* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DILEMMA & OTHER STORIES
  • Availability : Available
  • Translators : VANITA SAWANT
  • ISBN : 9788171619474
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE MARATHI TRANSLATION BY VANITA SAVANT, ORIGINALLY WRITTEN BY VIJAYDAN DETHA, IS A STORY COLLECTION OF `DVANDVA`. IN THE FIRST STORY OF `DUALITY`, IMMEDIATELY AFTER THE MARRIAGE, THE HUSBAND, WHO HAS BEEN ABROAD FOR FIVE YEARS ABROAD FOR TRADING WITH THE OBJECTIVE TO INCREASE HIS WIFE`S WEALTH AND LEAVE HIM ALONE, AND IN A SIMILAR FASHION, IT IS DESCRIBED AS A LIVING GHOST. POWER, WEALTH AND AUTHORITY CAN CAUSE MEN`S FEET TO FALL; WHAT DO WOMEN THINK IF THEY WANT TO OVERCOME THEM? THE EVENTS OF THIS EVENT ARE IN THE STORY OF `NYARI NYARI LIMAA`; THE GENIUS, THE GENUINE WEAVER KABIR, WHO HAS GONE BEYOND JOKE AND HIS SEPARATION KABIR`S LIFE PHILOSOPHY COMES IN THE STORY OF `KABIR KABIR`, IN HIS EXTRAORDINARY MEETING WITH THE KEEN PRINCESS AND KING WHO CAME TO KNOW. ALL THE WOMEN OF THE WORLD HAVE ONLY ONE RAMAYANA - MEN CAN GET FOOLS AND THEY ARE LAKSHU, A VETERAN WHORE, SAYS, "IT WILL BE THE RESULT OF THAT DECEPTION THROUGHOUT MY LIFE." THE DESCRIPTION OF THE WILD BEAST THAT PRODUCES A COWBOY (REALLY, PRINCE!) IS BROUGHT TO A HUMBLE MAN BY HIS GUARDIAN, IN THE STORY OF `GRIEVOUS QUESTIONS`. OTHER SUCH STORIES ARE IN THIS STORY. ALTHOUGH THE THREADS OF EACH STORY ARE SLIGHTLY DIFFERENT, THESE STORIES HIGHLIGHTING THE INTRICACIES OF GENDER EQUALITY, ANGER-GREED, COMPETITION, AND ENLIGHTENMENT HIGHLIGHT THE INTRICACIES OF TRADITIONAL IDEAS. ALTHOUGH THESE ARE MYSTERIOUS ENVIRONMENTS AND FANTASY, THESE GENUINE STORIES HAVE THE POWER TO EXHIBIT INTENSE REALITY.
’द्वंद्व’ या पहिल्याच कथेत विवाहानंतर लगेचच भरल्या घरात पत्नीला एकटी सोडून संपत्तीत वाढ करण्याच्या उद्देशाने व्यापारासाठी पाच वर्षे परदेशी जाणारा धनवान नवरा आणि तेवढ्या कालावधीत नवऱ्याचे रूप घेऊन नववधूसोबत राहाणारे भूत याचे वर्णन आहे. सत्ता, संपत्ती आणि अधिकारामुळे पुरुषांचा पाय घसरू शकतो; त्यांना आवर घालण्यासाठी स्त्रियानांही तसे वागावे असे वाटले तर काय? अशा अर्थाचे घटना-प्रसंग ’न्यारी न्यारी मर्यादा’ या कथेमध्ये आहेत; तर राग, लोभाच्या पलीकडे गेलेला अस्सल विणकर कबीर आणि त्याचा वेगळेपणा जाणून घेण्यासाठी आलेली उत्सुक राजकन्या व राजा यांच्या विलक्षण भेटीत कबीराचे जीवनविषयक तत्त्वज्ञान ’दुसरा कबीर’ कथेत येते. दुनियेतील तमाम स्त्रियांचं फक्त एकच रामायण आहे- पुरुषांच्या हातून फसवलं जाणं आणि आयुष्यभर त्या फसवणुकीचा परिणाम भोगणं, असा संदेश लक्खू ही अनुभवी वेश्या ’काकपंथ’ या कथेतून देते. आपल्या निगराणीने वनमानवाला माणसात आणून, गुराखी (खरे