* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454935
  • Edition : 5
  • Publishing Year : MAY 1993
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A COMPILATION OF STORIES; TRANSLATED AS WELL AS SOME OF HIS OWN. THE WRITER ONCE AGAIN SUCCEEDS IN MAKING US LAUGH OVER THE PURE HUMOUR. HIS STORY ‘SHIVAJI MAHARAJANCHI PATRAKARANSHI BATCHIT’- MEANING THE CONVERSATION THAT SHIVAJI MAHARAJ HAD WITH THE JOURNALISTS POINTS AT THE DISCREPANCIES THAT ARE SO PROMINENTLY SEEN IN POLITICS THESE DAYS. ANOTHER GOOD ONE IS THE STORY ‘TAGEWADE FESTIVAL’; THIS ELABORATES HOW ANY FESTIVAL HAS BECOME A FAD IN THE TOWN/VILLAGE OF TAGEWADI. THE STORY ‘MANTRYANWAR ODHAWLELA PRASANG’ PINPOINTS AT THE HOPELESS SITUATION OF LAW AND ORDER AND ALSO THE ELIGIBILITY OF OUR MINISTERS. HIS STORY ‘EKA SHOKSABHECHA VRUTTANT- A REPORT ON A CONDOLENCE MEETING’ PORTRAYS MANY PEOPLE AROUND US PERFECTLY WELL. ALL HIS STORIES TALK ABOUT THE VARIOUS CARICATURES WE SEE AROUND. THEY MAKE US LAUGH, AT THE SAME TIME, THEY ALSO MAKE US THINK ABOUT THE SOCIETY, THE TRENDS, OUR ROLE, ETC. HIS STORIES AIM AT PEOPLE FROM POLITICS, SOCIAL WORK, EDUCATION DEPARTMENT, POLICE DEPARTMENT ETC. A WONDERFUL COLLECTION OF STORIES HELPING YOU TO LAUGH AT YOUR HEART’S CONTENT WHILE HAVING THE POTENTIAL OF MAKING YOU THINK.
‘फुकट’हा द.मा. मिरासदारांच्या रूपांतरित आणि स्वतंत्र कथांचा संग्रह. अर्थातच त्यांच्या स्वतंत्र विनोदी कथा वाचकाचं लक्ष वेधून घेतात. ‘शिवाजी महाराजांची पत्रकारांशी बातचीत’या कथेतून मिरासदार आजच्या राजकीय विसंगतींवर बोट ठेवतात. तर ‘टगेवाडी फेस्टिव्हल’मधून फेस्टिव्हलच्या फॅडवर त्यांनी भाष्य केलं आहे. आजची ढिसाळ कायदा-सुव्यवस्था आणि मंत्र्यांची ‘योग्यता’याचं मार्मिक चित्रण ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’या कथेतून केलं आहे. तर ‘एका शोकसभेचा वृत्तांत’या कथेतून त्यांनी माणसांचे विविध नमुने टिपले आहेत. या चारही विनोदी कथा श्रोत्यांना मनमुराद हसवतात आणि अंतर्मुखही करतात. राजकारण, समाजकारण, शिक्षण खातं, पोलिस खातं या क्षेत्रांतील व्यक्तींचं अत्यंत खुमासदार पद्धतीने केलेलं प्रातिनिधिक चित्रण त्या त्या खात्यातील विसंगतीवर बोट ठेवतंच; पण वाचकांना खळखळून हसायला लावतं. तेव्हा वाचकांना खळखळून हसवणारा हा कथासंग्रह सगळ्यांनी अवश्य वाचला पाहिजे, असा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PHUKAT #PHUKAT #फुकट #SHORTSTORIES #MARATHI #D.M.MIRASDAR #द.मा.मिरासदार "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    दर्जेदार विनोदी कथांचा संग्रह... मराठीतील विनोदी कथांचं दालन समृद्ध करणाऱ्या लेखकांमध्ये द.मा. मिरासदार हे नाव अग्रस्थानी आहे. फुकट’हा द.मा. मिरासदारांच्या रूपांतरित आणि स्वतंत्र कथांचा संग्रह. अर्थातच या संग्रहातील त्यांच्या स्वतंत्र विनोदी कथा ल्ष वेधून घेतात. ‘शिवाजी महाराजांची पत्रकारांशी बातचीत’, ‘टगेवाडी फेस्टिव्हल’, ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’ आणि ‘एका शोकसभेचा वृत्तांत’ या चार कथांतून मिरासदारांच्या विनोदी कथेच्या दालनातील अग्रस्थानाचा प्रत्यय येतो. काही पत्रकार रायगडावर गेलेले असताना त्यांची शिवाजी महाराजांशी भेट होते आणि पत्रकार व शिवाजी महाराज यांच्यात प्रश्नोत्तररूपी जो संवाद होतो, तो आपल्या खास मिरासदारी शैलीत द. मां. नी रंगवला आहे. त्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून द.मा. आजच्या राजकीय विसंगतींवर बोट ठेवतात. ‘टगेवाडी फेस्टिव्हल’मध्येही द.मां. नी राजकीय आणि सामाजिक विसंगतींवर बोट ठेवलं आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या धर्तीवर टगेवाडीत फेस्टिव्हल करायचं ठरतं. फेस्टिव्हलची तयारी कशी होते आणि प्रत्यक्षात फेस्टिव्हल कसा पार पडतो, याचं रंगतदार वर्णन द.मां. नी केलं आहे. ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’ ही त्याच वाटेवरची आणखी एक कथा. बाबूराव टोणग्यांचा गृहमंत्री पदापर्यंतचा प्रवास आणि गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर ओढवलेला एक प्रसंग याचं खास मिरासदारी शैलीत द.मां.नी वर्णन केलं आहे. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी टोणगेंची लाल दिव्याची गाडी थांबते. ड्रायव्हर खाली उतरतो आणि टोणगे ड्रायव्हरच्या नकळत लघुशंकेसाठी उतरतात. टोणगे गाडीत बसले आहेत, असं समजून ड्रायव्हर गाडी घेऊन निघून जातो आणि नंतर जी धमाल उडते ती प्रत्यक्ष कथेत वाचताना हसून हसून मुरकुंडी वळते. ‘एका शोकसभेचा वृत्तांत’ ही अशीच खळखळून हसवणारी कथा आहे. एका नगराध्यक्षाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मंडळी जमतात आणि मग तिथे माणसं कशी वागतात आणि कसं भाषण करतात याची हकिगत द.मा. खुसखुशीत शैलीत वर्णन करतात. ही कथाही अर्थातच मुळातून वाचण्यासारखी. तेव्हा या चारही कथांचा मनसोक्त आस्वाद घेऊन हसण्यासाठी ‘फुकट’ हा कथासंग्रह वाचलाच पाहिजे. त्यातील स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचा अनुभव घेतला पाहिजे. यातील रूपांतरित कथा आणि ‘नेम’ ही आबाच्या विठ्ठलभक्तीची थोडी गंभीर वळणाने जाणारी स्वतंत्र कथाही वाचनीय आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 09-07-2017

    द.मा. मिरासदार यांची पुस्तकं म्हणजे आनंदठेवाच फुकट आणि अंगतपंगत या त्यांच्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अंगतपंगत हे त्यांनी लिहिलेल्या एका सदराचं पुस्तक आहे. भविष्याच्या नादापासून डॉक्टरांपर्यंत अनेक विषयांवर त्ांनी खुशखुशीत भाष्य केलं आहे. फुकट या संग्रहात कथांचा समावेश आहे. त्यात काही भाषांतरित कथा आणि दमांच्या काही कथांचा समावेश आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more