* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
REHANA HAQUE, A YOUNG WIDOW, BLISSFULLY PREPARES FOR THE PARTY SHE WILL HOST FOR HER SON AND DAUGHTER. BUT THIS IS 1971 IN EAST PAKISTAN, AND CHANGE IS IN THE AIR. SET AGAINST THE BACKDROP OF THE BANGLADESH WAR OF INDEPENDENCE, A GOLDEN AGE IS A STORY OF PASSION AND REVOLUTION; OF HOPE, FAITH, AND UNEXPECTED HEROISM IN THE MIDST OF CHAOS—AND OF ONE WOMAN`S HEARTBREAKING STRUGGLE TO KEEP HER FAMILY SAFE
’द कॉस्टा फर्स्ट नॉव्हेल अवॉर्ड’ आणि ’द गार्डियन फर्स्ट बुक अवॉर्ड’ यांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेली कादंबरी. 1971च्या वसंत ऋतूमध्ये रेहाना हक आपल्या दोन मुलांना एक मेजवानी देत आहे. तिला हे माहीत नाही की, आजच्या दिवसानंतर त्यांची सर्वांची आयुष्यं कायमची आणि पार बदलून जाणार आहेत, कारण हा पूर्व पाकिस्तान आहे... युद्धाला तयार झालेला. आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीत रेहानाला एका काळीज पिळवटून टाकणार्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली ’अ गोल्डन एज’ ही कादंबरी क्रांती, आशा आणि अनपेक्षित शौर्य यांची कथा सांगते आणि तीही प्रेमाच्या लांबलचक मार्गावरून जाणारी...!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TECHDINSONERI #AGOLDENAGE #तेचदिनसोनेरी #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BHARATIPANDE #भारतीपांडे #TAHMIMAANAM #तहमिमाअनम "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 14-5-17

    ब्रिटनस्थित बांगलादेशी लेखिका तहमिमा अनम यांच्या ‘अ गोल्डन एज’ या कादंबरीचा भारती पांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे. ‘माझ्या पतीस, आज मी आपली मुलं गमावली’, या वाक्यांनी सुरुवात झालेली ही कादंबरी प्रारंभीपासूनच उत्सुकता ताणते आणि नंतर पकड घेते. पाकिस्तन आणि बांगलादेश या दोन्ही देशांतील अस्थिर वातावरणाची पाश्र्वभूमी लाभलेल्या या कादंबरीची नायिका आहे रेहाना हक. रेहाना ही सामथ्र्यशाली आई आहे आणि तिच्याच दृष्टिकोनातून ही युद्धकथा मांडली आहे. ती आपल्या दोन मुलांना एक मेजवानी देते. मात्र, त्या दिवसानंतर त्या सगळ्यांच्याच आयुष्याला कलाटणी मिळते. युद्धखोर पूर्व पाकिस्तानात आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी तिला सर्व शक्तीनिशी लढावे लागते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 16-10-2016

    ‘अ गोल्डन एज’ ही १९७५ मध्ये ढाक्यात जन्मलेल्या लेखिका तहमिमा अनम यांची पाहिली कादंबरी आहे. बांगलादेशाच्या फाळणीच्या पाश्र्वभूमीवर बेतलेल्या या कहाणीचे भारती पांडे यांनी ‘तेच दिन सोनेरी’ हे मराठी भाषांतर केले आहे. अनुवादासाठी पांडे यांनी निवडलेल्या याकथानकात एका देशाच्या निर्मितीची व एका कुटुंबाची रेशमी भावबंधांची अशी दुहेरी घट्ट वीण असून एक सशक्त कथाबीज लपलेले आहे. यातील घटनांचा आवाका प्रचंड असूनही पात्रांचा फापटपसारा नाही व कुठेही विषयांतर नाही. त्यामुळेच या पुस्तकाची पकड कुठेही सैल होत नाही. यातील नाट्य एवढे पकड घेणारे आहे की यावर एखादा उत्तम चित्रपट किंवा नाटकही निघू शकेल. एका अत्यंत सामान्य आणि अबला भासणाऱ्या स्त्रीमधील सुप्त ऊर्जा तिच्याकडून कोणकोणते धाडस करवून घेऊ शकते याचा एक अत्यंत सहजसुंदर आविष्कार म्हणजे ही कादंबरी. मुलांची ताटातूट झाल्यावर त्यांना परत मिळविण्यासाठी एका निराधार विधवा मातेनं पार पडलेल्या दिव्यांचा रहस्यभेद आपल्या हृदयाचे ठोके वाढवतो. ‘दोन पिढ्यांमधील अंतर संपवून टाकण्यासाठी आपल्या मुलांना जिंकण्यासाठी, जपण्यासाठी धडपडणाऱ्या या मातेच्या शांत जीवनाला अंतर्बाह्य ढवळून काढणारा घटनाक्रम थेट आपल्या जाणिवांना हात घालतो.’ पाकिस्तानी लष्करांनी स्त्री-पुरूषांवर केलेल्या अत्याचारांच्या आक्रोशाचा भयानक आवाज, क्रूर मानवसंहाराच्या भळभळत्या जखमा हे सर्व असूनही कुठेही भडकपणा न आणता एक संयत अशी मांडणी करणं हे उल्लेखनीय कौशल्य आहे. एका मातेचं स्वाभाविक अपत्यप्रेम, तरूण-तरुणींचे सलज्ज कोवळे प्रेम, देशप्रेम अशा प्रेमाच्या विविधरुपांसह यात जपलेला धार्मिक सलोखा व शेजाऱ्याचे प्रेम हे सारे आपले भावजीवन समृद्ध करून जाते. एका सुग्रणीने केलेले रुचकर असे सामिष भोजनातील विविध पदार्थ बंगाली खाद्यसंस्कृतीची आतून ओळख करून देतात. बांगलादेशच्या फाळणीची पार्श्वभूमी असलेल्या एका स्त्रीने एका स्त्रीची लिहिलेली ही पाहिलीवहिली गोष्ट जाणून घेताना मिळणारा वाचनानंदही उत्कट असाच आहे. ...Read more