तर राजकुमार!) बनवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बंजारनचे वर्णन ’बिकट प्रश्न’ कथेत आहे. अशाच इतर काही कथा या कथासंग्रहामध्ये आहेत. प्रत्येक कथेचे सूत्र थोडेफार वेगळे असले, तरी स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत, राग-लोभ, स्पर्धा, असूया यांवर प्रकाश टाकणार्या या कथा पारंपरिक कल्पनांचे अंतरंग उलगडून दाखवतात. गूढ वातावरण आणि कल्पनारम्यता असली तरी या अस्सल कथांमध्ये प्रखर वास्तवाचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DVANDA#NYARINYARIMARYADA#DUSARAKABEER#KAKAPANTH#BIKATPRASHNA#VEGALAGHARKUL#KAAT#LAAJALU#SWAPNPRIYA#SWAP#SAVADHGIRI#NISHARANICHARUSAVA#CHOR#
Customer Reviews
  • Rating Starअनिल कसूरकर / वनिता सावंत

    ‘द्वंद्व’ हे आपण हृदयांतरीत केलेलं पुस्तक आत्ताच वाचून संपलं. ग्रेट कलाकृतीचा अनुभव एक श्रीमंत अशी तृप्ती देतो. त्या तृप्तीचा अक्षरउद्गार तुम्हाला पाठवीत आहे. ‘विजयदान देथा’ ह्या लेखकाची कथा मी प्रथम ‘अक्षर’ (बहुदा) दिवाळी अंकात ९७ सालाच्या आसपास वाल्याचं मला पुसट स्मरतं आहे. प्रतिमा जोशी यांनी ती ‘काकपंथ’ ह्या गावात आशयांतरीत केलेली होती. त्या कथेनंही मला उखडून काढलं होतं मुळापासून. त्यानंतर मी अनेकांना त्या कथेबद्दल बोललो. थोर कलाकृतीचा सुगंध इतरांच्या ओंजळीत देत राहिल्याशिवाय कसं रहावेल? ‘द्वंद्व’ हे पुस्तक मला अनिल किणीकरांनी दिलं. आता मी ते ह्याला त्याला देत राहीन. त्यावर बोलत आणि ऐकत राहीन. अक्षरकला आपलं जगणं दुपदरी करते असा माझा अनुभव आहे. मला काही असे मित्र आहेत की जे अभिप्राय म्हणून ‘छान, ठीक, बरं आहे...’ अशी चिऊकाऊची भाषा वारण्याऐवजी ‘अरे... सत्तेच्या सामर्थ्यासमोर सत्त्याचं सामर्थ्य कुठवर टिकणार?’ हे वाक्यं काय सॉलीड आहे नाही?... असं उदाहरणासहित मनभर बोलतात. अशा आस्वादात्मक संवादाचंही एक सुख असतं. पण अर्थातच खूप जणांना फक्त असलं सुख लेखक या नात्यानं ‘घेणं’, ठाऊक असतं. वाचक ह्या नात्यानं ‘देणं’ नाही! असो. राजस्थानातून तुम्ही हे अस्सलं देसी तूप महाराष्ट्रात आणलंत आणि ते ही त्याच्या मूलभूत सौंदर्याला धक्का न पोहोचता आणलत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुमची भाषा मौल्यवान आहे. तिचं मी कौतुक करतो. असं दर्जेदार भाषांतर वाचणं हे एक सुख असतं. भाषांतर हे कलाकाराचं काम आहे. येऱ्यागबाळ्याचं नव्हे. भाषांतर ही एक कलाकृतीच असते, हे मान्य करायलाच हवं. तुम्हाला मूळ आशयाची खोलसमज आहे हे भाषांतरातून जाणवतं. कृत्रिम संकोच तुम्ही पाळलेला नाही हे पाहूनही फार समाधान वाटलं. आस्वाद ही पंचेद्रियांनी अनुभवण्याची चीज आहे. तिच्या आड लज्जेचं कुठलही वस्त्र देता कामा नये. तुम्ही केलेली ही अक्षरपूजा फार विशुद्ध आहे. सर्वच कथा एका हारातल्या आहेत पण प्रत्येक फुलाला स्वत:चं असं एक स्थान आहे. फुलं ह्या धरतीवरची वाटू नयेत इतकी स्वर्गीय आहेत. ‘काकपंथ’ ची अखेर डोळ्यांत पाणी आणते. ‘बिकटप्रश्न’ मधील निसर्ग दृष्ये स्वत:चाच विसर पाडतात. कथांचा आशय सत्त्यावर आधारीत असल्याने दणकट आहे. ‘गोष्ट हा रपकासारखा वापरून लेखकाने साऱ्या अवकाशाचं अंगण भरारीसाठी वापरलं आहे. ‘कात’ नावाची कथा चित्रपट काढण्यासाठी सर्वोकृष्ट आहे. मी तो चित्रपट पाहिला आहे वाचत असतानाच अमोल पालेकरचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होईल. असो आभार. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 02-07-2000

