A. B. PATIL

About Author

Birth Date : 25/02/1936
Death Date : 13/09/2016


A.B. PATILS SCHOOL AND COLLEGE EDUCATION WAS DONE IN KOLHAPUR. HAVING A BASIC INTEREST IN AGRICULTURE, HE TOOK ADMISSION IN THE AGRICULTURAL COLLEGE IN PUNE TO GET SCIENTIFIC EDUCATION IN THIS SUBJECT. HE THEN WORKED AS AN ASSISTANT AGRICULTURAL INFORMATION OFFICER IN THE DEPARTMENT OF AGRICULTURE, GOVERNMENT OF MAHARASHTRA. HE WAS ALSO A NEWSPAPER LIAISON OFFICER.

आ.बा. पाटील यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. शेतीची मुळातच आवड असल्याने या विषयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याकरिता त्यांनी पुणे येथील कृषि महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेती विभागात साहाय्यक कृषि माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच ते वृत्तपत्र संपर्क अधिकारीही होते. कृषि सहसंचालक (विस्तार) या पदावरही त्यांनी काम केले. १९९४मध्ये ते जॉइन्ट डायरेक्टर ऑफ अ‍ॅग्रिकल्चर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी १७ वर्षे शेतकरी या मासिकाची संपादक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. ते १९९५पासून शेतकरी शिक्षण माला हे शेतीविषयक मासिक प्रसिद्ध करतात. या मासिकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सध्या त्याचे २८,००० वर्गणीदार आहेत. आजवर त्यांची शेती आणि इतर विषयांवर ३७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे त्यांची सुंदर आपली फुलबाग , सुंदर आपला रोपमळा , शेती करू फायद्याची , बोन्साय आणि घरातील बाग ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून वाचकांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृषि पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पाटील यांनी सकाळ , केसरी (पुणे), तरुण भारत , लोकसत्ता (पुणे), महाराष्ट्र टाइम्स (मुंबई), दै. पुढारी , लोकमत (नागपूर) इत्यादी प्रमुख वृत्तपत्रांमधून सातत्याने शेतीविषयक लेखन केले आहे. पाटील यांच्या इथंच हाय पन या एकांकिकेचे पुस्तक प्रकाशित झाले असून, या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या वैतागवाडी ते विकासवाडी या पुस्तकाला १९७३-७४ सालचा महाराष्ट्र शासनाचा प्रौढसाक्षर वाङ्मय स्पर्धे चा पुरस्कार, तसेच शेती करू फायद्याची या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा १९९५-९६चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती चा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड र्फिटलायझर्स या केंद्र शासनाच्या खत उत्पादक कंपनीमार्फत १९९४-९५चा कृषि उत्पादकता पुरस्कार , वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान तर्फे १९९६चा वसंतराव नाईक कृषि पत्रकारिता पुरस्कार अशा अनेक मान-सन्मानांनी पाटील यांना गौरवण्यात आले आहे. १५ ऑगस्ट, १९९६ रोजी पुणे महानगरपालिकेतर्फे पाटील यांचा गौरवपदक देऊन सत्कार करण्यात आला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
GHARATIL BAG Rating Star
Add To Cart INR 260
SHETI KARU FAYDYACHI Rating Star
Add To Cart INR 280
SUNDER AAPLI PHALBAUG Rating Star
Add To Cart INR 200
SUNDER APALI PHULBAG Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more