A. B. PATIL

About Author

Birth Date : 25/02/1936
Death Date : 13/09/2016


A.B. PATILS SCHOOL AND COLLEGE EDUCATION WAS DONE IN KOLHAPUR. HAVING A BASIC INTEREST IN AGRICULTURE, HE TOOK ADMISSION IN THE AGRICULTURAL COLLEGE IN PUNE TO GET SCIENTIFIC EDUCATION IN THIS SUBJECT. HE THEN WORKED AS AN ASSISTANT AGRICULTURAL INFORMATION OFFICER IN THE DEPARTMENT OF AGRICULTURE, GOVERNMENT OF MAHARASHTRA. HE WAS ALSO A NEWSPAPER LIAISON OFFICER.

आ.बा. पाटील यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. शेतीची मुळातच आवड असल्याने या विषयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याकरिता त्यांनी पुणे येथील कृषि महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेती विभागात साहाय्यक कृषि माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच ते वृत्तपत्र संपर्क अधिकारीही होते. कृषि सहसंचालक (विस्तार) या पदावरही त्यांनी काम केले. १९९४मध्ये ते जॉइन्ट डायरेक्टर ऑफ अ‍ॅग्रिकल्चर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी १७ वर्षे शेतकरी या मासिकाची संपादक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. ते १९९५पासून शेतकरी शिक्षण माला हे शेतीविषयक मासिक प्रसिद्ध करतात. या मासिकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सध्या त्याचे २८,००० वर्गणीदार आहेत. आजवर त्यांची शेती आणि इतर विषयांवर ३७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे त्यांची सुंदर आपली फुलबाग , सुंदर आपला रोपमळा , शेती करू फायद्याची , बोन्साय आणि घरातील बाग ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून वाचकांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृषि पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पाटील यांनी सकाळ , केसरी (पुणे), तरुण भारत , लोकसत्ता (पुणे), महाराष्ट्र टाइम्स (मुंबई), दै. पुढारी , लोकमत (नागपूर) इत्यादी प्रमुख वृत्तपत्रांमधून सातत्याने शेतीविषयक लेखन केले आहे. पाटील यांच्या इथंच हाय पन या एकांकिकेचे पुस्तक प्रकाशित झाले असून, या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या वैतागवाडी ते विकासवाडी या पुस्तकाला १९७३-७४ सालचा महाराष्ट्र शासनाचा प्रौढसाक्षर वाङ्मय स्पर्धे चा पुरस्कार, तसेच शेती करू फायद्याची या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा १९९५-९६चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती चा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड र्फिटलायझर्स या केंद्र शासनाच्या खत उत्पादक कंपनीमार्फत १९९४-९५चा कृषि उत्पादकता पुरस्कार , वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान तर्फे १९९६चा वसंतराव नाईक कृषि पत्रकारिता पुरस्कार अशा अनेक मान-सन्मानांनी पाटील यांना गौरवण्यात आले आहे. १५ ऑगस्ट, १९९६ रोजी पुणे महानगरपालिकेतर्फे पाटील यांचा गौरवपदक देऊन सत्कार करण्यात आला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
BONSAI Rating Star
Add To Cart INR 180
GHARATIL BAG Rating Star
Add To Cart INR 260
SHETI KARU FAYDYACHI Rating Star
Add To Cart INR 280
SUNDAR AAPLI FALBAUG Rating Star
Add To Cart INR 200
SUNDER APALI PHULBAG Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
Ashwini Deshmukh, Pune.

This book holds a special place in my heart, especially because I come from Vidarbha, and the author`s writing resonates deeply with my roots. The stories are simple yet impactful, written in easy Marathi, making them accessible to all readers. What akes this book unique is how each story offers valuable life lessons—whether it`s about honesty, navigating real-life struggles, or the bonds we form with others. The humor woven throughout the stories adds a refreshing touch, making it enjoyable to read while also making you reflect on the deeper messages. The simplicity of the writing allows the book to flow seamlessly, leaving you eager to read the next story. It’s a perfect blend of life lessons, humor, and relatability. Overall, it`s a wonderful read that stays with you, reminding you of the little things that matter most in life. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.