    गूढ, कल्पनारम्य कथा... विजयदान देथा यांच्या मूळ राजस्थानी कथांचा वनिता सामंत यांनी अनुवाद केलेला ‘द्वंद्व’ हा कथासंग्रह नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. तेरा कथांचा हा संग्रह आहे. समाजात वावरताना स्त्री-पुरुष समाजाची बंधने, रूढी, रीिरिवाज यांचे ओझे वाहत जगत असतात. अशांचा आढावा घेत लिहिलेल्या या कथा वाचल्यानंतर माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. वनिता सावंत यांनी हा अनुवाद केला आहे. ‘द्वंद्व’ या कथेत एका धनवान सेठजीच्या एकुलत्या एका मुलीचा विवाह पार पडून वरात परत येताना जंगलात एका झाडाच्या सावलीत विश्रांतीसाठी थांबते. त्याच झाडावर एका भुताचा मुक्काम असतो. अत्तर, तेल्याच्या सुगंधाने दरवळणाऱ्या दुल्हनच्या उघड्या चेहऱ्याकडे जेव्हा भुताचे लक्ष जाते तेव्हा त्याचे डोळे दिपतात. तिचे सौंदर्य पाहून भुताच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. ढगातील मुक्काम सोडून बिजली तर नाही ना खाली आली, असे त्याला क्षणभर वाटून जाते. तिच्या झाडाखाली बसण्याने त्या झाडाची सावलीसुद्धा चमकू लागते. दुल्हनच्या शरीरात प्रवेश करण्याचा विचार त्याच्या मनात येतो, परंतु त्याला पुन्हा असेही वाटते की, त्यामुळे हिला त्रास होईल. अशा रूपाला त्रास कसा देता येईल आणि पतीला त्रास दिल्यास पत्नीचे मन तडफडणारच. हे रूप तडफडू लागल्यास ना मेघ बरसतील, ना बिजली चमकेल, ना सूर्य उगवेल ना चंद्र. निसर्गाचं सारं दृश्यच बिघडून जाईल. या सुंदर रूपाला दु:ख देण्याऐवजी स्वत: दु:ख सहन करणं चांगलं. अशातऱ्हेचे दु:ख तरी कुठे नशिबात असतं, असे अनेक विचार भुताच्या मनात येतात. विश्रांतीसाठी थांबलेला दुल्हा-दुल्हनचा रथ अदृश्य होताच तो मूर्च्छा येऊन पडतो. विवाहास झालेला खर्चाचा हिशेब लागत नव्हता म्हणून कपाळावर आठ्या चढवून आकड्यांचा जमाखर्च करणारा दुल्हा सौंदर्याकडे पाठ करून लगेच व्यापारासाठी परदेशी निघणार असतो, ते इकडे दुल्हनच्या सौंदर्याने वेडं झालेलं भूत आपण तिच्या कसे जवळ जाऊ याचाच विचार करत असते. जेव्हा दुल्हा भुताच्या वृक्षाजवळून जातो तेव्हा तो त्याला ओळखून विचारतो, ‘भाई, अजून विवाहाची मंगलगाठसुद्धा सुटली नाही, इतक्या लवकर कुठे चाललात?’ तेव्हा दुल्हा सांगतो, ‘मंगलगाठ काय परदेशात सोडता येत नाही?’ भूत खूप दूरवर सेठजींच्या मुलाबरोबर चालत राहून सगळी हकीकत जाणून घेतो आणि सेठजींच्या मुलाचं रूप धारण करून हवेलीत जाण्याचं ठरवतो. पाच वर्षे तरी आपल्याला कोणी विचारणार नाही. हवेलीत येताच सेठजींना सांगतो, मी परदेशी जात असतानाच एका महात्म्याने मला वरदान दिलं की रोज पलंगावरून खाली उतरताच पाच मोहरा मिळतील. हे ऐकून सेठजी मोहरांच्या लालचीने मुलाला आनंदाने इथेच राहण्यास मान्यता देतो. जिथे जन्मदाते आई-वडील भुताला आपला मुलगा मानतात त्या हुबेहूब चेहऱ्याच्या पुरुषाला आपला पती मानण्यास ती का संकोच करील. पुढे तिला दिवस जातात. परदेशात एका विश्वासू शेजाऱ्याकडून दुल्ह्याला इकडची खरी परिस्थिती समजते. तेव्हा तो मायदेशी परततो. परंतु त्याला अनेक कसोट्यांना उतरावे लागते. शेवटी एका गावंढळ मेंढपाळाच्या न्यायानुसार भुताला जेरबंद केलं जातं. यातूनच दुल्ह्याला दाखवून दिलं की, नुसत्या विवाहाने काय होतं. व्यापार वस्तूंचा होतो, प्रीतीचा नाही. या व्यापारात असाच लाभ होतो. असं विचार करायला लावणारं द्वंद्व. ‘दुसरा कबीर’ या कथेतील कबीराची कला म्हणजे गालिचा, शाल आणि कांबळ्यांवर वेलबुट्ट्या, झाडं-झुडपं आणि फुलं-पानं असं विणीत असे की जणू खरोखरीच आहेत. कबीराची लहर मात्र निराळी होती. खुद्द राजाचं बोलावणं आलं असताना सुद्धा राजाच्या भेटीसाठी न येणारा कबीर. राजकन्येच्या आग्रहाखातर स्वत: राजाच कबीराच्या भेटीस निघतो. तेव्हा कबीराला विचारलं जातं. ‘तू कुणाला आपल्या वस्तू विकत नाहीस, कुणाला भेट देत नाहीस. मग या आहेत कशासाठी?’ यावर कबीराचं उत्तर असतं, ‘गरज असूनसुद्धा ज्यांच्याकडे या वस्तू खरेदी करण्याची क्षमता नाही त्या लोकांसाठी माझी कारागिरी आहे.’ याचाही राग न धरता राजा म्हणतो, इच्छेला येईल ती किंमत माग. तुला पूर्ण सवलत आहे. तेव्हा निर्लोभी कबीर सांगतो, ‘माझ्या गरजा इतक्या कमी आहेत की आपण दिलेली सवलत माझ्या कसल्याच उपयोगी पडणार नाही. आपलं येणं व्यर्थ ठरलं म्हणून पुन्हा एकदा माफी मागतो.’ कोणती असूया, लालच याच्या आहारी न जाणारा निर्लोभी कबीर या कथेतून वाचावयाच मिळतो. ‘काकपंथ’ या कथेत मोती आणि माणिक खाणाऱ्या हंसांना सावकाराचा मुलगा पाणी पाजतो, त्यांना आपल्याजवळील मोत्याचा दाणा खाऊ घालतो. सेठजीला मात्र आपल्या मुलाच्या या कृत्याचा राग येतो. सेठजीच्या मुलाची बायकोही हंसाची देखभाल करते. हंसावर जीवापाड प्रेम करते. हंस परतताना हंस आणि बहू ओक्साबोक्शी रडतात तेव्हा दोघांचे अश्रू एकमेकात मिसळतात आणि अनमोल मोती बनू लागतात. हे पाहून सेठजी खूश होऊन मुलाला दूर मानस सरोवराला मुखिया हंसाच्या भेटीस पाठवतात. तिथे चक्रवाक ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार जर मध्यरात्री याच पत्नीशी मीलन झाले तर कडक नक्षत्रात मुलाचा जन्म होईल. बालपणी त्याच्या लाळेचे अनमोल मोती बनतील आणि मोठा झाल्यावर खोकला की खाकऱ्यातून सव्वा लाखाचं रत्न पडेल. परंतु पाच महिन्यांचा प्रवास असलेल्या ठिकाणी मध्यरात्रीस कसं पोहोचता येणार. तेव्हा उपकाराची परतफेड करणारे हंस त्याला आश्वासन देतो, ‘स्वप्नात पोहोचता येईल की नाही ते स्वप्न पडल्यावरच समजेल, पण मी मध्यरात्रीच्या आधीच तुला बहूच्या शेजघरात पोहोचवून देईन.’ तेव्हा तो स्वत:च्या पंखावर त्याला बसवून घेऊन जातो. अमृतघडीच्या शुभमुहूर्तावर बहूला गर्भधारणा होते. इथेच तिला अनेक कसोट्यांना सामोरे जावे लागते. तिला घराचे दार बंद होते. तेव्हा घोरपडीच्या पापाने पिंपळाला जळावं लागतं हेच इथे सिद्ध होतं. ‘काकपंथा’त सांगितल्याप्रमाणे लख्खू सेठानीला समजावते, ‘बेटी, हे धर्म, कर्म, ज्ञान, भक्ती, कल्याण, अहिंसा, रीतिरिवाज परंपरा आणि मान्यताचे सगळे भ्रम खोटे आहेत. खरा आहे तो फक्त काकपंथ. फरक नसला तरी प्रत्येक रामायणात फरक दिसून येतो. दुनियेतील तमाम स्त्रियांचं फक्त एकच रामायण आहे. पुरुषांच्या हातून फसवलं जाणं आणि त्या फसवणुकीचा आयुष्यभर परिणाम भोगणं. कोणतीही स्त्री या रामायणापासून अस्पर्श नाही. परंतु संसाराच्या भ्रमपाशात ही गोष्ट नीट ध्यान्यात येत नाही.’ ‘वेगळं घरकुल’ या कथेतील बिजा-तिजा यांची कहाणी लक्षवेधी ठरते. त्यांनी घेतलेले निर्णय आणि स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत इथे वाचावयास मिळते तर ‘कांत’ या कथेतील गवळ्याची बायको गावातील ठाकुराला तो अंगचटीला आला असता जोरात हिसका देते आणि घरी येऊन नवऱ्याला आपण केलेले कृत्य ऐकवते. परंतु जुन्या वृत्तीचा गवळी उलट तिलाच तू आपल्या अन्नदात्याच्या बाबतीत असं करायला नको होतं असं सुनावतो. तेव्हा नंतर तिने लढविलेली एकेक शक्कल मात्र वाखणण्यासारखी आहे. तिच्यामध्ये कुठेतरी आजची स्त्री डोकावताना दिसते. एकूणच या सर्व राजस्थानी लोककथांमधून स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत, लोभ-लालसा, ईर्षा, असूया उघड करून दाखविण्याचे सामर्थ्य दिसून येते. अनेक कथांमध्ये गूढ वातावरण आणि कल्पनाशक्तीचा आधार असला तरी सर्व कथा वाचनीय आहेत. -अभिषेक ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT 09-07-2000

    मानवीमनाचा वेध घेणारा कथासंग्रह… लोक कथात वास्तव व कल्पना यांचं मिश्रण असलं तरी त्यातील सत्याचा अंश हा मानवीजीवनातील वास्तवावरच आधारलेला असतो. लोककथांना असलेला गूढ व कल्पिताचा स्पर्श त्यातील मूळ गाभ्याला बाधा आणत नाही. उलट वातावरणनिर्मिती व मनोभूमिक तयार करण्यास हातभारच लावत असतो. अशा लोक कथांतून तत्कालिन समाजजीवनाचे, रूढी परंपरांचे चित्र उभे राहते. ‘द्वंद्व’ हा राजस्थानी लोककथांवर आधारित कथासंग्रह मूळ लेखक विजयदला देथा यांच्या १३ कथांचा अनुवाद केला आहे. वनिता सावंत यांनी स्त्री-पुरुष यांचे विविध स्तरांवरील नातेसंबंध, त्यातून निर्माण होणारे स्त्रीजातीचे दु:ख प्रस्तुत कथांतून व्यक्त झाले आहे. स्त्री कोणत्याही जातीधर्मातील, वर्गातील असो. तिची कथा, व्यथा, वेदना तिचं प्राक्तन एकच असतं, पुरुष जातीकडून होणारी वंचना. ‘द्वंद्व’ या कथेस गूढ, अंधश्रद्धेच्या कल्पनेचा आधार आहे. ऐहिक जीवनातील सुखसंपत्तीच्या, खोट्या प्रतिष्ठेच्या मागे असणारा व्यवहारी दुल्हा व त्याच वृत्तीचा पिता दुल्हनच्या दु:खास कारणीभूत होतात. स्त्री जन्माचीच ही करुण कहाणी आहे. ती एक बाहुलंच असते म्हणून दुल्हनही भूतयोनीतील पतीचे रूपासही ती शरण जाते. परस्त्री व परपुरुषासाठी कुणाचं मन लालचावत नाही पण सामाजिक प्रतिष्ठेमुळे पडदा हटवता येत नाही, पण पडद्याच्या मागे जे घडायचं ते घडतच. या