  • Rating StarSAMANA 16.10.16

    सामना १६.१०.२०१६ ‘अ गोल्डन एज’ ही १९७५ मध्ये ढाक्यात जन्मलेल्या लेखिका तहमिमा अनम यांची पाहिली कादंबरी आहे. बांगलादेशाच्या फाळणीच्या पाश्र्वभूमीवर बेतलेल्या या कहाणीचे भारती पांडे यांनी ‘तेच दिन सोनेरी’ हे मराठी भाषांतर केले आहे. अनुवादासाठी पांडे यंनी निवडलेल्या या कथानकात एका देशाच्या निर्मितीची व एका कुटुंबाची रेशमी भावबंधांची अशी दुहेरी घट्ट वीण असून एक सशक्त कथाबीज लपलेले आहे. यातील घटनांचा आवाका प्रचंड असूनही पात्रांचा फापटपसारा नाही व कुठेही विषयांतर नाही. त्यामुळेच या पुस्तकाची पकड कुठेही सैल होत नाही. यातील नाट्य एवढे पकड घेणारे आहे की यावर एखादा उत्तम चित्रपट विंâवा नाटकही निघू शकेल. एका अत्यंत सामान्य आणि अबला भासणाNया स्त्रीमधील सुप्त ऊर्जा तिच्याकडून कोणकोणते धाडस करवून घेऊ शकते याचा एक अत्यंत सहजसुंदर आविष्कार म्हणजे ही कादंबरी. मुलांची ताटातूट झाल्यावर त्यांना परत मिळविण्यासाठी एका निराधार विधवा मातेनं पार पडलेल्या दिव्यांचा रहस्यभेद आपल्या हृदयाचे ठोके वाढवतो. ‘दोन पिढ्यांमधील अंतर संपवून टाकण्यासाठी आपल्या मुलांना जिंकण्यासाठी, जपण्यासाठी धडपडणाऱ्या या मातेच्या शांत जीवनाला अंतर्बाह्य ढवळून काढणारा घटनाक्रम थेट आपल्या जाणिवांना हात घालतो.’ पाकिस्तानी लष्करांनी स्त्री-पुरूषांवर केलेल्या अत्याचारांच्या आक्रोशाचा भयानक आवाज,व्रूâर मानवसंहाराच्या भळभळत्या जखमा हे सर्व असूनही कुठेही भडकपणा न आणता एक संयत अशी मांडणी करणं हे उल्लेखनीय कौशल्य आहे. एका मातेचं स्वाभाविक अपत्यप्रेम, तरूण-तरुणींचे सलज्ज कोवळे प्रेम, देशप्रेम अशा प्रेमाच्या विविधरुपांसह यात जपलेला धार्मिक सलोखा व शेजाऱ्याचे प्रेम हे सारे आपले भावजीवन समृद्ध करून जाते. एका सुग्रणीने केलेले रुचकर असे सामिष भोजनातील विविध पदार्थ बंगाली खाद्यसंस्कृतीची आतून ओळख करून देतात. बांगलादेशच्या फाळणीची पाश्र्वभूमी असलेल्या एका स्त्रीने एका स्त्रीची लिहिलेली ही पाहिलीवहिली गोष्ट जाणून घेताना मिळणारा वाचनानंदही उत्कट असाच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more