* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ABHAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669305
  • Edition : 11
  • Publishing Year : SEPTEMBER 1961
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE SKY THE NAME SHANKAR PATIL IS NOW WELL RECOGNIZED IN THE WORLD OF MARATHI LITERATURE. HIS SAVOUR DIALOGUES AND LANGUAGE WITH ITS RURAL TOUCH BINDS TOGETHER PERFECTLY WELL GIVING IT A DEFINITE TOUCH AND FRESHNESS. HE VERY APTLY COMBINES THE VARIOUS CHANGES IN THE NATURE, THE SOCIAL CHANGES AND THE COMBINED EFFECT OF IT ON THE RURAL LIFE AND CULTURE, IN HIS STORIES. MEMORIES ARE LIKE THE CLOUDS, FULL OF RAINS, READY TO POUR ANYTIME, ENDLESSLY. SOMETIMES, THEY POUR LIGHTLY AND SOMETIMES VERY STRONGLY. BUT THE MEMORIES HAVE THE STRENGTH TO EVOKE THE DEEPEST CORDS, TENDEREST MOMENTS. THE MEANINGS OF MEMORIES CHANGE FROM PERSON TO PERSON YET THEY FILL THE MIND WITH THE RESONANCE OF THE MONOTONOUS RAIN AND THE CLOUDY MIND MERGES INTO THE CLOUDY SKY.
शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक स्थान मिळवून आहे. त्यांचे चटपटीत संवाद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा आणतात. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन याचा ग्रामीण संस्कृतीवर होणारा परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात. आठवणी या भरून आलेल्या आभाळासारख्या असतात. मग पावसाचा हलकासा शिडकावा असो वा झोडपणारा धुवाधार पाऊस असो, माणसागणिक त्याचा अर्थ बदलत जातो. पावसाचा एकसुरी निनाद कानात घुमू लागला की मग भरून आलेल्या आभाळात दाही दिशा लुप्त होतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NICHARA#HISHEB#KAVALA#VAVTAL#SOBAT#VATANI#KONDI#AABHAL#ARDHALI#JEET#VANGAN#PANGAL#VATCHAL
Customer Reviews
  • Rating StarAmir Bagwan

    मातीचा गंध असलेला लेखक शंकर पाटील प्रतेक पान वाचताना जानवत ते शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक स्थान मिळवून आहे. त्यांचे चटपटीत संवाद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा आणतात. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन याचा ग्रामीण संसकृतीवर होणारा परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात. आठवणी या भरून आलेल्या आभाळासारख्या असतात. मग पावसाचा हलकासा शिडकावा असो वा झोडपणारा धुवाधार पाऊस असो, माणसागणिक त्याचा अर्थ बदलत जातो. पावसाचा एकसुरी निनाद कानात घुमू लागला की मग भरून आलेल्या आभाळात दाही दिशा लुप्त होतात. ...Read more

  • Rating StarAniket Wadwale

    शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे लेणे आहे. त्यांचं लेखन विलक्षण पारदर्शी! त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाही; त्यामागे सामाजिक जाणीव आहे. यांच्या कथेनिर्मितीमागे प्रचंड घडामोड आहे. गुंतागुंत आहे त्यांची कथा चिंतनाच्या डोळ्यातूनच जन्मते. कथेद्वारेपरंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. खेड्यातली माणसं ,त्यांच्यातील परस्परसंबंध,आणि खेड्यांचे मन हे त्यांच्या कथांचे विषय आहे. त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमलेले आहे. ग्रामीण जीवन,ग्रामीण मन, ग्रामीण भाषा यांचा विचार करताना सारच बदलल आहे हे जाणीव त्यांनी मांडली...... कधी ते जुन्या नव्यातील पडलेल्या अंतर समजून घेतील, तर कधी आजूबाजूच्या माणसाशी गप्पा मारत बसतील.आपलं गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा. अश्या वेगळ्याच गावाची पाटीलकी लाभलेला हा माणूस........ चार पाऊले उमटवू आपुली ठेवू खुणेचा मार्ग बरा..... असं म्हणत पाय नेतील तिकडे वाचकांना पथदर्शन करायला लावणारे शंकर पाटील.... शंकर पाटील हे नाव मराठी वाचकांच्या मनात एक स्थान मिळवून आहे.त्यांची चटपटीत संवाद आणि गावरान भाषेचा बाज हा प्रत्येक वेळेस नवीन प्रकारे आपल्या अनुभवास मिळतो. निसर्गातले विविध बदल,सामाजिक परवर्तन ह्याचा ग्रामीण संस्कृती होणार परिणाम ते आपल्या कथांमधून मांडतात.. शंकर पाटील म्हणतात की, आठवण या भरून आलेलया आभाळा सारख्या असतात. मग पावसाचा हलकासा शिडकावा असो वा धुवाधार पाऊस असो माणसागणिक त्याचा अर्थ बदलत जातो.पावसाची एकसुरी निनाद कानात घुमू लागला की मन भरून आलेले आभाळात दाहीदिशा लुप्त होतात.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more