* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VAVARI SHENG
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669121
  • Edition : 12
  • Publishing Year : SEPTEMBER 1963
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BEANS IN A FARM. SHANKAR PATIL`S STORIES ARE A TREASURE OF MARATHI LITERATURE. HE HAS A VERY UNCOUTH MIND. HE DOES NOT INTEND TO EXPOSE THE RURAL LIFE TO GAIN POPULARITY. HE DOES NOT WRITE JUST WITH THE URBAN READERS IN HIS MIND. HE WRITES TO FIND HIMSELF IN THE WORDS, IN THE INCIDENCES, IN THE STORIES. HE HAS RECOGNIZED THE VALUE OF STORY WRITING, HE UNDERSTANDS THAT WRITING IS A MEAN TO FIND THE TRUE SOUL. HE STARTED HIS JOURNEY AS A STORY WRITER IN 1950. THE RURAL MIND AND SOUL LIVES IN A SOCIETY, YET THE SOCIETY FAILS TO INCULCATE THE VALUES LIKE FREEDOM, EQUALITY; THIS IS WHAT HE ALWAYS REGRETS. PATIL HAS MORE FAITH ON TRANSMOGRIFICATION THAN TRADITIONS. HE REALIZES THE PROBLEMS OF RURALITES, HE DOES NOT AIM AT ENTERTAINING, BUT WRITES OUT OF HIS SOCIAL AWARENESS. WHAT FACES HIM IS THE SOCIETY BASED ON THE ABODE OF VALUES AND CULTURE. HE EXPOSES THE SHOWY BUT USELESS TRANSFORMATION IN HIS UNIQUE STYLE, SARCASTIC YET WITH A TOUCH OF HUMOUR. DOES ANYONE FIND EXPERIENCES? NO, THEY COME TO US AUTOMATICALLY; WE JUST HAVE TO KEEP ALL OUR SENSES OPEN TO THEM. PATIL MUST HAVE REALIZED AND PRACTICED THIS. STILL, A LOT HAPPENS BETWEEN HIS FEELING OF THE EXPERIENCES AND REPRODUCTION OF THEM. IT IS A VERY INTRICATE PHENOMENON. HIS STORIES TAKE BIRTH FROM THE DEPTH OF HIS CONTEMPLATION. THIS PROCESS HAS BEEN CONTINUOUSLY GOING ON FOR OVER A PERIOD OF 25 TO 30 YEARS NOW. HIS STORIES HAVE ENRICHED MARATHI LITERATURE WORDLESSLY, CAN WE REFUSE THIS?
शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे एक लेणे आहे. त्यांचे मन अतिशय संस्कारक्षम आहे. केवळ ग्रामीण जीवनदर्शन घडवावे असा त्यांचा हेतू नसतो किंवा लोकप्रियता मिळविण्यासाठी गावरान किस्से सांगावेत असाही त्यांचा हेतू नाही. त्यांनी शहरी वाचकांचे भान ठेवून कथालेखन केले नाही. कथा हे आत्मशोधाचे साधन आहे, ही जाणीव शंकर पाटलांना आहे. १९५० पासून त्यांचा कथालेखनाचा प्रवास पाहिला तर हे लक्षात येईल, पण ग्रामीण मन ज्या समाजव्यवस्थेत वाढते आहे त्यात स्वातंत्र्य समतादी मूल्यांची रुजवण झालेली नाही, याचे त्यांना दु:ख आहे. पाटील परंपरेपेक्षा परिवर्तनावर श्रद्धा ठेवतात. त्यांना ग्रामीण प्रश्नांचे भान आहे; आणि म्हणूनच त्यांच्या कथेचा अवतार केवळ रंजनार्थ नाही, त्यांच्या लेखनामागे सामाजिक जाणीव आहे. मूल्यांवर अधिष्ठित अशा समाजव्यवस्थेचे चित्र त्यांच्या समोर आहे; म्हणून तर ते आपल्या कथांतून बेगडी परिवर्तनाचे व्यंगचित्रण करतात. अनुभव कधी शोधून सापडतात? ते आपसुक यावे लागतात. पाटलांच्या कथा अशाच रीतीने त्यांचे बोट धरून आल्या असाव्यात पण या कथानिर्मिती मागे केवढी प्रचंड घडामोड आहे, गुंतागुंत आहे. जणू चिंतनाच्या डोहातूनच ती जन्मते. जवळ जवळ २५३० वर्षे पाटलांची कथा वाटचाल करीत आहे. तिने मराठी कथेला ‘श्रीमंत’ केले आहे हे कुणाला नाकारता येईल काय! –डॉ. भालचंद्र फडके
