* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A GOLDEN AGE
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788184989908
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 284
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :TAHMIMA ANAM COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
REHANA HAQUE, A YOUNG WIDOW, BLISSFULLY PREPARES FOR THE PARTY SHE WILL HOST FOR HER SON AND DAUGHTER. BUT THIS IS 1971 IN EAST PAKISTAN, AND CHANGE IS IN THE AIR. SET AGAINST THE BACKDROP OF THE BANGLADESH WAR OF INDEPENDENCE, A GOLDEN AGE IS A STORY OF PASSION AND REVOLUTION; OF HOPE, FAITH, AND UNEXPECTED HEROISM IN THE MIDST OF CHAOS—AND OF ONE WOMAN`S HEARTBREAKING STRUGGLE TO KEEP HER FAMILY SAFE
’द कॉस्टा फर्स्ट नॉव्हेल अवॉर्ड’ आणि ’द गार्डियन फर्स्ट बुक अवॉर्ड’ यांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेली कादंबरी. 1971च्या वसंत ऋतूमध्ये रेहाना हक आपल्या दोन मुलांना एक मेजवानी देत आहे. तिला हे माहीत नाही की, आजच्या दिवसानंतर त्यांची सर्वांची आयुष्यं कायमची आणि पार बदलून जाणार आहेत, कारण हा पूर्व पाकिस्तान आहे... युद्धाला तयार झालेला. आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीत रेहानाला एका काळीज पिळवटून टाकणार्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली ’अ गोल्डन एज’ ही कादंबरी क्रांती, आशा आणि अनपेक्षित शौर्य यांची कथा सांगते आणि तीही प्रेमाच्या लांबलचक मार्गावरून जाणारी...!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TECHDINSONERI #AGOLDENAGE #तेचदिनसोनेरी #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BHARATIPANDE #भारतीपांडे #TAHMIMAANAM #तहमिमाअनम "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 14-5-17

    ब्रिटनस्थित बांगलादेशी लेखिका तहमिमा अनम यांच्या ‘अ गोल्डन एज’ या कादंबरीचा भारती पांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे. ‘माझ्या पतीस, आज मी आपली मुलं गमावली’, या वाक्यांनी सुरुवात झालेली ही कादंबरी प्रारंभीपासूनच उत्सुकता ताणते आणि नंतर पकड घेते. पाकिस्तन आणि बांगलादेश या दोन्ही देशांतील अस्थिर वातावरणाची पाश्र्वभूमी लाभलेल्या या कादंबरीची नायिका आहे रेहाना हक. रेहाना ही सामथ्र्यशाली आई आहे आणि तिच्याच दृष्टिकोनातून ही युद्धकथा मांडली आहे. ती आपल्या दोन मुलांना एक मेजवानी देते. मात्र, त्या दिवसानंतर त्या सगळ्यांच्याच आयुष्याला कलाटणी मिळते. युद्धखोर पूर्व पाकिस्तानात आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी तिला सर्व शक्तीनिशी लढावे लागते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 16-10-2016

    ‘अ गोल्डन एज’ ही १९७५ मध्ये ढाक्यात जन्मलेल्या लेखिका तहमिमा अनम यांची पाहिली कादंबरी आहे. बांगलादेशाच्या फाळणीच्या पाश्र्वभूमीवर बेतलेल्या या कहाणीचे भारती पांडे यांनी ‘तेच दिन सोनेरी’ हे मराठी भाषांतर केले आहे. अनुवादासाठी पांडे यांनी निवडलेल्या याकथानकात एका देशाच्या निर्मितीची व एका कुटुंबाची रेशमी भावबंधांची अशी दुहेरी घट्ट वीण असून एक सशक्त कथाबीज लपलेले आहे. यातील घटनांचा आवाका प्रचंड असूनही पात्रांचा फापटपसारा नाही व कुठेही विषयांतर नाही. त्यामुळेच या पुस्तकाची पकड कुठेही सैल होत नाही. यातील नाट्य एवढे पकड घेणारे आहे की यावर एखादा उत्तम चित्रपट किंवा नाटकही निघू शकेल. एका अत्यंत सामान्य आणि अबला भासणाऱ्या स्त्रीमधील सुप्त ऊर्जा तिच्याकडून कोणकोणते धाडस करवून घेऊ शकते याचा एक अत्यंत सहजसुंदर आविष्कार म्हणजे ही कादंबरी. मुलांची ताटातूट झाल्यावर त्यांना परत मिळविण्यासाठी एका निराधार विधवा मातेनं पार पडलेल्या दिव्यांचा रहस्यभेद आपल्या हृदयाचे ठोके वाढवतो. ‘दोन पिढ्यांमधील अंतर संपवून टाकण्यासाठी आपल्या मुलांना जिंकण्यासाठी, जपण्यासाठी धडपडणाऱ्या या मातेच्या शांत जीवनाला अंतर्बाह्य ढवळून काढणारा घटनाक्रम थेट आपल्या जाणिवांना हात घालतो.’ पाकिस्तानी लष्करांनी स्त्री-पुरूषांवर केलेल्या अत्याचारांच्या आक्रोशाचा भयानक आवाज, क्रूर मानवसंहाराच्या भळभळत्या जखमा हे सर्व असूनही कुठेही भडकपणा न आणता एक संयत अशी मांडणी करणं हे उल्लेखनीय कौशल्य आहे. एका मातेचं स्वाभाविक अपत्यप्रेम, तरूण-तरुणींचे सलज्ज कोवळे प्रेम, देशप्रेम अशा प्रेमाच्या विविधरुपांसह यात जपलेला धार्मिक सलोखा व शेजाऱ्याचे प्रेम हे सारे आपले भावजीवन समृद्ध करून जाते. एका सुग्रणीने केलेले रुचकर असे सामिष भोजनातील विविध पदार्थ बंगाली खाद्यसंस्कृतीची आतून ओळख करून देतात. बांगलादेशच्या फाळणीची पार्श्वभूमी असलेल्या एका स्त्रीने एका स्त्रीची लिहिलेली ही पाहिलीवहिली गोष्ट जाणून घेताना मिळणारा वाचनानंदही उत्कट असाच आहे. ...Read more

