURNEY IN A BOAT. ABHIMANYU BECAME THEIR GUIDE DURING THIS JOURNEY. THEY WERE LEAST AWARE OF WHAT THEY WANTED OR WHERE WOULD THEY GO ON LIKE THIS, BUT FAITH MADE IT SIMPLE FOR THEM. WITHOUT HESITATION, THEY CONTINUED THEIR JOURNEY, ONE STEP AFTER OTHER. IT WAS SAKHI WHO FOUND HER DESTINATION FIRST. SHE MET HER PRINCE CHARMING ON THE WAY. KANCHAN, FINDS HIS PARIS, THE PHILOSOPHER’S STONE WHILE CHETAN FINDS THE TRUE COLOURS OF LIFE. DHARINI AND NUKUL FIND SOLACE IN EACH OTHER’S COMPANY. AT THE END, ABHIMANYU REALIZES THAT HE WAS THE GUIDE BUT HIS DESTINATION WAS BLISS THAT WAS AT THE END OF THE JOURNEY. A WONDERFUL FORMAT OF LITERARY WORK LEAVES YOU THINKING ABOUT THE JOURNEY OF LIFE, THE THINGS WHICH WE REALLY CRAVE FOR, THE DESIRE THAT WE HAVE IN OUR MINDS FOR THE THINGS AROUND US AND EVERY SUCH THING THAT WE HAVE IN OUR MINDS BUT HAVE NEVER GIVEN IT ANY SERIOUS THOUGHT UNTIL TODAY. A MUST TO READ AND LATER TO RETROSPECT
‘‘तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?’’ आदिवासी ‘‘मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती.’’ चेतन ‘‘प्रतिकृती कोणाची?’’ आदिवासी ‘‘माणसांची.’’ चेतन ‘‘माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. झाडात जीव असतो. ती पुन:पुन्हा उगवतात. तुमचे धातूचे देव असे पुन:पुन्हा उगवतात का? किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार राहते. मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं; झाडं, किडे, प्राणी! कारण माती मूर्तिरूपात असताना आपण श्रद्धा पेरलेली असते. धातू तर साधा ध्वनी स्वीकारू शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो. तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADNEYA #ADNEYA #अज्ञेय #FICTION #MARATHI #REKHABAIJAL #रेखाबैजल "
Customer Reviews
  • Rating StarPanchdhara Magazine July-Dec.17

    लेखनातील सातत्य अन् बरोबरीने वाचकप्रियता टिकविणे हे तसे सेपे काम नसते. रेखा बैजल यांच्या लेखनाने मात्र ते साधले आहे. आतापर्यंत कादंबरी, कथा, नाटके, एकांकिका, ललित असे बहुविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत यशस्वीरित्या. अनेक पुरस्कार, मानसन्मान देील त्यांना लाभले आहेत. यातच ज्याला मानाचा शिरपेच म्हणता येईल अशी अज्ञेय ही साधारण शंभर पानी लघुकादंबरी मेहता पब्लिशिंगतर्पेâ प्रसिद्ध झाली आहे. अनेक अर्थांनी हे लेखन आगळेवेगळे आहे. हे एक अतिसुंदर रुपक आहे. लेखिकेनेच म्हटल्याप्रमाणे एखाद्या सार्वत्रिक, विश्वव्यापी विचार मांडायचा तर रुपक शैली उपयोगाची ठरते. इथे व्यक्ती, काळ, स्थळ त्याच्या मर्यादा ओलांडून लेखनस्वातंत्र्य घेता येते. हा एक मुक्तविहार असतो, अज्ञेयाच्या प्रवासाचा. खरं तर हे लेखन म्हणजे एक सुंदर प्रवासच आहे. कल्प प्रदेशाचा प्रवास. एका वाटाड्यासह अभिमन्यूसह इथे सहा प्रवासी आहेत. त्यातले पाच ज्ञात. एक अज्ञात. रुपक बंधात वि.स. खांडेकरांनी लिहिलंय फार पूर्वी. गंगाधर गाडगीळांची बिनचेहेNयाची संध्याकाळ पटकन आठवते या संदर्भात. गूढ, अगम्याचा शब्दप्रवास सहज घडविणाNया जी.