प्रखर वास्तवावर लेखक प्रकाश टाकतो. वर्षानुवर्षं स्त्रीला बंधनात ठेऊन तिला जिवंतपणी, मरणयातना भोगायला लावणं हे आपल्या समाजव्यवस्थेचं वैशिष्ट्य. ‘न्यारी न्यारी मर्यादा’ कथेत स्त्री व पुरुष यांच्या मर्यादा, त्यासंबंधीचे समाजाचे नीतीनियम, दंडक हे वेगवेगळे असतात. पुरुषाची नित्य नवी तृष्णा जागी होत असते. रवीला मात्र असे स्वातंत्र्य नसतेच. स्त्रीच्या मनावरचे दडपण दूर झाले. युगान् युगाच्या बंधनातून मुक्त झालेले जुने संस्कार नष्ट झाल्यावर स्त्री अतिशय धीट बनते. स्त्रीच्या मनाच्या तळघरात दडून राहिलेला भावनांना वाट मिळते. उधाण येते. पुरुषीसत्ता झुगारून देणाऱ्या आधुनिक स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी कथेची नायिका राणीपुढे अनेक प्रश्न उभे राहतात. पारतंत्र्य कसे झुगारता येईल? पुरुषांच्या आचरणाची नक्कल करून? कुणाच्या समजावण्यानं समजून घेणारे नाहीत पुरुष. स्त्रियांची मोकळीक पाहूनच यांना आपल्या मोकळीकीतील काळिमा दिसेल. असा आशावादही व्यक्त होतो. स्त्री मुक्तीच्या वाटेवरची ही कथा ‘दुसरा कबीर’ मधील नायक कबीर हा एक डोळस, निगर्वी, निधड्या छातीचा व मानवताधर्म श्रेष्ठ मानणारा पुरुष. सुंदर स्त्रीच्या रूपाला, तिच्या नजरेतील आव्हानाला, राजाच्या संपत्तीलाही बळी न पडणारा नि:संग कबीर, म्हणूनच मृत्यूसंबंधी तो म्हणू शकतो. ‘‘तलवार आणि सिंहासन या दहशतीनं मृत्यू भयभीत झाला असता तर गोष्ट वेगळी!’’ आणि देशाचा स्वामी हीन होऊन विचारता होतो, ‘‘क्षुद्र रयतेप्रमाणे मलासुद्धा एक दिवस मरावं लागेल काय?’’ कबीराच्या व्यक्तीचित्रणातून लेखक मानवजातीवरील महत्त्वाचे भाष्य करतो. ‘‘दुसऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आणि उच्च समजण्याच्या गैरसमजुतीमुळेच माणसाचा अत्यंत ऱ्हास झाला आणि होतच राहिला आहे. माणसाच्या दृष्टीनं ही किती शरमेची गोष्ट आहे की, धर्म आणि पंथाच्या बहाण्याने मृत झालेले अवतार अजूनपर्यंत जिवंत माणसांवर राज्य करीत आहेत.’’ समाजातील सारे भेदभाव नष्ट होऊन मानवताधर्म हाच श्रेष्ठ धर्म मानला जावा असा विचार मांडला गेलेली ही कथा वाचकाला विचारप्रवृत्त करते. ‘काकपंथ’ ही कथा म्हणजे माणसांमधील कावळ्याच्या वृत्तीची कथा. माणसंच माणसाला टोचून टोचून तचा जीव नकोसा करतात. माणुसकी विसरून मानवतेला कलंक लावण्यासारखं वर्तन करतात आणि या व्यवस्थेला बळी पडते ती स्त्री. प्रत्यक्ष पतीकडून फसवली गेलेली स्त्री अगतिक होऊन जाते. कारण स्त्रीचं सौंदर्य व तारुण्य आजही विकलं जातं. लक्खूच्या तोंडचं ‘‘हे दुष्ट अश्रूच आपल्याला हरवतात. स्त्रीचा यांच्यापेक्षा मोठा वैरी कोणी नाही.’’ हे वक्तव्य समस्त स्त्रीजातीला जागे करते. माणसांच्या जगात माता कुमाता नसते या विश्वासालाही तडा जातो आणि या पाखंडी दुनियेची ओळख खऱ्या अर्थाने पटते तेव्हा स्त्री उरी फुटून जाते हे कठोर वास्तव लेखक सांगतो. ‘‘धर्म-कर्म, ज्ञान, भक्ती, कल्याण, अहिंसा, रीतीरिवाज, परंपरा आणि मान्यतांचे सगळे भ्रम आहेत. खरा आहे तो फक्त काकपंथ. आपला स्वार्थच सगळ्यात महान.’’ हे मानवीजीवनातलं उघडंनागडं सत्य लक्खू वेश्येच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. ‘अकलेचा शिरोमणी असलेला हा माणूस आपल्या दोन पायांच्या बळावर नेहमी कुमार्गावरूनच चालत राहणार?’ असे प्रश्नचिन्ह लेखकाने ‘बिकट प्रश्न’ कथेत उपस्थित केले आहे. वनमानवाच्या रानटी अवस्थेतून प्रगत अवस्थेतील माणसाच्या अवस्थेपर्यंचा त्याचा प्रवास हा एका स्त्रीच्या अथक प्रयत्नांचे फलित होते. स्वार्थानं आंधळा बनून सैतानासारख्या माणसापेक्षा वनमानवाच्या संगतीत राहणे तिने पत्करले. त्याचा अंतर्बाह्य कायापालट केला. वनमानवाचा गुराखी होताच त्याचं सगळं जीवन बदललं आणि स्त्रीच्या दु:खद जीवनप्रवासास सुरुवात झाली. ‘वेगळं घरकुल’ कथेद्वारा समलिंगी संभोगासारखी ज्वलंत व आगळीवेगळी सामाजिक समस्या मांडण्यात आली आहे. ‘‘स्त्रीचं पाण्याशिवाय चालू शकेल, पण पुरुषाच्या घामाशिवाय चालणार नाही.’’ या भाष्यातून स्त्री जुन्या रूढीपरंपरांत गुंतलेलीच आहे आणि ती स्वत:च दास्य पत्करते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. माणसाच्या सामाजिक स्थानावर त्याच्या मानमर्यादा अवलंबून असतात. गावपातळीवर तर हे अधिक प्रकर्षाने जाणवते, अन्नदाता व रयत यांच्यामधील संबंधात ठाकुराशी वैर धरताच येत नाही. येथे पौरुषही हतबल ठरते. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करण्यापलीकडे रयतेला पर्यायच नसतो. ‘कात’ कथेचा नायिका लाछी ही अशीच हतबल स्त्री. ती म्हणते, माणसाच्या वागणुकीत खूप गुंतागुंत असते. कथनी व करणी यात फरक असतो आणि त्याची फळं भोगावी लागतात स्त्रीला. ‘सावधगिरी ‘सारख्या रूपकथेतून लेखक स्त्री-पुरुष नातेसंबंधातील विलक्षण गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. परक्या स्त्रीचं शील भ्रष्ट करण्यामुळे पुरुषांच्या हाती काय लागतं कुणास ठाऊक?’ असं म्हणत असतानाच दुसरीकडे स्त्रीलाही परक्या पुरषात रस असू शकतो. हे जरी अभावानेच आढळत असले तर संपूर्ण असत्य नाही. या सत्यावर प्रकाश टाकलाय. प्रस्तुत कथासंग्रहातील कथांत स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत, प्रेम, लोभ, लालसा, कामभावना उलगडून दाखवण्यासाठी माणसाच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न केला गेला आहे. समाजातील पारंपरिक रूढी, रीतीरिवाज, अलिखित दंडक आणि त्यामुळे स्त्रीजातीवर होणारा अन्याय या वास्तवावर प्रखर-प्रकाश टाकला आहे. बुद्धी भ्रष्ट झालेल्या माणसातील माणूसपणच हरवून गेलं आहे. माणसातील पशुवृत्ती अधिक प्रबळ ठरल्याने तो पशू पातळीवर येऊन हीन; क्रूर कृत्ये करतो. यास बळी पडलेली स्त्री आमरण परिणाम भोगत राहते. स्त्रीच्या दु:खास केवळ व्यक्ती, पुरुष कारणीभूत आहेत असं नव्हे तर संपूर्ण समाजव्यवस्था पुरुषप्रधान समाजव्यवस्था कारणीभूत आहे या सत्यावर प्रकाश पडतो. माणसाचे अंतर्मन उलगडून दाखवणाऱ्या या कथा वास्तवाशी जवळीक साधतात आणि वाचकाला खिन्न करतात. म्हणूनच त्या उत्तम कथा असे म्हणता येईल. -माधुरी महाशब्दे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more