* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHITAK
  • Availability : Available
  • ISBN : 9788190779128
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1975
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE IS A WHOLE WORLD OUT; NOT OF THE SO CALLED LITERATE AND MIDDLE CLASS PEOPLE BUT OF THOSE WHO ARE DOWN TRODDEN, THERE ARE FARMERS, WORKERS, LABOURERS, DRIVERS, CLEANERS, MECHANIC, PROSTITUTES...; THEY ALL LEAVE WITH THEIR INSULTS, THEIR POVERTY, AND THEIR INSECURITIES; STILL THEY HAVE THE SPIRIT TO FIGHT ALL THESE ADVERSITIES IN THEIR LIVES. THIS WORLD HAS INSPIRED THE AUTHOR. THE STORIES IN THIS BOOK ARE BASED ON ALL SUCH PEOPLE, OF THEIR AFFLICTION AND ALSO OF THEIR HAPPY MOMENTS. CHITAAK WILL HELP YOU TO REALIZE THAT THE BASE OF RURAL STORIES IS NOT ALWAYS THE RURAL LANGUAGE. THE FARMERS SPEAK THE LANGUAGE IN NORMAL TONE AND STYLE TOO; AT THE SAME TIME THERE ARE OTHER PEOPLE WHO HAS THE RURALITE ACCENT TO THEIR SPOKEN SKILLS.
सुशिक्षित पांढरपेशांच्या सुरक्षित टीचभर जगाबाहेरही पदोपदीच्या अपमानांचे व दु:खांचे हालाहल पचवीत नियतीशी चिवटपणे झुंजत जगणाया शेतकरीकामकरीमजूरड्रायव्हरक्लीनरमेकॅनिक वारयोषिया आदि पददलित लोकांचं एक विशाल असं जग आहे. हेच जग लेखनाची प्रेरणा व शक्ती... ‘चिताक’मध्ये कथा आहेत त्या ह्याच जगातील लोकांच्या, रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळकांच्याही. चाकोरीबद्ध ग्रामीण वाङ्मय वाचून ग्रामीण बोली खेड्यापाड्यातील केवळ शेतकरीच नित्य बोलत असतो असा जो समज सर्वसामान्य मराठी वाचकांत रूढ झाला आहे, त्याला ‘चिताक’मुळे छेद जायला हरकत नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    सुशिक्षित पांढरपेशांच्या सुरक्षित टीचभर जगाबाहेरही, पदोपदीच्या अपमानांचं व दु:खांचं हलाहल पचवीत नियतीशी चिवटपणे झुंजत जगणाऱ्या शेतकरी, कामकरी, मजूर, ड्रायव्हर, क्लीनर, मेकॅनिक, जोगते, जोगतिणी, वारयोषिता आदी पददलित लोकांचं एक विशाल असं जग आहे. हेचजग श्री. महादेव मोरे यांच्या लेखनाची प्रेरणा व शक्ती. समाजाच्या तळागाळातील हे जग... ‘चिताक’मध्ये कथा आहेत त्या याच जगातील लोकांच्या... त्यांच्या ओढगस्तीच्या जगण्यातील रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळकांच्याही... या संग्रहास महाराष्ट्र शासनाचा १९७५-७६ सालचा राज्यपुरस्काराचा सन्मानही प्राप्त झाला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रिया आपल्या गळ्यात एक विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात, त्याला ‘चिताक’ म्हणतात. कोल्हापूर-राधानगरी भागात हे ‘चिताक’ आजही आढळते. ...Read more

