VIJAYA RAJADYAKSHA

About Author

Birth Date : 05/08/1933


VIJAYABAIS EDUCATION IS M.A., PH.D. DONE HE ATTENDED ELPHISTON COLLEGE AND SNDT. WORKED AS HEAD OF MARATHI DEPARTMENT IN MAHILA UNIVERSITY. ALSO M.PHIL. AND SUCCESSFULLY GUIDED MANY STUDENTS OF PH.D. MARATHI CRITIC AND WRITER MANGESH VITTHAL RAJADHYAKSHA WAS HER HUSBAND. HE HAS PUBLISHED 18 COLLECTIONS OF STORIES, 5 LITERARY COLLECTIONS AND 7 REVIEWS AND MANY EDITED BOOKS. VIJAYABAIS STORY CONVEYS A CERTAIN VALUE AND IS CHARACTERIZED BY A FLUID, POETIC STYLE.

विजयाबाईंची शिक्षण एम.ए., पीएच.डी. झाले. त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयात आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच एम.फिल. व पीएच.डी.च्या अनेक विद्याथ्र्यांना यशस्वी मार्गदर्शन केले. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते.त्यांचे १८ कथासंग्रह, ५ ललित लेखसंग्रह आणि ७ समीक्षाग्रंथ तसेच अनेक संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विजयाबाईंची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते आणि तरल, काव्यात्म शैलीने अशी कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. त्यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार तर कवितारती या समीक्षा लेखसंग्रहास रा. श्री. जोग समीक्षा पारितोषिक व राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ समीक्षाग्रंथास साहित्य अकादमीचा आणि कै. केशवराव कोठावळे पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सचिव पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अध्यापक गौरव पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा साहित्यरत्न पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.इंदूर येथे २००१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. इतर विविध संस्थांवरही त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला तसेच सूत्रसंचालन केले. शाळा व महाविद्यालयांसाठी पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ज्ञानपीठ पारितोषिक परीक्षक समिती, चित्रपट परीक्षण मंडळ, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाप्रमाणेच अन्य अनेक संस्थांच्या त्या सदस्य होत्या. त्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी होत्या. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराच्या सल्लागार मंडळाच्या त्या सदस्य आहेत.महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार-२०१९
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
AKHERACHE PARV Rating Star
Add To Cart INR 220
AVATI BHAVATI Rating Star
Add To Cart INR 140
UTTARARDH Rating Star
Add To Cart INR 240
34 %
OFF
VIJAYA RAJADYAKSHA COMBO-3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 600 INR 399

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.