* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUDHA MURTHY HAS WANDERED IN MANY REMOTE AND ECONOMICALLY BACKWARD PLACES IN INDIA. SHE HAS WALKED OVER TO DEPTHS AT THESE PLACES, SHE HAS TRAVELLED BY THE PUBLIC TRANSPORT. SHE HAS TRIED HER LEVEL BEST TO TAKE THE MEDICAL FACILITIES TO THE DOORSTEPS OF THESE NEGLECTED AND NEGLIGENT PEOPLE. HER WORK HAS GIVEN HER THE OPPORTUNITY TO MIX WITH MANY NOBLE PEOPLE FROM THE VARIOUS SECTORS OF SOCIETY. SHE HAS MET THE BEGGAR`S FAMILY FROM MUMBAI WHO WENT TO SETTLE DOWN IN GUJARAT WHERE THE EARTHQUAKE HAD LEFT EVERYONE IN CHAOS. SHE HAS MET THE MOTHER OF A GIRL WHO WAS KILLED FOR THE DOWRY. SHE HAS COME ACROSS THE UNKNOWN DONOR WHO HAS DONATED A HUGE AMOUNT BY CHEQUE. SUDHA MURTI`S LIFE IS MATURED TODAY WITH THE MEETINGS WITH SUCH VARIOUS PEOPLE WITH THEIR UNIQUE THOUGHTS, PHILOSOPHIES AND FEELINGS. SHE HAS PRESENTED HER EXPERIENCES AS A PROFESSOR AND AS A SOCIAL WORKER. THIS BOOK HAS A VERY SIMPLE AND HOMELY LANGUAGE THAT OF ANY COMMON PERSON, YET IT PRESENTS THE PERFECT PICTURE OF SUDHA MURTI`S WORK AND PHILOSOPHY IN DETAIL.
आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांनी बसनंही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तींच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारं भिकाऱ्यांचं कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो... नाही तर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो... या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामुळे सुधा मूर्तींचं जीवन समृद्ध होऊन गेलं आहे.एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखनशैलीतून निर्माण झालेलं हे पुस्तक सुधा मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणारं आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarAnand Saraikar

    #वाइज #अँडअदरवाइज -------------------------------------------- काही व्यक्तींवर लक्ष्मीचा वरदहस्त असतो तर काही व्यक्तींवर सरस्वती ची कृपादृष्टी असते...परंतु जगात अशा मोजक्याच व्यक्ती असतात ज्यांच्या हातात लक्ष्मी आणि हृदयात सरस्वती निवास करत असे. भांडवलदार असूनही मनात जर समाजसेवेची आवड असेल तर कमावलेली पै नी पै ही धन्य होत असेल, कारण लक्ष्मीलाही ठाऊक असते की आपण सत्पात्री पडलो आहोत. सुधा मूर्ती या अशाच विदुषी. इन्फोसिस या बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनीच्या त्या पतीसह भागीदार. त्या स्वतः M.Tech Computer science आहेत. त्याच बरोबर त्या प्राध्यापिका सुद्धा होत्या. प्राध्यापिका म्हणण्यापेक्षाही त्या कनवाळू,सह्रदय शिक्षिका ... वडील डॉक्टर असल्याने समाज सेवेचे बाळकडू लहानपणीच मिळालेले, समाजाकडून मिळालेले काही अंशी समाजाकडे गेले पाहिजे ही विचारसरणी मनात पक्की रुजलेली त्यामुळे इन्फोसिस फाऊंडेशन ही सामाजिक कार्य करणारी संस्था उभारली गेली नसती तर नवल वाटले असते. इन्फोसिस फाऊंडेशन ही विद्यार्थी, आदिवासी, आणि इतर गरजवंताना आर्थिक आणि वस्तु स्वरुपात मदत करणारी संस्था. अर्थात मदत देण्याचेही काही निकष असतात, आणि ज्यांनी ही संस्था उभी केली त्यांच्या सदसद्विवेक बुद्धिला जे पटेल त्यांना सुधाताई इमाने इतबारे मदत पोहोचवत असतातच....मुळात हे खरेखुरे अनुभव असल्याने समाजाचा खरा चेहरा आपल्या पुढे उघड करण्याचे काम त्या खुबीने करतात...आता विना रंगरंगोटी खरा चेहरा हा प्रत्येक वेळी विलोभनीय कसा असू शकेल...हे माहीत असूनही आपण कित्येक वेळा चकित होतो, हताश होतो आणि निराशही होतो.तुम्ही मला मदत करा नाहीतर मी आत्महत्या करीन अशी धमकी देणारा याचक(?), शेअर बाजारात पैसे बुडाले म्हणुन पाच कोटींची मदत मागणारी एक महाभाग स्त्री ... स्वतः च्या वडिलांना अनाथ म्हणून ऑफिस मधे आणून सोडणारा आणि त्यांच्या मृत्यूनंतर खरी ओळख सांगून बँक खात्यावर वारसा हक्क सांगणारा आधुनिक श्रावण... ज्या विद्यार्थ्यांला मदत केल्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकलेला डॉक्टर जेव्हा त्यांच्याकडून फीसची मागणी करतो .. या आणि अशाच अनेक हृदयद्रावक हकिकती वाचताना एक प्रश्न वारंवार उपस्थित होतो माणुस असा का वागतो...?सामाजिक कार्य करत असताना आलेल्या अशाच कटू गोड अनुभवाचा मिश्किल आणि थेट हृदयाला भिडणाऱ्या शैलीत मांडलेला लेखाजोखा म्हणजेच #वाइजअँडअदरवाइज हे पुस्तक होय. #डॉ.#आनंद #सराईकर ...Read more