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KUSTI# KARWAT# RIT-RIVAJ# VECHANI# NHAVRA#YEDTAAK#VAVRI SHENG# PURAVA# ISAALA# KHOD #SHANKAR PATIL
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मराठी साहित्यात प्रामुख्यानं पांढरपेशा मध्यमवर्गियांच्या आयुष्याचं चित्रण कथा-कादंबऱ्यांतून रंगवलं जायचं. या अनुभवविश्वाला पहिला तडा दिला तो ग्रामीण साहित्यानं आणि पाठोपाठ दलित साहित्यानं. १९५०-६० च्या दशकात व्यंकटेश माडगुळकर, द. मा. मिरासदार, वसंत सनीस यांच्या ग्रामीण ढगांच्या कथांनी मराठी साहित्याची एक वेगळीच धारा येऊन मिळाली. या ग्रामीण साहित्यात मोलाची अन लक्षणीय भर टाकली ती शंकर पाटील यांच्या ग्रामीण कथांनी. शहरी जीवनानुभवापेक्षा या ग्रामीण कथांमधून रेखाटलेलं सामान्य माणसाचं जगणं पांढरपेशा मध्यमवर्गासाठी नवं होतं. त्यांच्या जगण्याच्या झगडा, दैन्य-दारिद्र्य, शोषकांची दांडगाई, शोषितांची परिस्थिती शरणता हे सारंच धक्कादायक होतं. दलित साहित्यानं तर कल्पनेपलीकडचं जीवन वास्तव, अनलंकृत भाषेत, थेटपणे मांडल्यानं मराठी साहित्याचं सारं सौंदर्यशास्त्रच कोलमडून पडलं. अन् या साहित्याच्या मूल्यमापनासाठी नव्या निकषांची निकड भासू लागली. ग्रामीण साहित्याचं लेखन विपुलतेनं झालं. नवनवे लेखक लिहिते झाले. त्या ग्रामीण साहित्यात शंकर पाटील यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य मोठं आहे. शंकर पाटील यांनी केवळ विनोदापेक्षा ग्रामीण जीवनातील रोजच्या जगण्याचा, सामान्य माणसाचा झगडा, परिस्थितीशी दोन हात करत जीवनाला सामोरं जाण्याची विजिगिजू वृत्ती, माणसातील माणुसकी जपणारी नाती, (अन् त्यांच्याबरोबर त्याचं पशुत्व), मानवी स्वभावाची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या साऱ्यांचं चित्रण आपल्या कथांमधून केलं. त्यांच्या कथांमधून ग्रामीण जीवनाचं प्रातिनिधक चित्रण दिसतं. तसं जीवनाची नीतिमूल्यं, तत्व यांचही दर्शन होतं. मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी शंकर पाटील यांच्या कथांचं कालातीत महत्त्व लक्षात घेऊन त्याचं ‘वावरी शेंग’, ‘बंधारा’ आणि ‘घालमेल’ या कथासंग्रहाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. या कथासंग्रहामधून शंकर पाटलांची चित्रमय वर्णनशैली प्रकर्षानं जाणवते. बारीक तपशिलासह ते सारं चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं करतात. ग्रामीण भाषा, बोलके शब्द, म्हणी यांचा वापर, ग्रामीण वातावरण त्याचं जीवन, दैन्य-दारिद्र्य तपशिलानं वर्णन करतात. त्यांच्या काही कथांमध्ये नाट्यमय शेवट आहे. कथांतर्गत लेखकानं निर्माण केलेला समज शेवटच्या धक्क्यातून पार उधळला जातो आणि कथा वेगळ्याच वळणानं रंजक ठरते. उदा. ‘पुरावा’ (वावरी शेंग). आत्यंतिक दैन्य-दारिद्र्याचं चित्रण ते करतात, पण त्यावर आपलं भाष्य करीत नाहीत. शंकर पाटलांच्या उपमाही ग्रामीण वातावरणाशी, जीवनाशी निगडित येतात. उदा. ‘पदर आलेली गजरा कापसाच्या बोडागत उमलून आली होती. पृ. ६२ (वावरी शेंग) विंâवा आतला गाभाच जर कडू, तर वरचं टरपाल घेऊन काय काराययं?’ पृ. ८७ (खोड). ग्रामीण कथांमधून येणारे इरसाल नमुनेही या कथांमधून दिसतात. शंकर पाटलांच्या कथांतून ग्रामीण जीवनाच्या चित्रणाबरोबरच मानवी जीवनाची गुंतागुंत, जगण्याची आस, नीतिमूल्यं सारं जाणवतं. त्यांच्या कथांकडे म्हणूनच गांभीर्याने पहायला हवं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more