A. B. PATIL

About Author

Birth Date : 25/02/1936
Death Date : 13/09/2016


A.B. PATILS SCHOOL AND COLLEGE EDUCATION WAS DONE IN KOLHAPUR. HAVING A BASIC INTEREST IN AGRICULTURE, HE TOOK ADMISSION IN THE AGRICULTURAL COLLEGE IN PUNE TO GET SCIENTIFIC EDUCATION IN THIS SUBJECT. HE THEN WORKED AS AN ASSISTANT AGRICULTURAL INFORMATION OFFICER IN THE DEPARTMENT OF AGRICULTURE, GOVERNMENT OF MAHARASHTRA. HE WAS ALSO A NEWSPAPER LIAISON OFFICER.

आ.बा. पाटील यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. शेतीची मुळातच आवड असल्याने या विषयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याकरिता त्यांनी पुणे येथील कृषि महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेती विभागात साहाय्यक कृषि माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच ते वृत्तपत्र संपर्क अधिकारीही होते. कृषि सहसंचालक (विस्तार) या पदावरही त्यांनी काम केले. १९९४मध्ये ते जॉइन्ट डायरेक्टर ऑफ अ‍ॅग्रिकल्चर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी १७ वर्षे शेतकरी या मासिकाची संपादक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. ते १९९५पासून शेतकरी शिक्षण माला हे शेतीविषयक मासिक प्रसिद्ध करतात. या मासिकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सध्या त्याचे २८,००० वर्गणीदार आहेत. आजवर त्यांची शेती आणि इतर विषयांवर ३७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे त्यांची सुंदर आपली फुलबाग , सुंदर आपला रोपमळा , शेती करू फायद्याची , बोन्साय आणि घरातील बाग ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून वाचकांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृषि पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पाटील यांनी सकाळ , केसरी (पुणे), तरुण भारत , लोकसत्ता (पुणे), महाराष्ट्र टाइम्स (मुंबई), दै. पुढारी , लोकमत (नागपूर) इत्यादी प्रमुख वृत्तपत्रांमधून सातत्याने शेतीविषयक लेखन केले आहे. पाटील यांच्या इथंच हाय पन या एकांकिकेचे पुस्तक प्रकाशित झाले असून, या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या वैतागवाडी ते विकासवाडी या पुस्तकाला १९७३-७४ सालचा महाराष्ट्र शासनाचा प्रौढसाक्षर वाङ्मय स्पर्धे चा पुरस्कार, तसेच शेती करू फायद्याची या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा १९९५-९६चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती चा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड र्फिटलायझर्स या केंद्र शासनाच्या खत उत्पादक कंपनीमार्फत १९९४-९५चा कृषि उत्पादकता पुरस्कार , वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान तर्फे १९९६चा वसंतराव नाईक कृषि पत्रकारिता पुरस्कार अशा अनेक मान-सन्मानांनी पाटील यांना गौरवण्यात आले आहे. १५ ऑगस्ट, १९९६ रोजी पुणे महानगरपालिकेतर्फे पाटील यांचा गौरवपदक देऊन सत्कार करण्यात आला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
BONSAI Rating Star
Add To Cart INR 180
GHARATIL BAG Rating Star
Add To Cart INR 140
SHETI KARU FAYDYACHI Rating Star
Add To Cart INR 280
SUNDAR AAPLI FALBAUG Rating Star
Add To Cart INR 200
SUNDER APALI PHULBAG Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more