* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VAVARI SHENG
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669121
  • Edition : 11
  • Publishing Year : SEPTEMBER 1963
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BEANS IN A FARM. SHANKAR PATIL`S STORIES ARE A TREASURE OF MARATHI LITERATURE. HE HAS A VERY UNCOUTH MIND. HE DOES NOT INTEND TO EXPOSE THE RURAL LIFE TO GAIN POPULARITY. HE DOES NOT WRITE JUST WITH THE URBAN READERS IN HIS MIND. HE WRITES TO FIND HIMSELF IN THE WORDS, IN THE INCIDENCES, IN THE STORIES. HE HAS RECOGNIZED THE VALUE OF STORY WRITING, HE UNDERSTANDS THAT WRITING IS A MEAN TO FIND THE TRUE SOUL. HE STARTED HIS JOURNEY AS A STORY WRITER IN 1950. THE RURAL MIND AND SOUL LIVES IN A SOCIETY, YET THE SOCIETY FAILS TO INCULCATE THE VALUES LIKE FREEDOM, EQUALITY; THIS IS WHAT HE ALWAYS REGRETS. PATIL HAS MORE FAITH ON TRANSMOGRIFICATION THAN TRADITIONS. HE REALIZES THE PROBLEMS OF RURALITES, HE DOES NOT AIM AT ENTERTAINING, BUT WRITES OUT OF HIS SOCIAL AWARENESS. WHAT FACES HIM IS THE SOCIETY BASED ON THE ABODE OF VALUES AND CULTURE. HE EXPOSES THE SHOWY BUT USELESS TRANSFORMATION IN HIS UNIQUE STYLE, SARCASTIC YET WITH A TOUCH OF HUMOUR. DOES ANYONE FIND EXPERIENCES? NO, THEY COME TO US AUTOMATICALLY; WE JUST HAVE TO KEEP ALL OUR SENSES OPEN TO THEM. PATIL MUST HAVE REALIZED AND PRACTICED THIS. STILL, A LOT HAPPENS BETWEEN HIS FEELING OF THE EXPERIENCES AND REPRODUCTION OF THEM. IT IS A VERY INTRICATE PHENOMENON. HIS STORIES TAKE BIRTH FROM THE DEPTH OF HIS CONTEMPLATION. THIS PROCESS HAS BEEN CONTINUOUSLY GOING ON FOR OVER A PERIOD OF 25 TO 30 YEARS NOW. HIS STORIES HAVE ENRICHED MARATHI LITERATURE WORDLESSLY, CAN WE REFUSE THIS?
शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे एक लेणे आहे. त्यांचे मन अतिशय संस्कारक्षम आहे. केवळ ग्रामीण जीवनदर्शन घडवावे असा त्यांचा हेतू नसतो किंवा लोकप्रियता मिळविण्यासाठी गावरान किस्से सांगावेत असाही त्यांचा हेतू नाही. त्यांनी शहरी वाचकांचे भान ठेवून कथालेखन केले नाही. कथा हे आत्मशोधाचे साधन आहे, ही जाणीव शंकर पाटलांना आहे. १९५० पासून त्यांचा कथालेखनाचा प्रवास पाहिला तर हे लक्षात येईल, पण ग्रामीण मन ज्या समाजव्यवस्थेत वाढते आहे त्यात स्वातंत्र्य समतादी मूल्यांची रुजवण झालेली नाही, याचे त्यांना दु:ख आहे. पाटील परंपरेपेक्षा परिवर्तनावर श्रद्धा ठेवतात. त्यांना ग्रामीण प्रश्नांचे भान आहे; आणि म्हणूनच त्यांच्या कथेचा अवतार केवळ रंजनार्थ नाही, त्यांच्या लेखनामागे सामाजिक जाणीव आहे. मूल्यांवर अधिष्ठित अशा समाजव्यवस्थेचे चित्र त्यांच्या समोर आहे; म्हणून तर ते आपल्या कथांतून बेगडी परिवर्तनाचे व्यंगचित्रण करतात. अनुभव कधी शोधून सापडतात? ते आपसुक यावे लागतात. पाटलांच्या कथा अशाच रीतीने त्यांचे बोट धरून आल्या असाव्यात पण या कथानिर्मिती मागे केवढी प्रचंड घडामोड आहे, गुंतागुंत आहे. जणू चिंतनाच्या डोहातूनच ती जन्मते. जवळ जवळ २५३० वर्षे पाटलांची कथा वाटचाल करीत आहे. तिने मराठी कथेला ‘श्रीमंत’ केले आहे हे कुणाला नाकारता येईल काय! –डॉ. भालचंद्र फडके