  • Rating StarRajesh Javir

    वाइज अँड अदरवाईज अतिशय छान पुस्तक. पुस्तक वाचल्यानंतर त्यांची विशाल महानता कळते. 204 पानाच्या या पुस्तकामध्ये सुमारे 51 कथा आहेत. आदरणीय सुधा मुर्ती यांच्या विशाल कार्याचा आढावा या पुस्तकामधुन होतो .प्रत्येक कथेमधुन सुधा मुर्ती यांच्या कार्याची णि त्यांच्या जीवनाविषयीच तत्वज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातुन दिसुन येते.सुधा मूर्ती वाइज अँड अदरवाइज गोष्टी अनुभवाच्या त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात..! त्या चांगल्या वाईट अनुभवातुन ते काहींना काही शिकतमोठे झाले. ते म्हणतात ना अनुभव हा माणसाचा खरा गुरु असतो. तसेच या यशस्वी लोकांचा खरा गुरु हा त्यांना आलेला अनुभव असतो. यशस्वी व्यक्ती त्यांना आलेल्या अनुभवातुन ते शिकतात. वाइज अँड आदर वाईज एक प्रसिद्ध पुस्तक! भारताच्या अत्यंत मागास भागामध्ये त्या फिरल्या.रेल्वे, बस प्रसंगी पायी फिरून जाणून घेतले तेथील दारिद्र्य! आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांच्यासाठी मग आरोग्य,शिक्षण आणि स्वावलंबनासाठीची सुरू केल्या अनेक योजना! त्या साठी झगडल्या.अटोकाट प्रयत्न केले.अनेक प्रकारच्या लोकांचा संपर्क आणि संबंध आला.मन हेलावून टाकणारा एक एक प्रसंग जणू त्यांचा गुरूच! जसे आठरा विश्वं दारिद्र्याचे त्यांना स्वामी भेटले तसेच त्यांना भेटले करोडो रुपयांच्या रकमेचे चेक देणारे अनामिक दाते! "इन्फोसिस फाऊंडेशन" च्या माध्यमातून त्यांनी स्वतः अनेक कार्य चालवले आहेत.इतरांना ही मदत करतात. अश्या अनुभवातून निर्माण झाले एक तत्वज्ञान! त्याची मांडणी खूपच प्रेरक आसते! त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना कधी अत्यंत गरीब लोक भेटले तर कधी धूर्त राजकारणी यातुन आलेले अनुभव आणि त्यांना भेटलेली माणसे. यातुन समजलेला मनुष्यस्वभाव.वाईस अँड अदरवाइज या पुस्तकातुन त्यांनी मांडला आहे. सुधा मुर्ती यांनी परतफेडीची अपेक्षा न करता न ठेवता अनेकांना मदत केली. काहींनी त्या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर काहींनी मिळालेल्या मदतीचा उल्लेखही केला नाही. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना खुप लहान-मोठी माणसे भेटली त्या प्रत्येकाकडुन बरंच काही त्यांना शिकायला मिळाले. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो..! या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले..! खरंच आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचायचं असेल तर आपल्याला अनुभवातुन शिकलं पाहिजेल. हे पुस्तक वाचल्यावर समजत कि माणसाचा खरा गुरु हा त्याला आलेले अनुभव होय. जो अनुभवातुन शिकतो तो सदैव यशस्वी होत रहातो. ...Read more

  • Rating StarDARSHANA CHAPHEKAR

    इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना `द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, "कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं रत असणार्‍या या लेखिकेने `द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्‍या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ - असे हे `तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन `इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे. ...Read more

  • Rating StarLaxmikant Kulkarni

    थोडंसं जगणं समाजासाठी..! हे जरी खरे असले तरीपण "जगणंच फक्त समाजांसाठी" हे स्वतःच्या आचरणाने दाखवून देणाऱ्या अन असामान्य असूनही सामान्य राहणाऱ्या आणि असामान्य काम करणाऱ्या गोरगरीब,होतकरू आणि कित्येक निराधारासाठी आधारवड असणाऱ्या अम्मा म्हणजेच सुधा मूर्ी..! खरंच अशाच ठिकाणी "कर माझे जुळती " वाईज अँड अदरवाईज-सुधा मूर्ती इतक्या प्रचंड मोठ्या साम्राज्याची अनभिषीत एक कर्तृत्ववान महाराणी..! प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरांवर कुठलाही बडेजाव न करता समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सुधा मूर्तींच्या पुस्तकाविषयी थोडंसं..आणि त्याचं विचाराचं हे धन नक्कीच आपल्या पिढीला प्रेरणा देईल..! - विचाराचं संक्रमण योग्य तऱ्हेने करण्याची क्षमता ज्याची अधिक त्याच्या आयुष्यात गैरसमजांचे प्रसंग कमी प्रमाणांत घडतात. - मी फक्त अशाच माणसांना मदत करायचं ठरवलंय,ज्यांना कशाचाच,कुणाचाच आधार नाही.आपण जर त्यांना मदत केली नाही तर त्यांच्यावर अक्षरशः विनाश ओढावेल. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो..! या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले..! त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात..! त्यांची निरीक्षण करण्याची आणि वेगवेगळ्या नवीन व्यक्तींशी संवाद करण्याची हातोटी लाजवाब आहे..! आणि एवढं असतानाही त्यांना सत्कार,कुठला बडेजाव,किंवा कुणाची फुकटची अवास्तव स्तुती पण नकोय..! शेवटी तर त्यांनी स्पष्ट म्हटलंय कि "उगीचच्या उगीच एखाद्याचं अवास्तव,अतिरंजित कौतुक करणं म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारचं आहे..! :-खूप काही शिकण्यासारख्या..! सलाम सुधा मूर्ती यांना..! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more