ए. कुलकर्णी यांच्या रुपक कथाही आठवतात. या शिवाय मला आठवण झाली ती ग्रेस यांच्या कवितेची. कवितेची म्हणू की महाकाव्याची? पण रेखा बैजल यांचे प्रस्तुत लिखाण वाचताना या थोर प्रतिभावंताचे स्मरण व्हावे यातच त्यांच्या लेखनाचा गौरसव आहे, असे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते. खरे तर या लिखाणाला कादंबरी म्हणावे की, आणखीच काही हा देखील साहित्यिक समीक्षेच्या क्षेत्रात वादाचा, चर्चेचा विषय ठरू शकतो. पण आपण त्या वादात पडू या नको..... ज्यांना थोडे ‘हटके’ वाचायची ऊर्मी येते अधूनमधून त्यांनी वाचायलाच हवे असे हे लेखन आहे. हे एक तत्त्वचिंतक रसाळ प्रवचन आहे. प्रवचनात विंâवा कीर्तनात दाखले असतात. रूप (क), रंग असतात. विचार असतो, अनुभव असतो, विवेचन असते. इथेही हे सारे काही एकवटले आहे. सुंदररित्या परस्परात गुंफले गेले आहे. अभिमन्यू, चेतन, कांचन, नकुल, धारिणी यांचा हा अज्ञात प्रदेशाचा प्रवास एका वास्तव, न्याय-अन्याय, नीती-अनीती, सत्य-असत्य अन् ऋ़तू अशा तात्त्विक परिभाषांच्या विश्लेषणातून हे लेखन आपल्यापुढे अवकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य रेखाटतं. इंद्रधनुष्याच्या सातही रंगांची नांव आपल्याला माहिती असतात. वर्णपटलातील त्या रंगांचा क्रमदेखील आपल्याला अचंबित करते, संभ्रमित करते. माणूस अन् निसर्गातले वाढते अंतर, आपल्यातल्या चंगळवादातून अंकुरलेला भोगवाद, नैतिकतेविषयी बदललेल्या संकल्पना, कीर्ती, अहंभाव या मोहजालाची आपल्या शरीराभवतीची पकड, आपल्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवरचे उंचसखल खाचखळगे या या साNया धवलकृष्ण पाश्र्वभूमीवर आयुष्याला रंगीत, सुगंधित करण्याची माणसाची केविलवाणी धडपड सहा प्रवासांची ही प्रवाही कथा प्रत्येक पानावर एक नवा धडा शिकवून जाते. आपण सारेच स्वप्न बघतो. आपण कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कांचनमृगाचा ध्याय घेतो. स्पर्धेच्या जाळ्यात अडकतो. मोहपाशात गुंतत जातो. विवेक-अविवेकाच्या हिंदोळ्यांवर झुलत कधी, वर आकाशात तर कधी धरणीवर असे हिंदकळत राहतो. खरं काय खोटं काय या प्रश्नांची उत्तरं शोध घेऊनही मिळत नाहीत. मग आपले आपणच ठरवत जातो चांगले-वाईट. आपणच आपला न्यायदेखील करत जातो. स्वतःच स्वतःला शाबासकी देऊन टाकतो. लेखिकेचं हे तिला सर्वाधिक आवडलेलं लिखाण असल्याचं त्यांनी सुरुवातीला म्हटलयं. ते सार्थ आहे. कारण लेखिकेची प्राजंळ, स्फटिकासारखी पारदर्शी अन् प्रतिभेची उत्कट परिसस्पर्श लाभलेली तत्त्वचिंतक भूमिका पानोपानी अनुभवता येते. लेखन अल्पाक्षरी असल्याने हे चिंतन बोजड होत नाही हे महत्त्वाचे. त्यातले ललित्य टिवूâन राहते-शेवटपर्यंत! या कल्प प्रदेशाच्या प्रवासात जीवन अन् निसर्ग हे हातात हात घालून आपल्याबरोबर वाटचाल करतात. नैसर्गिक शक्ती कुठल्यातरी असामान्य शक्तीत आपसूक परिवर्तित होत जाते आपल्या नकळत. आपल्या विचारांच्या परिघाची त्रिज्यादेखील आपसुक वाढत जाते. रबर ताणलं की लांबी वाढते तशी. पण तरीही ताण कुठे जाणवत नाही. इच्छांचं कक्षा ओलांडून स्वप्नांचं रूप धारण करणं बघताना हरखून जायला होतं. चेतनच्या चित्रातले रंग असोत की बासरीवाल्याच्या वेणुतले सप्तसूर. रंग, गंध, स्वर, ताल, शब्द, काव्य या प्रतिभेच्या, कलेच्या छटा आयुष्याच्या विविधांगांना लपेटून एक अद्भू नवा, सृजनात्मक कलाविष्कार घडवून वाचकाला अचंबित करतात. इथे फक्त नीती, सत्य, पावित्र्य, चांगलेपण, विवेक याचाच बोलबाला नाही. इथे धारिणीच्या माध्यमातून स्खलनदेखील आहे. मुळातच माणूस स्खलनशील आहे. चुका करणं हा आपला