  • Rating StarSAMANA 16.10.16

    सामना १६.१०.२०१६ ‘अ गोल्डन एज’ ही १९७५ मध्ये ढाक्यात जन्मलेल्या लेखिका तहमिमा अनम यांची पाहिली कादंबरी आहे. बांगलादेशाच्या फाळणीच्या पाश्र्वभूमीवर बेतलेल्या या कहाणीचे भारती पांडे यांनी ‘तेच दिन सोनेरी’ हे मराठी भाषांतर केले आहे. अनुवादासाठी पांडे यंनी निवडलेल्या या कथानकात एका देशाच्या निर्मितीची व एका कुटुंबाची रेशमी भावबंधांची अशी दुहेरी घट्ट वीण असून एक सशक्त कथाबीज लपलेले आहे. यातील घटनांचा आवाका प्रचंड असूनही पात्रांचा फापटपसारा नाही व कुठेही विषयांतर नाही. त्यामुळेच या पुस्तकाची पकड कुठेही सैल होत नाही. यातील नाट्य एवढे पकड घेणारे आहे की यावर एखादा उत्तम चित्रपट विंâवा नाटकही निघू शकेल. एका अत्यंत सामान्य आणि अबला भासणाNया स्त्रीमधील सुप्त ऊर्जा तिच्याकडून कोणकोणते धाडस करवून घेऊ शकते याचा एक अत्यंत सहजसुंदर आविष्कार म्हणजे ही कादंबरी. मुलांची ताटातूट झाल्यावर त्यांना परत मिळविण्यासाठी एका निराधार विधवा मातेनं पार पडलेल्या दिव्यांचा रहस्यभेद आपल्या हृदयाचे ठोके वाढवतो. ‘दोन पिढ्यांमधील अंतर संपवून टाकण्यासाठी आपल्या मुलांना जिंकण्यासाठी, जपण्यासाठी धडपडणाऱ्या या मातेच्या शांत जीवनाला अंतर्बाह्य ढवळून काढणारा घटनाक्रम थेट आपल्या जाणिवांना हात घालतो.’ पाकिस्तानी लष्करांनी स्त्री-पुरूषांवर केलेल्या अत्याचारांच्या आक्रोशाचा भयानक आवाज,व्रूâर मानवसंहाराच्या भळभळत्या जखमा हे सर्व असूनही कुठेही भडकपणा न आणता एक संयत अशी मांडणी करणं हे उल्लेखनीय कौशल्य आहे. एका मातेचं स्वाभाविक अपत्यप्रेम, तरूण-तरुणींचे सलज्ज कोवळे प्रेम, देशप्रेम अशा प्रेमाच्या विविधरुपांसह यात जपलेला धार्मिक सलोखा व शेजाऱ्याचे प्रेम हे सारे आपले भावजीवन समृद्ध करून जाते. एका सुग्रणीने केलेले रुचकर असे सामिष भोजनातील विविध पदार्थ बंगाली खाद्यसंस्कृतीची आतून ओळख करून देतात. बांगलादेशच्या फाळणीची पाश्र्वभूमी असलेल्या एका स्त्रीने एका स्त्रीची लिहिलेली ही पाहिलीवहिली गोष्ट जाणून घेताना मिळणारा वाचनानंदही उत्कट असाच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more