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KUSTI# KARWAT# RIT-RIVAJ# VECHANI# NHAVRA#YEDTAAK#VAVRI SHENG# PURAVA# ISAALA# KHOD #SHANKAR PATIL
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मराठी साहित्यात प्रामुख्यानं पांढरपेशा मध्यमवर्गियांच्या आयुष्याचं चित्रण कथा-कादंबऱ्यांतून रंगवलं जायचं. या अनुभवविश्वाला पहिला तडा दिला तो ग्रामीण साहित्यानं आणि पाठोपाठ दलित साहित्यानं. १९५०-६० च्या दशकात व्यंकटेश माडगुळकर, द. मा. मिरासदार, वसंत सनीस यांच्या ग्रामीण ढगांच्या कथांनी मराठी साहित्याची एक वेगळीच धारा येऊन मिळाली. या ग्रामीण साहित्यात मोलाची अन लक्षणीय भर टाकली ती शंकर पाटील यांच्या ग्रामीण कथांनी. शहरी जीवनानुभवापेक्षा या ग्रामीण कथांमधून रेखाटलेलं सामान्य माणसाचं जगणं पांढरपेशा मध्यमवर्गासाठी नवं होतं. त्यांच्या जगण्याच्या झगडा, दैन्य-दारिद्र्य, शोषकांची दांडगाई, शोषितांची परिस्थिती शरणता हे सारंच धक्कादायक होतं. दलित साहित्यानं तर कल्पनेपलीकडचं जीवन वास्तव, अनलंकृत भाषेत, थेटपणे मांडल्यानं मराठी साहित्याचं सारं सौंदर्यशास्त्रच कोलमडून पडलं. अन् या साहित्याच्या मूल्यमापनासाठी नव्या निकषांची निकड भासू लागली. ग्रामीण साहित्याचं लेखन विपुलतेनं झालं. नवनवे लेखक लिहिते झाले. त्या ग्रामीण साहित्यात शंकर पाटील यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य मोठं आहे. शंकर पाटील यांनी केवळ विनोदापेक्षा ग्रामीण जीवनातील रोजच्या जगण्याचा, सामान्य माणसाचा झगडा, परिस्थितीशी दोन हात करत जीवनाला सामोरं जाण्याची विजिगिजू वृत्ती, माणसातील माणुसकी जपणारी नाती, (अन् त्यांच्याबरोबर त्याचं पशुत्व), मानवी स्वभावाची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या साऱ्यांचं चित्रण आपल्या कथांमधून केलं. त्यांच्या कथांमधून ग्रामीण जीवनाचं प्रातिनिधक चित्रण दिसतं. तसं जीवनाची नीतिमूल्यं, तत्व यांचही दर्शन होतं. मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी शंकर पाटील यांच्या कथांचं कालातीत महत्त्व लक्षात घेऊन त्याचं ‘वावरी शेंग’, ‘बंधारा’ आणि ‘घालमेल’ या कथासंग्रहाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. या कथासंग्रहामधून शंकर पाटलांची चित्रमय वर्णनशैली प्रकर्षानं जाणवते. बारीक तपशिलासह ते सारं चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं करतात. ग्रामीण भाषा, बोलके शब्द, म्हणी यांचा वापर, ग्रामीण वातावरण त्याचं जीवन, दैन्य-दारिद्र्य तपशिलानं वर्णन करतात. त्यांच्या काही कथांमध्ये नाट्यमय शेवट आहे. कथांतर्गत लेखकानं निर्माण केलेला समज शेवटच्या धक्क्यातून पार उधळला जातो आणि कथा वेगळ्याच वळणानं रंजक ठरते. उदा. ‘पुरावा’ (वावरी शेंग). आत्यंतिक दैन्य-दारिद्र्याचं चित्रण ते करतात, पण त्यावर आपलं भाष्य करीत नाहीत. शंकर पाटलांच्या उपमाही ग्रामीण वातावरणाशी, जीवनाशी निगडित येतात. उदा. ‘पदर आलेली गजरा कापसाच्या बोडागत उमलून आली होती. पृ. ६२ (वावरी शेंग) विंâवा आतला गाभाच जर कडू, तर वरचं टरपाल घेऊन काय काराययं?’ पृ. ८७ (खोड). ग्रामीण कथांमधून येणारे इरसाल नमुनेही या कथांमधून दिसतात. शंकर पाटलांच्या कथांतून ग्रामीण जीवनाच्या चित्रणाबरोबरच मानवी जीवनाची गुंतागुंत, जगण्याची आस, नीतिमूल्यं सारं जाणवतं. त्यांच्या कथांकडे म्हणूनच गांभीर्याने पहायला हवं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book