धर्म आहे. असं वचन आहे. धारिणी इतरांना ऊब देण्यासाठी स्वतःच्या शरीराचं वस्र त्यांना पांघरते. त्यातून ती गर्भ धारण करते. या गर्भाचा नेमका पिता कोण हा प्रश्न पडतो. पण तो इथे चुटकीसरशी सोडवला जातो. ज्याने संगच केला नाही, ते फक्त प्रेम असा नकुल पितृत्त्व स्वीकारतो. शारीरिक गरजांवर शाश्वत प्रेमभावना (इथे प्लेटो आठवतो प्लेटॉनिक लव्ह ही संज्ञा आठवते) मात करून जाते. या प्रवाशांबरोबर वाचकदेखील एका उंच कड्यावर जाऊन मोकळा श्वास घेतो शुद्ध हवेत! आपल्या अवतीभवतीच्या शकडो, हजारो, लाखो माणसांचं प्रतिनिधित्व करणारे हे पाच प्रवासी एकेका चक्रव्यूहातून आपली अलवार सुटका करीत जातात. अभिमन्यू ते की आपण हेही कळत नाही. तशी प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत एक असते. पण कुवत मात्र सारखी नसते. त्या त्या वेळच्या भावना आपल्या कृतीला वेगवेगळ्या दिशा देतात. हा नव्या दिशेचा शोध आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. जाणीवा जागवणारा, चैतन्य पुâलविणारा. कारण वेगवेगळ्या कारणाने आपल्या शरीरावर, विचारांवर, प्रतिभेवर चेतनेवर राख पसरत जातो. त्यामुळे आतली उष्णतेची धग असूनही नसल्यासारखी वाटते. अभिमन्यू ही राख बाजूला सारण्याचे, पुंâकर मारून निखारे पेटविण्याचे काम करतो. जंगलात अस्वल मारल्यावर ध्यानात येतं तर गर्भार, पोटुशी अस्वलीण होती. इथे धरिणीतलं ममत्व पाझरतं. धारिणी धरिणी होते. तिच्या मातृत्वाचा नैसर्गिक पान्हा पाझरतो. मोठ्या कष्टानं अस्वलिणीच्या पिलाचा जन्म होतो. आई शेवटी एकच असते. प्राण्यातली, पक्ष्यातली, माणसातली! मातृत्व हे फक्त शरीराशी संबंधित नसतं. ते मनाशी, अंतरंगाशी संबंधित असतं. संग, गर्भधारणा, पालनपोषण, जीवन अन् शेवटी मरण या नैसर्गिक पायNया.. हा एकसंध प्रवास जे निसर्गात, जे चार पायांच्या प्राण्यांत तेच माणसांत पायांच्या संख्येने काही फरक पडत नाही. माणूस हा सारखा काही तरी मिळविण्यासाठी धडपडतो. कीर्ती हवी असते. नाव हवंच असतं. इथे मला अकारण अण्णा हजारे, मेधा पाटकर अन् केजरीवाल यांची आठवण झाली. साNयांचे उद्देश चांगले. पण कीर्तीच्या हव्यासापोटी, नावाच्या प्रसिद्धीच्या मोहापायी चांगल्याचं वांगलं होतं. काही मिळवलं की काय मिळवायचं राहिले ते कळतं. मग ते उरलं सुरलं मिळविण्यासाठी वेगळी धडपड. वेगळी पडझड धडपडीपोटी पडझड आलीच. संन्याशाचं विवेचन उत्तम. आपल्यातल्या प्रत्येकाला दृष्टी असते; पण दृष्टिकोन नसतो. शब्दांच्या या अवघड वाटा लेखिकेनं सहजरित्या ओलांडल्या. पार केल्या. हे एक शिवधनुष्य म्हणायला हवं. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वाचताना मला का कुणास ठाऊक ग्रेसची कविता वाचत असल्यासारखं वाटलं. गूढ अनाकलनीय तरीही मोहून टाकणारं, आनंद देणारं वाचनाचं समाधान देणारं. सत्य दाहक असतं. हादरविणारं असतं. हे सारं वाचताना मनाची पूर्वतयारी हवी. म्हणजे हादरे कमी बसतील. उलट आकाशपाळण्यात उंच उंच झुलण्याचं समाधान लाभेल. रेखा बैजल यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देणारी ही कादंबरी. अज्ञेय प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. पण हे वाचण्यासाठी पेशन्स मात्र हवेत. सर्वांगसुंदर लेखनासाठी, प्रकाशनासाठी लेखिकेचे, प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन. डाॅ.विजय पांढरीपांडे, पंचधारा नियतकालिक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more