* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357203388
  • Edition : 2
  • Publishing Year : FEB 1997
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 216
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF SHORT TRUE STORIES INSPIRED BY ACTUAL EVENTS IN THE LIFE OF AUTHOR B. D. KHER; THERE ARE GHOST STORIES, DISORIENTATION (CHAKWA IN MARATHI) STORIES, GRAVEYARD STORIES AND EVEN FUNNY ANECDOTES. MOST OF THESE STORIES ARE HUMOROUS; BUT SOME SERIOUS STORIES ARE ALSO HEART-WRENCHING. KHER, WHO USED TO GO FOR A SWIM WITHOUT HIS FATHER`S PERMISSION, ONCE SAW A SNAKE IN THE WELL AND HE STARTED RUNNING AWAY AS IF A TIGER WAS CHASING HIM. THIS INCIDENT IS DESCRIBED IN THE STORY `ADNYNECHI AVADNYNA`. WHEREAS, `VANZOTI BABUTAI` EXPRESSES THE ANGUISH OF A CHILDLESS BABUTAI. KHER, WHO WENT TO JAIL AS A SATYAGRAHI NARRATES HOW HIS “SANKASHTI” FAST WAS CELEBRATED ELABORATELY EVEN IN JAIL, IS DESCRIBED IN THE STORY `TURUNGATIL CHATURTHI`. THE STORY `PILUTAI AHEVAPANI GELYA` TELLS US HOW PILUTAI, WHO WISHED TO DIE WHILE HER HUSBAND WAS STILL ALIVE, GETS HER DESIRE FULFILLED. IT IS INDEED AN ENTERTAINING AND COLORFUL COLLECTION OF STORIES IN A LIGHT-HEARTED LANGUAGE AND HUMOROUS STYLE
हा छोट्या-छोट्या सत्यकथांचा संग्रह आहे. या सर्व गोष्टी भा. द. खेर यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या आहेत; यामध्ये भुताच्या गोष्टी आहेत, चकव्याच्या गोष्टी आहेत, स्मशानातल्या तसेच अगदी फजितीच्यासुद्धा गोष्टी आहेत. यातील बहुतेक कथा विनोदी स्वरूपाच्या आहेत; परंतु काही गंभीर कथा हृदयाचा ठाव घेणार्‍याही आहेत. वडिलांची परवानगी नसताना चोरून पोहायला जाणार्‍या खेर यांना एकदा विहिरीत नाग दिसला आणि ते वाघ मागे लागल्यासारखे पळत सुटले. या प्रसंगाचं वर्णन ‘आज्ञेची अवज्ञा’ या कथेत येतं. तर ‘वांझोटी बबूताई’मधून मूल नसलेल्या बबूताईची व्यथा व्यक्त होते. सत्याग्रही म्हणून तुरुंगात गेलेल्या खेरांची संकष्टी चतुर्थी तुरुंगातही कशी साग्रसंगीत साजरी झाली, याचं वर्णन येतं ‘तुरुंगातील चतुर्थी’ या कथेत. ‘पिलूताई अहेवपणी गेल्या’ या कथेत अहेवपणी मरण यावं अशी इच्छा करणार्‍या पिलूताईंची इच्छा कशी पूर्ण होते, हा कथाभाग आहे. खुसखुशीत भाषेतील, नर्मविनोदी शैलीतील कथांचा मनोरंजक आणि रंगतदार संग्रह.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#कथासंग्रह#शिळोप्याच्यागोष्टी#भा.द.खेर#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#STORY#SHILOPYACHYA GOSHTI#B.D.KHER
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more