  • Rating Star SAKAL SAPTRANG 8-3-2009

    ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रिया गळ्यात विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात. या दागिन्याला ‘चिताक’ असे म्हणतात. जुन्या काळातील हा दागिना कोल्हापूर-राधानगरी भागातील स्त्रियांच्या गळ्यात आजही आढळतो. महादेव मोरे यांच्या कथासंग्रहाचे नाव हेच आहे. मोर हे त्याच भागातील (निपाणी) असल्याने त्या भागातील एका खणखणीत शब्दाचे शीर्षक त्यांनी त्या संग्रहाला दिले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वर्षी ही दुसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. मोरे हे विपुल लेखन करणारे लेखक आहेत. आजवर त्यांचे सतरा कथासंग्रह (एक अनुवादित, एक निवडक), तितक्याच कादंबऱ्या (एक अनुवादित), एक ललित लेखसंग्रह आणि व्यक्तिचित्रांचे तीन संग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘चिताक’ या शीर्षकाची एकही कथा या संग्रहात नाही. मात्र, सर्व कथांचा मिळूनच हा एक कथादागिना (चिताक) आहे, असा अर्थ घेता येईल. एकंदर वीस कथा संग्रहात आहेत. मोरे यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. ग्रामीण भाषेतील विविध अर्थसंपन्न शब्दांनी लगडलेली अशी ही शैली वाचकाला वेगळ्याच जगात घेऊन जाते. सुशिक्षित, पांढरपेशाच्या छोट्या जगाबाहेरही एक जग असते. शेतकऱयांचे, कामकाऱयांचे, मजुरांचे, जोगत्यांचे, वारयोषितांचे... या जगातील माणसे पदोपदी अपमान, मानहानी, वंचना, उपेक्षा, दु:खे यांचे हलाहल पचवीत नियतीशी झुंज देत जगत असतात. मोरे यांच्या लेखनाची मुख्य प्रेरणा आहे ती या जगातील माणसांचीच. ‘चिताक’मधून त्यांनी याच माणसांची सुख-दु:खे, कथा-व्यथांचे चित्रण केले आहे. हा कथासंग्रह ग्रामीण भागातील वाचकांना आपल्या मातीतील वाटेल; तर शहरी भागातील वाचकांना दैनंदिन जीवनाहून एका वेगळ्याच जगाचे दर्शन घडवेल. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 19-4-2009

    साहित्यातून जे बहुपेडी जीवनानुभव व्यक्त होतात, त्यातून अनेक अनुभवांचे ज्ञान मिळून आपले जीवन संपन्न बनते. शहरातल्या लोकांना ग्रामीण जीवनाचे तर खेड्यातल्या लोकांना शहरी जीवनाचे आकर्षण कायम असते. चिताक या ग्रामीण कथा आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रया गळ्यात एक विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात त्याला `चिताक` म्हणतात. कोल्हापूर, राधानगरी भागात हे चिताक आजही वापरतात. पांढरपेशा जीवनाशी जवळीक साधू पाहणारे त्यात आपली जागा पक्की करून त्यात अस्तित्व टिकवू पाहणारी शेतकरी, कामकरी, मजूर, ड्रायव्हर, क्लीनर, मेकॅनिक, जोगते आदी पददलित लोकांचं विशाल असं जग, तेच मोरे यांच्या लेखनाची प्रेरणा व शक्ती. माणूस आपल्या जीवनात आनंद शोधत असतो. ओढगस्तीच्या जगण्यातील रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळका या कथातून वेगळाच अनुभव देतात. माणसाच्या सुखाच्या शोधाची ही धडपड कथांना एक वेगळेच परिमाण देते. भजी हांदलली, गाडी लहडून गेली, बोंबडी मारला, दवडणे, परतडमदी अशा प्रकारच्या वेगळ्या रचना मराठीचा वेगळा बाज व्यक्त तर करतातच पण त्यातून त्यांचा जीवनानुभव जास्त भिडतो. विविध कष्टांची कामं करत आयुष्य जगणाऱ्या मोरेंना आपल्या अवतीभवती जी कथाबीजं मिळाली तीच त्यांनी फार सुंदर फुलवली असं या कथातून जाणवतं. माणसांची हतबलता त्याला कसं जीवन जगायला भाग पाडते, हे मांडताना काही वेळा त्यातूनही जीवन जगतांना क्षणाक्षणाला आनंदाचा शोध मनोहारी वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more