REKHA BAIJAL

About Author

Birth Date : 06/07/1952


REKHA BAIJAL IS A RENOWNED WRITER. SO FAR, HE HAS SUCCESSFULLY HANDLED MANY TYPES OF LITERATURE LIKE NOVELS, ANTHOLOGIES, PLAYS, ONE-ACT PLAYS, FINE ARTS. HE HAS DONE STORYTELLING PROGRAMS ON DOORDARSHAN, E TV, ALPHA TV. MARATHWADA UNIVERSITY B.A. AND M.A. HIS STORIES AND POEMS ARE INCLUDED IN THE SYLLABUS. CONCLUDED AT PARBHANI HE HAS CHAIRED THE 2ND MARATHWADA LEKHIKA SAMMELAN.

रेखा बैजल एक प्रथितयश लेखिका आहेत. आतापर्यंत कादंबरी, कथासंग्रह, नाटके, एकांकिका, ललित असे अनेक साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. दूरदर्शन, ई टीव्ही, अल्फा टीव्ही या वाहिन्यांवर त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झाले आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रमात त्यांच्या कथा व कविता समाविष्ट झाल्या आहेत. परभणी येथे संपन्न झालेल्या दुसरे मराठवाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या साहित्यावर प्रा. दादासाहेब गिऱ्हे यांनी पीएच. डी. मिळविली आहे. रेखा बैजल यांनी काटा रुते कुणाला या चित्रपटाचे लेखनही केले आहे. आकाशवाणीच्या पुणे, औरंगाबाद, परभणी या केंद्रांवरून त्यांच्या कथा, कवितांचे सातत्याने प्रसारण होत असते. त्यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगु, इंग्रजी या भाषांत अनुवाद झाले आहेत. रेखा बैजल यांना समग्र लिखाणासाठी अनंत काणेकर पुरस्कार , पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, त्यांच्या लेखनाला बा.सी. मर्ढेकर पुरस्कार , नाथमाधव पुरस्कार (गोवा) , महाराष्ट्र राज्य शासनाचे सहा पुरस्कार असे एकुण पंचवीस पुरस्कार मिळाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
ADNEYA Rating Star
Add To Cart INR 120
PRASTHAN Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more